Tuesday 5 July 2011

आरक्षणामुळे आम्ही सर्व पदे काबीज केले हे पूर्णतः चुकीचे आहे.

एक गोष्ट लक्षात घ्यावी ती अशी कि "५०वर्षांपूर्वीपर्यंत मेलेल्या गायीचे मढे ओढणार्‍या महार आणि इतर अस्पृश्य जातींचे लोक शिक्षक बनले आहेत, प्राध्यापक बनले आहेत. डॉक्टर, इंजीनिअर्स तयार होतायेत."..... अशी वाक्ये जातीवाद्यांनी आपल्या मुळावर लादली आहेत. मुळात आम्ही आरक्षणामुळे हे सर्व पदे काबीज केले हे पूर्णतः चुकीचे आहे. या समाजाने हि सर्व पदे बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे, बाबासाहेबांनी त्यांच्यात जागविलेल्या स्वभिमानामुळे, शिक्षणाच्या बळावर काय बदल घडवून आणता येतो हे या समाजाला कळून चुकल्यामुळे त्यांनी आपले एक वेळचे पोट मारून आपल्या मुलांना शिक्षण दिले. आरक्षण फ़क़्त एक मदत होती. आरक्षण हेच आमच्या उद्धाराचे एकमेव कारण नाही. तर आमच्या उद्धाराचे कारण वर सांगितल्याप्रमाणे आहे. त्यामुळे यानंतर तरी अशी वक्तव्ये सच्च्या आंबेडकरवाद्यांनी करू नये. हि विनंती !

No comments:

Post a Comment