Thursday 27 October 2016

*RSS तरूण होत आहे व आंबेडकरी चळवळ म्हातारी*

😳 *RSS तरूण होत आहे व आंबेडकरी चळवळ म्हातारी* ☺

🚩 भारतात दोन विचारधारा क्रांती व प्रतिक्रांतीच्या पथदर्शक आहेत.
       👉🏻 *आंबेडकरी चळवळ क्रांतीच्या मार्गावर चालणारी* तर
       👉🏻 *RSS प्रतिक्रांतीच्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारी*

🚩RSS ला इथली संविधानिक लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाची *व्यवस्था उध्वस्त करायची आहे* व त्या दिशेने ते पाऊले टाकत आहेत.
👉🏻तर दुसरीकडे...
🇪🇺 आंबेडकरी चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे संवर्धन, पालनपोषण व संरक्षण करणारी *संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे.* असे असतांनाही ही चळवळ गर्तेत अडकली आहे.

👉🏻 *एकीकडे*...
🚩RSS च्या शाखा वाढत आहेत. वाढणाऱ्या शाखांमध्ये तरूणाईचा भरणा होत आहे. *तरूणांना आकर्षित करून RSS पुढच्या प्रतिक्रांतीच्या ५०-६० वर्षाची तजविज आजच करून ठेवीत आहे.*

👉🏻 तर *दुसरीकडे...*
🇪🇺आंबेडकरी चळवळ काही मोजक्या वय संपत चाललेल्या लोकांपर्यंत मर्यादीत होत चालली आहे. *तरूणाईला आकर्षित करणारा कृतिकार्यक्रम आंबेडकरी चळवळीच्या म्होरक्यांकडे दिसून येत नाही.*

✍🏻 *कुठल्याही संघटनेचे वय वाढत असतांनाच तरूणाईच्या बळावर त्या संघटनेचे आयुष्य दुप्पटीने वाढत जात असते. पण तरूणाईपासून दूर जाणारे संघटन प्रौढावस्थेत म्हातारे होत जाते.*

✍🏻 क्रांतीला प्रतिक्रांतीसोबतचे शितयुद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी *क्रांतीच्या नायक शिलेदारांची ही जबाबदारी आहे की आंबेडकरी चळवळीत उपकार म्हणून कार्य करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून कार्याला लागा.*

✍🏻 प्रतिक्रांतीवर मात करायची असेल तर शिस्त व संयम पाळायला शिका. *एखादी कृती करून समाजमन जिंकले की लगेच नायक होण्याची महत्वाकांक्षा बाळगू नका.* व लगेच आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व करणाऱ्यांवर प्रश्नांकित वयल निर्माण करू नका. *तुम्ही एका जबाबदारीचे निर्वहन करून चळवळीत आपले योगदान दिले. असेच प्रत्येकाने आपआपली जबाबदारी म्हणून आंबेडकरी चळवळीत योगदान दिले तरच ही चळवळीचे आयुष्य चिरकाळ टिकेल.*

✍🏻 मोर्चे काढली, चार माणंस जमवली म्हणजे चळवळ चालत नसते. तत्कालीन मुद्यांवर लढणे म्हणजेच चळवळ नव्हे. तर *तत्कालीन मुद्यांवरील लढ्याचा भविष्यावर दूरगामी परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन संयमी लढ्याची आखणी करणे चळवळीच्या शिलेदारांचे काम आहे.*

🙏🏻👉🏻 *आंबेडकरी चळवळीतल्या व परिवर्तनवादी आंदोलनातल्या माझ्या तरूण मित्रांनो...*👉🏻

🗣 *शत्रु जेव्हा स्वतःचे शक्तीप्रदर्शन करीत असतो तेव्हा त्याच्या शक्तीप्रदर्शनाची चिकीत्सा करून तो वेळ चिंतनात घालवायचा असतो.* हे युद्धनितीचे साधे व सोपे नियम आहे.
🗣 *शत्रुंचे शक्तीप्रदर्शन व तुमचेही शक्तीप्रदर्शन दोन्ही एकसाथ, एकाचवेळी सुरू असेल तर त्याला युद्ध असेच म्हणतात.* शक्तीप्रदर्शनाची कीतीही नावे बदलली तरीही....
🗣 ज्या गोष्टींच्या संरक्षणासाठी तुम्ही तुमचे शक्तीप्रदर्शन कराल त्याच गोष्टीच्या विरोधात शत्रु जनमत तयार करीत असतो हे लक्षात घ्या. *आज ज्याच्या सन्मानार्थ तुम्ही शक्तीप्रदर्शनाला तयार आहात तेच उद्धस्त करण्यासाठी उद्याचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.*
🗣 *शत्रु तरूण होत आहे. तुम्हीही नवी उमेद जागवा. शस्त्राने नव्हे अस्त्राने सज्ज व्हा. शक्तीप्रदर्शनासाठी नाही तर नितीने सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी...*

🙏🏻🇪🇺 मित्रांनो, निती ओळखा, कृती ओळखा, चाल ओळखा, चिंतन करा, जबाबदारी घ्या. तुम्ही नेहमीच शक्तीप्रदर्शन करीत आला आहात. *हा काळ चिंतनाचा आहे, तो चिंतनात घालवा. व नव्या दमाने, नव्या उमेदीने, नव्या नितीने सज्ज व्हा !*
✍🏻___*अॅड.डॉ. संदीप नंदेश्वर...*

Tuesday 25 October 2016

मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...

🙏🏻🇪🇺 *मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...*🇪🇺🙏🏻

मोर्चाच्या निमित्ताने गर्दी होत आहे व त्यामुळे समाज संघटीत होत आहे ही आशादायक व सकारात्मक म्हणून स्वागतार्ह बाब म्हणता येईल.
                 🙏🏻 *पण* 🙏🏻      
   
🙏🏻 *गर्दी संघटीतपणाच्या भावनेतून होत असेल तर योग्य अन्यथा असुरक्षित भावनेच्या भरावर गर्दीत सुरक्षितता शोधण्यासाठी माणसं सामिल होत असतील तर कसायाच्या कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या कळपाचा भाग होऊन स्वतःचा खात्मा करून घेण्यात काहीच अर्थ नाही.*

🙏🏻 *गर्दीला वैचारिक बैठक नसेल, गर्दीला पुर्णकालीन सेनापती नसेल तर गर्दी ही कळपात परावर्तित होते. व कळपात कुणीही सुरक्षित राहू शकत नाही. गर्दीला राजकीय व सामाजिक शहाणपण देता येत नसेल तर गर्दीत चेंगराचेंगरी होऊन भविष्यात या गर्दीतील सामिलांची हाणी मात्र नक्कीच आहे.*

🙏🏻 मोर्चे काढा तो तुमचा अधिकार आहे. गर्दीही करा तोही तुमचा अधिकार आहे. पण *गर्दीत सहभागी होण्याआधी किंवा गर्दी जमविण्याआधी मोर्चातील विषयावर याआधी एकतरी दिवस कधी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम केले का हे स्वतःला विचारा. पिडीतांना, अन्यायग्रस्तांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी कधी पुढाकार घेतला आहे का ? ते तपासा. किंवा त्यावर थातूरमातूर कधीतरी अभ्यास तरी केला का ? हेही तपासा. व्यक्तीगत जबाबदारी टाळून सामुहिक जबाबदारीत सहभागी होणे पराभवाचे लक्षण आहे.*

🙏🏻 *ज्या समाजातील व्यक्ती व्यक्तीगत जबाबदारी समजून सतत ईतरांसाठी कार्यरत असतो तो समाज कधीही पराभूत होऊ शकत नाही. सामुहीक जबाबदारीचे निर्वाहण व्यक्तिगत जबाबदारीच्या निर्वाहणातूनच पुर्ण करता येते.*

👉🏻🚩 *इतरांच्या कळपांना पाहून* 🇪🇺 *तुम्हीही कळप बनवायला लागले* तर घात होण्याची संभावना शतप्रतिशत आहे. कारण 🚩 *त्यांचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणाने ओतप्रोत आहे. तर 🇪🇺 *तुमचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणापासून कोसो दूर आहे.

        🙏🏻 *राजकीय व सामाजिक शहाणपणा गर्दीतील माणसांना देता येतो का ते बघा*

           🙏🏻 *विचार करा !* 🙏🏻
✍🏻___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Monday 17 October 2016

मोर्चे काढायचे असतील तर नक्की काढा !

🌹 *बंधूंनो* 🌹
🗣🏃🏃🏃 *मोर्चे काढायचे असतील तर नक्की काढा !* 🏃🏃🏃
                  🙏🏻 *पण* 🙏🏻
*या प्रश्नांची उत्तरे देता येईल का ते बघा !*
*___अॅड.डॉ. संदीप नंदेश्वर*

🇪🇺 *तुमच्या मोर्चा काढल्याने गावातला माणुस सुरक्षित होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने गावातील जातीय भेदभाव, जातीय तणाव, व जातीच्या आधारे होणारा अन्याय अत्याचार थांबत असेल  व जातीभेद वाढणार नसेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने जातीअंत होणार असेल व जात संपणार असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने व त्यात वाढलेल्या गर्दीने माणुस व समाज, देश, सरकार, सत्ता, सत्ताधारी बदलत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने सरकार तुमच्या हिताचे तात्पुरते निर्णय न घेता कायमस्वरूपी निर्णय घेऊन तुम्हाला न्याय देणार असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने गावातला तणाव मावळत असेल व अन्यायग्रस्ताला न्याय मिळत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने माणसांच्या भौतिक व व्यावहारीक आयुष्यात बदल होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही काढत असलेल्या मोर्चाने गावातला सामान्या माणुस सुरक्षित होत असेल किंवा मोर्चानंतर त्याला सुरक्षितता देण्यास तुम्ही सक्षम असाल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने सामाजिक विषमता नष्ट होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

---पण *तुमच्या मोर्चाने यातले काहीच होत नसेल किंवा होतांना दिसून येत नसेल तर मोर्चा कशासाठी ?*

👉🏻 *जातीय तणाव वाढविण्यासाठी...*
👉🏻 *जातीची ताकत व संख्या दाखविण्यासाठी...*
👉🏻 *जातीय भावना व प्रेरणा घट्ट करण्यासाठी...*
👉🏻 *कुणाचे तरी राजकारण फोफावण्यासाठी...*
👉🏻 *कुणीतरी आखलेल्या षडयंत्राला पुर्णत्वास नेण्यासाठी...*
👉🏻 *गावातल्या सामान्य माणसाला असुरक्षित करण्यासाठी...*
👉🏻 *मोर्चाची भावनिक गर्दी दाखवून पुढचे व्यैयक्तिक राजकीय लाभ घेण्यासाठी...*

🙏🏻 *बघा बंधूंनो यातले तुम्हाला काही उत्तर देता येईल का ?*

🇪🇺🙏🏻👉🏻 *काही कृतींचे परिणाम लगेच दिसून येत नाही पण दूरगामी परिणाम करून जातात. जाती, असुरक्षितता, अन्याय, अत्याचार, भेदभाव मजबूत व घट्ट करून जातात.*

   🙏🏻 *बघा एकदा विचार करून !* 🙏🏻
___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Friday 14 October 2016

*कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा पाठींबा नाही.*

*कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा पाठींबा नाही.*
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

*मा. बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आव्हानानुसार कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा किंवा कुठल्याही जबाबदार कार्यकर्त्यांचा पाठींबा नाही.*

महाराष्ट्रात काही ठिकाणी अॅट्रोसिटी समर्थनाच्या नावाखाली प्रतिमोर्चे काढले जात आहेत. *हे मुकमोर्चे किंवा प्रतिमोर्चे दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपुर्वक काढले जात आहेत असा आमचा आरोप आहे.*

*दि. १६/१०/२०१६ ला निघणाऱ्या नांदेड येथील प्रतिमोर्चाला भारिपचा विरोध आहे.* स्वतःला भारिपचे कार्यकर्ते म्हणविणारे काही कार्यकर्ते या मोर्चात किंवा आयोजनात सहभागी होत असतील तर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही असे आम्ही जाहीर करीत आहोत.

महाराष्ट्रात जे काही अट्रोसिटी समर्थनाच्या नावाखाली प्रतिमोर्चे निघत आहेत किंवा आयोजित आहेत ते *सर्व प्रतिमोर्चे भाजप च्या अनुसूचित जाती जमाती सेल व राम'दास आठ'वले यांच्या कार्यकर्त्यांकडून आयोजित व प्रायोजित आहेत अशा प्रकारची ठोस माहीती आमच्यापर्यंत आलेली आहे. या मोर्चांना आर्थिक पाठबळही उपरोक्त पक्ष संघटनांकडून पुरविला जात आहे असा आमचा आरोप आहे.*

*दोन समाजात तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे कारस्थान आरएसएस ने रचलेले आहे.* व त्याला वास्तवात उतरविण्यासाठी *दलित समाजातील आपल्यातीलच पण त्यांच्या गळाला लागलेले भाजप अनुसूचित जाती-जमाती सेल व राम'दास आठ'वले यांचे कार्यकर्ते हाताशी घेऊन आरएसएस हे काम करीत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.*

तरी *भारिप बहूजन महासंघाच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की, समाजाने प्रस्थावित/आयोजित प्रतिमोर्चाला बळी पडू नये व त्यात सामिल होऊ नये. समाजाने शांतता पाळावी व आपली क्रयशक्तीचा व्यय करू नये.* असे आव्हाहन करण्यात येत आहे.

*तरी कृपया आयोजित/नियोजित/प्रस्तावित प्रतिमोर्चे थांबवावे.*

सरकार विरोधात मोर्चे काढायचेच असतील तर...
*१) अनुसूचित जाती-जमातींना तसेच ओबिसी वर्गाला दिलेल्या आरक्षणाचा बॅकलॉग (अनुशेष) त्वरीत भरून काढण्यात यावा यासाठी...*
*२) शेतकरी आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने शेतकरी विमा व एप्रिल महिण्यात (हंगाम सुरू होण्याआधी) शेती कसण्यासाठी ६०% सबसिडी लोन सर्व अल्पभूदारक शेतकऱ्यांना द्यावे व त्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करावी यासाठी...*
*३) दलित व अल्पसंख्यक संरक्षण आयोगाची त्वरीत स्थापना करून या आयोगावर फक्त त्याच प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घ्यावे यासाठी...*
*४) व इतर अन्य महत्वपुर्ण विषय...*
इ. अशा महत्वपुर्ण विषयावर मोर्चे काढावेत. पण *अॅट्रोसिटी समर्थन मोर्चाच्या नावाखाली आरएसएस च्या षडयंत्राला बळी पडू नका.*

*शांतता पाळा व शांतता राखा. अराजकता माजवू पाहणाऱ्या शक्तींना प्रतिउत्तर न देता शांतता हीच एक मोठी चपराक ठरेल.*

               🌹 *आपला* 🌹
       *___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर*
           *भारिप बहूजन महासंघ*