Wednesday 28 December 2016

धम्मदिक्षेचे Event धम्माला व चळवळीलाही धाेकादायक

🙋🏻‍♂ *धम्मदिक्षेचे Event धम्माला व चळवळीलाही धाेकादायक*

🙄 *धम्मदिक्षेच्या Event रूपी राजकारणाने आंबेडकरी चळवळीला धोका संभवू शकतो.*

🙄 *धम्मदिक्षेचे Event साजरे करणे म्हणजे भविष्यात धार्मिक उन्मादाला व धार्मिक द्वेषाला जन्म देणे होय.*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

🙋🏻‍♂ भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना धार्मिक अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे धर्मपरिवर्तन किंवा धर्म स्विकार हा प्रत्येकाचा व्यक्तीगत मुलभूत अधिकार आहे. त्याचा वापर त्याने स्वच्छेने करावा. परंतु *जेव्हा २००-३०० कुटूंबाच्या धर्मपरिवर्तनाचे Event साजरे केेले जातात व त्या Event च्या यशस्वितेसाठी विजयीमुद्रेत जेव्हा मोठ्या संख्येने समाज उपस्थित होतो, तेव्हा दोन धर्मात तेढ उत्पन्न व्हायला चालना मिळते.*

🙋🏻‍♂ धर्मपरिवर्तनाचा Event साजरा झाला म्हणजे एखादा धर्म मोठा झाला किंवा श्रेष्ठ झाला असे होत नाही. धर्माची तत्वे माणसांना आकर्षित करीत असतात. व *जेव्हा धार्मिक तत्वांचा स्विकार व्यक्ती करतो तेव्हा त्याला त्याच्या धर्मपरिवर्तनाचे Event साजरे करण्याची गरजच पडत नाही. तो Event साजरे न करताही धार्मिक तत्वाचा अंगिकार करून स्वतःच त्या धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम करायला लागतो. त्याची वर्तणुक हीच त्याच्या धर्मपरिवर्तनाचे प्रतिक बनायला पाहीजे.*

🙋🏻‍♂ काल दि. २५/१२/२०१६ ला नागपूरच्या दिक्षाभूमिवरून काही २००-३०० ओबिसी कुटूंबांनी (म्हणजेच हिंदूंनी) धर्मपरिवर्तन करून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. या धर्मपरिवर्तनाचा Event केला गेला. (कदाचित राजकारणही केले गेले असे म्हणता येईल.) *४००-५०० लोकांच्या धर्मपरिवर्तन सोहळ्याला हजारो बौद्ध व आंबेडकरी लोक उपस्थित होते हे त्या Event चे फलितच म्हणावे लागेल.*

४००-५०० लोकांच्या धर्मपरिवर्तनाला हजारो आंबेडकरी - बौद्ध लोक या Event ला का उपस्थित होते ? तर याचे कारण एकच की ते ओबिसी होते.(हिंदू होते) कारण Event ची हेडलाईनही तशीच होती. 🙋🏻‍♂ *हा Event साजरा करणाऱ्यांना एकतर चळवळीचे, धम्माचे गांभिर्य नाही. किंवा निव्वळ राजकारणाला बळी पडून हा उत्सव साजरा केला गेला. यात धर्मपरिवर्तन कमी आणि राजकारण अधिक होते असेच खेदाने म्हणावे लागेल.*

🙋🏻‍♂ आजपर्यंत अनेक लोकांनी धर्मपरिवर्तन केले. विविध धर्माच्या व विविध जातीच्या लोकांनी धर्मपरिवर्तन केले. *(धर्मपरिवर्तनानंतर त्यांची बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार किती केला किंवा बौद्ध तत्वे वर्तणुकीत उरविले की नाही यावर न बोललेलेच बरे)* परंतु असे Event साजरे करून धर्मपरिवर्तनाचे सोहळे साजरे व्हायला लागले तर येणाऱ्या काळात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो.

👉🏻 *Event रूपी धर्मपरिवर्तन सोहळ्याने काय साध्य केले ?*
१) ४००-५०० लोक हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आले. (बुद्धीस्ट झाले असे म्हणता येणार नाही.)
२) या ४००-५०० लोकांना धर्मपरिवर्तन करण्याचे नेतृत्व करणाऱ्या माणसांची सामाजिक-राजकीय उंची वाढली एवढेच.
३) ओबिसी लोक धर्मपरिवर्तन करताहेत हे पाहून त्या सोहळ्याला हजारो बौद्ध - आंबेडकरी बांधव उपस्थित होऊन एक मोठा Event साजरा झाला एवढेच.

👉🏻 *पण या Event रूपी सोहळ्याचे दूरगामी परिणाम काय होतील ?*
१) ४००-५०० किंवा १०००-१५०० ओबिसी लोकांनी धर्मपरिवर्तन केले म्हणून तुम्ही केलेली गर्दी, त्यातून साजरा केला जाणारा उन्माद व त्या सोहळ्याचा प्रचार प्रसार लाखो ओबिसी बांधवांच्या (हिंदूंच्या) भावनांना दुखावणारा झाला तर त्याचे भविष्यावर दुष्परिणाम होतील.
२) कालच्या किंवा उद्याच्या धर्मपरिवर्तन सोहळ्याने आंबेडकरी राजकारण वा आंबेडकरी मतदान वाढेल का ? तर कदापी नाही.
३) तुमच्या या धर्मपरिवर्तन सोहळ्याच्या उन्मादाचा प्रतिपरिणाम इतर लोकांच्या मनात तुमच्याविषयी द्वेष पसरविण्यासाठी प्रस्थापितांकडून केला गेला तर व्यापक आंबेडकरी चळवळीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
४) या धर्मपरिवर्तन Event चे नेतृत्व करणाऱ्यांना उद्या चळवळीच्या खरेदी विक्रीचे नेतृत्व दिले जाण्याची दाट शक्यता आहे. ज्याचे परिणाम चळवळीवर होऊ शकतात.

🙋🏻‍♂ *माझा विरोध धर्मपरिवर्तनाला नसून माझा विरोध धर्मपरिवर्तनाचे Even साजरे करण्याला आहे.*

🙏🏻🙋🏻‍♂ *माझा विरोध कशाला ?*
१) माझा विरोध धर्मपरिवर्तनाच्या कार्यक्रमाला Event बनविण्याला आहे.
२) माझा विरोध धर्मपरिवर्तन Event चे नेतृत्व करणाऱ्यांच्या भूमिकेला आहे.
३) माझा विरोध व्यक्तीगत मान्यतेच्या सार्वत्रिक दिखाऊपणाला आहे.
४) माझा विरोध धार्मिक, सामाजिक, राजकीय व चळवळीचे गांभिर्य नसल्याला आहे.
५) माझा विरोध बौद्ध - आंबेडकरी माणसांच्या अतिउत्साहीपणाला आहे.

🙏🏻 *कुठल्याही सामाजिक कृतीचे दुरगामी परिणाम लक्षात घेणे जास्त महत्वाचे असते.*

🙋🏻‍♂💐 *धर्मपरिवर्तन करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे स्वागत ! व पुढील आयुष्यात आपण धम्मतत्वाने वाटचाल करून जीवनाला गतिमान कराल ही मंगलकामना !*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...