Wednesday 28 December 2011

सुबह की ताजगी नई उम्मीदे लाए
खिलते हुए अरमान ताजगी जगाए
यु न मायूस रहे उभरती हुई मुरादे
आनेवाला भविष्य मुस्कुराकर जगाए
---डॉ. संदीप नंदेश्वर
"जय भीम"

Wednesday 21 December 2011

प्रज्ञेचा विजय


प्रज्ञेचा विजय

आम्ही जगतो टीकेच्या प्रांतात
एका मनस्वी सुर्यासमान, ता-यांना दीपविण्यासाठी
जळणा-या तप्त निखा-यांना पेलतांना
जेव्हा चामडीची ढाल बनते
तेव्हा हत्तीचे सोंड फोडणारे सुडाधारी दरवाजे
आम्हाला नमन करून जातात

पंचशीलेचा झेंडा हातात घेऊन
आम्ही शिरतो त्या मरणयात्रेच्या चक्रव्युहात
तेव्हा आमच्यातल्या अभिमन्यू चा विजय होतो
कर्णाची धरुर्विद्या अधिक धारदार होते
एकलव्याचा गुरु आत्महत्या करतो
आणि अंगुलीमालातल्या प्रज्ञेचा विजय होतो.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. 

एकत्रीकरण नेत्यांचे की समाजाचे

एकत्रीकरण नेत्यांचे की समाजाचे
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

आंबेडकरी चळवळ आज एका अभिनिवेशातून जात आहे. या चळवळीतला प्रत्येकच माणूस हवालदिल झाला आहे. प्रत्येकाला येणा-या भविष्याची चिंता सतावत आहे. कौन, कधी, कुठे जाऊन बसेल याचे काहीच तारतम्य उरले नाही. अश्या परिस्थितीत समाज एकाकी पडतो. सामाजिक प्रश्नांवर ही चळवळ नेहमी आपले अस्तित्व दाखवून देत आहे. चळवळ जिवंत असण्याचे आणि प्रवाहित असण्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे या चळवळीवर नितांत प्रेम करणा-या, आंदोलन आणि लढ्यांविषयी आदर असणा-या माणसांना आजही ही चळवळ या देशाचे भविष्य बदलवू शकते यावर विश्वास आहे. परंतु नेतृत्व स्पर्धेने आणि चळवळीत इतरांनी चालविलेल्या किल्विषाने भावाभावात द्वेष तयार होत आहे. त्यातही शुद्ध आणि प्रक्षुब्द्ध अश्या आततायी पणात चळवळीतली माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. त्यामुळे अनेकदा चळवळीतील कार्यकर्त्यांकडून चळवळीवर प्रखर अशी टीका केली जातांना दिसून येते. 

आंबेडकरी चळवळीविषयी अत्यंत आदर असलेल्या सच्च्या कार्यकर्त्याच्या मनातील ही घुसमट आहे. आतापर्यंतच्या इतिहासाने हा त्रस्त आहे. त्यामुळे दोन पिढीतील लोकांमध्ये चळवळीविषयी वेगवेगळी मतमतांतरे दिसून येतात. आताच्या पिढीच्या प्रक्रिया आणि पद्धत्ती यातही फरक आहे. ही पीढी आधीच्या पिढीच्या तुलनेत सक्षम दिसत नसली तरी या पिढीजवळ असलेली उर्जा तीळमात्रही कमी नाही. आंबेडकरी चळवळीसाठी ही उर्जा निश्चितच लाभदायी ठरणारी आहे. थोडासा संयम या पिढीने आपल्या अंगी बाळगून आणि आततायीपणा सोडून सम्यक मार्गाने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.  अनुल्लेखानेही कुणाला दुखावता येणार नाही याची खबरदारी या पिढीने घ्यायला हवी. निश्चितच नेत्यांचे मार्ग पटणारे नाहीत. परंतु त्यांनी ही चळवळ तुमच्यापर्यंत आणून पोहचविली हेही या पिढीला विसरता येणार नाही. आतातरी चळवळीवर आणि नेत्यांवर टीका करीत असतांना या पिढीने आम्ही काय करू शकतो हे दाखवून द्यावे लागणार आहे. आता या तरुण पिढीला चळवळीसाठी काहीतरी नवीन प्रोग्राम द्यावा लागणार आहे. समाज त्याची अजूनही वाट पाहत आहे. नेते आपल्या मार्गावर तेव्हाच येऊ शकतात. अन्यथा यांना कितीही शिव्या मारल्या तरी काहीही निष्पन्न होणार नाही एवढेच ! म्हणून कामाला लागून आधी या पिढीला स्वतःमधले मतभेद विसरून संघटीत तरुण शक्तीचा उत्कृष्ट नमुना समाजासमोर मांडावा लागणार आहे. जो वर्तमानातील चळवळीला पोषक असेल आणि समाजाला संघटीत करणारा असेल..

इथे प्रत्येकच स्वतःला नेता मानायला लागला आहे. आणि न कळताही इतरांवर टीका करायला लागला आहे. आतातरी हे बंद व्हायला पाहिजे. टीका करतांना आम्ही समाजासाठी काय करू शकतो हे आपल्या कार्यातून आणि कृतीतून सिद्ध करून दाखविले पाहिजे.  तेव्हाच ते चळवळीसाठी पोषक राहील. अन्यथा आम्ही दुसरे तिसरे काहीही करीत नसून पुन्हा एकदा आतापर्यंत आंबेडकरी चळवळीत घडून गेलेल्या इतिहासालाच दोहरावत आहोत. खूप झाले आता...समाजाला संभ्रमित करणे सोडून एकत्र करण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी कुणावरही टीका न करता स्वतःच्या कृतीतून आणि तरुण आंबेडकरवाद्यांच्या जोरावर आता आम्हाला समाजात जाऊन किल्ला लढवावा लागणार आहे. आता आम्हाला समाजासमोर कृती कार्यक्रम देण्याची वेळ आलेली आहे. जरा याचा नीट विचार करा. विरोध केल्याने चळवळ पुढे नेता येईल की, कृती कार्यक्रम दिल्याने आपसातील मतभेद मिटवून सहकार्याच्या भावनेतून चळवळ पुढे जाईल याचा आता प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी विचार करावा..

आजपर्यंत आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात आंबेडकरी नेत्यांना एकत्र करण्याचे अनेक प्रयत्न झाले. जणू आंबेडकरी चळवळ ही फक्त राजकीय चळवळ आहे अश्या आविर्भावात काहींनी दिशाभूल केली आहे. सध्या मात्र अजूनही समाजाच्या हातात काहीच लागलेले नाही. ना कधी नेते एकत्र आहे. आणि ना कधी राजकीय चळवळ चालविणा-यांनी समाजहितासाठी काही केले. भारतात आंबेडकरी समूह असा एकमात्र समूह आहे ज्या समूहाला आपल्या समाजहिताचे प्रत्येकच कार्य एकतर लढून वा आंदोलनाच्या मार्गातूनच पूर्ण करून घ्यावे लागले आहे. शेवटी किती दिवस आम्ही समाजाची शक्ती वाया घालविणार आहोत ? किती दिवस या आंबेडकरी समूहाला संघर्षच करावा लागणार आहे ? असे प्रश्न चळवळीतल्या जाणकारांकडून येऊ लागले आहेत. परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की परिवर्तनवादी समाजाला नेहमी संघर्षच करावा लागत असतो. संघर्षाशिवाय या समाजाला काहीच मिळत नाही. आणि सतत संघर्षरत असणे हेच चळवळीचे घोषवाक्यही आहे. शेवटी मानवी जीवन दुसरे तिसरे काही नसून संघर्षाचेच दुसरे नाव आहे. म्हणून संघर्षाला या समूहाचा कमीपणा न मानता त्यालाच तुमच्या चळवळीचे ब्रीदवाक्य करावे लागणार आहे.

आजची पीढी संघर्षाला तयार आहे. संघर्षाची उर्मी कमी नाही. कमी आहे ती एकोप्याची. मात्र या एकोप्याची योग्य चिकित्सा केली जात नाही. जेव्हा कधी समाजाच्या एकोप्याचा उद्दा उपस्थित केला जातो. तेव्हा हवसे, नवसे, गवसे नेत्यांना दोष द्यायला समोर येतात. मात्र स्वतःच्या कर्तव्यदक्षतेची साक्ष देत नाही. नेत्यांनी राजकारण केले हे मान्य आहे. नेत्यांचे काम राजकारण करणे हेच असते. ते समाजहिताचे झाले नाहीत याला जबाबदार नेते नाहीत तर समाज आहे. नेत्यांची सत्तास्पर्धा मान्य केली जाऊ शकते मात्र समाजही जेव्हा नेत्यांच्या या सत्तास्पर्धेत खांद्याला खांदा लाऊन चालू लागतो तेव्हा समाजाचे दुभंगणे हे ठरलेलेच असते. स्वयंघोषित नेता कधीही नेता बनत नाही. समाजमान्यता म्हणा की काही लोकांची मान्यता नेत्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो नेता होऊ शकत नाही. हा निकष आंबेडकरी चळवळीतील नेत्यांवर लावला गेला तर कुठल्याही नेत्याला दोषी ठरविण्याचा आपला अधिकारही आपण गमावून बसतो. रिपाईचे इतके तुकडे झाले ते नेत्यांनी केले नाही ते समाजानी केले आहे. नेतृत्वामध्ये सत्तालोलुपता आणि स्वार्थ आपल्या अंतिम पातळीला पोहचला असतांना अश्या नेत्यांना समाजाने (समाजातल्या काहींनी) पाठीशी घालून त्याला नेता बनण्याची संधी दिली. ही माणसे त्या नेत्याच्या पाठीशी गेली नसती आणि नेतृत्वगुण ओळखून एकाच नेतृत्वाच्या पाठीशी उभी झाली असती तर इतके तुकडे आज आपल्याला दिसले नसते. कोणत्याही समाजाचे नेतृत्व करणारा एक नेता जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्या समाजाचा संघटीत लढा यशस्वी होणे दुरापास्त आहे. 

नेमके इथेच या समूहाने कात टाकली आहे. १०० लोकांचे टोळके घेऊन चालणारही स्वतःला नेता समजतो. तो त्या १०० च्या भरोश्यावर. पण ही १०० लोक त्या नेत्याच्या पाठीशी राहून काय सध्या करून घेतात ? याचे उत्तर शोधले तर काहीअंशी स्वहित आणि स्वार्थ पण बहुतांशतः यांच्या वाट्याला काहीच येत नाही. तरीही मालक धर्म म्हणून ही माणसे त्याच नेत्याला चिकटून असतात. एखादवेळी त्यातल्या एखाद्या माणसाशी मतभेद झाले की तो त्या नेतृत्वाला दुषणे देत त्यातीलच काही माणसे घेऊन बाहेर पडतो. आश्चर्य असे की त्या टोळीतील काही माणसेही त्याच्यासोबत जातात आणि मग पुन्हा एक नेता एक गट तयार होतो. या सर्व प्रक्रियेत समाज नावाचे मोठे संघटन जे निवडणुकीच्या गर्दीत सहभागी होते. ते कुठेच नसते. नेमकी हीच स्थिती आंबेडकरी चळवळीतील राजकारणाची झाली आहे. निवडणुकीतील संख्याबळावर बोलणारा, नेत्यांना शिव्या घालणारा वर्ग मात्र नेत्यांच्या फुटीरपणाला आळा घालण्यासाठी कधीही येत नाही. 

या सर्व विवेचनातून आधुनिक पिढीला बोध घ्यायचा आहे. समाज विघटीत झाला आहे. नेत्यांच्या मागे, समाजद्रोहिंच्या मागे, समाजकंठकांच्या मागे. त्या समाजाला संघटीत करण्याची आज नितांत गरज आहे. एक नेतृत्व स्वीकारण्याची आणि त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपली संघटीत शक्ती उभी करण्याची गरज आहे. नेते एकत्र कधी येणार नाही. आणि त्यांच्या एकत्रीकरणासाठी आपली शक्ती खर्च घालून काहीही सध्या होणार नाही. नेता जेव्हा एकाकी पडेल तेव्हा काही न करता त्याचे नेतृत्व संपेल आणि समाज संघटीत राहील. लढा संघटीत राहील. आंदोलनाला बळ मिळेल. समाजहिताला प्राधान्य येईल. "नाचता येईना; आंगण वाकडे" अशी आजच्या नेत्यांची स्थिती झाली आहे. त्यामुळे एक नेतृत्व स्वीकारतांना काही बाबींचेही आम्हाला तंतोतंत पालन करावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळ हे एक वैचारिक आंदोलन आहे. विचारांशी तडजोड म्हणजे चळवळ संपविणे होईल. म्हणून विचारांना प्रामाणिक असलेला, सिद्धांतात बसणारा, लढवय्या, सामाजिक प्रश्नांची जाण असणारा आणि संसदीय प्रणालीतून लोकशाही मूल्यांशी समाजाची जवळीक निर्माण करणारा नेता आता समाजाने शोधला पाहिजे. ही जबाबदारी आता समाजाने स्वीकारून नेत्यांना घरचा आहेर दाखविण्याची गरज आहे. आणि आधीनिक पिढीने अश्या समाजाला एकत्रित करून समाजाच्या संघटीत शक्तीला प्रदर्शित करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे.  

आपण आंबेडकरी घराण्यातील नेत्यांविषयी कृतघ्न आहोत असे तुम्हाला वाटत नाही का ? अद्यापही बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याची योग्य शहानिशा कुणीही केलेली दिसत नाही. मात्र त्यांच्या वक्तव्याचा गदारोड करून सर्वच त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नसतात. प्रत्येक गोष्टीत प्रकाश आंबेडकर जबाबदार आहेत अशी भूमिका घेणा-यांनी स्वतःच्याही भूमिकेचा नीट विचार करावा. चळवळीचे हे हाल झाले असतांनाही एक दिशादर्शक नेतृत्व समाजाने अद्यापही स्वीकारले नाही. उलटपक्षी दोषारोप ठेऊन माकडांच्या हातात कोलीत आणि दुश्मनांना संधी उपलब्ध करून दिली आहे. आतातरी समाजाने अंतर्मुख होऊन नीट विचार करावा.... इतकी पराकोटीची कृतघ्नता आम्ही दाखवली आहे. म्हणूनच ही वेळ आली. आतातरी या कृतघ्नतेतून बाहेर पडा आणि सच्च्या नेत्याविषयी कृतज्ञ बना...!

नेत्यांच्या शोधात हा समाज संभ्रमित झाला आहे. हे अलीकडच्या एका आंदोलनाच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. ते आंदोलन होते मुंबई चैत्यभूमी वरील इंदू मिल ची १२.५ एकर जागा शासनाच्या ताब्यातून मिळविण्याचे. मागील कित्तेक वर्षापासून हे आंदोलन सुरु आहे. पण आताच्या आंदोलनाला बळ मिळाले तेही मा. आनंदराज आंबेडकर यांच्या आंदोलनाने. या आंदोनावर अनेक मतमतांतरे झाली पण समाजाने  इथे आपल्या संघटीत शक्तीचा नमुना प्रदर्शित केला. मा. आनंदराज यांच्या आंदोलनावर जे चुटक्या फुट्क्यांनी मतमतांतरे चालविली होती त्यांना चोप देऊन समाजाने त्याला पाठींबा दिला. त्यामुळे नाईलाजाने सर्वच नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना समाजाच्या सुरात सूर मिळवून समर्थन दिले. श्रेयाच्या लढाईत समाजाच्या पाठींब्याने आंदोलनाला बळ दिले. रिपाईच्या एकत्रीकरणासाठीही असाच पाठींबा समाजाने घेऊन आपला एक नेता निवडणे गरजेचे आहे. आणि या नेता निवडीच्या आंदोलनाची जबाबदारी आधुनिक पिढीने आपल्या खांद्यावर घेऊन त्याला समाजाचा पाठींबा घेतला तर निश्चितच आंबेडकरी चळवळीचा भविष्यकाळ सुवर्णयुग आपल्यासोबत घेऊन येईल.  

चैत्यभूमिवरील स्मारक हा संपूर्ण भारतीयांसाठी आदरणीय असला तरी तो बाबासाहेबांचे महापरिनिर्वान स्थळ असल्याने आंबेडकरी समूहाच्या तो जिव्हाळ्याचा आहे. तसाच आंबेडकरी राजकारण हाही आपल्या जिव्हाळ्याचा मुद्दा समजून आता समाजाने या आंदोलनाची तयारी केली पाहिजे. समाजरेटा हा कधीच अयशस्वी होत नाही. समाजशक्तीपुढे, समाजाच्या एकोप्यापुढे सर्वच गौण ठरत असते. हे जर सत्य असेल तर नेत्यांना एका विचारपिठावर, एका छत्रछायेखाली, एका संघटनेखाली आणणे समाजासाठी कठीण नाही.  त्यामुळे आता आम्हाला काही शहाणपणा अंगी भिनवावा लागणार आहे. इतरांना दुषणे देतांना आपली जबाबदारी ओळखावी लागेल. नेत्यांचे नाही तर समाजाचे एकत्रीकरण करावे लागेल.

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

Light of Thoughts


Tuesday 20 December 2011

बागों की परिया


बागों की परिया

बागों की परिया यु न मुस्कुराती
खिलते आसमान में पंख न लहराती
तितलियोंसी न बसती फूलोंकी सेज पर
गर मेरे आँगन में फूलों की बगीयाँ न होती

खिलती मुस्कुराती कहती है परिया
गर हम न होती तो न होती यह दुनिया
जीवन में तुम्हारे यु फूलोंकी खुशबू न होती
गर तेरे घर आँगन में नन्ही परियां न होती

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Photo 2


buddha


Jai Bheem


I hate Anna Hajare


photo 1


Monday 19 December 2011

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि "लोकपाल"

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि "लोकपाल"

भारताला भ्रष्टाचाराच्या चक्रीवादळाने भन्नावून सोडले आहेचहुबाजूने भ्रष्टाचाराचे वारे वाहू लागले आहेसभोवतालची धूळ, मिट्टी या भ्रष्टाचाराच्या चक्रीवादळाने स्वतःमध्ये सामावून घेतली आहेभारतीयांना फ़क़्त भ्रष्टाचार नावाचे बाह्यरूपी चक्रीवादळ दिसत आहेपरंतु हे चक्रीवादळ जे आक्राळविक्राळ रूप घेऊन बाहेरचे रूप दाखवित आहे. त्यापेक्षा कितीतरी भयंकर आणि आक्रमक रूप या चक्रीवादळाच्या आत शिजले जात आहे. अनेकांना भरडले जात आहे. पिळले जात आहे. मुरगाळले जात आहे. भ्रष्टाचार हे त्याचे बाह्य आवरण आहे.  मुळात याचे स्वरूप हे जातीय, वर्णीयवर्गीय  आणि धार्मिक आहे. पण भ्रष्टाचाराच्या बुरख्याआड त्याचे हे स्वरूप सर्वसामान्य भारतीयांना दिसत नाही. तशी व्यवस्थाही केली गेली आहे. जगातल्या कुणालाच ते कळू नये कि नेमके काय करायचे आहे ? आणि काय चालले आहे"लोकपाल" किंवा "जन लोकपाल" अश्या गोंडस नावाने भ्रष्टाचाराला समोर आणले जात आहे. मुळात याचे स्वरूप आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वर्णीय, वर्गीय, जातीय असेच आहे.  हे स्वरूप बाबासाहेबांच्या परिप्रेक्षातून अगदी तंतोतंत या देशातील सर्वसामान्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

मुळात भारतात आज जे काही "अण्णा हजारे आणि त्याच्या टीम" च्या माध्यमातून चालले आहे. त्याचे खरे स्वरूप बाबासाहेबांनी २१ डिसेंबर १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिलेले होतेअगदी तीच प्रक्रिया आज "भ्रष्टाचारा"चे नाव घेऊन "अण्णा हजारे" ला "गांधीवादा"चा चष्मा चढवून "लोकपाला"चे भूत लोकांच्या मानगुटीवर बसवून "सिविल सोसायटी" च्या माध्यमातून चालविली जात आहे. यांचा बळी बडतो आहे तो भारतीय माणूस ज्याने हा विचारच डोक्यातून काढून घेतला आहे. हि सर्व प्रक्रिया "आज घडून येत आहे" असे कुणीही समजून घेऊ नये. हजारो वर्षे जी "जातीवादी, वर्णवादी, धार्मिक  वर्गीय व्यवस्था" इथे चालू होती.  त्या व्यवस्थेला छेद देऊन "भारतीय संविधानाने जी समानतेची व्यवस्था" निर्माण केली. ती व्यवस्था यांना मोडीत काढायची आहे. त्यासाठी हे षड्यंत्र गेल्या अनेक वर्षापासून आखण्यात आले आहे. त्यामुळे ते आजचे आहे असे समजून घेण्याची चूक कुणी करू नयेहि "समानतेची व्यवस्था निर्माण होणार आहे" हे यांना आधीच ठाऊक होते. त्यामुळेच 1836 मध्ये इथल्या हिंदुत्ववाद्यांनी 175 वर्षांचा मास्टर प्लान आखला होता. तो मास्टर प्लान आज २०११ हा आहे. आणि म्हणूनच आज भारतात अस्थिरथा "लोकपालाच्या  निर्मितीच्या" संबंधाने आखण्यात आली आहे. 1836 ला आखण्यात आलेला मास्टर प्लान आता अंमलबजावणीत आणायचा आहे. तुम्ही आम्ही सर्व त्यात बळी पडणार आहोत. हेही तितकेच सत्य आहे.

 बाबासाहेब बहिष्कृत भारताच्या २१ डिसेंबर १९२८ च्या अंकात लिहितात, "कनिष्ठ माणसे अनेक दिवसांच्या कनिष्ठ भावनेच्या शिकवणीमुळे स्वतःच कनिष्ठ आहोत असे मानावयास लागून श्रेष्ठांचे श्रेष्ठत्व कानिष्ठांचे कनिष्ठत्व हे कृत्रिम कारस्थान नसून दैवाचा ठेवा आहे असे मानावयास लागतात ज्या अन्यायाविरुद्ध बंद करणे त्यांचे कर्तव्य असते त्याच अन्यायाला आपले नशीब म्हणून ते खुशीने मान देतातइतकेच नव्हे तर ज्यांच्या वर्चस्वाला ते आपली मान वाकवितात त्यांना लोकपाल, भूदेव, राजाधिराज अशा विशेषणाने संबोधून त्यांची प्रशंसा करू लागतात." (संदर्भ :- लेखन आणि भाषण खंड १९डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापानक्र. ३९०)

आता याचाच आढावा आजच्या वास्तवात "लोकपाला"च्या आणि "अण्णा त्यांच्या टीम" च्या माध्यमातून चालना-या "आंदोलना"च्या संबंधाने घेऊ या ! मुळात आज भारतात जे आंदोलन सुरु आहे. ते भ्रष्टाचाराच्या नावानेयाच्याही मुळाशी आहे ती "आर्थिकता." म्हणजेच वर्णव्यवस्था, वर्गव्यवस्था.  आज मंदिर, उद्योग, व्यापार, व्यवसाय, शिक्षणसंस्था आणि एन जी अश्या खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून संपत्तीची मोठी लुट केली जात आहे.  संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. हि सर्व संपत्ती काही विशिष्ठ वर्गाच्या हातात सामावली जात आहेकारण हि सर्व क्षेत्रे काही वर्गांच्याच, काही लोकांच्याच हातात आहेत. त्यामुळे कमालीची आर्थिक विषमता पहावयास मिळत आहेत्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याची सूबुद्धी  "अण्णा  टीम" ला येत नाही.
  
अश्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस आर्थिक विषमतेच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणार हे निश्चित होते. मग तो माणूस हा यांची संपूर्ण व्यवस्था उलथवून लावायसाठी समोर येईल हे वास्तव होते. संविधान त्याच्या पाठीशी होतेम्हणून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने त्याला त्याच्या मार्गापासून भटकविण्यासाठी आणि त्याचेच समर्थन घेऊन त्याच्याच हाताने त्याचीच व्यवस्था उलथवून लावण्यासाठी आजचे हे आंदोलन जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेले आहे. गरिबीचा आकडा वाढत आहे तर मूठभरांच्या संपत्तीचाही आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आर्थिक विषमतेने एक व्यवस्था निर्माण केली आहे. उच्च वर्णीय अधिक गब्बर होत चालला आहे. तर सर्वसामान्य बहुजन भिकारी बनत चालला आहे. मग या बहुजानाला त्याच्या भिकारीपनाचे कारण "राजकीय भ्रष्टाचार" आहे असे सांगून संविधानाच्या विरुद्ध कृती साठी चेतविले, पेटविले जात आहे. "लोकपाल" किंवा "जन लोकपाल" असे गोंडस नाव घेऊन "सिविल सोसायटी" म्हणजे उच्चवर्णीय श्रेष्ठीय सर्वसामान्य "भारतीय बहुजनांचा" म्हणजेच "कनिष्ठांचा" वापर करून मुळच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यापासून दूर नेत आहेत. मग हेच लोक  "राजकीय भ्रष्टाचाराला" समोर केल्यामुळे मूळ भ्रष्टाचारापासून दूर जातात. अन्यायाविरुद्धाची लढाई इथेच थांबते.  आणि "सिविल सोसायटीला" समर्थन करण्याच्या नावाखाली कनिष्ठ वर्ग श्रेष्ठ वर्गाच्या आंदोलनाला समर्थन करतातआज "अण्णा हजारे त्यांच्या टीम" ला समर्थन करणा-यांनी "सिविल सोसायटी" च्या समोर आपली मान वाकविली आहे. म्हणजेच बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे, "इतकेच नव्हे तर ज्यांच्या वर्चस्वाला ते आपली मान वाकवितात त्यांना लोकपाल, भूदेव, राजाधिराज अशा विशेषणाने संबोधून त्यांची प्रशंसा करू लागतात."

अश्याच प्रकारे आज "अण्णा हजारे त्यांची टीम" तत्सम प्रकारच्या लोकांच्या "लोकपाला"पुढे आणि "सिविल सोसायटी" च्या नावाखाली उच्चवर्णीय श्रेष्टीजन वर्गापुढे भारतीय माणूस नतमस्तक होत आहे. आपली मान वाकवीत आहे आणि "लोकपालाची" प्रशंसा करू पाहत आहे.
बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हाच तो "लोकपाल राजा"  "कनिष्ठ बहुजन समाजाला" गुलाम बनविण्यासाठी "अण्णा हजारे आणि सिविल सोसायटी"च्या उच्चवर्णीय टीम ला बनवायचा आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी त्याआधी केलेल्या विश्लेषणाला त्यांनी अतिशय सूत्रबद्ध रीतीने चालविले. त्यामुळेच आज अण्णा टीम ला देशातून समर्थन प्राप्त होत आहे. देश्यातल्या लोकांना हे वाटायला लागले आहे कि आम्ही कनिष्ठ आहोत त्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून त्यांनी "उच्चवर्णीय अण्णा टीम" ला त्यांच्या भाग्याचा निर्णय घेण्यासाठी समर्थन देऊन टाकले आहे. परंतु या मेंढरांच्या कळपाला हे माहित नाही किंवा ते हे विसरले आहेत कि या देश्यातल्या संविधानाने त्यांच्याच हातात मोठे शस्त्र दिले आहे. संविधान नावाचे हे शस्त्र नीट चालविण्याचे प्रशिक्षण दिले गेले किंवा हे संविधान शस्त्र नीट हाताळले तरी देशाचे आणि याच मेंढरांच्या कळपांच्या भविष्याचे सोने होऊ शकते. हे ते विसरले आहेत. आणि बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे'त्यांच्या कनिष्ठतेला त्यांनी दैवाचा ठेवा मानून श्रेष्ठांच्या हाती कोलीत दिले आहे.
 
आज "अण्णा टीम" ज्या विजयाच्या आवेशात वागत आहे. ती परिस्थिती येणारच याचे कारण स्पष्ट करतांना बाबासाहेब पुढे म्हणतात, "कनिष्ठांच्या अंतःकरणात श्रेष्ठ वर्गाच्या पूज्य बुद्धीचे पिढ्यानपिढ्या संगोपणाने तिची पाळेमुळे इतकी खोल जातात कि, कालांतराने ज्यांना एकदा पूज्य मानण्याची मनाला सवय झाली, ते त्या आदरास पत्र नसले तरी त्याचा अपमान किंवा धिक्कार करणे तर राहोच पण त्यांना सर्वांसारखे लेखण्याचे देखील धैर्य त्यांना होत नाहीते सांगतील ते ऐकण्याची, वागतील तसे वागण्याची आणि नेतील तिकडे जाण्याची त्यांना सवय लागते....उलटपक्षी श्रेष्ठ लोकांची स्तुती होत गेल्यामुळे त्या स्तुतीस आपण सर्वस्वी पात्र आहोत अशी त्यांची भावना होते कालांतराने ती भावना अंगात मुरली म्हणजे आपण परमपूज्य आहोत असे स्वतःचे ठाम मत करून घेतात आणि लोकांनी आपण होऊन मान दिला नाही तर त्यांना दंडून त्यांच्या कडून तो घेण्याचा ते प्रयत्न करतात." (संदर्भ :- लेखन आणि भाषण खंड १९डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापानक्र. ३९०)

बाबासाहेबांनी केलेले हे वक्तव्य आणि सांगितलेली चिकित्सा आणि आज अण्णा टीम ची वर्तणूक यात कुठेही तफावत दिसून येत नाही. "सिविल सोसायटी"ने, त्यांच्या बुद्धीने दिलेला, तयार केलेला एकमात्र  कायदा तोच श्रेष्ठ असाच समाज आज अण्णा टीम च्या समर्थकांनी करून घेतला आहे. आणि म्हणूनच "अण्णा हजारे टीम सिविल सोसायटी या लोकांसाठी पूज्य ठरू लागली आहेती इतकी पूज्य बनली आहे कि देशातली संसद, संविधान त्यांना काहीच दिसत नाही. इतकेच काय तर त्यांना या भारतीय संविधानाने लोकशाहीने दिलेले निवडणुकीचे आणि मतदान करण्याचे मुलभूत स्वातंत्र्यहि हे लोक विसरले आहेतअश्या लोकांनी एकदा तरी बाबासाहेब वाचायला घ्यावा.

 आज कुणीही अण्णा वर बोलायला तयार होत नाही. लोकशाहीच्या विरुद्ध, संविधान विरुद्ध कृती करूनही समर्थक जनता त्यांच्याविषयी बोलण्याचे धैर्य धाखावत नाही उलट त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मेंढरांची जमात रस्त्यावर उतरून कमाल लागते. "अण्णा टीम" नी सांगितलेलेच ऐकतात आणि ते जिकडे घेऊन जातील तिकडे हि मेंढरांची जमात जात आहे. त्यामुळेचअण्णा परमपूज्य बनत चालला आहे. त्याची टीम स्वतःला परमपूज्य बनवून घेण्यात व्यस्त झालेली आहे. कारण त्यांना तुमची हि समानतेची व्यवस्था तुमच्याच हातून उलथवून लावायची आहे. लोकशाही, संसदीय सार्वभौमत्व संपवून वर्गीय हुकुमशाही आणायची आहे. आणि हे सर्व हि मेंढरांची जमात त्यांच्या नादी लागून स्वतःला गुलामीच्या छायेत झोकु पाहत आहे.

बाबासाहेबांनी केलेले विवेचन आणि मौलिक विचार आजचे झणझणीत वास्तव तुमच्या आमच्या या संपूर्ण समाजाच्या समोर मांडत आहे. तरीही आम्ही याकडे डोळेझाक का करीत आहोत ? बाबासाहेबांनी केलेले वर्णवादाचे, वर्गवादाचे हे विवेचन आणि त्यातून अस्तित्वात येणारा "लोकपाल राजा" आज कश्या पद्धतीने इथली लोकशाही, संविधान, संसद, जनतेचा अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व गिळंकृत करू पाहत आहे. आतातरी आम्ही आमच्या डोळ्यावरही झापडी उघडणार आहोत कि नाही. आतातरी बाबासाहेबांच्या परीप्रेक्षातील संविधानाला प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणणार आहोत कि नाही. बाबासाहेबांनी दिलेला धोक्याचा इशारा, लोकपालाचा राजाधिराज होण्यापासून आम्ही सावधगिरी बाळगायची कि नाही.

आतातरी समाजाने पेटून उठणे गरजेचे आहे. लोकपाल हे पदच आम्हाला अमान्य आहे कारण ते वर्गवादाचे, हुकुमशाहाचेराजतंत्रचे निदर्शक आहे. म्हणून भ्रष्टाचार निर्मुलनासाठी एक नवीन संवैधानिक प्रशासक लोकपाल व्यतिरिक्त तयार करावा. जो संसद, न्यायपालिका आणि संविधानाच्या चौकटीत असेल. संविधान धोक्यात टाकून, तुमचे आमचे अधिकार धोक्यात टाकून, समतावादी समाज व्यवस्था धोक्यात टाकून, संवैधानिक लोकशाहीला धोक्यात टाकून लोकपाल राजा बनवू नये. या मागणीसाठी आता समाजमन पेटविण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. सरकार आणि तत्सम संविधान प्रेमींच्या पाठीशी राहून "उच्चवर्णीय अण्णा सिविल सोसायटी" च्या टीम चे षड्यंत्र हाणून पडण्याची हि वेळ आहे. अन्यथा राजाधिराज, भूदेव, लोकपाल राजा तुमच्या आमच्या मस्तकी हे "उच्चवर्णीय अण्णा सिविल सोसायटी" ची टीम लादणार आहे.

अण्णा भगाओ, देश बचाओ !
संविधान चलाओ, भ्रष्टाचार मिटाओ
अधिकार बचाओ, प्रशासक बनाओ !
संसद की सार्वभौमता मान्य करो, वरना देश खाली करो !
न्यायपालिका की लाज बचाओ, नागरिक होने का हक़ जताओ !
पहले मंदिर की संपत्ति बाटो, फिर गरिबो को न्याय दिलाओ
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर, ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

संदर्भ :- .   लेखन आणि भाषण खंड १९डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापानक्र. ३९०  
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, (बहिष्कृत     भारतता२१ डिसेंबर १९२८