Tuesday 25 October 2016

मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...

🙏🏻🇪🇺 *मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...*🇪🇺🙏🏻

मोर्चाच्या निमित्ताने गर्दी होत आहे व त्यामुळे समाज संघटीत होत आहे ही आशादायक व सकारात्मक म्हणून स्वागतार्ह बाब म्हणता येईल.
                 🙏🏻 *पण* 🙏🏻      
   
🙏🏻 *गर्दी संघटीतपणाच्या भावनेतून होत असेल तर योग्य अन्यथा असुरक्षित भावनेच्या भरावर गर्दीत सुरक्षितता शोधण्यासाठी माणसं सामिल होत असतील तर कसायाच्या कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या कळपाचा भाग होऊन स्वतःचा खात्मा करून घेण्यात काहीच अर्थ नाही.*

🙏🏻 *गर्दीला वैचारिक बैठक नसेल, गर्दीला पुर्णकालीन सेनापती नसेल तर गर्दी ही कळपात परावर्तित होते. व कळपात कुणीही सुरक्षित राहू शकत नाही. गर्दीला राजकीय व सामाजिक शहाणपण देता येत नसेल तर गर्दीत चेंगराचेंगरी होऊन भविष्यात या गर्दीतील सामिलांची हाणी मात्र नक्कीच आहे.*

🙏🏻 मोर्चे काढा तो तुमचा अधिकार आहे. गर्दीही करा तोही तुमचा अधिकार आहे. पण *गर्दीत सहभागी होण्याआधी किंवा गर्दी जमविण्याआधी मोर्चातील विषयावर याआधी एकतरी दिवस कधी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम केले का हे स्वतःला विचारा. पिडीतांना, अन्यायग्रस्तांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी कधी पुढाकार घेतला आहे का ? ते तपासा. किंवा त्यावर थातूरमातूर कधीतरी अभ्यास तरी केला का ? हेही तपासा. व्यक्तीगत जबाबदारी टाळून सामुहिक जबाबदारीत सहभागी होणे पराभवाचे लक्षण आहे.*

🙏🏻 *ज्या समाजातील व्यक्ती व्यक्तीगत जबाबदारी समजून सतत ईतरांसाठी कार्यरत असतो तो समाज कधीही पराभूत होऊ शकत नाही. सामुहीक जबाबदारीचे निर्वाहण व्यक्तिगत जबाबदारीच्या निर्वाहणातूनच पुर्ण करता येते.*

👉🏻🚩 *इतरांच्या कळपांना पाहून* 🇪🇺 *तुम्हीही कळप बनवायला लागले* तर घात होण्याची संभावना शतप्रतिशत आहे. कारण 🚩 *त्यांचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणाने ओतप्रोत आहे. तर 🇪🇺 *तुमचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणापासून कोसो दूर आहे.

        🙏🏻 *राजकीय व सामाजिक शहाणपणा गर्दीतील माणसांना देता येतो का ते बघा*

           🙏🏻 *विचार करा !* 🙏🏻
✍🏻___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

No comments:

Post a Comment