Sunday 29 December 2013

भारतीय लोकशाही मिडीयाधारी भांडवलशाही कडे वळत चालली आहे.

केजरीवाल च्या यशाने छोट्या छोट्या राजकीय गटाच्या फुटक्या फुसक्या नेत्यांनाही आता PM आणि CM चे स्वप्न पडायला लागतील. आणि या राजकीय दुकानदाऱ्या बंद होणार नाहीत हे या समाजासाठी घातक आहे. केजरीवाल CM बनला तो मिडियामुळे. निश्चितच त्यांनी मिळविलेले यश आणि उराशी बाळगलेले स्वप्न मोठे आणि सर्वसामान्यांना भेडसावणारे असले तरी त्यांच्या यशाच्या श्रेय शतप्रतिशत प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडियाचे आहे. देशात अनेक केजरीवाल आहेत. केजरीवालपेक्षाही जास्त सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न उराशी घेऊन विकासाची ब्लु प्रिंट घेऊन आहेत. पण त्यांना व त्यांच्या ब्लू प्रिंट ला जनमानसात पोहोचविणारा मिडिया त्यांच्याकडे नाही. आणि अस्तित्वात असलेल्या मिडीयाने अश्या लोकांना पारंपारिक अस्पृश्य म्हणून सतत बाहेर ठेवले आहे. त्यामुळे केजरीवालसारखे चमत्कारिक परिवर्तन अन्य कुणी करेल अशी अपेक्षा उराशी बाळगून एकसंघ राजकीय समाजाला दुभंगू नका. आता या देशात मिडिया म्हणेल तोच CM आणि मिडिया म्हणेल तोच PM बनेल. भारतीय राजकीय व्यवस्था मिडिया संचालित झाली आहे. भारतीय लोकशाही मिडीयाधारी भांडवलशाही कडे वळत चालली आहे. हा बदल लक्षात घ्या. व त्याआधारावर पुढची राजकीय दिशा व संकल्पाची आखणी करा. त्यातच तुमचा उद्धार आहे. एकसंघ राजकीय समाज निर्माण करण्यासाठी नेतृत्वाची निवड करा. आणि तुमच्या सभोवतालचा सामाजिक कार्यकर्त्यांचा ताफा त्या खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर

No comments:

Post a Comment