Friday 25 July 2014

धनगर समाजाचे आरक्षण : वास्तव कि राजकारण

धनगर समाजाचे आरक्षण : वास्तव कि राजकारण 

We are Touchable, not Untouchable---by Mahadeo Jankar धनगर समाजाचे बारामतीचे नेते 

धनगर समाज महाराष्ट्रात आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनाचा पवित्र घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळी कलाटणी दिली आहे. धनगर समाजाच्या या आंदोलनाच्या भावनिक बाजूशी आम्ही आहोत. पण वैचारिक आणि व्यावहारिक बाजू तपासून पाहाव्याच लागतील.
धनगर आणि धनगड या दोन नाव साधर्म्यामुळे हा गोंधळ मागच्या अनेक वर्षापासून उफाळलेला आहे. धनगड असा उल्लेख संविधान सूची मध्ये आलेला आहे. आणि धनगर ही जात म्हणून महाराष्ट्रात उल्लेख आलेला आहे. दोन्ही वेगळ्या जाती आहेत असेच आजपर्यंत मानण्यात आले.
भारतीय संविधान, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे अनुसूचित जमाती आणि जाती यामध्ये मुलभूत अंतर आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्कृती या निकषाच्या आधारावर एखाद्या जाती किंवा जमातीला अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्यसरकार घेऊन तो केंद्राकडे सुपूर्द करावा लागतो. केंद्र त्यावर निर्णय घेऊन त्या जाती किंवा जमातीचा समावेश अनुसूचित करीत असतो.
आज धनगर समाज अनुसूचित जाती किंवा जमातीच्या निकषात बसतो का ? जर बसत नसेल तर मुळ आदिवासींवर अन्याय होईल. त्यावर तोडगा म्हणून मराठा समाजासारखे वेगळे आरक्षण त्यांना देता येऊ शकते. पण त्यावर धनगर समाजाचे नेतृत्व करणारे काय दिशा समाजाला देतात त्यावर निर्भर करेल.
धनगर समाजाचे नेते महादेव जाणकर काल IBN LOKMAT वर बोलतांना म्हणाले कि, "आम्ही Untouchable नाहीत आम्ही Touchable आहोत. (We are Touchable, not Untouchable)" आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी बनलो नाहीत. काय मानसिकता आहे ही ? जानकर यांचे म्हणणे सत्य असेल तर धनगर समाजाला आज राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जवाब विचारण्याची गरज नाही. किंवा आरक्षण मागण्याचीही गरज नाही. त्यांच्या समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती खराब असेल तर याचा जवाब त्यांनी धर्मसंस्थेला किंवा धर्मव्यवस्थेला किंवा ते ज्या Touchable धर्मांचे पाईक आहेत त्यांच्या धर्मप्रमुखांना विचारावा कि नाही ?
जिथे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही touchable आणि Untouchable अशी जातीय मानसिकता आरक्षण मागणार्यांच्या व एकूणच समाजाच्या मानसिकतेतून गेलेली नसेल तिथे अश्या वर्गांना कितीही आरक्षण दिले तरी समाजाच्या एकूण परिस्थितीत काहीच बदल घडणार नाही हेच सिद्ध होते. एकूणच हा राजकीय डाव भारतीय समाजाला जातीय मानसिकतेने (वर्णव्यवस्थेने) येणाऱ्या काळात सोलून काढेल एवढे मात्र निश्चित. तूर्तास तुम्ही सर्व तयार राहा एवढेच !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
 

1 comment:

  1. संदीप जी...जय भीम....
    महादेव जानकर यानी टीव्ही वर बोलताना we are not untouchables, we are touchables असे वक्तव्य केले. त्याचे कारण आपण जाणून घ्यावे. आदिवासी नेत्यानी असा मुद्दा मांडला कि आदिवासी कमजोर आहेत म्हणून धनगर त्यांच्यात घुसकोरी करत आहेत. त्याना आरक्षण हवे असेल तर एस सी मध्ये घ्यावे. त्यावर बोलताना महादेव जानकर यानी स्पष्ट केले कि एस सी चे आरक्षण मूळच्या अस्प्रुष्य समाजासाठी आहे. आणि धनगर कधीही अस्प्रुष्य नव्हता त्यामुळे त्याना एस सी चे आरक्षण मिळू शकणार नाही. नेमके हेच सांगण्यासाठी महादेव जानकर म्हणाले कि 'धनगर कधीही अस्प्रुष्य नव्हता' परंतु या विधानाचा विपर्यास करुन काही जणानी त्यांच्या या विधानापुढे वाक्य जोडले "आणि म्हणून आम्ही बाबासाहेबाना मानणार नाही" आता जे जानकर बोललेच नाहीत ते विधान त्यांच्या नावावर खपवून आंबेडकरी समाज आणि धनगर समाज यांच्यात वाद निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असेल. पण सुजाण समाजबांधवामुळे हा प्रयत्न यशस्वी हौ होऊ शकला नाही. ज्याना खात्री करायची आहे त्यानी संबंधित चानेल वरील धनगर आरक्षण ही चर्चा परत पहावी. जानकर यांच्या सध्याच्या राजकीय भुमिकेबद्दल वाद होऊ शकतात. परंतु बाबासाहेब आंबेडकराना मानणार्या एका व्यक्तीबद्दल अशा प्रकारच्या अफवा कुणीही पसरवू नयेत असे मला वाटते.

    ReplyDelete