Thursday 24 September 2015

मा. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस

💐👇💐👇💐👇💐👇💐👇💐
जागतीक बौद्धांचा विचार करून सर्वांना एक करूयात व राज्याच्या बौद्ध  कायद्याला विरोध करूयात.
💐👇💐👇💐👇💐👇💐👇💐
प्रति,
       मा. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस
       महाराष्ट्र राज्य
       मुंबई.

सविनय "जय भिम"

महोदय,
            आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोठ्या थाटाने शपथ ग्रहण केली. शपथ ग्रहण करतेवेळी आपण स्वच्छ व सर्वसमावेशक राज्यकारभार करणार असे जनतेला निक्षूण सांगितले. परंतू हल्ली आपला कारभार तुमच्यावर मालकी हक्क असलेल्या संघटनेच्या सुचनेनुरूप चाललेला दिसतोय असा आमचा राज्याचे रहीवासी व देशाचे नागरीक म्हणून आरोप आहे. तुमच्यासारख्या हुशार व बुद्धीमंत मुख्यमंत्र्यावर असणार सेवक संघाचा प्रभाव राज्यातील नागरीकांना अडगडीत टाकणारा आहे. हे निदान आपल्या लक्षात यावे व आपण घेत असलेले घाईच्या निर्णयावर सेवक संघाच्या प्रभावातून बाहेर पडून चिंतन करावे यासाठी हा पत्रप्रपंच...
              राजद्रोहाचा आपण लावलेला नविन सरकारी निकष असो की हल्लीच तातडीने २१ सप्तेंबर २०१५ ला "राज्यातील बौद्धांसाठी बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा" बनविण्यासाठी गठीत केलेली मसुदा समिती असो; आपण आपल्याच कालावधीत सेवक संघाला अपेक्षीत यश मिळवून देण्याचा चंग बांधलेला दिसतोय. हे राज्याच्या व देशाच्या सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहे हे आपण लक्षात घ्यावे.
             दि. २१ सप्तेंबर २०१५ ला "राज्यातील बौद्धांसाठी बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा" बनविण्यासाठी गठीत केलेली मसुदा समितीचे परिपत्रक आपण काढले. त्यावरून राज्यातील बौद्धांच्या प्रश्नांवर आपण गंभीर आहात असे दिसून येते त्यामुळे आपल्या सारख्या बुद्धीवंत मुख्यमंत्र्याला बौद्ध जनतेतर्फे काही प्रश्न विचारतो आहोत.
          १.  बौद्ध फक्त महाराष्ट्र राज्यातच आहेत का ? संपूर्ण देशात बौद्ध नाहीत का ? संपुर्ण देशात जर बौद्ध राहत असतील तर महाराष्ट्र सरकारचा कायदा संपूर्ण देशातील बौद्धांना लागू होईल का ? आणि हे सर्व कोणत्या संविधानिक तरतुदीच्या माध्यमातून ? राज्याला तसा अधिकार आहे का की एका विशिष्ट धर्मियांसाठी संपूर्ण देशात व जगभरात पसरलेल्या बौद्ध धम्मानुययांसाठी कायदा बनविण्याचा अधिकार आहे का ? घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते ?
           २.   जगाच्या व या देशाच्या इतिहासात कधीतरी एका विशिष्ट धर्मासाठी एका विशिष्ट राज्याने फक्त त्या राज्यात राहणा-या त्या धर्माच्या लोकांसाठी कायदा बनविला आहे का ? संविधानाने तो अधिकार राज्याला दिलेला आहे का ?
           ३. जो धम्म निरिश्वरवादी, विज्ञानवादी, जिवनदर्शन देणारा आहे त्याला सुचिबद्ध व कलमबद्ध करता येणार आहे का ? तो तसा कलमबद्ध करतांना बौद्ध धम्मातील तत्वे जी संस्कृतमिश्रीत हिंदू धार्जिनी आहेत त्याला आधार बनविणार की पाली या प्राचीन बुद्धकालीन बोलीभाषेतील तत्वांना अंगीकारणार आहात ?
           ४.   धम्म आणि धर्म यातील गफलत तुमच्या या कायद्याने दूर होणार आहे का ? धम्माला धर्माने कोडीबद्ध करण्यामागचा तुमचा हेतू काय आहे ?
            ५.    तुम्ही मसुदा समितीत निवड केलेल्या अशासकीय सदस्यांची निवड करतांना कुठला निकष ठेऊन निवड केली. ती अशासकीय सदस्य मसुदा समितीच्या सदस्यत्वासाठी पात्र आहेत का ? की तुमच्या सेवक संघातले विश्वासू म्हणून आपण त्यांची निवड केली ? समितीतील सदस्य बौद्ध आहेत का ? की अजूनही ते "हिंदू महारच.      किंवा अनुसूचीत जातीचेच" आहेत ? हे तपासले का ? जर ते तसेच असतील तर त्यांना बौद्धांसाठी धार्मिक कायदा बनविण्याचा नैतिक व कायदेशिर अधिकार आहे का ?
         ६.  या कायद्याने राज्यातील बौद्ध जगातल्या बौद्ध धर्मियांपासून व देशातल्याच ईतर राज्यातील बौद्ध बांधवापासून वेगळे दाखवायचे आहे का ? त्यांना वेगळे पाडायचे आहे का ? किंवा तुमचा तसा उद्देश आहे का ?
          ७.  तुमच्या मसुदा समितीतील डॉ. मिलींद माने हे तुमचेच प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नावापूढे तुम्ही Adv. मिलींद माने असे लावले आहे. हे तुम्ही जाणीवपुर्वक राज्यातील बौद्ध जनतेची फसवणुक करण्यासाठी तुम्ही करीत आहात असे वाटत नाही का ?
         ८.  बबन कांबळे, भैय्याजी खैरकर, राहूल बोधी सारख्या माणसांचा बौद्ध धम्माविषयीचा अभ्यास आहे का ? त्यांचे बौद्धांच्या जिवनात काय योगदान आहे ? हे सर्व हिंदू महार आहेत की बौद्ध याचा खुलासा केला का ?

            मुख्यमंत्री महोदय बौद्धांसाठी कायदा करण्याचा घाट तुम्ही घातला त्याआधी या प्रश्नांचा खुलासा करावा. बौद्धांसाठी फक्त एखाद्या राज्याने त्या राज्यासाठीच कायदा बनवावा हे आम्हाला मान्य नाही.
            बौद्धांसाठी कायदा बनविण्याची गरज भासलीच तर आम्ही "युनिवर्सल बुद्धीस्ट अक्ट" ची मागणी करू जी राज्याच्या अधिकारक्षेत्रात राहणार नाही तर जगातील तमाम बौद्धांसाठी तो कायदा असेल. व जगातील जागतिक बौद्ध विद्वानांच्या त्या मसुदा समितीत सदस्यत्व सहभाग असेल. त्यामुळे तुमच्या कार्यकाळातच हा कायदा व्हावा असा अट्टाहास आपण धरू नये त्याला आम्हा सर्वांचा विरोध आहे.
           बौद्ध कायद्याच्या अनुषंगाने आपण या बाबींवर बुद्धीप्रामाण्यवादी विचार करून त्वरीत निर्णय घ्यावा अशी विनंती आहे.
           "जय भिम"
                             कुठल्याही द्वेषभावनेशिवाय...
                          आपला नागरीक मित्र
                  Adv. Dr. Sandeep Nandeshwar, Nagpur.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हे पत्र आपल्या सर्वांच्या सहयोगातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले पाहीजे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Saturday 19 September 2015

"बघ ! तुला माझा आभास होतो का ?" 13

"बघ ! तुला माझा आभास होतो का ?" चा पून्हा एक नवा बंध आपल्याशी थेट कोल्हापूरातून जोडतो...तो तुम्ही तुमच्या सखीशी जोडा...
🌹🌹प्रतिक्रिया जरूर द्या🌹🌹

सखे,
निघालीस का चर्चासत्रातून बाहेर
"मेरीट" चा बुरखा फाडून
व्हा छानच...
चल आता लगेच
कोल्हापूरला जाऊन येऊ...
समिर गायकवाडला सांगून येऊ...
त्याच्या प्रेयसीला घेऊन येऊ...
पून्हा एक गोळी शंकरापीठावर दागून येऊ...
नव्या मनुस्मृतीच्या मसुदा समितीवर
फायरींग ...
आता तु आणि मी
मिळूनच करू...
आणि अख्ख्या बुलेट शेल मुख्यालयाच्या पायथ्याशी लोळवू...
त्यांनी पानसरेच संपविला रे
इतिहासाच्या पानावर येतील अशा पिढ्याच आपण संपवू...
फक्त त्या विचारपिठावरून एकदा म्हण...
"माझ्या बंधू आणि भगिनिंनो..."
सारेच तुटून पडतील
तुझ्या या डरकाळीने...
समिर गायकवाडचीच प्रेयसी काय...?
अरे सा-याच "इंद्रा"च्या प्रेयस्या तुझ्या पायघडी लोळतील...
आणि सा-याच शंकरापीठाचे इमले जमिनदोस्त होऊन...
पायथ्याशी हजारो दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी जन्म घेतील...
सखे, सांग तु त्यांना
इथे हजारो सख्या पेटल्या इतिहासात
त्यांची राख अजूनही धगधगते..
तुम्ही एक जोडी निवडली...?
इथे पावलो पावली जोड्या बनतायत...
त्या समिरच्या हातातली बंदूक तू घे !
त्याच्या हातात इतिहासाची पेन दे
न पुसणा-या गर्द निळ्या शाईची...
आता होऊनच जाऊ दे छेद...
यांच्या नसलेल्या पृष्ठभागी इतिहासावर
पुन्हा कुठली मनुस्मृती आदेशच देणार नाही
कुठल्या समिर गायकवाड व त्याच्या प्रेयसीला
तु डाग यांच्यावर इतिहासाचे, विज्ञानाचे, वास्तवादी विचाराचे तोफगोळे
ही संधी आहे तुला
माझी सखी (प्रेयसी) बनण्याची...
खोट्या इतिहासातल्या पिढ्या संपविण्याची...
चल चाल करून जाऊया...
शंकरपिठाच्या मुख्यालयी
नव्या मनुस्मृतीच्या मसुद्याला उध्वस्त करण्यासाठी...
तो उध्वस्त करतांना तु थरथरणार नाही
तेव्हा...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
आपला
डॉ. संदीप नंदेश्वर
🌹🌹हा संदेश तुमच्या प्रत्येकच सखीला (प्रेयसीला) पाठवा.🌹🌹

Monday 7 September 2015

"बघ तुला माझा आभास होतो का ?" 12

माझ्या प्रस्तावित "बघ तुला माझा आभास होतो का ?" या महाकाव्यातील सखी तुमच्याशी नियमीत संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. यातील आकृतीबंध आपल्यात सम्यक क्रांतीची ज्वाला निर्माण करतील अशीच अपेक्षा...

सखी,
चल लवकर निघ
कॉलेज ला जायचे आहे
आंबेडकर-पेरीयार स्टडी सर्कलच्या चर्चासत्रात
वैचारीक क्रांतीची ज्वाला भविष्यावर पेरायची आहे
पण
सावधानतेने...
त्या पुस्तकाच्या कपाटाकडे जा
त्यात एका कप्यात ठेवलेले
अणुबॉम्ब दिसेल
निघतांना ते सोबत घ्यायला विसरू नकोस
पुन्हा दोन पावले समोर जा
स्टडी टेबलवर ठेवलेले माझे
एके-४७ सुद्धा सोबत घे
ड्रावर उघड
त्यातील छन्नी हातोडा हातात ठेव
विचारू नकोस हे सर्व कशासाठी...
आज या सर्व शस्त्रांचा उपयोग होण्याची शक्यता आहे
शास्त्रांवर चढलेली मेरीट ची धुळ यांनीच साफ करायची...
कारण...
यांचे फतवे निघणार आहेत
ब्यॉन प्रतिबंध लावला जाणार आहे
'मेरिट'चे बुजगावणे तोंड वर काढतील
हातात लाठ्या काठ्या घेऊन
"जय श्री**" च्या घोषणा करीत चाल होणार आहे.
तेव्हा तयार रहा...
छन्नी हातोड्याने त्यांच्या कपाळावर
'जन्मजात मेरीट' चे ठीगळ कोरण्यासाठी...
एके-४७ ने या "मेरीट" ची वंशावळ संपविण्यासाठी...
"घोकणपट्टी मेरीट" चे पंडुधारी पोपटपंछी कायमचेच संपवायचे,
व्यावहारीक सामाजिक बुद्धीमत्ता निर्माण करण्यासाठी...
तुला आता अणुबॉम्ब सोडायचे.
न खचता, न डगमगता
तुझ्यातली व्यावहारीक बुद्धीमत्ता सिद्धच करायची
यांच्या वांझोट्या कुशीत असलेल्या शास्त्रीय बुद्धीमत्तेला मला गर्भार करायचे आहे.
सामाजिक समानतेचे बिज यांच्या गर्भात सोडायचे
पून्हा एक दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी
यांच्या गर्भात सोडायचा आहे.
आणि
हार्दीक पासून विजय पर्यंत
सर्वांचा गर्भपात करायचा...
तेव्हाच हे गुदमरायला लागतील
"बचाओ" चा नारा द्यायला लागतील
तेव्हाच तू चर्चासत्राचे आभार मानून बाहेर पड...
बाहेर पडतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?

आपलाच...
Adv.डॉ. संदीप नंदेश्वर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक्रीया जरूर कळवा...

आरक्षणविरोधी हार्दीक पटेल वा विजय दर्डा

👇👹🔕👇👹🔕👇🔕👇🔕👇
सद्या देशात आरक्षणाविरोधात मानसिक वातावरण तयार करण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहे. हार्दिक पटेल ते विजय दर्डा पर्यंतची साखळी अतिशय शिस्तबद्ध काम करीत आहे. त्यातून चिटपूट प्रतिक्रीयावादी आंदोलन करून आम्ही जिंकल्याचा उन्माद आणीत असू तर थांबा ! कुठे तरी चुकतेय...

आरक्षणाच्या समर्थनात तुमच्या प्रतिक्रीया तुष्टीकरणात आहेत. नेतृत्वाविना जंगलात भरकटलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे. एकीकडे आरक्षणाचा लाभार्थी तमाम वर्ग तुष्टीकरणात अडकलेला आहे. आरक्षण असावे की नसावे ? याविषयी हा लाभार्थी वर्ग निरूत्तर आहे. आरक्षण लाभार्थ्यामध्ये एकता नाही. तर दूसरीकडे आपल्या प्रतिक्रीयावादी आंदोलनाने आरक्षण विरोधी गट अधिक सक्रीय होऊन एकजूट होत आहे. तो पून्हा तिव्र व्हावा हेच यामागची भूमिका आहे. आम्ही "जय भिम" चा नारा देऊन किती काळ ही लढाई टिकवून धरणार आहोत. ? हा खरा प्रश्न आहे.

आरक्षणविरोधी हार्दीक पटेल वा विजय दर्डा पर्यंत थांबले आहेत असा विचार आम्ही करीत असू तर नक्कीच चुकतोय.

कारण नौकरीतील आरक्षण आमचे केव्हाचेच संपवून टाकण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गात आरक्षीत समाजाचा उमेदवार घेतला जाणार नाही असे प्रशासकीय, शासकीय व न्यायीक फतवे केव्हाचेच निघालेत. शिक्षण व नौक-यांतील आरक्षण हे फक्त तुम्हाला दिलेल्या संवैधानिक प्रतिशत पर्यंत सिमीत करून बाकीचे सर्व केव्हाचेच अकायदेशिररित्या बळकावण्यात आले आहे. आम्ही उरलोत ते फक्त रस्त्यावर जिंदाबाद मुर्दाबातचा नारा लावण्यापर्यंतच...व्हा !

विरोधक यशस्वी होतायत संघटीत समाज व संघटीत समाजाचे मुखीयाधारी नेतृत्व स्विकारून. आम्ही संघटीत होत नाही. नेतृत्वाची तर एलर्जीच जणू काही लागलेली. उरलेसुरले २-४ टाळके रस्त्यावर उतरून जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा लावून दिवाळखोरी दाखवण्यात अव्वल ठरतात व संपुर्ण समाजाला हेटाळणीचा विषय करून मोकळे होतात.

चळवळीचे गांभिर्य हरवून नेतृत्वहीन क्रांती, आंदोलन, चळवळी ना इतिहासात यशस्वी झाल्या, ना ही वर्तमानात  होत आहेत व ना ही भविष्यात होतील. समाजाच्या गर्भात शिरून पून्हा क्रांतीची गर्भधारणा करावी लागेल. व पूर्ण विकास झाल्याशिवाय क्रांतीच्या बाळंतपणाची घाई करणे अंगलट येण्यासारखे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सक्षम नेतृत्व न स्विकारल्यामुळे आरक्षीत वर्गाचे तुष्टीकरण व आरक्षण विरोधकांचे होणारे पोलरायझेशन भविष्यातील अनेक पिढ्या बर्बाद करणारे ठरेल हे समजून घेता आले तरी आम्ही नैसर्गिक बाळंतपणातून सुदृढ क्रांतीला जन्म देऊ शकू.

२-४ टाळक्यांच्या नेतृत्वविरहीत जिंदाबाद, मुर्दाबाद च्या घोषणांमध्ये ही चळवळ लयास जाऊ नये एवढीच तुर्तास अपेक्षा !
...डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
👆👆👆👆👆👆👆👆👆👆🎤

"बघ तुला माझा आभास होतो का "?

आज नागपूरात थोड्याच वेळापूर्वी विजगर्जनेसह आलेल्या पावसाने माझ्याही लेखणीची विज कडाडली. आणि प्रस्तावित "बघ तुला माझा आभास होतो का "? या प्रस्तावित महाकाव्याला बंध मिळाला. तो तुमच्याशी लगेच शेअर करतोय...प्रतिक्रीया जरूर कळवाव्या ही विनंती,

आज अचानक विजा व पावसानी हल्ला सुरु केला
वादळासवे पाऊस अचानक सुरु झाला
विजांचा कडकडाट असह्य झालाय
तु पाऊस आणि मी विज...
चल बरसुया त्या महालातल्या वाड्यावर,
जिथे जिंदगीचा धिंगाणा घालून
मानवतेच्या खूनाचा कट रचला जात आहे
नंग्या साधूंच्या विक्षीप्त शरिरावर कपडे घालून बसलेत सर्व...
शासकीय महालातून तुझ्या माझ्या ऑनर किलींग चे फतवे काढण्यासाठी,
तु आणि मी झिजून पेरलेल्या आरक्षीत जागेवर बसण्यासाठी...
त्यांच्यावर कोसळायचे आहे विजेसह
आणि
तुला बरसायचे आहे गोदावरीला पूर येईपर्यंत
अगं...
विचार का करतेस एवढा ?
मी आहे ना तुझ्यासोबत...
ऐरवी मी कडकडायला सुरवात केली की तु बरसायला सुरवात करतेस...
आज मी नागपूरातून कडकडतोय
तु नाशिक मधून बरसायला  सुरवात कर...
फार विचार करू नकोस
देव-इंद्र, नर-इंद्र तुला आणि मलाही पुजतील
फक्त विश्वास ठेव माझ्या कडाडण्यावर
आणि तुझ्या बरसण्यावर...
अगदी तसाच...
जसा तू पुण्याच्या शनिवारवाड्यावर बरसली होतीस
आणि मी पेशवाईवर कडाडलो होतो
तु गरिबीवर बरसली होतीस
आणि मी कडाडलो अस्पृश्यतेवर
सखे !
जसे...
तुझ्या माझ्या संयोगाशिवाय ईथे शक्यच नाही जलधारा बरसने व विजांचा कडकडाट होने...
तसेच...
आज तुझी माझी गरज आहे वाड्यावरचा काळा झेंडा उतरविण्यासाठी...
तू बरसणार...
आणि मी कडाडणार...
या माणसांच्या डोक्यावर-उरावर साचलेले काळे ढग मिटविण्यासाठी...
तु चल तयारीला लाग !
तोच शनिवारवाडा, पेशवाई, गरिबी, अस्पृश्यता तुला मला खुणावतेय...
छळतेय...
आता तुझ्या माझ्या मिलनाची वेळ जवळ आली...
घट्ट मिठी मारून...
मिलनकथेची आतुरता घेऊन बाहेर ये...
तुला बाहेरच दिसेल...
तु आणि मी मिळून केलेला हल्ला...
आक्रमणsssss....
असे शब्द कानावर पडतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
आपलाच...
डॉ. संदीप नंदेश्वर...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक्रीया जरूर द्या !

Saturday 4 April 2015

असामाजिक तत्वोंको रोखीये !

🙏 ध्यान से पढीए और सब को शेअर करे ! हम सभी के लिए बहोत जरूरी ! 🙏

सुप्रिम कोर्ट ने IT Act की धारा 66 संविधान की अभिव्यक्ती स्वतंत्रता के विरूद्ध होने का हवाला देकर रद्द कर दिया ! जिसका लाभ लेकर समाज मे पनपते असामाजिक तत्व फेसबूक ओर वॉट्स अँप जैसे सोशल मिडीया मे डॉ. बाबासाहब आंबेडकर जी के बारे मे विकृत टिपणीया, कॉमेंट, फोटो, पोस्ट डाल रहे है ! यह सिलसिला आगे भी चलते रहेगा ! कई बहूजन महापूरूषोंके बारे में यह सामने आएगा ! क्योंकी देश की सरकार और उनके धार्मिक नुमांईंदे इन असामाजिक तत्वो को यह सब करने की प्रेरणा दे रहे है !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती के कार्यक्रम के आयोजन मे आप सभी व्यस्त होंगे ! चारोतरफ आनंद का माहौल है ! इस माहौल को तोडने हेतू, आपके आनंददायी माहौल को खराब करने हेतू यह असामाजिक तत्व बाबासाहेब की प्रतिमा सोशल मिडीया मे खराब कर के आपका ध्यान आकर्षित करना चाहेंगे ! आप मे उग्रता भरना चाहेंगे ! आपको भडकाना चाहेंगे ! लेकीन आप इन लोगो के तरफ ध्यान न देते हूए जयंती कार्यक्रम को हर्षोल्हास के साथ मनाए ! यही उनको हमारे तरफ से सही जवाब होगा !

आप सभी को कुछ सूचनाए :-
१) ऐसी कोई भी घटना आपके सामने आती है, आपके नजर मे आती है, या आपको पता चलती है, तो तुरंत ही नजदीकी पोलिस स्टेशन मे जाकर IPC धारा 295, 295(A), और 296 के अंतर्गत FIR दाखिल करे !
२) पुलिस वाले अगर आपसे सिर्फ लिखित रिपोर्ट (NC) दर्ज कराने को कहे तो उसे नकारकर FIR दर्ज कराने पर अडीग रहे ! और FIR की कॉपी हाथ मे लेकर ही पोलिस स्टेशन से प्रस्थान करे !
३) हो सके तो तहसिलदार, जिल्हाधिकारी को निवेदन दे ! और एेसे असमाजिक तत्व को जल्द से जल्द कडी सजा देने की मांग करे ! ताकी पोलिस प्रशासन आपकी रिपोेर्ट को गंभीरता से ले !
४) यह ध्यान रखे की, असामाजिक तत्व बाबासाहब आंबेडकर या कोई भी महापूरूष की छवी को कितना भी प्रदूषीत करने की कोशीश करे उनकी महानता कम होनेवाली नही है ! क्योंकी यह महापूरूष दुनियाभर मे अपनी महानता की छबी छोड गए है !
५) सोशल मिडीया पर होनेवाली टीप्पनीयों को जादा गंभीरता से न ले ! और अपने ध्येयपूर्ती पे ज्यादा ध्यान दे !

👉 यह कदापी न करे :-

६) सोशल मिडीया पर महापूरूषों को अपमानीत करने वाली पोस्ट, फोटो, टिप्पनीयों को खूद शेअर न करे !
७) दूसरोंको इसकी जानकारी देने के चलते आप खूद ही उसको वायरल करके अपमानीत न करे ! बल्की मित्रोंको एक जगह बुलाकर तुरंत पुलिस को खबर करे ! लेकीन एकदुसरे के मोबाईल पर या ग्रूप पर शेअर न करे !
८) अगर आप महापुरूषोंके अनुयायी हो तो उनके विचारोंको के अनुसार ही वर्तन करे !
९) जयंती समारोह मे दारू या नशीली पदार्थो का सेवन न करें और न ही कीसी और को करने दे!
🙏 Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर 🙏

👉ईस पोस्ट को गंभीरता से ले और बाकी लोगो से भी शेअर करें ! 🙏🙏🙏

Saturday 28 February 2015

बजेट - २०१५ "फिर एक बार भूलभूलय्या : खोकली मानसिकता का बजेट"

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
बजेट - २०१५
"फिर एक बार भूलभूलय्या : खोकली मानसिकता का बजेट"
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
कीसी भी देश के विकास का सपना उसके अर्थव्यवस्था पर निर्भर होता है ! और अर्थव्यवस्था का सूचारू रूप बजेट मे प्रदर्शित होता है !
📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢
विकास का झांसा देनेवाली सरकार ईतना निराशाजनक बजेट देगी इसकी कल्पना नही की थी !
👎 IIM और IIT की स्थापना को छोड दे तो शिक्षा के उपर कीया जाने वाला निवेश फिर एक बार निराश कर गया !
👉अगर हम नौजवान देश की बात कर रहे है तो बजेट का कम से कम ६% हिस्सा शिक्षा के उपर खर्चा होना जरूरी है ! गरिब और सामान्य विद्यार्थीयोंके शिक्षा के उपर सरकार गंभीरता से नही सोच रही यही साबीत हूआ !

👎रोजगार मे इजाफा लाने की बात तो हर बजेट मे होती लेकीन देश के नौजवानों में स्वयंपूर्णता लाने की कोई बात नही होती. कीतनी भी रोजगार और नौकरीयोंकी बात करे उससे सिर्फ गूलामी बडेगी !
👉बजट गूलामी बढाने के लिए नही बल्की स्वयंपूर्णता लाने के लिए हमारे देश के अर्थव्यवस्था की सबसे बडी कडी कृषीक्षेत्र और उससे जूडे संबंधीत व्यवसाय को बडावा देना जरूरी है ! लेकीन बजट मे इसका कोई समाधानकारक प्रावधान नही !
👉एक तरफ देश का कृषीक्षेत्र घटता जा रहा है ! इसकी कोई चिंता बजेट मे नही जताई गई ! अगर हम हमारे संसाधनो को घटाकर नए उद्योग खडे करेंगे तो देश एक लंबे खतरे के तरफ बढता जा रहा है !
👎Service Tax बढाकर आम आदमी को कंगाल बनाने का और Corporate Tax आनेवाले दिनोंमे घटाकर अब्जोपतीयों और कारखानदारों ने चूनाव मे जो खर्चा कीया है वो कई गूना बढाकर वापस करने का प्रावधान कर लिया गया ! आप बस Service Tax भरते जाओ !
👉Service Tax बढने से हर चिज की किंमते बढेगी और वह आम आदमी के जेब से जाएगा !
👎योगा यह नया Charitable Commodity मे आ गया ! जिसका सिधा फायदा योगा की सबसे बडी दूकान चलाने वाले रामदेव बाबा को होगा ! जिसको कोई Tax भरना नही होगा ! और ऐसे कई रामदेवबाबा योगा की दूकान खोलने के लिए तय्यार होंगे !
👎स्वास्थ, शिक्षा, सामाजिक दायित्व, कृषीक्षेत्र और स्वयंपूर्णता पर ईस बजेट-२०१५ ने पूरी तरह से निराश किया !
📡कारखानदार, पूंजीपती, उद्योगपती और साधू-बूवाओंकी बल्ले बल्ले.....

🐰बेरोजगार, कृषक और आम आदमी की ठल्ले ठल्ले.....
...Adv. डॉ. संदीप नंदेश्वर...
🔕🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐

Wednesday 11 February 2015

अविवेक जिंकला, विवेक हरला...

👹👹👹दिल्लीत भाजप, हिंदूत्व, आरएसएस व नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला नसून विवेकाचा पराभव व अविवेकाचा विजय झाला आहे.👹👹👹

दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या विजयाने फसव्या विकासाचे राजकारण पून्हा चर्चेत आले आणि सारेच विकासाच्या "कोमात" गेले.

मात्र हेच खरे वास्तव आहे का ? काँग्रेस शून्यावर आली. इतकेच नाही तर २०१३ च्या तूलनेत १५ % मत कमी पडली. अपक्ष व इतरांच्याही मतांचा टक्का कमी झाला आणि ते सर्व मते "आप" च्या पारड्यात कशी गेली ?

दूसरीकडे भाजपा ला २०१३ ला मिळालेल्या मतात (३३ %) फक्त १ % टक्का मते कमी पडली. या निवडणूकीत भाजप ला ३२ % टक्के मते पडली आहेत. मात्र ३२ जागावरून ३ जागावर भाजप आली.

इतका फरक का पडला ? याचे सरळ उत्तर हे आहे की काँग्रेस व अन्य पक्षांना पडत असलेले deciding votes यावेळी "आप" च्या खात्यात गेली. ही मते "आप" कडे कशी गेली ? की, ही मते तिकडे वळविण्यात आली ? या प्रश्नाच्या उत्तरात दिल्लीच्या निकालाचे गूढ दडलेले आहे.

दिल्लीच्या तख्तावरून १३० वर्षाची काँग्रेस हद्दपार होऊन त्याचे पडसाद देशभर परिणाम करणारे आहे. तसेच विचारसरणीवर आधारीत प्रादेशिक व काही राष्ट्रीय पक्ष पूर्णतः नाकारले जाणे. ही अतिशय गांभिर्याची बाब आहे. पण त्यातच हिंदूत्व विचारसरणीच्या भाजपा चा मतदान टक्का कायम राहणे; सोबतच कूठलीही विचारधारा पाठीशी नसणारा "आप" पक्ष भरारी घेणे देशाच्या भविष्याला प्रश्नांकीत करणारे आहे.

यावरून हेच दिसून येते की, हिंदूत्ववादी मतदार कायम ठेवून हिंदूत्वाच्या विरोधी असणारा मतदार अविवेकी, अविचारी "आप" सारख्या प्रवाहासोबत जोडला गेला. सत्ताधारी पक्षाच्या मूळाशी विचारधारा नसेल तर राज्य विवेकाने नाही तर अविवेकाने चालविले जाणार हे नक्की. आणि ही कृती भविष्यात व्यवस्था मोडकळीस आणण्यास पोषक वातावरण निर्माण करेल. याचा विचार राजकीय भाष्यकारांकडून केला  न जाणे भारतील लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहे.

"आप" च्या झंजावाताने विकासाचे व स्थानिक मूद्यांचे भांडवल राजकीय बाजारात सर्वांना आकर्षित करू गेले. आता या भांडवलाचा वापर सर्वच राज्यीय व राष्ट्रीय पातळीवर केला जाईल. यातून राजकीय वैचारीक व्यवस्था व पक्षप्रणाली मोडकळीस येईल.

काँग्रेस व अन्य पक्षांना संपवून, हिंदूत्वाला टिकवून अविवेक व अविचारी विदूषकांच्या हातात सत्ता सोपविण्यात अविवेकवादी यशस्वी झाले.

शेवटी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्या उक्ती व कृतीत कूठलाही फरक नाही. दोघांचेही वैचारीक नेतृत्व करनारे एकच आहेत हे विसरू नका.

पूढील योजना 🌹"चाय पे चर्चा"🌹 या प्रस्तावीत कार्यक्रमात आखली जाईल.
🐄🐄🐄तूम्ही विकासाची चर्चा करीत रहा ! राजकीय घमंड आणि गर्वाचे गर्वहरण झाल्याचा शंखनाद करीत रहा !🐰🐰🐰

शेवटी विचार व विवेक पराभूत होईल. त्याला आम्हीच जबाबदार राहू.
...डॉ. संदीप नंदेश्वर...