Sunday 28 May 2017

#dump_thinker

*#dump_thinker*

जाती जातीत विभालेल्या मानव समुहाला विभागून बुद्धीभेद करून स्पृष्य-अस्पृष्य तयार केले गेले जो "जातीवाद" म्हणून हजारो वर्ष मानवाची पिळवणुक करीत आला. ज्या जातीवादाविरूद्ध अनेक विचारवंतांनी (महापुरुषांनी) लढा दिला. व मानव्यतेचा विचार समाजात पेरून जातीवादाला संपुष्टात आणण्यासाठी आपल्या आयुष्याची होळी केली.

आज त्याच महापुरूषांचे तथाकथित अनुयायी म्हणविणारे त्याच मानवतावादी विचारांची मांडणी करणाऱ्या महापुरूषांच्या विचारांविरोधात शत्रुत्व करून आपले-परके, श्रेष्ठ-कनिष्ठ, योग्य-अयोग्य, महापुरूषांत, विचारवंतात भेद करून हाच आमचा, तो तुमचा; हाच श्रेष्ठ विचार, तो तकलादू विचार असा बुद्धीभेद करून "विचारवाद" "विचारद्वेष" तयार करून मानवतावादी विचारांच्या अनुयायामध्येच स्पष्ट द्वेषभावना पसरवित आहेत. मानवतावादी विचारकांत फुट पाडून अमानवतावादाविरूद्धची लढाई संपवू पाहात आहेत. उद्या "जातीवाद" सोबतच हे पसरवित असलेल्या "विचारवाद" संपविण्यासाठीही लढावे लागणार आहे.

फुले * आंबेडकर, मॉर्क्स * आंबेडकर, गांधी * आंबेडकर अशी शेकी मिरवून अमकाच श्रेष्ठ, तमकाच श्रेष्ठ म्हणणाऱ्या बाळबोधांच्या बुद्धीची किवही येते व रागही येतो. विचारधारा, तत्वद्न्यानाला द्वेषासाठी नव्हे तर मानवी कल्याणासाठी ओळखले जाते. प्रत्येकच तत्वद्न्यान, विचारधारा मानवी कल्याणासाठी स्वतःमध्ये एक श्रेष्ठत्व घेऊन पुढे येते. मार्ग व प्रक्रीया वेगवेगळ्या असतात. ध्येय व उद्धीष्ट्ये एकच असतात ते म्हणजे सामान्य माणसांचे कल्याण.   पण वैचारिक दळभद्री लोकांनो तुम्हाला ते कळणार नाही.

अशा दळभद्रींना भर चौकात चाबकाचे फटके मारले तरीही यांनी केलेल्या समाजद्रोही कृत्याविरोधातला राग शांत होणार नाही.

अशा दळभद्रींनीच चळवळ संपवली रे....संकल्पना द्वेषाने पेटलेल्या राक्षसांनो तुम्हीच एक दिवस महापुरूषांच्या विचारांना लावलेल्या आगीत भस्मसात व्हाल. लिहून ठेवा.

माझा एकच प्रश्न :- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या काळात समाजवादी, मॉर्क्सवादी, उदारमतवादी यांना एकत्र करण्याचा प्रयत्न का केला ?*
कचराकुंडीत वाढलेल्या अनुयायांनो....या प्रश्नाचे उत्तर देता येईल तर बघा.
*#अॅड_डॉ_संदीप_नंदेश्वर*

No comments:

Post a Comment