Thursday 24 November 2016

सर्व झोल काळा पैसा पांढरा करण्यासाठी...

✍🏻 *नोटाबंदी / Demonetisation / High Denomination Currency हा सर्व झोल काळा पैसा पांढरा करण्यासाठी...*
✍🏻 *____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

✍🏻 कुठल्याही संवैधानिक मार्गाचा प्रचलित वापर न करता देशातील *जनतेला मुर्ख बनवून १००/५०० च्या नोटा रातोरात बंद करण्यात आल्या. अख्खी लोकशाही अंधारात ठेऊन.* कशासाठी बघा...

*रद्द करण्यात आलेल्या नोटा*
    १००० + ५०० = १५००
*सुरू करण्यात आलेल्या नोटा*
    २००० + ५०० = २५००

*काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचे गणित बघा...*

  सुरू          बंद.            फरक
२५००   -   १५००    =    १०००

✍🏻 १००० रू. अधिकचे बाजारात/अर्थव्यवस्थेत आणल्या गेले. त्यासाठीचे तारण कुठं आहे ? नविन आणि जून्या नोटांमध्ये १००० रू. अधिक का काढल्या गेले ?

✍🏻 *उत्तर :-*

*अगाऊ १००० रू. अर्थव्यवस्थेत आणून बिजेपी, आरएसएस, अदानी, अंबानी यांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला.*

✍🏻 तुम्ही मात्र नमो नमो करीत काळा पैसा, भ्रष्टाचार यावर बोंबलत बसलात व तिकडे तुम्हाला मुर्ख बनवून तुमचाच पैसा बँकेद्वारे गोळा केला गेला व सर्व काळा पैसा पांढरा केला गेला.

😜 बसा आता "सबका साथ, सबका विकास" बोंबलत हातात हात घेऊन बँकांच्या रांगेत...

🙄 *"उघडा डोळे, बघा निट."* 😳
✍🏻 *____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Thursday 10 November 2016

*ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !*

🚩 *भाजपाईयों (संघीयों) या देशात अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत, देशहितासाठी, देशविकासासाठी त्या केव्हा बदलणार ?*

💰 *फक्त ५००, १००० च्या नोटा बदलल्याने भ्रष्टाचार, ब्ल्यॉकमनी थांबेल का ?*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

🗣 या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कालबाह्यच झाल्या नसून समाजव्यवस्थेसाठी व देशहिताला धोकादायक आहेत. *चलनी नोटांंनी तर फक्त भ्रष्टाचार करून देशाची भौतिक संम्पत्ती धोक्यात आणली पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने देशाची भविष्याची चल-अचल, भौतिक-व्यावहारिक, शारिरिक-मानसिक संम्पत्ती संपवू पहात आहेत.* त्या कधी बदलणार आहात ?

🗣 *विदेशात असलेला काळा पैसा ५००, १००० च्या नोटा बदलल्याने परत येणार का ?*
*उत्तर :- नाही* मग स्विस बँकेतला तुमच्या पैशाचे काय करणार आहात ? त्याचा निर्णय अद्याप का घेतला गेला नाही.

*वास्तव :- देशातला सामान्यांचा हक्काचा पैसा काढून बँकात जमा करून तुमच्या स्विस बँकेतल्या ब्ल्यॉकमनी ला व्हाईट करायचे आहे हे सांगा ना मा. मोदी साहेब...*

🗣 *विदेशात जमा असलेल्या ५००, १००० रुपी ला तुम्ही कसे बदलणार हे पण देशवासियांना कळले पाहीजेच ना !* ते अद्याप देशवासियांपासून का लपविण्यात आले आहे. देशाचा नागरिक म्हणून याचे उत्तर मला पाहीजे आहे. व ते उत्तर देणे तुम्हाला बंधनकारक आहे.

*सब गोलमाल है, भाई सब गोलमाल है !*

💰 *विदेशात असलेल्या रूपयाचे गोलमाल (ब्ल्यॉक मनी) कुठे होणार आहे. कारण हा रूपया देशांतर्गत ब्ल्यॉक मनी पेक्षा कित्तेक पट जास्त आहे.*

💰 *करमुक्त (टॅक्स फ्री) असलेला देशभरातल्या मंदीरातील ब्ल्यॉकमनीला सार्वजनिक करणे देशहिताचे व देशविकासाचे मोठे साधन असतांना ते का केले जात नाही.* देशभरातल्या मंदीरातील ५००, १००० च्या नोटांचा ब्ल्यॉकमनी व्हाईट करून परत कुणाकडे सुपूर्द केला जाणार ? हे पण सांगा.

🙏🏻 *कालबाह्य झालेले (विशिष्ठ वर्गातले) पुजारी ज्यांची मंदीरातील ब्ल्यॉकमनीवर परंपरागत मालकी हक्क आहे ते सार्वजनिक करणे देशहिताचे/देशविकासाचे आहे.* तो निर्णय केव्हा होणार. *भ्रष्टाचार मुक्तीचा हा मैलाचा दगड* आपण कधी पार करणार आहात हे देशवासियांना कळू द्या.

🇮🇳 *देशहीत/देशविकास, भष्टाचार मुक्ती तुमच्यापासून सुरू व्हायला पाहीजे होती ती सामान्य नागरिकांपासून का सुरू केली गेली ?* सामान्य देशवासियांना वेठीस धरून तुम्ही *जैसे थे* कसे काय राहणार ? *मंदीर, पुजारी, दान, स्विस बँक या तुमच्या ब्ल्यॉक मनी उत्पन्न स्त्रोतांना तुम्ही कधी सोडणार/तोडणार/बदलणार ?*

🎤 *ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !* 🇮🇳

*या देशातील मंदीर, पुजारी, देव-देवता, संस्कृती, जाती, धर्म, विचार जेव्हा बदलतील तेव्हा ५००, १००० कालबाह्य ठरविण्याची वेळ येऊन नव्या ५००, २००० च्या छपाईवर सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार नाही.*

*अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या निर्णयाचे (भ्रष्टाचार व ब्ल्यॉकमनी) १०% सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतांना मलाही दिसून येतात. परंतु त्याच अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ९० % ची चिंता जास्त सतावतेय. हा निर्णय १०० % ब्ल्यॉकमनी निर्मुलनाचा निश्चितच नाही.*

म्हणूनच म्हणतो.....
🎤 *ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !* 🇮🇳

🙏🏻 *चलो जड से बदलाव की तरफ बढते है ! न की डालियों से जड की तरफ ! बदलाव नही होगा साहाब !*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
*टिप :- मै किसी भी मंदीर, ईश्वर, देव, धर्म का विरोध नही करता, क्योकी दोष उनका नही दोष मानसिकता और प्रकृती/संस्कृती का है !*