Wednesday 6 June 2012

"१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने घेण्यात येणारी जनमत निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात येण्याबाबत....

निवेदन
प्रती,
        मा. पंतप्रधान,
       भारत सरकार,
       नई दिल्ली.
      

विषय      :- CNN-IBN आणि HISTORY-18 या वाहिन्यांच्या माध्यमातून "१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने घेण्यात येणारी जनमत निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात येण्याबाबत....
निवेदनकर्ते         :- डॉ. संदीप नंदेश्वर, इतर सामाजिक कार्यकर्ते व इतर संस्था-संघटना.
पत्ता                  :- ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर- ४४००३४
           मो. क्र. 9226734091
CNN-IBN आणि HISTORY-18 या वाहिन्यांच्या माध्यमातून "१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने जनमत निवड चाचणी घेण्यात येत आहे. ही निवड चाचणी विषयानुसारच दोषपूर्ण अशी आहे. जगाच्या पाठीवर अश्या प्रकारची कुठलीही चाचणी अजूनपर्यंत झालेली नाही. कुठल्या तरी एका राष्ट्रीय व्यक्तिमत्वाला आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इर राष्ट्रीय व्यक्तिमत्वांची निवड करणे हे जगामध्ये सर्वप्रथम भारतात घडून येत आहे. ज्यामुळे इतर महापुरुश्यांच्या अनुयायांची मने दुखावली जात आहेत. सामाजिक शांतता व सुव्यवस्था डोक्यात येत आहे. आणि समाजात पुनःश्च्य वैचारिक संघर्षाला खतपाणी घातल्या जात आहे. त्यामुळे ही निवड चाचणी शक्य तितक्या लवकर रद्दबातल ठरवून किंवा विषयात बदल करून केली जावी अशी मागणी समाजातून जोर धरू लागली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून केंद्रसरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारला पाठविण्यात येत आहे. कृपया या निवेदनाची त्वरित दाखल घेण्यात यावी.
मुळात या निवड यादीत ज्या राष्ट्रीय नेतृत्वाची सद्यकालीन नेतृत्वांशी सांगड घालण्यात आली आहे. तीच पूर्णतः दोषपूर्ण आहे. या निवड यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण इ. राष्ट्रीय नेतृत्वाची आणि महापुरुषांची तुलना अटल बिहारी बाजपेयी आणि अब्दुल कलम यांच्याशी होऊ शकत नाही. निवड यादीत एकत्र सुद्धा या नेतृत्वांना बसविता येणार नाही. शिवाय वरील सर्व राष्ट्रीय नेते हे महात्मा गांधी यांच्या समकक्ष आणि एकाच कालखंडातील असल्यामुळे गांधीजींच्या नंतर किंव्हा गांधीजींना मोठे करून इतर महापुरुषांना छोटे करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाचे देशाच्या नवनिर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. याची कृपया सरकारने दक्षता घ्यावी.
ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने केलेल्या जागतिक संशोधनात "जगाचे निर्माते" या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ४ थे स्थान देण्यात आले आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग संपूर्ण जगात आहे. या निवड यादीत त्यांचे नाव महात्मा गांधी नंतर...घेतल्या गेल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय समाजातल्या शोषित-पिडीत वर्गासाठी आणि भारतीय संविधानाच्या रुपात देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान जगाने मान्य केले आहे. तरीही त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न या निवड चाचणीत करण्यात आला आहे.
या निवड चाचणीने गांधी-आंबेडकर या पारंपारिक वैचारिक संघार्षालासुद्धा खतपाणी घातले आहे. गांधी-आंबेडकर वैचारिक वाद आधुनिक समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अश्या परिस्थितीत गांधीजींच्या नंतर सर्वोच्च भारतीय च्या यादीत बाबासाहेबांना ठेवणे म्हणजे सामाजिक संघर्षाला चीतावनी देणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे करोडो शोषित-पिडीत-मागास समूहाचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे त्यांना अश्या निवड चाचणीत घेणे म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा अपमान करणे होय. अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. याची दाखल शासनाने घ्यावी.   
सर्वोच्च भारतीय ठरवायचेच आहे तर गांधीजींचे नाव सुद्धा या निवड चाचणीच्या यादीत घेऊन भारतातील इतरही महापुरुषांना या यादीत स्थान देण्यात यायला पाहिजे होते. तेव्हाच ती निवड चाचणी पारदर्शक होईल. अन्यथा समाजाच्या विभिन्न घटकांना, त्यांच्या श्रद्धास्थानांना, त्यांच्या प्रतीकांना दुखावले जाईल. ज्यामुळे समाजात वैचारिक तेढ, व्यायक्तिक संघर्षाला चालना दिली जाऊ शकते. सूचना प्रसारण आणि दूरसंचार मंत्रालयाने अश्या निवड चाचणीला परवानगी देऊ नये. व ती त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावे. जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांचा सन्मान केला जाईल.  अनेक संत, महात्मे भारतात जन्मले आहेत. ज्यात संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत साई बाबा, महर्षी कर्वे, गायकवाड, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर इ. महान समाजसेवकांचे योगदानही महत्वपूर्ण असेच आहे.  त्यांचा सन्मान म्हणून त्यांच्याही नावांना या यादीत समाविष्ठ करायला पाहिजे होते. परंतु तसे जाणीवपूर्वक न करता षडयत्रपुर्वक ही निवड चाचणी घेण्यात येत आहे. ज्यात फक्त आणि फक्त गांधीजींना मोठे करून इतर महापुरुषांना कमी लेखण्याचा यांचा उद्देश आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.  
वरील निवेदनात करण्यात आलेल्या विवेचनाला लक्षात घेऊन सरकारने आमच्या पुढील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या –
१.        ही निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात यावी.
२.        अश्या प्रकारची निवड चाचणी करतांना सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याची दाखल घेऊन दोषींवर कार्यवाही करावी.
३.        भारतात ज्या महापुरुषांच्या योगदानाने आज समता, स्वातंत्राची पहाट उगवली आहे अश्या महापुरुषांचा अपमान होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी.
४.        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या निवड यादीतून वगळण्यात यावे. त्याच बरोबर वर उल्लेखित केलेल्या व्यक्तिमत्वाच्या कार्याला न्याय देण्यासाठी त्यांचेही नाव या यादीतून वगळण्यात यावे.
५.        निवड चाचणी घ्यायचीच असेल तर कुणाचेही नाव विषयात न घेता सर्व नावांना निवड यादीत घ्यावे.
६.        महात्मा गांधीचे नाव सुद्धा निवड यादीत समाविष्ठ करावे. जेणेकरून ही निवड यादी पारदर्शक होईल.
वरील मागण्यांसह आम्ही हे निवेदन सरकारला सदर करीत आहोत. यावर सरकारने आणि संबंधित विभागाने त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा समाजातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अश्याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था भंग होत असेल तर त्याला पूर्णतः सरकार जबाबदार असेल.
सविनय विनंतीपूर्वक वरील मागण्यांचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सादर.
धन्यवाद !
आपले जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
प्रतिलिपी,
1)   राष्ट्रपती, भारत सरकार, नई दिल्ली.
2)   सूचना प्रसारण व दूरसंचार मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली.
3)   मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, मुंबई.
4)   मार्फत, जिल्हाधिकारी, नागपूर, महाराष्ट्र सरकार.
निवेदनकर्ते
                             नाव                                                                                                   सही
1.    -------------------------------------------------------                           --------------------------
2.    -------------------------------------------------------                           --------------------------
3.    -------------------------------------------------------                           --------------------------
4.    -------------------------------------------------------                           --------------------------
5.    -------------------------------------------------------                           --------------------------
6.    -------------------------------------------------------                           --------------------------
7.    -------------------------------------------------------                           --------------------------
8.    -------------------------------------------------------                           --------------------------
9.    -------------------------------------------------------                           --------------------------
10.  -------------------------------------------------------                           --------------------------

6 comments:

  1. Very nice sir
    jaibhim

    ReplyDelete
  2. pls print this deputation...put ur name...and submite to ur local area collector or tahasildar....and try to agited to stop this nonsense poll...

    ReplyDelete
  3. अगर आप लोग निवेदन नहीं दे सकते तो घर बैठे इस मेल पत्ते पर मेल भेज दे ! अपने नाम से ! ध्यान रहे जादा से जादा मेल भेजो ताकि यह मोहिम यशस्वी हो सके ! हर किसी को मेल भेजने को बोलिए !
    राष्ट्रपति :- presidentofindia@rb.nic.in
    पंतप्रधान :- manmohan@sansad.nic.in
    सूचना एवं प्रसारण मंत्री :- psministerib@gmail.com
    मुख्यमंत्री :- chiefminister@maharashtra.gov.in
    आज हम लोगो ने यह निवेदन राष्ट्रपति, पंतप्रधान, सूचना एवं प्रसारण मंत्री, मुख्यमंत्री को सौप दिया है ! प्रेस कान्फेरंस लेकर यह पोल बंद करने का आव्हान भी किया है ! IBN लोकमत को भी एक निवेदन सौप कर आये है ! अगर वो उस निवेदन पर गंभीरता से दखल नहीं लेते तो उनका ऑफिस टूट जायेगा ! आप लोगो से भी विनती है की आप लोग इस निवेदन को प्रिंट करे और अपने नाम से अपनी स्थानीय जिल्हा कलेक्टर को सौप दे ! यह पोल बंद करने के लिए सरकार पर दबाव बनाये ! इनकी खौकाली मानसिकता का विरोध करे ! बाबासाहब का सन्मान तभी होगा ! आज के नागपुर के कांफेरेंस की खबरे कल के अखबार में जरुर आएगी ! यह निवेदन और इससे जुदा मेरा लेख भी आज के दै. महानायक में आया है ! वो भी जरुर पढ़ ले ! मेरे ब्लॉग पर भी है ! वो भी पढ़ ले ! गम्बिरता से इस विषय को लेकर अपना अपना योगदान बाबासाहब का सन्मान बचाने के लिए दे ! बस इतनीही आप सभी से गुजारिश है !
    आपका मित्र ---- भारत का जागृत नागरिक ---- प्रथम और अंतिम भी भारतीय ---- डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर- ९२२६७३४०९१
    निवेदन
    प्रती,
    मा. पंतप्रधान,
    भारत सरकार,
    नई दिल्ली.

    विषय :- CNN-IBN आणि HISTORY-18 या वाहिन्यांच्या माध्यमातून "१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने घेण्यात येणारी जनमत निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात येण्याबाबत....

    ReplyDelete
  4. कोई भी आन्दोलन कुछ पल, कुछ वक्त या कुछ दिन के लिए नहीं होता ! आन्दोलन यह तब तक चलते रहता है जबतक उस आन्दोलन का उद्देश सफल नहीं हो जाता ! हमें अगर आदत लगी है एक दिन या कुछ वक्त का आन्दोलन करने की तो कृपा करके इस आदत को छोड़ दीजिये ! क्योंकि इसी आदत के चलते आम्बेद्कारी आन्दोलन की दिशा और परिणाम भटकते जा रहा है ! गाँधी को ऊँचा करके सर्वोच्च भारतीय की खोज करने एक नाजायज IBN का इरादा कुचलना है ! तो हमें कुछ दिनों के लिए सबकुछ भूलकर सिर्फ और सिर्फ इस IBN के नाजायज खोज को बंद करने के लिए निरंतर आन्दोलन करना होगा ! कुछ दिनों के लिए हमारी फेसबुक वाल पर सिर्फ और सिर्फ इसी आन्दोलन से जुडी खबरे होनी चाहिए ! वरना यहाँ आन्दोलन की धार कम हो जाएगी ! और हम एक दिन या कुछ समय के आन्दोलन से खुश होकर असली उद्देश से भटक सकते है ! हमें इस आन्दोलन को किसी भी हालत में जितना है ! इस पोल को बंद करके बाबासाहब को वंदन करना है ! यह सभी का कर्त्तव्य है ! इसलिए मै आप सभी बुद्धिजीवी और आम्बेडकरवादियोंसे गुजारिश करता हु की जबतक यह पोल बंद नहीं होता अपने वाल पर सिर्फ और सिर्फ इस आन्दोलन की खबरे डालते रहे ! बाकि के विषयो को हम इस आन्दोलन के बाद भी उजागर कर सकते है ! जब ऐसा हम करेंगे तो इस आन्दोलन को कम मिलाने वाला Success आज ही मिल सकता है !
    मेरा नम्र निवेदन सभी से.......

    ReplyDelete
  5. The first and foremost thing is that there is no comparison with Dr.Ambedkar... In the history of the universe there is only one Dr.Ambedkar ... why are we indulging in such a discussion or contest? We know that no one should compare with Dr.Ambedkar as he was born only once ...

    Nobody can reach with his heights.... We all so called intellectuals are molecules of Dr.Ambedkar's feet dust whether anybody gets highly and numerous educational degrees or holding any high position several times... There are lakhs of crores of molecules(people) from Dr.Ambedkar's feet dust for comparison. we individual always feel proud to tag ourselves as a molecule(person) of that dust.

    There is no question of comparison with Dr.Ambedkar because it is beyond our thinking level and false imagination... Dr.Ambedkar is the SUN of the UNIVERSE, we all are little candles (including all intellectuals) just to show little light to the SUN...

    All intellectuals across India and across World(including News Channels, Press, Organizations, Governments and individuals) should know this fact that "SUN IS SUN AND CANDLE IS CANDLE" ... so the light of SUN and light of Candle cannot be compared...

    ReplyDelete
  6. The first and foremost thing is that there is no comparison with Dr.Ambedkar... In the history of the universe there is only one Dr.Ambedkar ... why are we indulging in such a discussion or contest? We know that no one should compare with Dr.Ambedkar as he was born only once ...

    Nobody can reach with his heights.... We all so called intellectuals are molecules of Dr.Ambedkar's feet dust whether anybody gets highly and numerous educational degrees or holding any high position several times... There are lakhs of crores of molecules(people) from Dr.Ambedkar's feet dust for comparison. we individual always feel proud to tag ourselves as a molecule(person) of that dust.

    There is no question of comparison with Dr.Ambedkar because it is beyond our thinking level and false imagination... Dr.Ambedkar is the SUN of the UNIVERSE, we all are little candles (including all intellectuals) just to show little light to the SUN...

    All intellectuals across India and across World(including News Channels, Press, Organizations, Governments and individuals) should know this fact that "SUN IS SUN AND CANDLE IS CANDLE" ... so the light of SUN and light of Candle cannot be compared...

    Regards,
    Rajesh

    ReplyDelete