Sunday, 28 May 2017

#dump_thinker

*#dump_thinker*

जाती जातीत विभालेल्या मानव समुहाला विभागून बुद्धीभेद करून स्पृष्य-अस्पृष्य तयार केले गेले जो "जातीवाद" म्हणून हजारो वर्ष मानवाची पिळवणुक करीत आला. ज्या जातीवादाविरूद्ध अनेक विचारवंतांनी (महापुरुषांनी) लढा दिला. व मानव्यतेचा विचार समाजात पेरून जातीवादाला संपुष्टात आणण्यासाठी आपल्या आयुष्याची होळी केली.

आज त्याच महापुरूषांचे तथाकथित अनुयायी म्हणविणारे त्याच मानवतावादी विचारांची मांडणी करणाऱ्या महापुरूषांच्या विचारांविरोधात शत्रुत्व करून आपले-परके, श्रेष्ठ-कनिष्ठ, योग्य-अयोग्य, महापुरूषांत, विचारवंतात भेद करून हाच आमचा, तो तुमचा; हाच श्रेष्ठ विचार, तो तकलादू विचार असा बुद्धीभेद करून "विचारवाद" "विचारद्वेष" तयार करून मानवतावादी विचारांच्या अनुयायामध्येच स्पष्ट द्वेषभावना पसरवित आहेत. मानवतावादी विचारकांत फुट पाडून अमानवतावादाविरूद्धची लढाई संपवू पाहात आहेत. उद्या "जातीवाद" सोबतच हे पसरवित असलेल्या "विचारवाद" संपविण्यासाठीही लढावे लागणार आहे.

फुले * आंबेडकर, मॉर्क्स * आंबेडकर, गांधी * आंबेडकर अशी शेकी मिरवून अमकाच श्रेष्ठ, तमकाच श्रेष्ठ म्हणणाऱ्या बाळबोधांच्या बुद्धीची किवही येते व रागही येतो. विचारधारा, तत्वद्न्यानाला द्वेषासाठी नव्हे तर मानवी कल्याणासाठी ओळखले जाते. प्रत्येकच तत्वद्न्यान, विचारधारा मानवी कल्याणासाठी स्वतःमध्ये एक श्रेष्ठत्व घेऊन पुढे येते. मार्ग व प्रक्रीया वेगवेगळ्या असतात. ध्येय व उद्धीष्ट्ये एकच असतात ते म्हणजे सामान्य माणसांचे कल्याण.   पण वैचारिक दळभद्री लोकांनो तुम्हाला ते कळणार नाही.

अशा दळभद्रींना भर चौकात चाबकाचे फटके मारले तरीही यांनी केलेल्या समाजद्रोही कृत्याविरोधातला राग शांत होणार नाही.

अशा दळभद्रींनीच चळवळ संपवली रे....संकल्पना द्वेषाने पेटलेल्या राक्षसांनो तुम्हीच एक दिवस महापुरूषांच्या विचारांना लावलेल्या आगीत भस्मसात व्हाल. लिहून ठेवा.

माझा एकच प्रश्न :- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या काळात समाजवादी, मॉर्क्सवादी, उदारमतवादी यांना एकत्र करण्याचा प्रयत्न का केला ?*
कचराकुंडीत वाढलेल्या अनुयायांनो....या प्रश्नाचे उत्तर देता येईल तर बघा.
*#अॅड_डॉ_संदीप_नंदेश्वर*

Wednesday, 10 May 2017

#Once_Again_Ambedkar - Article 1

#Once_Again_Ambedkar

चक्रव्युहात सापडलेल्या आंबेडकरी चळवळीला एक आंबेडकरच बाहेर काढू शकतो...

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

आंबेडकरी चळवळ म्हणजे एक व्यापक विश्व. ज्या विश्वाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक विचारांचा वारसा लाभला आहे. ही चळवळ म्हणजे माणसांच्या प्रश्नांवर लढणारी एक विशाल सैनिकांची फौज. ही चळवळ म्हणजे प्रत्येक समाजाचा आधारभूत विचार. ही चळवळ म्हणजे समता, न्याय, बंधुता व स्वातंत्र्याच्या चतुर्सुत्रीवर उभी असलेली नैसर्गिक मानवी जीवनाची आधारशिलाच. बुद्धापासून ते मानवी प्रश्नांवर लढणाऱ्या प्रत्येक विचाराला एका साखळीत बांधणारा धागा म्हणजे आंबेडकरी चळवळ. आधुनिक काळात त्या सर्व मानवतावादी विचारांचे नेतृत्व करणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारांची व्यापकता लक्षात घेऊन आंबेडकरी चळवळीचे सूत्रसंचालन होणे गरजेचे आहे. ज्या मुलभूत विचारावर ही चळवळ उभी आहे त्या विचारांना एका विशिष्ट कप्प्यात, समूहात, समाजात, जातीत, धर्मात किंवा पंथात गोठविता येणार नाही. विचार जितका व्यापक तितकेच त्या विचारावर चालणाऱ्या चळवळीचे सूत्रसंचालन, कार्यप्रवणता, कार्यपद्धती, ध्येयसिद्धी व्यापक असणे अपेक्षित आहे. विचार मानवी जीवनाचे संचालन करतात तसेच त्या विचारांची कार्यप्रवणता व कार्यपद्धती मानवी जीवनाला ध्येयसिद्धी पर्यंत पोहचविणारी असते. न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्याची मूल्य समाजव्यवस्थेत रुजविणारी असते. आणि तेच आंबेडकरी चळवळीचे बलस्थान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक विचारातून संचालित होणाऱ्या आंबेडकरी चळवळीने एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, व्यापक विचारांना स्वीकारणारे अनुयायी सुद्धा तितकेच व्यापक असले पाहिजे. अन्यथा विचार कितीही व्यापक असले परंतु त्या विचारांचे पाईक म्हणवून घेणारे अनुयायी संकुचित (कुपमंडूक) असले तर विचारही विशिष्ट कप्प्यात राहून संकुचित केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व ज्या गुरूला शरण गेले ते तथागत बुद्ध म्हणतात, “मानवी विचार सदैव प्रवाहित असले पाहिजे.” ज्या विचारांचा प्रवाह संकुचित होतो किंवा ज्या विचाराच्या प्रवाहाला बांध घातल्या जातात ते विचार कालौघात संपण्याच्या मार्गावर जातात. विचार स्वतःमध्ये कितीही प्रवाहित असला किंवा भविष्यातील पिढ्यांना कृतीशील असला तरीही अनुयायांच्या दुर्बलतेने तो समाजात प्रवाही पद्धतीने मांडला गेला नाही तर विचारांना भविष्य उरत नाही. आंबेडकरी चळवळीने हे मुलभूत तत्व लक्षात घेणे गरजेचे आहे.
आज आंबेडकरी चळवळ चक्रव्युहात सापडलेली आहे. आंबेडकरी चळवळीत प्रवेशद्वार भरपूर आहेत.  त्या प्रवेशद्वारातून अनेकांनी आंबेडकरी चळवळीत प्रवेश केला. वलयांकित असलेल्या आंबेडकरी चळवळीची व्यापकता आंबेडकरी चळवळीत काम करण्याऱ्या माणसांना पेलवली गेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने आंबेडकरी चळवळीला त्यांच्या त्यांच्या दृष्टीकोनातून अतिविशिष्टतेकडे नेण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी चळवळीतील सर्वव्यापकता माणसांच्या मर्यादेत अडकली.  व्यक्तींच्या मर्यादा चळवळीच्या मर्यादा बनायला लागल्या. माणूस व समाज केंद्रस्थानी असलेल्या चळवळीत व्यक्ती केंद्रस्थानी बनायला लागल्या. गुंता वाढत गेला. आंबेडकरी चळवळीच्या शिलेदारांनी स्वतःभोवतीच चक्रव्यूह तयार करीत गेले. ज्यामुळे ते स्वतःही स्वतःच तयार केलेल्या चक्रव्युहात अडकत गेले व समाजालाही अडकवित गेले. ज्यामुळे आंबेडकरी विचाराला संकुचीततेची झालर चढत गेली. ज्यातून स्व स्वार्थ वाढीस लागला. व्यक्तिकेंद्रित विचार समूह मानसिकतेला न्याय देण्यात अपयशी ठरला. आंबेडकरी माणसाने स्वतः सोबत चळवळीभोवती जे चक्रव्यूह निर्माण केले. ते भेदून काढणे आधुनिक काळाची गरज आहे.  आम्ही निर्माण केलेल्या मर्यादेत आंबेडकरी विचारांचा व आंबेडकरी चळवळीचा श्वास कोंडला जातोय. हे लक्षात घेऊन मार्गक्रमण होणे गरजेचे आहे.
कुठलाही विचार व चळवळ समूहासोबतच नेतृत्वाच्या आधारशिलेवर पुढे जात असते. फक्त विचारांचे अनुयायी असून चालत नाही. तर त्या विचारांवर चालणाऱ्या अनुयायांना दिशा देणारे नेतृत्वही काळानुरूप आवश्यक असते.  बुद्धाच्या विचाराला सम्राट अशोकाचे, बृह्दताचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेत्रुत्व लाभले नसते तर आज बुद्ध विचार जगाच्या पटलावरून नामशेष झाले असते. संतविचारांना शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे नेतृत्व लाभले नसते तर संतविचारही आज भारतातून नामशेष झाले असते.  प्रत्येक काळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक विचारला एक खंबीर नेतृत्व मिळाले म्हणून आज ते विचार जिवंत आहेत. व समाजव्यवस्थेत मानवी जीवनाचा एक भाग बनलेले आहेत. याचे कारण आहे त्या विचाराला नंतरच्या काळात लाभलेले नेतृत्व. व त्या नेतृत्वानी त्यांच्या समर्थ खांद्यावर पेलून धरलेली विचारांची चळवळ. 
आंबेडकरी चळवळीतही नेतृत्व आले. पण त्यांच्या मर्यादा स्पष्ट जाणवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीत वाढलेले राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड यांनी चळवळीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात काही काळ यांनी चळवळीची व्यापकता लक्षात घेऊन मार्गक्रमणही केले. परंतु व्यक्तिगत स्वार्थ जेव्हा विचार व चळवळीवर डोईजड व्हायला लागला तेव्हापासून आंबेडकरी चळवळीची व्यापकता मर्यादेत अडकायला लागली. व नेतृत्वातील स्पर्धेने आंबेडकरी चळवळीत नवीन चक्रव्यूह तयार केले. चळवळीची व्यापकता विशिष्ट समूहापर्यंत मर्यादित व्हायला लागली. विशिष्ट समूहाचे नेतृत्व करण्यात व त्यातून स्व स्वार्थ साधून घेण्यात धन्यता मानल्या जाऊ लागली. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संस्था, संघटना, पक्षांना ताब्यात घेण्यासाठी यादवी तयार झाली. तर काहींनी वेगळा मार्ग पत्करला तर काहींनी या संस्था, संघटना, पक्ष आपल्याच ताब्यात यावा यासाठी संघर्षाची ठिणगी टाकली. यामुळे आंबेडकरी चळवळीला जणू ग्रहणच लागले.
रिपब्लिक संकल्पना बाबासाहेबांनी दिली. तर बहुजन संकल्पना बुद्धांनी दिली. दोन्ही संकल्पना व्यापक व तितक्याच प्रभावी. म्हणून काहींनी रिपब्लिकन ला जवळ केले तर काहींनी बहुजन या संकल्पनेला जवळ केले. या दोन संकल्पनात दोन राजकीय प्रवाह आंबेडकरी चळवळीत तयार झाले. पण रिपब्लिकन नेत्यांनी बौद्ध, आंबेडकरी, महारांच्या पुढे आपली राजकीय धाव घेतली नाही तर बहुजन प्रवाहातील स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या नेत्यांनी बहुजन संकल्पनेला जातीय रंग बहाल केला. जातीय गणिते तयार केली गेली व त्यातून बहुजन नावाचा जातीय समूह तयार केला गेला. तथागत बुद्धांनी बहुसंख्य या अर्थाने वापरलेल्या बहुजन या संकल्पनेला जातीय रंग चढताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताचा लढा अवरुद्ध झाला. व त्यातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट फुट पडत गेली. वैचारिक दिवाळखोरी वाढत गेली. त्यामुळे आंबेडकरी चळवळ मुख्य उद्देशापासून दूर जाऊन अंतर्गत वादात अडकली.
आंबेडकरी चळवळीतील काहींनी स्व स्वार्थासाठी केलेल्या बुद्धीभेदातून आजची पिढी सुद्धा प्रभावित झाली. आंबेडकरी चळवळीत काहींनी तयार केलेल्या चक्रव्युहात आधीच्या पिढीसोबतच आताची पिढी पण अडकली. व या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कुणालाच मार्ग सापडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा लाभ घेऊन प्रस्थापितांनी आंबेडकरी चळवळीतील काही माशांना गळाला लावले. त्यातून चळवळीत भेदाची दरी आणखीच वाढत गेली. समाज नेतृत्वहीन होऊ लागला. भरकटू लागला. भ्रमित होऊ लागला. अविचारी होऊ लागला. स्वतःभोवती गुंफलेल्या कुंपणातून बाहेर न पडता मर्यादेच्या भिंतीतून एका व्यापक प्रवाहाला खेकड्यांच्या सवयीप्रमाणे मागे खेचू लागला.
या सर्व गदारोळात सामाजिक वास्तव्याकडे पूर्णतः डोळेझाक केल्या गेली. कुठल्याही विचाराचा किंवा चळवळीचा समूह संघटीत असेल तर ती चळवळ टिकते व वृद्धिंगतही होते. परंतु आंबेडकरी चळवळीचा समूह संघटीत राहिला नाही. आजही अनेक गावची गावे आंबेडकरी चळवळीच्या विरोधी पक्षांचे मतदार आहेत. अनेक गावांतील आंबेडकरी विचारांना व चळवळीला मानणारा समूह आंबेडकरेत्तर पक्षांचा मतदार आहे. याकडे लक्ष न देता आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या माणसांना (मतदारांना) एकत्र न करता आंबेडकरी नेत्यांच्या एकत्रीकरणाच्या आरोळ्या ओढल्या गेल्या. तेही अशा नेत्यांना सोबत घेऊन जे स्वतःच आंबेडकरेत्तर पक्षांची व नेत्यांची घरठाव करून आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक आपल्या मर्जीतल्या हस्तकांच्या हातून केले गेले. ज्यामुळे आंबेडकरी चळवळ संघटीत होण्याऐवजी दिवसेंदिवस विघटीत होत गेली.
याचा परिणाम असा झाला कि एकीकडे आंबेडकर नावाचा उदोउदो करून दुसरीकडे आंबेडकर नावाची घृणा ही समाजात पसरविली गेली.  आंबेडकरी चळवळ संकुचित होत असतांना आंबेडकर नावानेच या चळवळीला थोडेफार का होईना तारूण धरले.  स्वतःचे व्यक्तीगत स्वार्थ बाजूला सारून, मान-सन्मान बाजूला ठेवून, मिळू शकणारे राजकीय लाभ दुर्लक्षित करून, टीका व आरोप-प्रत्यारोप दुर्लक्षित करून, आंबेडकर परिवाराची होणारी तथ्यहीन बदनामी मोठ्या मनाने पचवून, चळवळीच्या व्यापकतेसोबतच चळवळीची कृतीप्रवणता टिकवून ठेवली ती आंबेडकर या नावानेच. आंबेडकरी चळवळीत सारेच वातावरण गढूळ होत असतांना देखील आंबेडकरी चळवळीला नेतृत्व दिले ते आंबेडकर नावानेच. संकुचित होत चाललेल्या आंबेडकरी चळवळीला एका विशिष्ट जाती व समूहात अडकवून न ठेवता आंबेडकरी चळवळीची व्यापकता टिकवून ठेवली ती आंबेडकर नेतृत्वानेच. संतपरंपरेपासून ते आंबेडकरी विचार प्रवाहापर्यंत मानवतावादी विचारांचा सेतू बांधण्याचे काम केले ते आंबेडकर नावाच्या नेतृत्वानेच. विचारांचे वारस बेईमान होऊन खरेदी-विक्रीत विकले जात असतांना विचाराच्या वारसेसोबतच नावाचाही वारसा टिकवून ठेवला तो आंबेडकर नावाच्या नेतृत्वानेच. ते नाव, ते नेतृत्व, ते वैचारिक वारस होते प्रकाश आंबेडकर.
राजकीय गदारोळात मानव्यतेसाठी लढण्याची मानसिकता संपली असतांना, मनुवादी विचार, कृती, व्यवस्था भक्कम होत असतांना, जातीय संवेदना वाढत असतांना, जातीय अत्याचाराची परंपरा अखंडित सुरु असतांना सर्वांना सोबत घेऊन “जाती अंताचा लढा” मा. प्रकाश आंबेडकरांनी सुरु केला. आंबेडकरी चळवळीत निर्माण केले गेलेले चक्रव्युव्ह भेदून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीतून बाहेर काढून संतपरंपरेसोबत जोडून घेतले. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून जातींचा नव्हे तर परिवर्तनवादी माणसांचा समूह तयार करून दुर्लक्षित सामाजिक समूहाला राजकीय प्रवाहात आणले. बाबासाहेब शब्दात न गोवता कृतीत उतरविले. आज मा. प्रकाश आंबेडकरांनी फक्त आंबेडकरी समुहालाच नेतृत्व दिले नाही तर परिवर्तनवादी, मानवतावादी समूहाला नेतृत्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात सांसदीय मार्क्सवाद्यांनी जर कुणाचे नेतृत्व मान्य केले असेल तर ते मा. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व होय. आंबेडकरी चळवळीचा ढासळत चाललेल्या चिरेबंदी किल्ल्याचे रक्षण करून त्याला अभेद्द्य ठेवण्याचे काम मा. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वानेच केले. हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. पण त्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की, त्यांच्या नावापुढे “आंबेडकर” नाव लागल्यामुळे इतरांना आंबेडकर नावासमोर खुजे राहण्याच्या भीतीपोटी प्रकाश आंबेडकर यांना टीका व बदनामीच सहन करावी लागली.  आंबेडकर नावाने लाभ घेण्यास पुढे धजावणारा समाज आंबेडकर नावाच्या नेतृत्वाखाली संघटीत व्हायला तयार नसणे हे समाजाचे व चळवळीचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
चहुबाजूने मानवतावादावर आक्रमणे होत असतांना, माणसे, विचार मारली जात असतांना, इतर स्वयंघोषित नेतृत्व खुजे ठरत असतांना, माणसांवर होणाऱ्या अन्यायाची अविरत मालिका सुरु असतांना, मानवतावादी विरोधी विचारांची सत्ता सत्तेवर असतांना, समाज भयभीत असतांना, समाज स्वतःला असुरक्षित समजत असतांना, या देशाचे संविधान धोक्यात आले असतांना, एकंदरीतच आंबेडकरी चळवळ चक्रव्युहात अडकली असतांना समाजाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कुणासोबत जायचे, कुणासोबत जाऊ नये हे ठरविण्याची वेळ आली आहे. नेतृत्वहीन झालेल्या समाजाने चळवळीचे नेतृत्व स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. आंबेडकरी विचारांची व चळवळीची व्यापकता लक्षात घेऊन मागच्या ६० वर्षात झालेल्या चुकांमुळे चक्रव्युहात सापडलेल्या आंबेडकरी चळवळीला एक आंबेडकरच (मा. प्रकाश आंबेडकर) बाहेर काढू शकतो. हे निर्धारित करून मार्गक्रमण करण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळीचा एका विशिष्ट कप्प्यात (समूहात) कोंडत चाललेल्या श्वासाला मुक्त करायचे आहे. आंबेडकरी चळवळीच्या रथाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या स्वप्नातील ध्येयपुर्तीकडे घेऊन जाण्यासाठी #परत_एकदा_आंबेडकर  स्वीकारायचा आहे. हेच आंबेडकरी चळवळीचे वर्तमान व यातूनच आंबेडकरी चळवळीच्या भविष्याची उभारणी होऊ शकेल.
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.

8793397275, 9226734091, 9518388849

Wednesday, 12 April 2017

रिपब्लिकन ऐक्याच्या ठेकेदारांनो.

🦁 *रिपब्लिकन ऐक्याच्या ठेकेदारांनो...* 🦁
                💃 *तुम्हाला* 💃
*#प्रकाश_आंबेडकर* यांच्यावर टिका करण्याचा नैतिक अधिकार आहे का ?

💃💃 *बिजेपीभक्त, नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बहीण व बरिएंम च्या (कामठी) गावनेत्या मा. सुलेखाताई कुंभारे यांचे चरित्र रिपब्लिकन आहे का ?* 💃💃

*#प्रकाश_आंबेडकर यांच्यामुळे रिपब्लिकन ऐक्याला बाधा* - मा. सुलेखाताई कुंभारे, सौजन्य - दै. लोकमत, दि. १२/०४/२०१७

✍🏻हल्ली *रिपब्लिकन ऐक्याच्या वेठबिगार ठेकेदारांना* झोपेतही *#प्रकाश_आंबेडकर* स्वप्नात यायला लागले आहेत. बिचारे यामुळेच की काय सकाळ-दुपार-संध्याकाळ झपाटल्यासारखे रिपब्लिकन ऐक्याच्या नावाखाली *#प्रकाश_आंबेडकर* यांच्यावर टिका करायला लागतात. तुमच्या टिकांचे स्वागत आहे. *पण* टिका करण्याआधी तुम्ही तुमचे चरित्र तपासले आहे का ? तुमच्या कॉग्रेस, बिजेपी व तत्सम अन्य पक्षांच्या चाटूगिरी वेठबिगारीत रिपब्लिकन चरित्र व चारित्र्य उरले आहे का ? हे तपासून समाजासमोर या हे आव्हान आज समाज तुम्हाला विचारतोय.

💃 सुलेखाताईंच्या बाबतीत लिहायचे झाले तर *कॉग्रेसच्या वेठबिगारीत मंत्रीपद भोगले. व आता बिजेपीच्या वेठबिगारीत कामठी मर्यादीत पगोडा बँक चालवितात. ताई रिपब्लिक कधी होत्या ?* याचा खुलासा त्यांनी करावा. *बरिएंम च्या सुलेखाताई ज्या बिजेपी च्या कमळावर स्वार होऊन आपले दोन-चार मानसपुत्र उभे करतात. त्या कमळरूपी ताईंच्या मुखी रिपब्लिकन ऐक्याची भाषा वाड्यावरून आली की मुख्यालयातून ?* याचाही खुलासा त्यांनी समाजासमोर करावा.

✍🏻 *#प्रकाश_आंबेडकर* यांच्यामुळे रिपब्लिकन ऐक्याला बाधा आली आहे की तुमच्यासारख्या आजपर्यंत कॉग्रेस, बिजेपीची वेठबिगारी करणाऱ्यांमुळे रिपब्लिकन ऐक्याला बाधा आहे. हे न जाणण्याईतपत समाज दुधखुळा नाही. *सुलेखाताई तुमच्यासह आठवलेंसोबत रिपब्लिकन ऐक्य बिजेपीसाठी करायचे ? की कवाडे, गवईसोबत रिपब्लिकन ऐक्य कॉग्रेससाठी करायचे ? नेमके #प्रकाश_आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य बिजेपीवाद्यांसोबत करायचे की, कॉग्रेसवाद्यांसोबत करायचे ?* याचेही खुलासे आता तुम्हीच करावे.

*हंssss थांबा !* "आम्ही त्यांच्यासोबतच्या युत्या-आघड्या तोडतो." असे म्हणण्याची घाई करू नका. फक्त एवढेच सांगा तुम्ही स्वतंत्र व स्वाभिमानी रिपब्लिकन चारित्र्याने कधी राजकारण केले ? याची समाजाला आठवण करून द्या. *तुमच्या सर्व रिपब्लिकन ऐक्यवादी वेठबिगारांच्या चारित्र्यातच प्रामाणिकता नाही व नव्हती. तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमची कुठली अग्निपरिक्षा घ्यायची ?* एवढे सांगा.

✍🏻 *ज्यांची अख्खी खाणदाण कॉग्रेस-बिजेपी व अन्य तत्सम बिगर रिपब्लिकन पक्षात गेली व ज्यांचे काके, मामे, चुलते आजही बिगर रिपब्लिकन पक्षात काम करीत आहेत अशा साऱ्याच वेठबिगारी समाजधूरिणांनी रिपब्लिकन ऐक्याचा, रिपब्लिकन पुर्नबांधणीचा तमाशा उभा करावा यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी.* इतिहासातील आजपर्यंतच्या रिपब्लिकन ऐक्यवादी, रिपब्लिकन पुर्नबांधणीवादी तमाशात एकही प्रामाणिक, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात काम करणारा कार्यकर्ता का दिसून आला नाही ? *एकतरी सच्चा रिपब्लिकन कार्यकर्ता या तमाशात दाखवून द्या. ज्याने आयुष्यात कधीतरी रिपब्लिकन पक्षात काम केले व रिपब्लिकन पक्षाला मते दिलीत.*

👉🏻💃 *सारेच जे इतर पक्षात वेठबिगारी करून आले, त्यांनाच रिपब्लिकन ऐक्याचा, रिपब्लिकन पुर्नबांधणीचा पुळका कसा काय येतो ?* हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय होता. आता त्याचे संशोधन समाजाने करावे व जाब विचारावा.

💃 *हंssss रिपब्लिकन ऐक्यवादी ठेकेदारांनो... थुईथुई नाचण्याआधी थांबा ! जरा ऐका...*

✍🏻 *आम्ही ऐक्यवादी नाहीत असा गैरसमज करण्याआधी...*

👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, चळवळीचे*
👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, जनतेचे*
👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, समाजाचे*
👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, स्वाभिनानी, प्रामाणिक माणसांचे*
👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, सच्च्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे*
👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, चळवळीच्या एकाच नेतृत्वाच्या एकाच पक्षाच्या मतदारांचे*
👍🏻 *आम्हालाही ऐक्य हवेय, निवडणुकांत न विकणाऱ्या कार्यकर्त्यांचे*
✍🏻___ *#प्रकाश_आंबेडकर* यांना हे ऐक्य हवेय.

✍🏻 *अरे ऐक्यवादी, पुर्नबांधणीवादी वेठबिगारांनो.... #प्रकाश_आंबेडकर यांना तुमचे गुलामीचे ऐक्य नव्हे तर वर सांगीतलेले ऐक्य हवेय.* त्यासाठीच त्यांची स्वाभिमानी, प्रामाणिक वाटचाल सुरू आहे. *#आंबेडकर या नावाला धक्का न लावता.* अन् तुम्ही काय करता तर, *आंबेडकर, रिपब्लिकन नाव घेऊन इतरांची वेठबिगारी...*

       🙏🏻 *समाजाला एक आव्हान* 🙏🏻
*सुलेखाताई सारख्या सर्वच परपक्षीय वेठबिगार ऐक्यवाद्यांपासून ते पावसाळी छत्र्यांप्रमाणे उगविणाऱ्या पुर्नबांधणीवादी वेठबिगारांपासून समाजाने सावध व्हावे. अन्यथा हे वेठबिगार समाजालाही वेठबिगार बनवून ठेवतील.*
👍🏻👉🏻 आता ध्येय एकच :- *एक पक्ष, एक नेता व संपुर्ण समाज त्या एकाच पक्षाचा मतदार*

🦁 रिपब्लिकन ऐक्यवादी वेठबिगारांनो यानंतर तरी *#प्रकाश_आंबेडकर* यांच्यावर टिका करतांना जरा काळजी घ्या. अन्यथा काळ उत्तर देईलच.
✍🏻___ *#अॅड_डॉ_संदीप_नंदेश्वर*
टिप :- *#प्रकाश_आंबेडकर* यांच्यावर टिका करण्याचा अधिकार त्यांनाच आहे *ज्यांनी रिपब्लिकन पक्षाशिवाय इतर कुणालाच मतदान केले नाही. ज्यांनी कधीच इतर पक्षात वेठबिगारी केली नाही. ज्यांनी कधीच राजकीय सत्तेची गुलामी पत्करली नाही.* आता असा शोधून दाखवा व नंतरच टिका करा.
✍🏻 *#अॅड_डॉ_संदीप_नंदेश्वर*

Wednesday, 28 December 2016

धम्मदिक्षेचे Event धम्माला व चळवळीलाही धाेकादायक

🙋🏻‍♂ *धम्मदिक्षेचे Event धम्माला व चळवळीलाही धाेकादायक*

🙄 *धम्मदिक्षेच्या Event रूपी राजकारणाने आंबेडकरी चळवळीला धोका संभवू शकतो.*

🙄 *धम्मदिक्षेचे Event साजरे करणे म्हणजे भविष्यात धार्मिक उन्मादाला व धार्मिक द्वेषाला जन्म देणे होय.*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

🙋🏻‍♂ भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना धार्मिक अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे धर्मपरिवर्तन किंवा धर्म स्विकार हा प्रत्येकाचा व्यक्तीगत मुलभूत अधिकार आहे. त्याचा वापर त्याने स्वच्छेने करावा. परंतु *जेव्हा २००-३०० कुटूंबाच्या धर्मपरिवर्तनाचे Event साजरे केेले जातात व त्या Event च्या यशस्वितेसाठी विजयीमुद्रेत जेव्हा मोठ्या संख्येने समाज उपस्थित होतो, तेव्हा दोन धर्मात तेढ उत्पन्न व्हायला चालना मिळते.*

🙋🏻‍♂ धर्मपरिवर्तनाचा Event साजरा झाला म्हणजे एखादा धर्म मोठा झाला किंवा श्रेष्ठ झाला असे होत नाही. धर्माची तत्वे माणसांना आकर्षित करीत असतात. व *जेव्हा धार्मिक तत्वांचा स्विकार व्यक्ती करतो तेव्हा त्याला त्याच्या धर्मपरिवर्तनाचे Event साजरे करण्याची गरजच पडत नाही. तो Event साजरे न करताही धार्मिक तत्वाचा अंगिकार करून स्वतःच त्या धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम करायला लागतो. त्याची वर्तणुक हीच त्याच्या धर्मपरिवर्तनाचे प्रतिक बनायला पाहीजे.*

🙋🏻‍♂ काल दि. २५/१२/२०१६ ला नागपूरच्या दिक्षाभूमिवरून काही २००-३०० ओबिसी कुटूंबांनी (म्हणजेच हिंदूंनी) धर्मपरिवर्तन करून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. या धर्मपरिवर्तनाचा Event केला गेला. (कदाचित राजकारणही केले गेले असे म्हणता येईल.) *४००-५०० लोकांच्या धर्मपरिवर्तन सोहळ्याला हजारो बौद्ध व आंबेडकरी लोक उपस्थित होते हे त्या Event चे फलितच म्हणावे लागेल.*

४००-५०० लोकांच्या धर्मपरिवर्तनाला हजारो आंबेडकरी - बौद्ध लोक या Event ला का उपस्थित होते ? तर याचे कारण एकच की ते ओबिसी होते.(हिंदू होते) कारण Event ची हेडलाईनही तशीच होती. 🙋🏻‍♂ *हा Event साजरा करणाऱ्यांना एकतर चळवळीचे, धम्माचे गांभिर्य नाही. किंवा निव्वळ राजकारणाला बळी पडून हा उत्सव साजरा केला गेला. यात धर्मपरिवर्तन कमी आणि राजकारण अधिक होते असेच खेदाने म्हणावे लागेल.*

🙋🏻‍♂ आजपर्यंत अनेक लोकांनी धर्मपरिवर्तन केले. विविध धर्माच्या व विविध जातीच्या लोकांनी धर्मपरिवर्तन केले. *(धर्मपरिवर्तनानंतर त्यांची बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार किती केला किंवा बौद्ध तत्वे वर्तणुकीत उरविले की नाही यावर न बोललेलेच बरे)* परंतु असे Event साजरे करून धर्मपरिवर्तनाचे सोहळे साजरे व्हायला लागले तर येणाऱ्या काळात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो.

👉🏻 *Event रूपी धर्मपरिवर्तन सोहळ्याने काय साध्य केले ?*
१) ४००-५०० लोक हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आले. (बुद्धीस्ट झाले असे म्हणता येणार नाही.)
२) या ४००-५०० लोकांना धर्मपरिवर्तन करण्याचे नेतृत्व करणाऱ्या माणसांची सामाजिक-राजकीय उंची वाढली एवढेच.
३) ओबिसी लोक धर्मपरिवर्तन करताहेत हे पाहून त्या सोहळ्याला हजारो बौद्ध - आंबेडकरी बांधव उपस्थित होऊन एक मोठा Event साजरा झाला एवढेच.

👉🏻 *पण या Event रूपी सोहळ्याचे दूरगामी परिणाम काय होतील ?*
१) ४००-५०० किंवा १०००-१५०० ओबिसी लोकांनी धर्मपरिवर्तन केले म्हणून तुम्ही केलेली गर्दी, त्यातून साजरा केला जाणारा उन्माद व त्या सोहळ्याचा प्रचार प्रसार लाखो ओबिसी बांधवांच्या (हिंदूंच्या) भावनांना दुखावणारा झाला तर त्याचे भविष्यावर दुष्परिणाम होतील.
२) कालच्या किंवा उद्याच्या धर्मपरिवर्तन सोहळ्याने आंबेडकरी राजकारण वा आंबेडकरी मतदान वाढेल का ? तर कदापी नाही.
३) तुमच्या या धर्मपरिवर्तन सोहळ्याच्या उन्मादाचा प्रतिपरिणाम इतर लोकांच्या मनात तुमच्याविषयी द्वेष पसरविण्यासाठी प्रस्थापितांकडून केला गेला तर व्यापक आंबेडकरी चळवळीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
४) या धर्मपरिवर्तन Event चे नेतृत्व करणाऱ्यांना उद्या चळवळीच्या खरेदी विक्रीचे नेतृत्व दिले जाण्याची दाट शक्यता आहे. ज्याचे परिणाम चळवळीवर होऊ शकतात.

🙋🏻‍♂ *माझा विरोध धर्मपरिवर्तनाला नसून माझा विरोध धर्मपरिवर्तनाचे Even साजरे करण्याला आहे.*

🙏🏻🙋🏻‍♂ *माझा विरोध कशाला ?*
१) माझा विरोध धर्मपरिवर्तनाच्या कार्यक्रमाला Event बनविण्याला आहे.
२) माझा विरोध धर्मपरिवर्तन Event चे नेतृत्व करणाऱ्यांच्या भूमिकेला आहे.
३) माझा विरोध व्यक्तीगत मान्यतेच्या सार्वत्रिक दिखाऊपणाला आहे.
४) माझा विरोध धार्मिक, सामाजिक, राजकीय व चळवळीचे गांभिर्य नसल्याला आहे.
५) माझा विरोध बौद्ध - आंबेडकरी माणसांच्या अतिउत्साहीपणाला आहे.

🙏🏻 *कुठल्याही सामाजिक कृतीचे दुरगामी परिणाम लक्षात घेणे जास्त महत्वाचे असते.*

🙋🏻‍♂💐 *धर्मपरिवर्तन करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे स्वागत ! व पुढील आयुष्यात आपण धम्मतत्वाने वाटचाल करून जीवनाला गतिमान कराल ही मंगलकामना !*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

Thursday, 24 November 2016

सर्व झोल काळा पैसा पांढरा करण्यासाठी...

✍🏻 *नोटाबंदी / Demonetisation / High Denomination Currency हा सर्व झोल काळा पैसा पांढरा करण्यासाठी...*
✍🏻 *____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

✍🏻 कुठल्याही संवैधानिक मार्गाचा प्रचलित वापर न करता देशातील *जनतेला मुर्ख बनवून १००/५०० च्या नोटा रातोरात बंद करण्यात आल्या. अख्खी लोकशाही अंधारात ठेऊन.* कशासाठी बघा...

*रद्द करण्यात आलेल्या नोटा*
    १००० + ५०० = १५००
*सुरू करण्यात आलेल्या नोटा*
    २००० + ५०० = २५००

*काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचे गणित बघा...*

  सुरू          बंद.            फरक
२५००   -   १५००    =    १०००

✍🏻 १००० रू. अधिकचे बाजारात/अर्थव्यवस्थेत आणल्या गेले. त्यासाठीचे तारण कुठं आहे ? नविन आणि जून्या नोटांमध्ये १००० रू. अधिक का काढल्या गेले ?

✍🏻 *उत्तर :-*

*अगाऊ १००० रू. अर्थव्यवस्थेत आणून बिजेपी, आरएसएस, अदानी, अंबानी यांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला.*

✍🏻 तुम्ही मात्र नमो नमो करीत काळा पैसा, भ्रष्टाचार यावर बोंबलत बसलात व तिकडे तुम्हाला मुर्ख बनवून तुमचाच पैसा बँकेद्वारे गोळा केला गेला व सर्व काळा पैसा पांढरा केला गेला.

😜 बसा आता "सबका साथ, सबका विकास" बोंबलत हातात हात घेऊन बँकांच्या रांगेत...

🙄 *"उघडा डोळे, बघा निट."* 😳
✍🏻 *____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Thursday, 10 November 2016

*ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !*

🚩 *भाजपाईयों (संघीयों) या देशात अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत, देशहितासाठी, देशविकासासाठी त्या केव्हा बदलणार ?*

💰 *फक्त ५००, १००० च्या नोटा बदलल्याने भ्रष्टाचार, ब्ल्यॉकमनी थांबेल का ?*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

🗣 या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कालबाह्यच झाल्या नसून समाजव्यवस्थेसाठी व देशहिताला धोकादायक आहेत. *चलनी नोटांंनी तर फक्त भ्रष्टाचार करून देशाची भौतिक संम्पत्ती धोक्यात आणली पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने देशाची भविष्याची चल-अचल, भौतिक-व्यावहारिक, शारिरिक-मानसिक संम्पत्ती संपवू पहात आहेत.* त्या कधी बदलणार आहात ?

🗣 *विदेशात असलेला काळा पैसा ५००, १००० च्या नोटा बदलल्याने परत येणार का ?*
*उत्तर :- नाही* मग स्विस बँकेतला तुमच्या पैशाचे काय करणार आहात ? त्याचा निर्णय अद्याप का घेतला गेला नाही.

*वास्तव :- देशातला सामान्यांचा हक्काचा पैसा काढून बँकात जमा करून तुमच्या स्विस बँकेतल्या ब्ल्यॉकमनी ला व्हाईट करायचे आहे हे सांगा ना मा. मोदी साहेब...*

🗣 *विदेशात जमा असलेल्या ५००, १००० रुपी ला तुम्ही कसे बदलणार हे पण देशवासियांना कळले पाहीजेच ना !* ते अद्याप देशवासियांपासून का लपविण्यात आले आहे. देशाचा नागरिक म्हणून याचे उत्तर मला पाहीजे आहे. व ते उत्तर देणे तुम्हाला बंधनकारक आहे.

*सब गोलमाल है, भाई सब गोलमाल है !*

💰 *विदेशात असलेल्या रूपयाचे गोलमाल (ब्ल्यॉक मनी) कुठे होणार आहे. कारण हा रूपया देशांतर्गत ब्ल्यॉक मनी पेक्षा कित्तेक पट जास्त आहे.*

💰 *करमुक्त (टॅक्स फ्री) असलेला देशभरातल्या मंदीरातील ब्ल्यॉकमनीला सार्वजनिक करणे देशहिताचे व देशविकासाचे मोठे साधन असतांना ते का केले जात नाही.* देशभरातल्या मंदीरातील ५००, १००० च्या नोटांचा ब्ल्यॉकमनी व्हाईट करून परत कुणाकडे सुपूर्द केला जाणार ? हे पण सांगा.

🙏🏻 *कालबाह्य झालेले (विशिष्ठ वर्गातले) पुजारी ज्यांची मंदीरातील ब्ल्यॉकमनीवर परंपरागत मालकी हक्क आहे ते सार्वजनिक करणे देशहिताचे/देशविकासाचे आहे.* तो निर्णय केव्हा होणार. *भ्रष्टाचार मुक्तीचा हा मैलाचा दगड* आपण कधी पार करणार आहात हे देशवासियांना कळू द्या.

🇮🇳 *देशहीत/देशविकास, भष्टाचार मुक्ती तुमच्यापासून सुरू व्हायला पाहीजे होती ती सामान्य नागरिकांपासून का सुरू केली गेली ?* सामान्य देशवासियांना वेठीस धरून तुम्ही *जैसे थे* कसे काय राहणार ? *मंदीर, पुजारी, दान, स्विस बँक या तुमच्या ब्ल्यॉक मनी उत्पन्न स्त्रोतांना तुम्ही कधी सोडणार/तोडणार/बदलणार ?*

🎤 *ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !* 🇮🇳

*या देशातील मंदीर, पुजारी, देव-देवता, संस्कृती, जाती, धर्म, विचार जेव्हा बदलतील तेव्हा ५००, १००० कालबाह्य ठरविण्याची वेळ येऊन नव्या ५००, २००० च्या छपाईवर सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार नाही.*

*अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या निर्णयाचे (भ्रष्टाचार व ब्ल्यॉकमनी) १०% सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतांना मलाही दिसून येतात. परंतु त्याच अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ९० % ची चिंता जास्त सतावतेय. हा निर्णय १०० % ब्ल्यॉकमनी निर्मुलनाचा निश्चितच नाही.*

म्हणूनच म्हणतो.....
🎤 *ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !* 🇮🇳

🙏🏻 *चलो जड से बदलाव की तरफ बढते है ! न की डालियों से जड की तरफ ! बदलाव नही होगा साहाब !*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
*टिप :- मै किसी भी मंदीर, ईश्वर, देव, धर्म का विरोध नही करता, क्योकी दोष उनका नही दोष मानसिकता और प्रकृती/संस्कृती का है !*

Thursday, 27 October 2016

*RSS तरूण होत आहे व आंबेडकरी चळवळ म्हातारी*

😳 *RSS तरूण होत आहे व आंबेडकरी चळवळ म्हातारी* ☺

🚩 भारतात दोन विचारधारा क्रांती व प्रतिक्रांतीच्या पथदर्शक आहेत.
       👉🏻 *आंबेडकरी चळवळ क्रांतीच्या मार्गावर चालणारी* तर
       👉🏻 *RSS प्रतिक्रांतीच्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारी*

🚩RSS ला इथली संविधानिक लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाची *व्यवस्था उध्वस्त करायची आहे* व त्या दिशेने ते पाऊले टाकत आहेत.
👉🏻तर दुसरीकडे...
🇪🇺 आंबेडकरी चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे संवर्धन, पालनपोषण व संरक्षण करणारी *संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे.* असे असतांनाही ही चळवळ गर्तेत अडकली आहे.

👉🏻 *एकीकडे*...
🚩RSS च्या शाखा वाढत आहेत. वाढणाऱ्या शाखांमध्ये तरूणाईचा भरणा होत आहे. *तरूणांना आकर्षित करून RSS पुढच्या प्रतिक्रांतीच्या ५०-६० वर्षाची तजविज आजच करून ठेवीत आहे.*

👉🏻 तर *दुसरीकडे...*
🇪🇺आंबेडकरी चळवळ काही मोजक्या वय संपत चाललेल्या लोकांपर्यंत मर्यादीत होत चालली आहे. *तरूणाईला आकर्षित करणारा कृतिकार्यक्रम आंबेडकरी चळवळीच्या म्होरक्यांकडे दिसून येत नाही.*

✍🏻 *कुठल्याही संघटनेचे वय वाढत असतांनाच तरूणाईच्या बळावर त्या संघटनेचे आयुष्य दुप्पटीने वाढत जात असते. पण तरूणाईपासून दूर जाणारे संघटन प्रौढावस्थेत म्हातारे होत जाते.*

✍🏻 क्रांतीला प्रतिक्रांतीसोबतचे शितयुद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी *क्रांतीच्या नायक शिलेदारांची ही जबाबदारी आहे की आंबेडकरी चळवळीत उपकार म्हणून कार्य करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून कार्याला लागा.*

✍🏻 प्रतिक्रांतीवर मात करायची असेल तर शिस्त व संयम पाळायला शिका. *एखादी कृती करून समाजमन जिंकले की लगेच नायक होण्याची महत्वाकांक्षा बाळगू नका.* व लगेच आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व करणाऱ्यांवर प्रश्नांकित वयल निर्माण करू नका. *तुम्ही एका जबाबदारीचे निर्वहन करून चळवळीत आपले योगदान दिले. असेच प्रत्येकाने आपआपली जबाबदारी म्हणून आंबेडकरी चळवळीत योगदान दिले तरच ही चळवळीचे आयुष्य चिरकाळ टिकेल.*

✍🏻 मोर्चे काढली, चार माणंस जमवली म्हणजे चळवळ चालत नसते. तत्कालीन मुद्यांवर लढणे म्हणजेच चळवळ नव्हे. तर *तत्कालीन मुद्यांवरील लढ्याचा भविष्यावर दूरगामी परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन संयमी लढ्याची आखणी करणे चळवळीच्या शिलेदारांचे काम आहे.*

🙏🏻👉🏻 *आंबेडकरी चळवळीतल्या व परिवर्तनवादी आंदोलनातल्या माझ्या तरूण मित्रांनो...*👉🏻

🗣 *शत्रु जेव्हा स्वतःचे शक्तीप्रदर्शन करीत असतो तेव्हा त्याच्या शक्तीप्रदर्शनाची चिकीत्सा करून तो वेळ चिंतनात घालवायचा असतो.* हे युद्धनितीचे साधे व सोपे नियम आहे.
🗣 *शत्रुंचे शक्तीप्रदर्शन व तुमचेही शक्तीप्रदर्शन दोन्ही एकसाथ, एकाचवेळी सुरू असेल तर त्याला युद्ध असेच म्हणतात.* शक्तीप्रदर्शनाची कीतीही नावे बदलली तरीही....
🗣 ज्या गोष्टींच्या संरक्षणासाठी तुम्ही तुमचे शक्तीप्रदर्शन कराल त्याच गोष्टीच्या विरोधात शत्रु जनमत तयार करीत असतो हे लक्षात घ्या. *आज ज्याच्या सन्मानार्थ तुम्ही शक्तीप्रदर्शनाला तयार आहात तेच उद्धस्त करण्यासाठी उद्याचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.*
🗣 *शत्रु तरूण होत आहे. तुम्हीही नवी उमेद जागवा. शस्त्राने नव्हे अस्त्राने सज्ज व्हा. शक्तीप्रदर्शनासाठी नाही तर नितीने सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी...*

🙏🏻🇪🇺 मित्रांनो, निती ओळखा, कृती ओळखा, चाल ओळखा, चिंतन करा, जबाबदारी घ्या. तुम्ही नेहमीच शक्तीप्रदर्शन करीत आला आहात. *हा काळ चिंतनाचा आहे, तो चिंतनात घालवा. व नव्या दमाने, नव्या उमेदीने, नव्या नितीने सज्ज व्हा !*
✍🏻___*अॅड.डॉ. संदीप नंदेश्वर...*

Tuesday, 25 October 2016

मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...

🙏🏻🇪🇺 *मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...*🇪🇺🙏🏻

मोर्चाच्या निमित्ताने गर्दी होत आहे व त्यामुळे समाज संघटीत होत आहे ही आशादायक व सकारात्मक म्हणून स्वागतार्ह बाब म्हणता येईल.
                 🙏🏻 *पण* 🙏🏻      
   
🙏🏻 *गर्दी संघटीतपणाच्या भावनेतून होत असेल तर योग्य अन्यथा असुरक्षित भावनेच्या भरावर गर्दीत सुरक्षितता शोधण्यासाठी माणसं सामिल होत असतील तर कसायाच्या कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या कळपाचा भाग होऊन स्वतःचा खात्मा करून घेण्यात काहीच अर्थ नाही.*

🙏🏻 *गर्दीला वैचारिक बैठक नसेल, गर्दीला पुर्णकालीन सेनापती नसेल तर गर्दी ही कळपात परावर्तित होते. व कळपात कुणीही सुरक्षित राहू शकत नाही. गर्दीला राजकीय व सामाजिक शहाणपण देता येत नसेल तर गर्दीत चेंगराचेंगरी होऊन भविष्यात या गर्दीतील सामिलांची हाणी मात्र नक्कीच आहे.*

🙏🏻 मोर्चे काढा तो तुमचा अधिकार आहे. गर्दीही करा तोही तुमचा अधिकार आहे. पण *गर्दीत सहभागी होण्याआधी किंवा गर्दी जमविण्याआधी मोर्चातील विषयावर याआधी एकतरी दिवस कधी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम केले का हे स्वतःला विचारा. पिडीतांना, अन्यायग्रस्तांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी कधी पुढाकार घेतला आहे का ? ते तपासा. किंवा त्यावर थातूरमातूर कधीतरी अभ्यास तरी केला का ? हेही तपासा. व्यक्तीगत जबाबदारी टाळून सामुहिक जबाबदारीत सहभागी होणे पराभवाचे लक्षण आहे.*

🙏🏻 *ज्या समाजातील व्यक्ती व्यक्तीगत जबाबदारी समजून सतत ईतरांसाठी कार्यरत असतो तो समाज कधीही पराभूत होऊ शकत नाही. सामुहीक जबाबदारीचे निर्वाहण व्यक्तिगत जबाबदारीच्या निर्वाहणातूनच पुर्ण करता येते.*

👉🏻🚩 *इतरांच्या कळपांना पाहून* 🇪🇺 *तुम्हीही कळप बनवायला लागले* तर घात होण्याची संभावना शतप्रतिशत आहे. कारण 🚩 *त्यांचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणाने ओतप्रोत आहे. तर 🇪🇺 *तुमचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणापासून कोसो दूर आहे.

        🙏🏻 *राजकीय व सामाजिक शहाणपणा गर्दीतील माणसांना देता येतो का ते बघा*

           🙏🏻 *विचार करा !* 🙏🏻
✍🏻___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Monday, 17 October 2016

मोर्चे काढायचे असतील तर नक्की काढा !

🌹 *बंधूंनो* 🌹
🗣🏃🏃🏃 *मोर्चे काढायचे असतील तर नक्की काढा !* 🏃🏃🏃
                  🙏🏻 *पण* 🙏🏻
*या प्रश्नांची उत्तरे देता येईल का ते बघा !*
*___अॅड.डॉ. संदीप नंदेश्वर*

🇪🇺 *तुमच्या मोर्चा काढल्याने गावातला माणुस सुरक्षित होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने गावातील जातीय भेदभाव, जातीय तणाव, व जातीच्या आधारे होणारा अन्याय अत्याचार थांबत असेल  व जातीभेद वाढणार नसेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने जातीअंत होणार असेल व जात संपणार असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने व त्यात वाढलेल्या गर्दीने माणुस व समाज, देश, सरकार, सत्ता, सत्ताधारी बदलत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने सरकार तुमच्या हिताचे तात्पुरते निर्णय न घेता कायमस्वरूपी निर्णय घेऊन तुम्हाला न्याय देणार असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने गावातला तणाव मावळत असेल व अन्यायग्रस्ताला न्याय मिळत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने माणसांच्या भौतिक व व्यावहारीक आयुष्यात बदल होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही काढत असलेल्या मोर्चाने गावातला सामान्या माणुस सुरक्षित होत असेल किंवा मोर्चानंतर त्याला सुरक्षितता देण्यास तुम्ही सक्षम असाल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने सामाजिक विषमता नष्ट होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

---पण *तुमच्या मोर्चाने यातले काहीच होत नसेल किंवा होतांना दिसून येत नसेल तर मोर्चा कशासाठी ?*

👉🏻 *जातीय तणाव वाढविण्यासाठी...*
👉🏻 *जातीची ताकत व संख्या दाखविण्यासाठी...*
👉🏻 *जातीय भावना व प्रेरणा घट्ट करण्यासाठी...*
👉🏻 *कुणाचे तरी राजकारण फोफावण्यासाठी...*
👉🏻 *कुणीतरी आखलेल्या षडयंत्राला पुर्णत्वास नेण्यासाठी...*
👉🏻 *गावातल्या सामान्य माणसाला असुरक्षित करण्यासाठी...*
👉🏻 *मोर्चाची भावनिक गर्दी दाखवून पुढचे व्यैयक्तिक राजकीय लाभ घेण्यासाठी...*

🙏🏻 *बघा बंधूंनो यातले तुम्हाला काही उत्तर देता येईल का ?*

🇪🇺🙏🏻👉🏻 *काही कृतींचे परिणाम लगेच दिसून येत नाही पण दूरगामी परिणाम करून जातात. जाती, असुरक्षितता, अन्याय, अत्याचार, भेदभाव मजबूत व घट्ट करून जातात.*

   🙏🏻 *बघा एकदा विचार करून !* 🙏🏻
___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Friday, 14 October 2016

*कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा पाठींबा नाही.*

*कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा पाठींबा नाही.*
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

*मा. बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आव्हानानुसार कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा किंवा कुठल्याही जबाबदार कार्यकर्त्यांचा पाठींबा नाही.*

महाराष्ट्रात काही ठिकाणी अॅट्रोसिटी समर्थनाच्या नावाखाली प्रतिमोर्चे काढले जात आहेत. *हे मुकमोर्चे किंवा प्रतिमोर्चे दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपुर्वक काढले जात आहेत असा आमचा आरोप आहे.*

*दि. १६/१०/२०१६ ला निघणाऱ्या नांदेड येथील प्रतिमोर्चाला भारिपचा विरोध आहे.* स्वतःला भारिपचे कार्यकर्ते म्हणविणारे काही कार्यकर्ते या मोर्चात किंवा आयोजनात सहभागी होत असतील तर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही असे आम्ही जाहीर करीत आहोत.

महाराष्ट्रात जे काही अट्रोसिटी समर्थनाच्या नावाखाली प्रतिमोर्चे निघत आहेत किंवा आयोजित आहेत ते *सर्व प्रतिमोर्चे भाजप च्या अनुसूचित जाती जमाती सेल व राम'दास आठ'वले यांच्या कार्यकर्त्यांकडून आयोजित व प्रायोजित आहेत अशा प्रकारची ठोस माहीती आमच्यापर्यंत आलेली आहे. या मोर्चांना आर्थिक पाठबळही उपरोक्त पक्ष संघटनांकडून पुरविला जात आहे असा आमचा आरोप आहे.*

*दोन समाजात तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे कारस्थान आरएसएस ने रचलेले आहे.* व त्याला वास्तवात उतरविण्यासाठी *दलित समाजातील आपल्यातीलच पण त्यांच्या गळाला लागलेले भाजप अनुसूचित जाती-जमाती सेल व राम'दास आठ'वले यांचे कार्यकर्ते हाताशी घेऊन आरएसएस हे काम करीत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.*

तरी *भारिप बहूजन महासंघाच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की, समाजाने प्रस्थावित/आयोजित प्रतिमोर्चाला बळी पडू नये व त्यात सामिल होऊ नये. समाजाने शांतता पाळावी व आपली क्रयशक्तीचा व्यय करू नये.* असे आव्हाहन करण्यात येत आहे.

*तरी कृपया आयोजित/नियोजित/प्रस्तावित प्रतिमोर्चे थांबवावे.*

सरकार विरोधात मोर्चे काढायचेच असतील तर...
*१) अनुसूचित जाती-जमातींना तसेच ओबिसी वर्गाला दिलेल्या आरक्षणाचा बॅकलॉग (अनुशेष) त्वरीत भरून काढण्यात यावा यासाठी...*
*२) शेतकरी आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने शेतकरी विमा व एप्रिल महिण्यात (हंगाम सुरू होण्याआधी) शेती कसण्यासाठी ६०% सबसिडी लोन सर्व अल्पभूदारक शेतकऱ्यांना द्यावे व त्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करावी यासाठी...*
*३) दलित व अल्पसंख्यक संरक्षण आयोगाची त्वरीत स्थापना करून या आयोगावर फक्त त्याच प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घ्यावे यासाठी...*
*४) व इतर अन्य महत्वपुर्ण विषय...*
इ. अशा महत्वपुर्ण विषयावर मोर्चे काढावेत. पण *अॅट्रोसिटी समर्थन मोर्चाच्या नावाखाली आरएसएस च्या षडयंत्राला बळी पडू नका.*

*शांतता पाळा व शांतता राखा. अराजकता माजवू पाहणाऱ्या शक्तींना प्रतिउत्तर न देता शांतता हीच एक मोठी चपराक ठरेल.*

               🌹 *आपला* 🌹
       *___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर*
           *भारिप बहूजन महासंघ*

Tuesday, 27 September 2016

महाराष्ट्रात निघत असलेले "मराठा मुक मोर्चे" उद्याच्या महाराष्ट्रातील सत्तेसाठी.

🚩 *महाराष्ट्रात निघत असलेले "मराठा मुक मोर्चे" उद्याच्या महाराष्ट्रातील सत्तेसाठी.*
__अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

🚩 *भाजप (BJP) + राष्ट्रवादी = पुढील महाराष्ट्राची सत्ता.* 🚩

🚩 *शरद पवारांची राष्ट्रवादी व मोहन भागवतांची भाजपा यांच्या संगनमतातून व प्रायोजकत्वातून* हल्ली महाराष्ट्रात मराठा समाजाचे मुक मोर्चे निघत आहेत. *कोपर्डी बलात्कार प्रकरण किंवा अट्रोसिटी किंवा आरक्षण* या विषयाच्या पाठीमागे जे काही चालले ते संपुर्ण राजकारण आहे.  व या राजकीय षडयंत्राला सामान्य मराठा समाज बांधव बळी पडत आहे.

येणाऱ्या नजीकच्या काळात *महाष्ट्रातील सवतींची (भाजप+शिवसेना) सरकार कोसळणार आहे.* सत्तेवर आल्यापासून या दोन्ही पक्षात *सवतीमत्सर* सुरू झालेला आहे. *"तुझं माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना."* या म्हणीप्रमाणे सध्या महाराष्ट्रात भाजप-सेनेची सत्ता सुरू आहे. *या सत्तेचा अंत जवळ आहे. व पुढील सत्तेची गणितं मांडण्यासाठी मराठा मूक मोर्चे निघत आहेत.*

🚩--- *या सवतींमध्ये (भाजप+सेना) भांडण लावणारा मराठ्यांचा महा-पुरूष शरद पवार आहे. परत सत्तेत येण्यासाठी ही सर्व उठाठेव मराठ्यांच्या नकळत सुरू आहे.* 🚩

🚩 महाराष्ट्रात सातत्याने मागच्या ५० वर्षात सत्तेवर असलेला मराठा समाज आज सत्तेपासून बाहेर जाताच समाजाच्या मागासलेपणाची आठवण होऊन रस्त्यावर उतरतो, व इतक्या मोठ्या प्रमाणात उतरतो; हे समिकरण आकलनापलिकडचे आहे. पण सत्तेपासून दूर राहू न शकलेला मराठा पुढारी या मोर्चाच्या पाठीमागून पुढील काळात सत्तेवर येण्यासाठीची तयारी करतोय. *मराठा सत्तेवर असतांना मागील ५० वर्षात मराठा समाजाच्या मागासलेपणाची जाणिव एकदाही का झाली नाही ?* हा साधा प्रश्न मराठ्यांनी त्यांच्या सत्ताधारी पुढाऱ्यांना विचारावा. सर्व पितळ उघडे पडेल. हे नक्की.

🚩 *भाजप+राष्ट्रवादी यांची पुढील काळाची हातमिळवणी झालेली आहे.* याची कुणकुण शिवसेनेला लागताच मुखपत्र सामनातून जी कॉर्टूनद्वारे उपरोधीक टिका मराठ्यांच्या मूक मोर्चावर करण्यात आली. त्यातून सर्व काही स्पष्ट होते. तर दुसरीकडे शरद पवार ही सर्व खेळी घडवून आणतोय. हे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्यांना कळून येईल.  *मराठा मूक मोर्चे सरकार विरोधी नाहीत."* हे सांगून याचा प्रत्यक्ष परिचय महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्र्यांनी आधीच दिलेले आहे.

🚩 *मराठा समाजाच्या मागासलेपणावर निघणारे मोर्चे सरकार विरोधी नाहीत तर मग मागणी कशासाठी व मोर्चे कशासाठी ? मराठा समाजाची मागणी कुणाकडे ?*

🚩 *लोकशाहीत समाज रस्त्यावर येतो तो सरकारच्या विरोधात जाऊन सरकारकडून मागणी पुर्ण करण्यासाठीच. पण हल्ली निघणारे मराठा मूक मोर्चे सरकारच्या विरोधातील नाहीत तर मग सरकार प्रायोजित मराठ्यांचे हे लाखोंची गर्दी दाखविणारे मोर्चे कुणाच्या विरोधात व कुणाकडून मागणी पुर्ण करून घेण्यासाठी निघत आहेत ? याचा खुलासा कोण करेल. ?*

____ मराठा मूक मोर्चाच्या पाठीमागून एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या बेतात असलेली भाजप + राष्ट्रवादी यांच्या छूप्या पण तेवढ्याच स्पष्ट युतीतून आम्हाला तो खुलासा झालेला आहे.

१) *भाजप-सेनेत भांडण लावून राष्ट्रवादीने सेेनेला एकटे पाडले. त्यातून सेनेची त्रेधातिरपट उडाली. व युती तुटण्याच्या मार्गावर येऊन ठेपली.*

२) *सेनेसोबत युती तोडून भाजप ची राष्ट्रवादी सोबत येणाऱ्या काळात युती होईल. व येणाऱ्या लवकरच्याच काळात महाराष्ट्रात भाजप + राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेचे गणीतं मांडले जातील. व या भाजप + राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनाला आजचे मराठ्यांचे मूकमोर्चे फायदेशिर ठरतील.* यातून...
         🚩 *शिवसेनेचा मराठा मतदार हिसकावला जाईल. व शिवसेनेचा "जय शिवराय" "जय रामजीकी" करेल.*
         🚩 *शिवसेना कैचीत सापडून उरले सुरले मराठ्यांचे पालकत्व गमावून बसेल.*

३) *बलात्कार, खोटे गून्हे, अॅट्रोसिटी, आरक्षण या सारख्या मुद्यांवर लक्ष विचलीत करून मागासवर्गियांमध्ये (ओबिसी + एस सी + एस टी) दुफळी माजवून अंतर्गत यादवी निर्माण करायची आहे.*

४) *जातीय भावना दृढ करून आरएसएस ने आखलेल्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी आरएसएस च्या स्वयंसेवकांकडून हे मराठा मोर्चे संचालित केले जात आहेत. व त्याला मराठा समाजातील राजकीय पुढाऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.*

५) *मराठा समाजाच्या मागासवर्गिय मागासलेल्या घटकांच्या उत्थानासाठी हे आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावनिक प्रश्नांचा व त्यामागच्या भूमिकेचा सौदा करून सत्तेवर पून्हा विराजमान होण्यासाठी हा सर्व खटाटोप चाललेला आहे. सत्तेसाठी समाज रस्त्यावर उतरविला जात आहे.*

🚩🇪🇺 *बांधवानो...*

🚩 *मराठा बांधवांनो तुमच्या राजकीय पुढाऱ्यांच्या छुप्या अजेंड्याला लवकर ओळखून वेळीच सावध व्हा ! व आरएसएस च्या दावणीला समाजाला बांधण्याच्या पुढाऱ्यांच्या डावाला हाणून पाडा.*

🇪🇺 *दलित मागासवर्गिय बांधवांनो अॅट्रोसिटी, आरक्षण यासारखे मराठा मोर्चाचे विषय घेऊन तुम्हाला भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रतिमोर्चे न काढता शांत रहा. तुमचे संरक्षण व अधिकार कुणीच काढून घेऊ शकत नाही.*
🇪🇺 *शांत राहून सामाजिक सलोखा तुम्ही टिकवून ठेऊ शकता हे मराठा बांधवांना दाखवून द्या.*
🇪🇺🚩 *मराठा व दलित या दोन मागासवर्गिय घटकांना वेगळे पाडण्याचा आरएसएस व सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा डाव हाणून पाडा. आम्ही एकसंघ आहोत हा संदेश द्या.*

🚩🚩 *मराठा मूक मोर्चाच्या मागून भाजप + राष्ट्रवादीची चाललेली सत्तेची व राजकारणाची खेळी डावासहीत हाणून पाडूयात !* त्यासाठी मराठा व दलित समाजाने आपसात सामंजस्य टिकवून ठेवावे ही विनंती.
____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩
*हा संदेश प्रत्येक मराठा व दलित मागासवर्गिय बांधवांपर्यंत पोहचवा.*
🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺

Saturday, 27 August 2016

भारत के दलितों की एकता का परिचय कब होगा ?

✍🏻 *भारत के दलितों की एकता का परिचय कब होगा ?*✍🏻

✍🏻*मद्रास, दादरी, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, ऊणा हुआ ! रोहीत मारा गया, अखलाख मारा गया, कनैय्या जेल गया, आंबेडकर भवन उध्वस्त हूआ और ऊणा मे गोमाता भक्तों ने दलितों का खून बहाया !* आंदोलन हूआ, सडके जाम हूई, आक्रोश किया गया, चिखा गया, चिल्लाया गया, मुंबई और ऊणा की सडको पे जनसैलाब उतरा ! कभी दलितों के आक्रोश की बातें हूई, तो कभी दलितों के अत्याचारो पे बहस हुई ! *मा. प्रकाश आंबेडकर सामने आए ! आवाज उठाई तो आगाज हूआ ! कनैय्या और जिग्नेश मेवानी हिरो बने !* उम्मीद की लकीरे तुफानी सैलाब बनते देख *दलित एकता* की बाते की गई ! हैद्राबाद, यु.पी., गूजरात, दिल्ली, महाराष्ट्र चारो और *समता और स्वतंत्रता* की आवाज गूंज उठी ! पर ये सब अचानक बंद कैसे हूआ ? एकता की श्रुंखला क्यो नही बनी ? किस कडी को कैसे जोडू ? किस कडी ने कोताही बरती ? और अचानक एकता की बनती हूई श्रुंखला बिखरने क्यो लगी ?

✍🏻 क्या कनैय्या, जिग्नेश या हम जैसो की उम्र मे दरार आयी ? या हमारी युवा उर्जा से बनती परिवर्तन की नई धाराए उम्रदराज के अविश्वास मे खो गई ? और कितने त्याग और समर्पण को नांपा जाएगा ? *सत्ता और राजनिती हमारा खून चुँस रही है, और धर्म और जाती हमारी साँसे छिन रही है !* फिर भी देश के *दलित एकता* की कडी जूडने का नाम नही ले रही, और हमारे खून को चुँसने वाली सत्ता और राजनिती अपने हाथो में लेकर जर्जर हूए समाज मे न्याय की प्रस्थापना को लेकर गंभीरता नही दिखाई दे रही !

✍🏻 *परिवर्तन का आगाज अभिजन समाज से नही बल्की बंजर समाज से किया जाता है !* आज यही बंजर समाज परिवर्तन की क्रांती के लिए तय्यार हो रहा है, पर एकसाथ न आने का डर भी सता रहा है ! सुना था की लढते लढते ही हम सत्ता पा सकते है, पर यहॉ हम सालों से लढ रहे है पर सत्ता से कोसों दूर रहकर ! एकता की श्रुंखला न बनाते हूए तुकडो तुकडो मे शक्ती का संचयन नही हो पाएगा !

*हमें सोचना होगा !*

✍🏻 फिर कोई अखलाख या रोहीत मरने ना पाए, फिर कोई कनैय्या, जिग्नेश या हम जैसो की जवानी की उर्जा बर्बाद न होने पाए ! फिर कोई सिर्फ गुजरात, युपी, हैद्राबाद, मुंबई या दिल्ली ना कह पाए ! फिर किसी दलित पर होने वाला अत्याचार सिमाओं मे बंधने ना पाए ! होने वाला हर आंदोलन *भारत* का आंदोलन हो ! होने वाले परिवर्तन की क्रांती *भारत* की क्रांती हो ! दलित चेतना और एकता न की गूजरात, महाराष्ट्र, यु.पी. या आंध्र की हो बल्की समुचें *भारत* की हो ! आपकों इन कडीयों को जोडना होगा और *भारत के दलितों की एकता* का आगाज कर संघटीतता का परिचय देना होगा ! हम राह मे है, इंतजार मे है, उस श्रुंखला की कडी बनने में विश्वास रखते है !
✍🏻___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर*___✍🏻

Tuesday, 26 July 2016

आंबेडकर भवन" : भावना, भावनिकता की कायदा*

🇪🇺 *"आंबेडकर भवन" : भावना, भावनिकता की कायदा* 🇪🇺

🇪🇺✍🏻 *आम्ही कुणाचे बेगडी, सत्तेचे, पैशाचे की काय'द्याचे* ? 🇪🇺

✍🏻 आंबेडकर भवन प्रकरणात ज्यांना जनभावनेला साथ देता आली नाही. चळवळीच्या अस्मितेसाठी जे जनतेच्या सोबत राहू शकले नाही. असे *काही सदगृहस्थ (महाभाग) "कायदा" पुढे करून आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम पसरवित आहेत. ऐनकेन प्रकारे आंबेडकर भवन प्रकरणातून सत्तेच्या (आरएसएस) व त्यांच्या हस्तकांच्या विरोधात आंबेडकरी चळवळीत तयार झालेला आक्रोश त्यांना "कायदा" हे गोंडस नाव पुढे करून थांबवायचा आहे.* आंबेडकर भवन मध्यरात्री पाडतांना यांचा "कायदा" कुठे गेला होता ? बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस हा ऐतिहासिक ठेवा जमिनदोस्त करतांना व त्यावर हातोडा मारतांना यांचा "कायदा" कुठे गेला होता ? *आजकाल आंबेडकर विरोधकांची (आंबेडकरी परिवेशात फिरणारे) सकाळ, दुपार, संध्याकाळ कायद्यानेच व्हायला लागली. हे हल्ली कायद्याची चटणी, कायद्याची पोळी, कायद्याचा झूणका, कायद्याचा पाणी रात्रीबेरात्री बाटलीतून पीऊ लागलेत.* अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. हे सर्व करतांना यांना कायदाही निट समजत नाही. *सर्वसामान्य आंबेडकरी जनतेने मात्र या संभ्रमातून बाहेर पडावे. व आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेशी, अस्तित्वाशी आपल्या भावना आणखी घट्ट करावे.* ✍🏻

✍🏻 मुळात "कायदा" मोडून आंबेडकर भवन उध्वस्त करण्यात आले. "कायदा" हातात घेऊन समाजाच्या/चळवळीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पुसायचा प्रयत्न केला गेला. कायद्याला न जूमानता पैशाच्या व अधिकारपदाच्या गुर्मित वावरणाऱ्यांनी पब्लिक पॉपर्टीवर हल्ला चढविला. आम्हाला कायद्याचा धाक नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व कृत्याबद्दल कायद्यानेच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहीजे अशी अपेक्षा असतांना कायद्यानेच त्यांना पाठीशीही घातले. या सर्व परिस्थितीत *मध्यरात्री पोलिस प्रशासनाचा कायदा पोलिस स्टेशन मध्ये बंदद्वार 'मुन्नी बदनाम हूई' खेळत होता. तर सरकारचा कायदा मध्यरात्री "ऑन ड्युडी...पांडे की सिटी" वाजवित होता. आता कायद्याचे "आता वाजले की १२.००" असतांना जनतेने निर्णय घेऊन 'आंबेडकर भवन' उभारायचे ठरवले तर लगेच यांचा "कायदा" फुगडी घालायला लागला.* मग *१९ जूलै ला मुंबईच्या रस्त्यावर आंबेडकरी जनतेचा आलेला महापूर हा "कायद्या" चे बोला व "कायद्या"ने वागा. हे सांगायसाठीच उतरला होता. सोबतच ज्या जनतेच्या भावनांवर रत्नाकर व साथीदारांनी जो बूलडोजर चालविला होता त्याच भावना सोबत घेऊन तो रस्त्यावर होता. व आजही आंबेडकर भवनाशी त्याच भावना घेऊन तो सोबत आहे.* तुमच्या "काय'द्याचे" काटेरी मुकूट तो भावनेने लाथाडतोय एवढेच.

✍🏻 *समाज हा भावनाशिल आहे व तो राहील. कारण माणूस हाच मुळात भावनाशिल आहे. ज्याला भावना नाही तो माणूस नाही.* परंतु आंबेडकर भवन प्रकरणात एकीकडे भावनाशिल झालेल्या समाजाला कायद्याने बांधण्याचा प्रयत्न काही भावनाहीन माणसं करतांना दिसतात. *आंबेडकर भवन प्रकरणात भावनिक होऊ नका, असे सल्ले देणाऱ्या* या जनावरांना भावना काय असतात व कायदे काय असतात हे समजावून सांगावेच लागेल. *त्यासाठी काही टेस्ट :-*

1⃣ दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपुर्ण देशात आंदोलने उभी झाली. कायदा असतांना जनतेने भावूक होऊन आपल्या तिव्र भावना प्रदर्शित केल्या. देशातील जनता एका भगिनीसाठी भावनिक झाली. या भावना इतक्या तिव्र होत्या की, जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारलाही झुकावे लागले. *"निर्भया" प्रकरणात भावनेचा महापूर इतका होता की, कायदा करावा लागला. कायदा बदलावा लागला. निर्भया नावाने विविध योजना काढाव्या लागल्या. निर्भया नावाने वेगवेगळे प्रयोग करावे लागले.* जनतेला भावनिक होऊ नका म्हणून सांगणारे याचे उत्तर देतील का की, *कायदा असतांना तेव्हा आंदोलन का करावे लागले ? कायदा असतांना कायदा का बदलावा लागला ? बलात्काराची पहिली घटना नसतांना जनता कायद्यावर विश्वास न ठेवता इतकी भावनिक का झाली ? अन्य योजना कार्यान्वित असतांना "निर्भया" नावाने नव्या योजना का काढाव्या लागल्या ? ही भावनिकता नव्हती का ? कायदा असतांना भावनिकतेला का महत्व देण्यात आले ?* कायद्याचा कुत्रा चावलेल्या अ-भावनिक जनावरांना याचे उत्तर देता येईल का ?

2⃣ नुकताच कोपर्डी बलात्कार प्रकरणात भावनिक आंदोलन सुरू झाले आहे. सर्व जनतेच्या भावना पिडीत भगिनिला व तिच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी तिव्र आहेत. पण त्याहीपेक्षा आरोपींना फासावर लटकविण्यासाठी जनतेच्या भावना अधिक तिव्र आहेत. *कायदा आहे. आरोप सिद्ध झाल्यावर कायद्याने आरोपींना शिक्षा होईलही. परंतु आरोप सिद्ध होण्याआधीच आरोपीला फासावर लटकविण्याची मागणी ही कायदा आहे की भावनिकता ? मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना कोपर्डी गावाला भेट देऊन पिडीत परिवाराची सांत्वना करता येते. पण मा. अॅड. प्रकाश आंबेडकरांना तिथे जाण्यापासून थांबविले जाते. हा कायदा आहे की भावनिकता ? मुख्यमंत्र्याला किंवा इतरांना कायदा लागत नाही मात्र प्रकाश आंबेडकरांना कायदा लागतो. हा कायदा आहे की भावनिकता ? खुद्द मा. मुख्यमंत्री महोदय कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवू. फाशीची शिक्षा देऊ. असे म्हणतात. मग आरोप सिद्ध न होताही मा. मुख्यमंत्री महोदय फाशीची गोष्ट कायद्याच्या आधारे करतात की भावनिकतेच्या ? मुख्यमंत्र्यांना कायद्यापेक्षा भावनिकता महत्वपुर्ण का वाटली ?*

✍🏻 वरील दोन्हीही उदाहरणात भावनिकतेने कायद्यावर मात केली हे स्पष्ट दिसून येते. *जीथे समाजाच्या अस्तित्वाशी जुळलेल्या भावनेचा व भावनिकतेचा प्रश्न उपस्थित होतो तीथे चार पाऊले मागे राहून कायदा जनभावनेला सलाम ठोकतो.* आंबेडकर भवन प्रकरणात कायदा व भावनिकता दोन्हीही जनतेच्या बाजूनेच आहेत. किंवा आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांच्याच बाजूने आहेत. परंतु *कायद्याचा कुत्रा चावलेल्यांना "आंबेडकर भवन" मुद्यावर भावनिकता केली जात आहे. असे सांगून आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या कृतीचे समर्थन करायचे आहे.* सर्वसामान्य जनतेला अञानात ठेऊन आंबेडकरी चळवळीला संपविण्यासाठी सरकार प्रायोजित गुलाम दलालांना पाठीशी घालायचे आहे. व त्यामागून *आरएसएस* चे छुपे कारस्थान यशस्वी करायचे आहे.

✍🏻 त्यामुळे *"आंबेडकर भवन" प्रकरणात कायद्याने समाजाला किती न्याय मिळेल वा न मिळेल हे आताच सांगता येणार नाही. परंतु हे प्रकरण आंबेडकरी जनतेच्या भावनेने व भावनिकतेने आम्हाला जिंकावेच लागणार आहे.* "काय'द्याचा" बळगा पुढे करून आंबेडकरी समाजाची भावनिकता संपविण्याचा प्रयत्न केला जाईल. संभ्रम निर्माण केला जाईल. अशावेळी आंबेडकरद्रोह्यांशी लढतांना आंबेडकरी समाजाची ही परिक्षा राहील. *"आंबेडकर भवन" प्रकरण आंबेडकरी समाज भावनिकतेने जिंकू शकला नाही तर पुढील काळात समाजावर होणारे अन्याय अत्याचार असेच कायद्याने दाबले जातील.* त्यामुळे *"आंबेडकर भवन" प्रकरणात आपण (समाजाने) उचलून धरलेली सत्याची बाजू व त्यामागची भावनिकता तशीच तिव्र ठेऊन ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. तुमची भावनिकता निस्सीम ठेऊन कायद्यालाही तुमच्या बाजूला उभे करावे लागेल. कायद्यानेही जिंकू आणि अस्मितेनेही जिंकू.*
___🏃🏻अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...🏃🏻🇪🇺

Saturday, 23 July 2016

लढाई संपली किंवा कुणीतरी लढाई जिंकली असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.

✍🏻 *न्यायालयातून बेल मिळणे म्हणजे आरोपमुक्त किंवा दोषमुक्त होणे नव्हे.*🏃🏻

👹 *आंबेडकर द्रोह्यांनो व समाजद्रोह्यांनो आंबेडकर भवन प्रकरणात दोषींना न्यायालयाने बेल दिली (अटकपुर्व जामिन दिला) याचा अर्थ न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त किंवा दोषमुक्त केले असे होत नाही.*👹

✍🏻 आंबेडकर भवन प्रकरणात ४ आरोपींना खालच्या कोर्टाने अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे रत्नाकर गायकवाड व त्याचे पाठीराखे काही समाजद्रोही व काही वकील मंडळी जणू काही आरोपी आरोपमुक्त झाले. दोषमुक्त झाले. अशा आविर्भावात येऊन प्रकरण दडपण्याचा व जनउद्रेकाला शमविण्याचा वायफळ प्रयत्न करीत आहेत. परंतु हे करीत असतांना कायद्याच्या अल्पञानाने स्वतःच तोंडघषी पडून समाजातली आपली दारे बंद करीत आहेत. *हे सर्व बुजगावणे सरकारी दलाल आहेत हेच सिद्ध करीत आहेत.*

✍🏻 *एखाद्या आरोपात एखाद्या आरोपीला जामिन देणे किंवा न देणे हा न्यायालयाचा Discretionary Power आहे.* बहूतांश हा अधिकार वापरतांना न्यायालय पोलिसांनी केलेल्या तपासात *(Report & Investigation)* काय आलेले आहे हे पाहून निर्णय घेत असतो. क्रिमीनल प्रॅक्टीस मध्ये सहसा आम्ही वकील मंडळी पोलिस *Investigation च्या Loopholes* चा लाभ घेऊन आरोपींना जामिन मिळवून देत असतो.  त्यामुळे खालच्या न्यायालयाने आंबेडकर भवन प्रकरणात ४ आरोपींना जामिन दिला आहे याचा अर्थ पोलिस तपासात काहीतरी हलगर्जी करण्यात आलेली दिसून येते. यात सरकार व पोलिस प्रशासन जबाबदार धरता येईल. *सुरवातीपासूनच सरकार व पोलिस प्रशासनाची या प्रकरणात भुमिका ही संशयास्पद होती. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.* त्याचा अपेक्षित परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला व ४ आरोपींना अटकपूर्व जामिन मंजूर झाला.

✍🏻 महत्वाची बाब या जामिन प्रकरणात ही सुद्धा आहे की, कोर्टाने आरोपींना जामिन देतांना दुःख ही व्यक्त केले आहे. तसेच काही मर्यादा *(Limitations)* ही घालून दिल्या आहेत. आरोपींना आंबेडकर भवन परिसरात जाण्यास न्यायालयाने बंधन घातले आहे. या बाबी लक्षात घेतल्या तर *न्यायालयापुढे या प्रकरणाची दाहकता होती. जनभावना, जनप्रक्षोभ न्यायालयाच्या निदर्शनात होता. असे असतांनाही नाराजी व्यक्त करून न्यायालयाने जामिन मंजूर का केला ? हा संशोधनाचा विषय राहील.* त्यामुळे मा. न्यायालयाचा आदर राखून कुठेतरी शासकीय स्तरावरून या सर्व प्रकरणाला दडपण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न होतो आहे हे उघडपणे दिसून येते.

✍🏻 आज सकाळी मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली तेव्हा आंबेडकर भवन प्रकरणापेक्षा बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस या ऐतिहासिक धरोहरेला ऊध्वस्त केले जाणे हा अक्षम्य गून्हा आहे. परंतु न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष का केले हा चिंतेचा विषय होता. न्यायालयाने जामिन मंजूर करतांना त्याची *Intensity* लक्षात घेतली नाही. हे खेदाने म्हणावे लागते. *तरीसुद्धा सरकार या जामिनाच्या विरोधात उच्च न्यायालयात जामिन रद्द करण्यासाठी केव्हा अर्ज करते. व त्यामागे काय भूमिका घेते याकडे लक्ष ठेऊन आहोत.* मुख्यमंत्री २८ तारखेला उच्च न्यायालयात जामिन रद्द करण्यासाठी अर्ज करून चांगल्यात चांगल्या सरकारी वकिलामार्फत मा. उच्च न्यायालयात जामिनाला विरोध करतील अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या सोबतीला आम्ही आमचे क्रिमीनल पॅक्टीस मधील दिग्गज वकीलांची टिम उच्च न्यायालयात सरकारी पक्षाला सहाय्य करण्यासाठी देणार आहोत. *त्यामुळे लढाई संपली किंवा कुणीतरी लढाई जिंकली असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.*

✍🏻 खालच्या कोर्टाने काही लोकांना जामिन मंजूर केला असला तरी कायद्याने तिथेच हे प्रकरण थांबत नाही. *आरएसएस प्रणित सरकार व सत्ता आंबेडकरी आंदोलनाला दडपूण काढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेल. हेही तेवढेच सत्य आहे. १९ जूलै ला मुंबईत आंबेडकरवाद्यांचा पाहीलेला उग्र रूप शमविण्याचा व कायदाप्रेमी आंबेडकरवाद्यांना न्यायालयाचे निर्णय पुढे करून कायद्यानेच गूमराह करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सुद्धा वास्तव राहील.* परंतु न्यायिक लढाई आम्ही लढत राहू. सत्ता आमच्या न्यायिक लढाईला कितीही कमजोर करण्याचा प्रयत्न करील तरी सुद्धा आम्ही लढत राहू. पुर्वाश्रमिचे न्यायिक अनुभव लक्षात ठेवून.

✍🏻 या सर्व प्रकरणात महत्वाचे हे आहे की, न्यायालयीन कोर्टात आरोपींना जामिन मिळाला असला तरी जनतेच्या न्यायालयात आरोपींना जामिन मिळणे अशक्य व असंभव आहे. *मुळात आंबेडकर भवन व बूद्धभूषण प्रिटींग प्रेस ज्या आंबेडकरद्रोह्यांनी व गद्दारांनी उध्वस्त केली त्या गद्दारांचा निर्णय कायद्याने प्रस्थापित न्यायालयाचा नव्हे तर समाजाच्या, जनतेच्या न्यायालयाचा आहे. कारण हा हल्ला आंबेडकरी अस्मितेवरचा, अस्तित्वावरचा व आंबेडकरी ऐतिहासिक धरोहरेवरचा आहे. त्याला उध्वस्त करण्यासंबंधीचा आहे. १९ जूलै च्या मोर्चाने जनतेच्या न्यायालयाने त्यांचा निर्णय आरोपींविरोधात दिलेला आहे. कायद्याने प्रस्थापित न्यायालयाचे निर्णय त्यापुढे गौण ठरते. कारण शेवटी जनतेच्या न्यायालयाने घेतलेले निर्णय कायद्यात रूपांतरीत होऊन न्यायालयीन कामकाजाचा भाग ठरीत असते.*

✍🏻 *मा. न्यायालयाच्या निर्णय मान्य करून आता हा आंबेडकर भवन प्रकरणातील आरोपींविरोधातला खटला दूहेरी न्यायालयात चालविला जाणार आहे. एकीकडे कायद्याने प्रस्थापित न्यायालयात खटला चालेल तर दूसरीकडे आंबेडकरी समाजाच्या जनतेच्या न्यायालयात हा खटला चालेले. तसेही आंबेडकरी जनतेच्या न्यायालयाने १९ जूलै ला या खटल्यातला पहीला निर्णय घेऊन ३० जूलै पासून श्रमदानातून आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेस परत उभारली जाईल असा निर्णय घेतलेला आहे.*

✍🏻 एका जनतेच्या न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. दुसऱ्या कायद्याच्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतिक्षा राहील. *परंतू जनतेच्या न्यायालयाने रत्नाकर गायकवाड, बोगस ट्रस्टी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या समाजद्रोही आंबेडकर विरोधकांना समाजातून बेदखल करण्याचा निर्णय लाखो जनसमुहाच्या साक्षीने १९ जुलै ला घेतला आहे. तोच अांबेडकरी चळवळीसाठी अंतिम निर्णय आहे. व राहील.*
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...