Sunday, 20 March 2016

देश अराजकतेच्या दिशेने..."बोलो गर्व से हम देशद्रोही है"



देश अराजकतेच्या दिशेने..."बोलो गर्व से हम देशद्रोही है"

हिंदुत्ववादी, आरएसएस, बिजेपीच अराजकतावादीे प्रयोग यशस्वी होतील की नाही याची पर्वा न करता त्यांनी शंखनाद केला. देशातील साऱ्या पुरोगाम्यांना बाजूला सारून हिंदूत्ववाद्यांना एकत्र करण्याचा प्रयोग केला. देशातील वेगळा विचार करणारे सर्व पूरोगामी देशोद्रोही ठरविण्याचा प्रयोग केला. व पूरोगाम्यांची शक्तीही विभागली. जेएनयू मधील कन्हैय्या चे कथीत देशद्रोही प्रकरण पुढे आणले. मुळात हैद्राबाद मधील रोहीत वेमुला प्रकरणाचा दूसरा टप्पा जेएनयू मधून त्यांनी पूढे रेटला. व अतिशय शिताफीने रोहीत प्रकरणातील आंदोलनकर्त्यांमध्ये रोहीत प्रकरणाला दडपण्यासाठी कन्हैय्या जेएनयू प्रकरण पुढे केले असा प्रचार व प्रसार केला. या प्रचाराला बळी पडून रोहीत आंदोलनकर्त्यांत संभ्रम तयार होऊन कन्हैय्या प्रकरणाला ते रोहीत प्रकरणाशी कनेक्ट न करता जेएनयू प्रकरणातून अलिप्त राहीले. त्यांची ही अलिप्तता पून्हा आरएसएस व बिजेपी ला लाभदायक ठरली. या दोन्ही प्रकरणातील काही तार्कीक मुद्दे समजून प्रतिक्रांती ला समजून घेतल्याशिवाय आंदोलन पूढे रेटता येणार नाही.
१) रोहीत खून प्रकरणाने सरकारी दडपशाही पूढे आली. विद्यार्थी तरूण वर्ग सरकारच्या विरोधात रस्त्यावर आला. त्याला विचलीत करण्याचा प्रयत्न केला गेला.
२) रोहीत व कन्हैय्या (हैद्राबाद व जेएनयू) दोन्ही प्रकरणात देशद्रोही कार्यवाह्या असा समान धागा पकडण्यात आला.
३) रोहीत प्रकरणात देशद्रोही कार्यवाह्या सिद्ध करता आल्या नाही म्हणून रोहीतच्या खूनाच्या विरोधात सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या जेएनयू तील स्कॉलर आंबेडकरी व मॉर्क्सवादी विद्यार्थ्यांच्या माथी देशविरोधी नारे मारून त्यांना देशद्रोही कसे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला.
४) दलित, मुस्लीम यांना देशद्रोही ठरविण्यासोबतच मॉर्क्सवादी व आंबेडकरवादी विचारांनाही देशद्रोही ठरविण्याचा व तशी मानसिकता तयार करण्याचा प्रयोग झाला.
५) सरकारी निर्णय व कार्यवाह्यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही व अन्य देशभक्त असा भेद रचला गेला.
६) थंड झालेल्या एबीविपी ला सक्रीय  करून मद्रास, हैद्राबाद, दिल्ली येथे नेतृत्वाची संधी दिली. त्याच्यात जहाल हिंदूत्ववाद निर्माण करून विद्यार्थी व तरूण वर्गाला पुढच्या सामाजिक लढाईत उतरविले गेले.
७) मिडीया व तत्सम माध्यमातून रोहीत, कन्हैय्या प्रकरणाचा निषेध करणाऱ्या तमाम नेत्यांना, कार्यकर्त्यांना, विचारकांना देशविरोधी म्हणून देशासमोर मांडले गेले.
८) रोहीत व कन्हैय्या प्रकरणाला वेगवेगळे करून समविचारी कार्यकर्त्यांमध्ये उघड फूट पाडण्यात आली.
९) देशहिताच्या नावावर वैचारीक स्वातंत्र्याची गळचेपी करून अघोषीत आणिबाणी लावली गेली आहे.
१०) पुढल्या काही वर्षात आरएसएस व भाजपला जे काही करायचे आहे त्याचा प्राथमिक प्रयोग व मानसिकीकरणाला सुरवात केली गेली.
११) पुढील काळातील षडयंत्राची पार्श्वभूमी तयार करून आराखडा आखण्यात आला आहे. इ. इ.
      पुढील काळात अनेक गोष्टी पुढे येतील. अशा परिस्थितीत पुरोगामी कार्यकर्त्यांना विनंती आहे की रोहीत व कन्हैय्या प्रकरणाला वेगवेगळे न समजता एकत्रीत लढले पाहीजे. रोहीत प्रकरणाच्या पार्श्वभूमिवरच कनैय्या प्रकरण निर्माण केले गेले आहे. सद्या सोशल मिडीया वरून वायरल होणाऱ्या विडीयो वरून याची सत्यता पडताळून पाहता येईल. रोहीत प्रकरण व त्याविषयीचे आंदोलन कन्हैय्याच्या त्या सर्व विडायोमधून दिसत आहे. त्यामुळे षडयंत्र ओळखून संघटीत लढाईला सज्ज रहा. आता तर या सरकारने ठरविलेल्या सर्वच देशद्रोह्यांना न्यायालयाने निर्दोश ठरविले आहे.

🔛🔛🔛दि. २३ फेब्रूवारी २०१६ ला दिल्लीला झालेल्या मोर्चात मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्नात मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाला व  या सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात ताकत निर्माण केली. ही ताकत टिकवून ठेवा कारण परत एकदा राष्ट्रवादाचा सूर आळवला जात आहे. सावधान व्हा !🔛🔛
दि. २०/०३/२०१६
...अँड. डॉ. संदीप नंदेश्वर...

Saturday, 19 March 2016

शेतकरी व सामान्य माणसांनी फसविणारा अर्थसंकल्प

💸💸शेतकरी व सामान्य माणसांनी फसविणारा अर्थसंकल्प💸💸
...🌟Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

💸महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करून शेतकरी व सामान्य माणसांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. व शेतकरी व सामान्य माणसांच्या तोंडाला पाने पूसली.💸

💸💸२५,००० कोटी शेतकऱ्यांसाठी, ७८५० कोटी सिंचनासाठी, २००० कोटी शेततळ्यांसाठी, १,००० कोटी पिक विमा योजनेसाठी इ. आकडे फुगवून मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आत्महत्या कशा थांबतील यावर कुठलाही विचार झालेला नाही. सावकारी जाचातून शेतकरी कसा मुक्त होईल याचाही विचार झालेला नाही. एकंदरीतच शेतकऱ्यांचे दुःख वाऱ्यावर ठेऊन या सरकारच्या अर्थसंकल्पाचा फुगा फूटला आहे.💸💸

💸💸💸सामाजिक न्याय व शिक्षण याविषयी हा अर्थसंकल्प निराश करणाराच नव्हे तर सरकारची सामाजिक न्याय व मागासवर्गिय विद्यार्थ्यांविषयी दूजाभाव करणारी मानसिकता सिद्ध करणारा ठरलेला आहे. ४०५ कोटी रू. फक्त मागासवर्गिय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तरतूद करून मागासवर्गिय विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. फक्त ४०५ कोटी रू. ची तरतूद राज्यातील ८०% समाजातील विद्यार्थ्यांसाठी करून मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत नकारात्मकताच या सरकारने दाखविली आहे. गरज नसतांना १७० करोड जन्मशताब्दी वर्षासाठी उधळण्याची गरज नव्हती त्याएेवजी आमदार निधीतून तो खर्च करण्यास बाध्य करून हेच १७० कोटी रू. मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केले असते तर अधिक स्वागतार्ह ठरले असते.💸💸💸

💸💸💸💸अंगणवाडी सेविकांना २ लाख रू. जिवन विमा व २ लाख रू. अपघात विमा दिला तशीच तरतूद शेतकऱ्यांसाठी केली असती तर बरे झाले असते. पण त्यावर हा अर्थसंकल्प व सरकार गप्प आहे. उलट तसे न करता या सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास मोकळे सोडले आहे.💸💸💸💸

💸💸💸💸💸मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना २००० कोटी रू. तरतूद केली परंतू मागासवर्गिय उद्योगांच्या तोंडावर पाने पूसली आहेत. विदर्भाच्या नावाने केलेली ही तरतूद प्रत्यक्षात कधीच खर्च केली जात नाही. विदर्भातील ज्या उद्योगांनी सरकारकडे आधीच मागणी केली आहे. त्या उद्योगांबाबत हा अर्थसंकल्प काहीच बोलायला तयार नाही.
🌟विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याबाबतही या अर्थसंकल्पात काहीच नाही.
🌟तसेच या सरकारने सामाजिक न्याय तर वाऱ्यावरच सोडले आहे.
🌟भाकड जनावरांच्या संगोपनावर केलेली १८ कोटी ६३ लाख रू. केलेली तरतूद स्वतःहून ओढवून घेतलेली उधळपट्टी आहे. त्यापेक्षा गोहत्या बंदीच उठवली असती तर १८ कोटी ६३ लाख वाचविता आले असते.
🌟शेतकऱ्यांना पैसे कमी पडणार नाही. असे म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का ?
🌟फक्त १० कोटी रू. महीला सक्षमीकरणासाठी तरतूद करून महीलांनासुद्धा या सरकारने सापत्नुक वागणूक दिली आहे.

💸💸💸एकंदरीतच ही अर्थसंकल्प अंधारात चाचपडत जाऊन कुठेतरी धडपडत जाऊन आपटला आहे. अविवेकी, दिशाहीन, अदूरदर्शी असाच हा अर्थसंकल्प आहे असेच म्हणता येईल.💸💸💸
...🌟Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर🌟

Saturday, 13 February 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता (Dr. B. R. Ambedkar & Secularism)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता
(Dr. B. R. Ambedkar & Secularism)

भारताच्या संविधानकारांनी या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी पाहिलेले स्वप्न व त्यासाठी घेतलेली मेहनत पराकोटीची होती. धर्म, भेद, भाषा, संस्कृती मध्ये विभागलेल्या प्रदेशाला एक राष्ट्र म्हणून एकरूप बनविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. व संविधानकारांनी ते आव्हान लीलया पेलून या देशाला जगातील सर्वोत्तम असे संविधान दिले. हे संविधान तयार करीत असतांना संविधान सभेत अनेक वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील “धर्मनिरपेक्ष व समाजवाद” या संकल्पनांचा समावेश करण्यावरून झालेली चर्चा व असे अनेक उदाहरणे देता येतील. परंतु त्यातूनही सर्वोत्तम निकष बाहेर पडून या देशाचे संविधान तयार झाले.  
धर्मनिरपेक्ष हा शब्द हल्लीचा अतिशय वादाचा मुद्दा ठरला आहे. हल्लीची सरकार आणि त्या सरकारच्या पाठीमागे असलेली आरएसएस या शब्दाला कडाडून विरोध करतांना दिसून येत आहे. संसदेमध्येही यावर वादळी चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत "धर्मनिरपेक्ष" या शब्दाला केलेल्या विरोधाचे दाखले पण देण्यात आले. परंतू त्यामागील त्यांच्या भूमिकेकडे जाणिपूर्वक दुर्लक्ष केल्या गेले. नुकत्याच २६ नोव्हेबर ला साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनानिमित्त सरकारतर्फे संविधानाची प्रस्ताविका पेपरमधल्या जाहीरातीतून प्रसिद्ध करण्यात आली. त्यात राज्य सरकार व केंद्र सरकारने जाणिवपूर्वक "धर्मनिरपेक्ष" या शब्दाऐवजी "पंथनिरपेक्ष" या शब्दाचा वापर केला. तर काही ठिकाणी “धर्मनिरपेक्ष व समाजवादी” हे दोन शब्द वगळून मूळ संविधानाची प्रस्थाविका प्रकाशित करण्यात आली. यावरून सरकारचा धर्मनिरपेक्षतेविषयीचा हेतू आपल्या लक्षात येतो. आरएसएस ला प्रस्थापित सरकारच्या माध्यमातून भारताला हिंदू राष्ट्र घोषीत करायचे आहे असे दिसून येते. परंतु प्रस्ताविकेतील "धर्मनिरपेक्ष" हा शब्द त्यांच्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या मार्गातील अडथळा ठरतो आहे. या वास्तव परिस्थितीला लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता हा विषय गांभिर्यपूर्वक लक्षात घेणे गरजेचे आहे.
15th November 1949 in the constituent assembly prof. K. T. Shah moved a resolution for include ‘secular federal socialist’ in article 1 of constitution. Prof. K.T. Shah wants “union shall be a federal, secular, socialist Union of states.”
15 नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेत प्रो. के. टी. शहा यांनी धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे दोन शब्द अंतर्भुत करण्यासाठी ठराव मांडला. प्रो. के. टी. शहा म्हणतात, K.T. Shah Said, “…as it is, in suggesting this amendment, I am anxious to point out that this is not only a statement of fact as it exists, but also embodies an aspiration which it is hoped will be soon realized.  The amendment tries to add three words to the descriptions of our state or union : that is to say, the new union shall be a federal, secular, socialist union of states.”  Further “…as regards the secular character of the state, we have been told time and again from every platform, that ours is a secular state.  If that is true, if that holds good, I do not see why the term could not be added or inserted in the constitution itself, once again, to guard against any possibility of misunderstanding or misapprehension.  The term ‘secular’, I agree, does not find place necessarily in constitutions on which ours seems to have been modelled.  But every constitution is framed in the background of the people concerned.  The mere fact, therefore, that such description is not formally or specifically adopted to distinguish one state from another, or to emphasis the character of our state is no reason, in my opinion, why we should not insert now at this hour, when we are making our constitution, this very clear and emphatic description of that state.  The secularity of the state must be stressed in view not only of the unhappy experiences we had last year and in the years before and the excesses to which, in the name of religion, communalism or sectarianism can go, but I intend also to emphasis by this description the character and nature of the state which we are constituting today, which would ensure to all its peoples, all its citizens that in all matters relating to the governance of the country and dealings between citizen and government the consideration that will actuate will be the objective realities of the situation, the material factors that condition our being, our living and our acting.  For that purpose and in that connection no extraneous considerations or authority will allowed to interfere, so that the relation between man and man, the relation of the citizen to the state, the relations of the states inter se may not be influenced by those other considerations which will result in injustice or inequality as between the several citizen that constitute the people of India”.
प्रोफ. के. टी. शहा संविधान सभेत केलेल्या भाषणात म्हणतात, “आपण जे संविधान तयार करीत आहोत त्या संविधानाच्या चौकटीत धर्मनिरपेक्ष शब्दाला कुठेही स्थान देता येणार नाही हे सत्य आहे. परंतु कुठल्याही संविधानाचा आराखडा हा त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या मान्यतेनुसार तयार व्हावा.  मागील काही वर्षातील धर्मांधतेचे, संप्रदायवादाचे आणि वर्गवादाचे जे काही वाईट अनुभव आले आहेत आणि जे भविष्यातही येण्याची संभावना आहे त्या आधारावर राज्याच्या धर्मनिरपेक्षतेला आम्ही महत्व दिले पाहिजे. भारतीय संविधानाचे जे स्वरूप व वैशिष्टे आम्ही आज तयार करीत आहोत त्यात धर्मनिरपेक्षता स्वीकारली गेली तर व्यक्ती व्यक्ती, नागरिक व शासन यांच्या जगण्यात व व्यवहारात धर्मनिरपेक्षतेला मान्यता प्रदान करता येईल. ज्यामुळे कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही व्यक्तीविशेषाला नागरिकांवर धार्मिक वा सांप्रदायिक प्रभाव टाकता येणार नाही.  याचा परिणाम असा होईल कि देशातल्या नागरिकांनी जे संविधान तयार केले त्या नागरिकांमध्ये आपापसात अन्याय व असमानतेची भावना निर्माण होणार नाही.”
प्रो. के. टी. शहा यांच्या प्रस्तावाला नाकारतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, Sir, I regret that, I cannot accept the amendment of prof. K. T. Shaha.  My objections stated briefly are two.  In the first place, the constitution as I stated in my opening speech in support of the motion I made before the house is merely a mechanism for the purpose of regulating the work of the various organs of the state.  It is not the mechanism whereby particular member or particular parties are installed in office.  What should be the policy of the state?  How the society should be organized in it social and economical sides are matters which must be decided by the people themselves according to time and circumstances.  It cannot be laid down in the constitution itself, because that is destroying democracy altogether.  If you state in the constitution that the social organization of the state shall take a particular form, you are, in my judgment, taking away liberty of the people to decide what should be the social organization in which they wish to live.  It is perfectly possible today, for the majority people to hold that the socialist organization of society is better than the capitalist organization of society.  But it would be perfectly possible for thinking people to devise some other form of social organization which might be better than the socialist organization of today or of tomorrow.  I do not see therefore why the constitution should tie down the people to live in a particular form and not live it to the people themselves to decide it for themselves.  This is one reason why the amendment should be opposed.  The second reason is that the amendment is purely superfluous.  My hon’ble friend prof. shaha does seem to have taken into account the fact that apart from the fundamental rights, which we have embodied in the constitution, we have also introduced other sections which deal with directive principles of policy.  If my hon’ble friend where to read the article contents in part IV, he will find that both the legislature as well as the executive have been placed by this constitution under certain definite obligation as to the form of their policy.  Now, to read only article 31, which deal with this matter.  It says the state shall in particular direct its policy towards securing – i) that the citizens men and women equally have the right to an adequate means of livelihood.  ii)  that the ownership and control  of the material resources of the community are so distributed as best to sub serve the common good.  iii)  that the operation of the economic system does not result in the concentration of wealth and means of production to the common detriment.  iv)  that there is equal pay for equal work for both men and women.   There are some other items more or less in the same strength.  What I would like to ask prof. shah is this, if these directive principles to which I have drawn attention are not socialistic in their direction and in their containt, I fail to understand what more socialism can be.  Therefore my submission is that, these socialist principles are already embodied in our constitution and it is unnecessary to accept this amendment.
डॉ. बाबासाहेब म्हणतात, "भारतीय संविधान हे कुण्या एका राजकीय पक्षाला किंवा धर्माला किंवा विशिष्ट समुदायाला लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले नाही. भारतीय संविधान हे असे mechanism आहे जे शासनाच्या व राज्याच्या विभिन्न अंगामध्ये चालणाऱ्या कार्याला नियंत्रीत ठेवणारे आहे. संसदेत विशिष्ट व्यक्ती वा पक्षाला प्रस्थापीत करणारे हे mechanism नाही. किंवा त्यासाठी या देशाचे संविधान तयार करण्यात येत नाही.  राज्याचे धोरण काय असेल व समाज त्याच्या सामाजिक व आर्थिक उद्धीष्टासाठी कशाप्रकारे संघटीत होईल, हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीवर निर्भर करेल. हे आताच भारतीय संविधानात समाविष्ट करणे म्हणजे भारतीय लोकशाहीला आताच संपविणे असे होईल.  जर राज्यातल्या सामाजिक संघटनांनी कुठली एक विशिष्ट प्रणाली स्विकारली पाहीजे हे आजच संविधानात अंतर्भुत करणे म्हणजे माझ्या दृष्टीने सामाजिक संघटनांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे असे होईल. अशा स्थितीत नागरिकांना कसे जगायचे आहे हे संविधानाने बंधिस्त न करता त्यांना त्यांनी ठरविल्याप्रमाणे जगू द्यावे. असे मला वाटते. संविधानात समाविष्ट मुलभूत अधिकार व राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेतली तर येणाऱ्या सरकारला आम्ही धोरण निश्चितीसाठी उत्तरदायी बनविले आहे. त्यामुळे यापेक्षा समाजवादाचे दुसरे रूप कुठले असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे प्रो. के. टी शहा यांनी मांडलेल्या ठरावाला माझा विरोध आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिष्ठा व देशातील नागरिकांवर असलेला विश्वास उच्चकोटीचा होता हेच यातून दिसून येते.  कायद्याची बंधने लादून समाज नियंत्रीत करण्यापेक्षा समाजाला मुलभूत स्वातंत्र्य बहाल करून शासनाला नागरिकांसाठी कल्याणकारी धोरण आखण्यास बाध्य करणे, यावर त्यांचा विश्वास होता. धर्मासाठी माणूस नसून माणसासाठी धर्म आहे. त्यामुळे स्वतंत्र संविधानिक भारतात धर्मवाद, पंथवाद राहणार नाही असे त्यांना वाटत होते. सरकार अशा कुठल्याही धर्मवादाला व पंथवादाला प्रोत्साहन देणार नाही अशी त्यांची अपेक्षा होती. व जनता अशा लोकांना किंवा पक्षाला किंवा संघटनांना थारा देणार नाही यावर त्यांचा विश्वास होता. परंतु कालौघात त्यांचा अपेक्षाभंग झाला. याचे मोठे उदाहरण द्यायचे झाले तर "हिंदू कोड बिल" पारित होण्यास इथल्या धर्मवाद्यांनी केलेला विरोध व त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला कायदामंत्री पदाचा राजिनामा हे होय.
भारतीय समाजात धर्मांधता पराकोटीची असतांना बदललेल्या परिस्थितीला अनुसरूण समाजपरिवर्तनाची अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. त्यात त्यांचा उदात्त हेतू होता. परंतू त्यांच्या उदात्त हेतूला इथल्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी व प्रत्यक्ष जनतेनेही लक्षात घेतले नाही. लोकशाहीतून समतामुलक समाज निर्मितीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कल्पना आम्ही मोडीस काढली. त्याचेच परिणामस्वरूप आजही आम्ही समाजात धार्मिक तेढ वाढतांना पाहत आहोत.
देशातल्या सामाजिक व राजकीय संघटनांची धर्मांधता पराकोटीला जातांना पाहून १९७६ ला ४२ व्या संविधान संशोधनाने भारतीय संविधानाच्या प्रस्तावणेत "धर्मनिरपेक्ष व सामाजवाद" या दोन शब्दांचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु आजही त्यामागचा हेतू पुर्णत्वास आलेला नाही.  त्याची काही उदाहरणे द्यायची झाली तर आषाढी एकादषीच्या दिवशी "पंढरीच्या विठ्ठलाची" शासकीय पुजा केली जाणे व राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हाताने प्रथम पूजा करणे किंवा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असतांना राष्ट्रपतीच्या बंगल्यात गणपतीची प्रतिष्ठापणा होणे व गणेशोत्सव साजरा होणे किंवा हल्लीच्या सरकारचे मुस्लीमद्वेषी, दलितद्वेषी वक्तव्ये ही सर्व उदाहरणे संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वाला छेद देणारी आहेत. त्यामुळे संविधानात एखादे विशिष्ट तत्वाचा अंतर्भाव केल्याने किंवा दुरूस्ती करून ते बंधनकारक केल्याने बदल घडून येतो असे दिसून येत नाही.
२५ नोव्हेबर १९४९ ला संविधानसभेला संविधान सुपूर्द करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य यादृष्टीने लक्षात घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "अतिशय महत्प्रयासाने तयार केलेल्या या भारतीय संविधानाचे यशापयश हे निव्वळ संविधानावर अवलंबून राहणार नाही. संविधानाचे यशापयश हे संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यकर्त्यांवर अवलंबून राहील. संविधान कितीही चांगले असले तरी त्या संविधानाची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते योग्य नसतील तर महत्प्रयासाने तयार केलेल्या संविधानाचा हा डोलारा भविष्यात कोलमडून पडेल." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विधान आज आपणा सर्वांसाठी एक संदेश देणारे आहे. ज्या राज्यकर्त्यांची निवड आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून करतो ते राज्यकर्ते योग्य नसतील तर "धर्मनिरपेक्षते"सारखे कितीही डोलारे उभे करून आम्ही धर्मवादाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. तो कोलमडून पडेलच. लोकशाहीत अंतिम सार्वभौम सत्ता जनतेत निहीत आहे. ती जनता व लोकशाहीतील नागरीक जागृत नसतील, ती जागरूकता त्यांच्यात नसेल तर कायद्याचा वापर व अंमलबजावणी करणारे हे स्वतःच्या स्वार्थासाठी व फायद्यासाठीच कायद्याचा वापर करतील.  व सामान्य जनता, नागरिक हे न्यायापासून वंचितच राहतील. धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतही हेच घडले व घडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मवादी की धर्मद्वष्टे, धर्मद्वेषी की धर्मनिरपेक्ष हे सिद्ध करू पाहणारे दोन वर्ग समाजात काम करीत आहेत. महापूरुषांच्या विचारांचा स्वतःच्या निहीत स्वार्थासाठी वापर करू पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत तर हे नेहमीच निदर्शास येते. राष्ट्रभक्त, समाजप्रेमी, पराकोटीचे मानवतावादी, समतावादी या अंगाने बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार केल्यास त्यांचे विचार वर्तमानाला दिशादर्शन करतांना दिसून येतील. नुकतेच पाश्च्यात्य लेखक जेफरसन यांनी इंग्रजी वृत्तपत्रात लिहीलेल्या लेखात म्हटले आहे की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र न स्विकारता व्यक्तीपरोक्ष व घटनापरोक्ष स्विकारले गेले आहेत. त्यामुळे जगातल्या या सर्वोच्च संविधानकाराच्या विचारांचा भारताला लाभ घेता आला नाही." आम्ही एखाद्या विचाराला कसे स्विकारतो व कसे अंगिकारतो त्यावर त्या विचाराचे लाभ निदर्शनास येत असतात. भारताला व भारतीय समाजाला अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. त्यांनी संविधानात समाविष्ट केलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. Social, economic and Political JUSTICE and EQUALITY of status and opportunity, LIBERTY of thoughts, expression, belief, faith and worship यात निहीत असलेली धर्मनिरपेक्षता  समाजात वृद्धींगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच मुलभूत अधिकारात समाविष्ट कलम १४, १५, १६, १७, १८,१९, २३, २४, २५ यातील उद्देशही धर्मनिरपेक्ष समाजनिर्मिती हाच आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धार्मिक कायद्यांपेक्षा uniform civil code ला प्राधान्य देणारे होते. घटनेच्या कलम ४४ अनुसार त्याचा स्पष्ट उल्लेखही केला गेला आहे कि देशातल्या नागरिकांसाठी uniform civil code तयार करण्याची जबाबदारी ही सरकारची राहील.
त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानात आवश्यक वाटत होता की, त्यांचा त्या शब्दाला विरोध होता याचे संविधानसभेतील दाखले देऊन संसदेत वादंग निर्माण करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानातील इतर कलमात समाविष्ठ असलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांचा अंगिकार करून भारताला एकसंघ ठेवणे हेच सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आजही संविधानातील निहीत धर्मनिरपेक्ष तत्वांची व त्यांच्या अंमलबजावणीची प्रकर्षाने गरज आहे हेच यातून दिसून येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मचिकित्सा ही एखाद्या विशिष्ट धर्म, पंथ, संप्रदायाच्या पलीकडली होती.  त्यांचे धर्मचिकित्सेबद्दलचे विचार आकलनापलीकडे आहे. त्याचे आकलन करून घ्यायचे असेल तर निरपेक्ष भावनेतूनच ते समजून घेता येईल.  व त्यावरच या देशाचे भवितव्य निर्भर करेल.
"आज धर्मनिरपेक्षता की बात हूई,
कल संविधान की बात होगी,
विषमता और सामाजिक भेदाभेद को चूर चूर करना
लोकतंत्र की गहराई और जनता पर निर्भर होगा
जब तुम और मै मानवता की गुहार लगाएंगे,
तभी स्वातंत्र्य, समता, न्याय और बंधूता की सही पहचान होगी"
*********
Adv. डॉ. संदीप नंदेश्वर

८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१.

Thursday, 24 September 2015

मा. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस

💐👇💐👇💐👇💐👇💐👇💐
जागतीक बौद्धांचा विचार करून सर्वांना एक करूयात व राज्याच्या बौद्ध  कायद्याला विरोध करूयात.
💐👇💐👇💐👇💐👇💐👇💐
प्रति,
       मा. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस
       महाराष्ट्र राज्य
       मुंबई.

सविनय "जय भिम"

महोदय,
            आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोठ्या थाटाने शपथ ग्रहण केली. शपथ ग्रहण करतेवेळी आपण स्वच्छ व सर्वसमावेशक राज्यकारभार करणार असे जनतेला निक्षूण सांगितले. परंतू हल्ली आपला कारभार तुमच्यावर मालकी हक्क असलेल्या संघटनेच्या सुचनेनुरूप चाललेला दिसतोय असा आमचा राज्याचे रहीवासी व देशाचे नागरीक म्हणून आरोप आहे. तुमच्यासारख्या हुशार व बुद्धीमंत मुख्यमंत्र्यावर असणार सेवक संघाचा प्रभाव राज्यातील नागरीकांना अडगडीत टाकणारा आहे. हे निदान आपल्या लक्षात यावे व आपण घेत असलेले घाईच्या निर्णयावर सेवक संघाच्या प्रभावातून बाहेर पडून चिंतन करावे यासाठी हा पत्रप्रपंच...
              राजद्रोहाचा आपण लावलेला नविन सरकारी निकष असो की हल्लीच तातडीने २१ सप्तेंबर २०१५ ला "राज्यातील बौद्धांसाठी बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा" बनविण्यासाठी गठीत केलेली मसुदा समिती असो; आपण आपल्याच कालावधीत सेवक संघाला अपेक्षीत यश मिळवून देण्याचा चंग बांधलेला दिसतोय. हे राज्याच्या व देशाच्या सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहे हे आपण लक्षात घ्यावे.
             दि. २१ सप्तेंबर २०१५ ला "राज्यातील बौद्धांसाठी बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा" बनविण्यासाठी गठीत केलेली मसुदा समितीचे परिपत्रक आपण काढले. त्यावरून राज्यातील बौद्धांच्या प्रश्नांवर आपण गंभीर आहात असे दिसून येते त्यामुळे आपल्या सारख्या बुद्धीवंत मुख्यमंत्र्याला बौद्ध जनतेतर्फे काही प्रश्न विचारतो आहोत.
          १.  बौद्ध फक्त महाराष्ट्र राज्यातच आहेत का ? संपूर्ण देशात बौद्ध नाहीत का ? संपुर्ण देशात जर बौद्ध राहत असतील तर महाराष्ट्र सरकारचा कायदा संपूर्ण देशातील बौद्धांना लागू होईल का ? आणि हे सर्व कोणत्या संविधानिक तरतुदीच्या माध्यमातून ? राज्याला तसा अधिकार आहे का की एका विशिष्ट धर्मियांसाठी संपूर्ण देशात व जगभरात पसरलेल्या बौद्ध धम्मानुययांसाठी कायदा बनविण्याचा अधिकार आहे का ? घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते ?
           २.   जगाच्या व या देशाच्या इतिहासात कधीतरी एका विशिष्ट धर्मासाठी एका विशिष्ट राज्याने फक्त त्या राज्यात राहणा-या त्या धर्माच्या लोकांसाठी कायदा बनविला आहे का ? संविधानाने तो अधिकार राज्याला दिलेला आहे का ?
           ३. जो धम्म निरिश्वरवादी, विज्ञानवादी, जिवनदर्शन देणारा आहे त्याला सुचिबद्ध व कलमबद्ध करता येणार आहे का ? तो तसा कलमबद्ध करतांना बौद्ध धम्मातील तत्वे जी संस्कृतमिश्रीत हिंदू धार्जिनी आहेत त्याला आधार बनविणार की पाली या प्राचीन बुद्धकालीन बोलीभाषेतील तत्वांना अंगीकारणार आहात ?
           ४.   धम्म आणि धर्म यातील गफलत तुमच्या या कायद्याने दूर होणार आहे का ? धम्माला धर्माने कोडीबद्ध करण्यामागचा तुमचा हेतू काय आहे ?
            ५.    तुम्ही मसुदा समितीत निवड केलेल्या अशासकीय सदस्यांची निवड करतांना कुठला निकष ठेऊन निवड केली. ती अशासकीय सदस्य मसुदा समितीच्या सदस्यत्वासाठी पात्र आहेत का ? की तुमच्या सेवक संघातले विश्वासू म्हणून आपण त्यांची निवड केली ? समितीतील सदस्य बौद्ध आहेत का ? की अजूनही ते "हिंदू महारच.      किंवा अनुसूचीत जातीचेच" आहेत ? हे तपासले का ? जर ते तसेच असतील तर त्यांना बौद्धांसाठी धार्मिक कायदा बनविण्याचा नैतिक व कायदेशिर अधिकार आहे का ?
         ६.  या कायद्याने राज्यातील बौद्ध जगातल्या बौद्ध धर्मियांपासून व देशातल्याच ईतर राज्यातील बौद्ध बांधवापासून वेगळे दाखवायचे आहे का ? त्यांना वेगळे पाडायचे आहे का ? किंवा तुमचा तसा उद्देश आहे का ?
          ७.  तुमच्या मसुदा समितीतील डॉ. मिलींद माने हे तुमचेच प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नावापूढे तुम्ही Adv. मिलींद माने असे लावले आहे. हे तुम्ही जाणीवपुर्वक राज्यातील बौद्ध जनतेची फसवणुक करण्यासाठी तुम्ही करीत आहात असे वाटत नाही का ?
         ८.  बबन कांबळे, भैय्याजी खैरकर, राहूल बोधी सारख्या माणसांचा बौद्ध धम्माविषयीचा अभ्यास आहे का ? त्यांचे बौद्धांच्या जिवनात काय योगदान आहे ? हे सर्व हिंदू महार आहेत की बौद्ध याचा खुलासा केला का ?

            मुख्यमंत्री महोदय बौद्धांसाठी कायदा करण्याचा घाट तुम्ही घातला त्याआधी या प्रश्नांचा खुलासा करावा. बौद्धांसाठी फक्त एखाद्या राज्याने त्या राज्यासाठीच कायदा बनवावा हे आम्हाला मान्य नाही.
            बौद्धांसाठी कायदा बनविण्याची गरज भासलीच तर आम्ही "युनिवर्सल बुद्धीस्ट अक्ट" ची मागणी करू जी राज्याच्या अधिकारक्षेत्रात राहणार नाही तर जगातील तमाम बौद्धांसाठी तो कायदा असेल. व जगातील जागतिक बौद्ध विद्वानांच्या त्या मसुदा समितीत सदस्यत्व सहभाग असेल. त्यामुळे तुमच्या कार्यकाळातच हा कायदा व्हावा असा अट्टाहास आपण धरू नये त्याला आम्हा सर्वांचा विरोध आहे.
           बौद्ध कायद्याच्या अनुषंगाने आपण या बाबींवर बुद्धीप्रामाण्यवादी विचार करून त्वरीत निर्णय घ्यावा अशी विनंती आहे.
           "जय भिम"
                             कुठल्याही द्वेषभावनेशिवाय...
                          आपला नागरीक मित्र
                  Adv. Dr. Sandeep Nandeshwar, Nagpur.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हे पत्र आपल्या सर्वांच्या सहयोगातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले पाहीजे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Saturday, 19 September 2015

"बघ ! तुला माझा आभास होतो का ?" 13

"बघ ! तुला माझा आभास होतो का ?" चा पून्हा एक नवा बंध आपल्याशी थेट कोल्हापूरातून जोडतो...तो तुम्ही तुमच्या सखीशी जोडा...
🌹🌹प्रतिक्रिया जरूर द्या🌹🌹

सखे,
निघालीस का चर्चासत्रातून बाहेर
"मेरीट" चा बुरखा फाडून
व्हा छानच...
चल आता लगेच
कोल्हापूरला जाऊन येऊ...
समिर गायकवाडला सांगून येऊ...
त्याच्या प्रेयसीला घेऊन येऊ...
पून्हा एक गोळी शंकरापीठावर दागून येऊ...
नव्या मनुस्मृतीच्या मसुदा समितीवर
फायरींग ...
आता तु आणि मी
मिळूनच करू...
आणि अख्ख्या बुलेट शेल मुख्यालयाच्या पायथ्याशी लोळवू...
त्यांनी पानसरेच संपविला रे
इतिहासाच्या पानावर येतील अशा पिढ्याच आपण संपवू...
फक्त त्या विचारपिठावरून एकदा म्हण...
"माझ्या बंधू आणि भगिनिंनो..."
सारेच तुटून पडतील
तुझ्या या डरकाळीने...
समिर गायकवाडचीच प्रेयसी काय...?
अरे सा-याच "इंद्रा"च्या प्रेयस्या तुझ्या पायघडी लोळतील...
आणि सा-याच शंकरापीठाचे इमले जमिनदोस्त होऊन...
पायथ्याशी हजारो दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी जन्म घेतील...
सखे, सांग तु त्यांना
इथे हजारो सख्या पेटल्या इतिहासात
त्यांची राख अजूनही धगधगते..
तुम्ही एक जोडी निवडली...?
इथे पावलो पावली जोड्या बनतायत...
त्या समिरच्या हातातली बंदूक तू घे !
त्याच्या हातात इतिहासाची पेन दे
न पुसणा-या गर्द निळ्या शाईची...
आता होऊनच जाऊ दे छेद...
यांच्या नसलेल्या पृष्ठभागी इतिहासावर
पुन्हा कुठली मनुस्मृती आदेशच देणार नाही
कुठल्या समिर गायकवाड व त्याच्या प्रेयसीला
तु डाग यांच्यावर इतिहासाचे, विज्ञानाचे, वास्तवादी विचाराचे तोफगोळे
ही संधी आहे तुला
माझी सखी (प्रेयसी) बनण्याची...
खोट्या इतिहासातल्या पिढ्या संपविण्याची...
चल चाल करून जाऊया...
शंकरपिठाच्या मुख्यालयी
नव्या मनुस्मृतीच्या मसुद्याला उध्वस्त करण्यासाठी...
तो उध्वस्त करतांना तु थरथरणार नाही
तेव्हा...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
आपला
डॉ. संदीप नंदेश्वर
🌹🌹हा संदेश तुमच्या प्रत्येकच सखीला (प्रेयसीला) पाठवा.🌹🌹

Monday, 7 September 2015

"बघ तुला माझा आभास होतो का ?" 12

माझ्या प्रस्तावित "बघ तुला माझा आभास होतो का ?" या महाकाव्यातील सखी तुमच्याशी नियमीत संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. यातील आकृतीबंध आपल्यात सम्यक क्रांतीची ज्वाला निर्माण करतील अशीच अपेक्षा...

सखी,
चल लवकर निघ
कॉलेज ला जायचे आहे
आंबेडकर-पेरीयार स्टडी सर्कलच्या चर्चासत्रात
वैचारीक क्रांतीची ज्वाला भविष्यावर पेरायची आहे
पण
सावधानतेने...
त्या पुस्तकाच्या कपाटाकडे जा
त्यात एका कप्यात ठेवलेले
अणुबॉम्ब दिसेल
निघतांना ते सोबत घ्यायला विसरू नकोस
पुन्हा दोन पावले समोर जा
स्टडी टेबलवर ठेवलेले माझे
एके-४७ सुद्धा सोबत घे
ड्रावर उघड
त्यातील छन्नी हातोडा हातात ठेव
विचारू नकोस हे सर्व कशासाठी...
आज या सर्व शस्त्रांचा उपयोग होण्याची शक्यता आहे
शास्त्रांवर चढलेली मेरीट ची धुळ यांनीच साफ करायची...
कारण...
यांचे फतवे निघणार आहेत
ब्यॉन प्रतिबंध लावला जाणार आहे
'मेरिट'चे बुजगावणे तोंड वर काढतील
हातात लाठ्या काठ्या घेऊन
"जय श्री**" च्या घोषणा करीत चाल होणार आहे.
तेव्हा तयार रहा...
छन्नी हातोड्याने त्यांच्या कपाळावर
'जन्मजात मेरीट' चे ठीगळ कोरण्यासाठी...
एके-४७ ने या "मेरीट" ची वंशावळ संपविण्यासाठी...
"घोकणपट्टी मेरीट" चे पंडुधारी पोपटपंछी कायमचेच संपवायचे,
व्यावहारीक सामाजिक बुद्धीमत्ता निर्माण करण्यासाठी...
तुला आता अणुबॉम्ब सोडायचे.
न खचता, न डगमगता
तुझ्यातली व्यावहारीक बुद्धीमत्ता सिद्धच करायची
यांच्या वांझोट्या कुशीत असलेल्या शास्त्रीय बुद्धीमत्तेला मला गर्भार करायचे आहे.
सामाजिक समानतेचे बिज यांच्या गर्भात सोडायचे
पून्हा एक दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी
यांच्या गर्भात सोडायचा आहे.
आणि
हार्दीक पासून विजय पर्यंत
सर्वांचा गर्भपात करायचा...
तेव्हाच हे गुदमरायला लागतील
"बचाओ" चा नारा द्यायला लागतील
तेव्हाच तू चर्चासत्राचे आभार मानून बाहेर पड...
बाहेर पडतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?

आपलाच...
Adv.डॉ. संदीप नंदेश्वर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक्रीया जरूर कळवा...

आरक्षणविरोधी हार्दीक पटेल वा विजय दर्डा

👇👹🔕👇👹🔕👇🔕👇🔕👇
सद्या देशात आरक्षणाविरोधात मानसिक वातावरण तयार करण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहे. हार्दिक पटेल ते विजय दर्डा पर्यंतची साखळी अतिशय शिस्तबद्ध काम करीत आहे. त्यातून चिटपूट प्रतिक्रीयावादी आंदोलन करून आम्ही जिंकल्याचा उन्माद आणीत असू तर थांबा ! कुठे तरी चुकतेय...

आरक्षणाच्या समर्थनात तुमच्या प्रतिक्रीया तुष्टीकरणात आहेत. नेतृत्वाविना जंगलात भरकटलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे. एकीकडे आरक्षणाचा लाभार्थी तमाम वर्ग तुष्टीकरणात अडकलेला आहे. आरक्षण असावे की नसावे ? याविषयी हा लाभार्थी वर्ग निरूत्तर आहे. आरक्षण लाभार्थ्यामध्ये एकता नाही. तर दूसरीकडे आपल्या प्रतिक्रीयावादी आंदोलनाने आरक्षण विरोधी गट अधिक सक्रीय होऊन एकजूट होत आहे. तो पून्हा तिव्र व्हावा हेच यामागची भूमिका आहे. आम्ही "जय भिम" चा नारा देऊन किती काळ ही लढाई टिकवून धरणार आहोत. ? हा खरा प्रश्न आहे.

आरक्षणविरोधी हार्दीक पटेल वा विजय दर्डा पर्यंत थांबले आहेत असा विचार आम्ही करीत असू तर नक्कीच चुकतोय.

कारण नौकरीतील आरक्षण आमचे केव्हाचेच संपवून टाकण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गात आरक्षीत समाजाचा उमेदवार घेतला जाणार नाही असे प्रशासकीय, शासकीय व न्यायीक फतवे केव्हाचेच निघालेत. शिक्षण व नौक-यांतील आरक्षण हे फक्त तुम्हाला दिलेल्या संवैधानिक प्रतिशत पर्यंत सिमीत करून बाकीचे सर्व केव्हाचेच अकायदेशिररित्या बळकावण्यात आले आहे. आम्ही उरलोत ते फक्त रस्त्यावर जिंदाबाद मुर्दाबातचा नारा लावण्यापर्यंतच...व्हा !

विरोधक यशस्वी होतायत संघटीत समाज व संघटीत समाजाचे मुखीयाधारी नेतृत्व स्विकारून. आम्ही संघटीत होत नाही. नेतृत्वाची तर एलर्जीच जणू काही लागलेली. उरलेसुरले २-४ टाळके रस्त्यावर उतरून जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा लावून दिवाळखोरी दाखवण्यात अव्वल ठरतात व संपुर्ण समाजाला हेटाळणीचा विषय करून मोकळे होतात.

चळवळीचे गांभिर्य हरवून नेतृत्वहीन क्रांती, आंदोलन, चळवळी ना इतिहासात यशस्वी झाल्या, ना ही वर्तमानात  होत आहेत व ना ही भविष्यात होतील. समाजाच्या गर्भात शिरून पून्हा क्रांतीची गर्भधारणा करावी लागेल. व पूर्ण विकास झाल्याशिवाय क्रांतीच्या बाळंतपणाची घाई करणे अंगलट येण्यासारखे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सक्षम नेतृत्व न स्विकारल्यामुळे आरक्षीत वर्गाचे तुष्टीकरण व आरक्षण विरोधकांचे होणारे पोलरायझेशन भविष्यातील अनेक पिढ्या बर्बाद करणारे ठरेल हे समजून घेता आले तरी आम्ही नैसर्गिक बाळंतपणातून सुदृढ क्रांतीला जन्म देऊ शकू.

२-४ टाळक्यांच्या नेतृत्वविरहीत जिंदाबाद, मुर्दाबाद च्या घोषणांमध्ये ही चळवळ लयास जाऊ नये एवढीच तुर्तास अपेक्षा !
...डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
👆👆👆👆👆👆👆👆👆👆🎤

"बघ तुला माझा आभास होतो का "?

आज नागपूरात थोड्याच वेळापूर्वी विजगर्जनेसह आलेल्या पावसाने माझ्याही लेखणीची विज कडाडली. आणि प्रस्तावित "बघ तुला माझा आभास होतो का "? या प्रस्तावित महाकाव्याला बंध मिळाला. तो तुमच्याशी लगेच शेअर करतोय...प्रतिक्रीया जरूर कळवाव्या ही विनंती,

आज अचानक विजा व पावसानी हल्ला सुरु केला
वादळासवे पाऊस अचानक सुरु झाला
विजांचा कडकडाट असह्य झालाय
तु पाऊस आणि मी विज...
चल बरसुया त्या महालातल्या वाड्यावर,
जिथे जिंदगीचा धिंगाणा घालून
मानवतेच्या खूनाचा कट रचला जात आहे
नंग्या साधूंच्या विक्षीप्त शरिरावर कपडे घालून बसलेत सर्व...
शासकीय महालातून तुझ्या माझ्या ऑनर किलींग चे फतवे काढण्यासाठी,
तु आणि मी झिजून पेरलेल्या आरक्षीत जागेवर बसण्यासाठी...
त्यांच्यावर कोसळायचे आहे विजेसह
आणि
तुला बरसायचे आहे गोदावरीला पूर येईपर्यंत
अगं...
विचार का करतेस एवढा ?
मी आहे ना तुझ्यासोबत...
ऐरवी मी कडकडायला सुरवात केली की तु बरसायला सुरवात करतेस...
आज मी नागपूरातून कडकडतोय
तु नाशिक मधून बरसायला  सुरवात कर...
फार विचार करू नकोस
देव-इंद्र, नर-इंद्र तुला आणि मलाही पुजतील
फक्त विश्वास ठेव माझ्या कडाडण्यावर
आणि तुझ्या बरसण्यावर...
अगदी तसाच...
जसा तू पुण्याच्या शनिवारवाड्यावर बरसली होतीस
आणि मी पेशवाईवर कडाडलो होतो
तु गरिबीवर बरसली होतीस
आणि मी कडाडलो अस्पृश्यतेवर
सखे !
जसे...
तुझ्या माझ्या संयोगाशिवाय ईथे शक्यच नाही जलधारा बरसने व विजांचा कडकडाट होने...
तसेच...
आज तुझी माझी गरज आहे वाड्यावरचा काळा झेंडा उतरविण्यासाठी...
तू बरसणार...
आणि मी कडाडणार...
या माणसांच्या डोक्यावर-उरावर साचलेले काळे ढग मिटविण्यासाठी...
तु चल तयारीला लाग !
तोच शनिवारवाडा, पेशवाई, गरिबी, अस्पृश्यता तुला मला खुणावतेय...
छळतेय...
आता तुझ्या माझ्या मिलनाची वेळ जवळ आली...
घट्ट मिठी मारून...
मिलनकथेची आतुरता घेऊन बाहेर ये...
तुला बाहेरच दिसेल...
तु आणि मी मिळून केलेला हल्ला...
आक्रमणsssss....
असे शब्द कानावर पडतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
आपलाच...
डॉ. संदीप नंदेश्वर...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक्रीया जरूर द्या !

Saturday, 4 April 2015

असामाजिक तत्वोंको रोखीये !

🙏 ध्यान से पढीए और सब को शेअर करे ! हम सभी के लिए बहोत जरूरी ! 🙏

सुप्रिम कोर्ट ने IT Act की धारा 66 संविधान की अभिव्यक्ती स्वतंत्रता के विरूद्ध होने का हवाला देकर रद्द कर दिया ! जिसका लाभ लेकर समाज मे पनपते असामाजिक तत्व फेसबूक ओर वॉट्स अँप जैसे सोशल मिडीया मे डॉ. बाबासाहब आंबेडकर जी के बारे मे विकृत टिपणीया, कॉमेंट, फोटो, पोस्ट डाल रहे है ! यह सिलसिला आगे भी चलते रहेगा ! कई बहूजन महापूरूषोंके बारे में यह सामने आएगा ! क्योंकी देश की सरकार और उनके धार्मिक नुमांईंदे इन असामाजिक तत्वो को यह सब करने की प्रेरणा दे रहे है !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती के कार्यक्रम के आयोजन मे आप सभी व्यस्त होंगे ! चारोतरफ आनंद का माहौल है ! इस माहौल को तोडने हेतू, आपके आनंददायी माहौल को खराब करने हेतू यह असामाजिक तत्व बाबासाहेब की प्रतिमा सोशल मिडीया मे खराब कर के आपका ध्यान आकर्षित करना चाहेंगे ! आप मे उग्रता भरना चाहेंगे ! आपको भडकाना चाहेंगे ! लेकीन आप इन लोगो के तरफ ध्यान न देते हूए जयंती कार्यक्रम को हर्षोल्हास के साथ मनाए ! यही उनको हमारे तरफ से सही जवाब होगा !

आप सभी को कुछ सूचनाए :-
१) ऐसी कोई भी घटना आपके सामने आती है, आपके नजर मे आती है, या आपको पता चलती है, तो तुरंत ही नजदीकी पोलिस स्टेशन मे जाकर IPC धारा 295, 295(A), और 296 के अंतर्गत FIR दाखिल करे !
२) पुलिस वाले अगर आपसे सिर्फ लिखित रिपोर्ट (NC) दर्ज कराने को कहे तो उसे नकारकर FIR दर्ज कराने पर अडीग रहे ! और FIR की कॉपी हाथ मे लेकर ही पोलिस स्टेशन से प्रस्थान करे !
३) हो सके तो तहसिलदार, जिल्हाधिकारी को निवेदन दे ! और एेसे असमाजिक तत्व को जल्द से जल्द कडी सजा देने की मांग करे ! ताकी पोलिस प्रशासन आपकी रिपोेर्ट को गंभीरता से ले !
४) यह ध्यान रखे की, असामाजिक तत्व बाबासाहब आंबेडकर या कोई भी महापूरूष की छवी को कितना भी प्रदूषीत करने की कोशीश करे उनकी महानता कम होनेवाली नही है ! क्योंकी यह महापूरूष दुनियाभर मे अपनी महानता की छबी छोड गए है !
५) सोशल मिडीया पर होनेवाली टीप्पनीयों को जादा गंभीरता से न ले ! और अपने ध्येयपूर्ती पे ज्यादा ध्यान दे !

👉 यह कदापी न करे :-

६) सोशल मिडीया पर महापूरूषों को अपमानीत करने वाली पोस्ट, फोटो, टिप्पनीयों को खूद शेअर न करे !
७) दूसरोंको इसकी जानकारी देने के चलते आप खूद ही उसको वायरल करके अपमानीत न करे ! बल्की मित्रोंको एक जगह बुलाकर तुरंत पुलिस को खबर करे ! लेकीन एकदुसरे के मोबाईल पर या ग्रूप पर शेअर न करे !
८) अगर आप महापुरूषोंके अनुयायी हो तो उनके विचारोंको के अनुसार ही वर्तन करे !
९) जयंती समारोह मे दारू या नशीली पदार्थो का सेवन न करें और न ही कीसी और को करने दे!
🙏 Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर 🙏

👉ईस पोस्ट को गंभीरता से ले और बाकी लोगो से भी शेअर करें ! 🙏🙏🙏

Saturday, 28 February 2015

बजेट - २०१५ "फिर एक बार भूलभूलय्या : खोकली मानसिकता का बजेट"

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
बजेट - २०१५
"फिर एक बार भूलभूलय्या : खोकली मानसिकता का बजेट"
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
कीसी भी देश के विकास का सपना उसके अर्थव्यवस्था पर निर्भर होता है ! और अर्थव्यवस्था का सूचारू रूप बजेट मे प्रदर्शित होता है !
📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢
विकास का झांसा देनेवाली सरकार ईतना निराशाजनक बजेट देगी इसकी कल्पना नही की थी !
👎 IIM और IIT की स्थापना को छोड दे तो शिक्षा के उपर कीया जाने वाला निवेश फिर एक बार निराश कर गया !
👉अगर हम नौजवान देश की बात कर रहे है तो बजेट का कम से कम ६% हिस्सा शिक्षा के उपर खर्चा होना जरूरी है ! गरिब और सामान्य विद्यार्थीयोंके शिक्षा के उपर सरकार गंभीरता से नही सोच रही यही साबीत हूआ !

👎रोजगार मे इजाफा लाने की बात तो हर बजेट मे होती लेकीन देश के नौजवानों में स्वयंपूर्णता लाने की कोई बात नही होती. कीतनी भी रोजगार और नौकरीयोंकी बात करे उससे सिर्फ गूलामी बडेगी !
👉बजट गूलामी बढाने के लिए नही बल्की स्वयंपूर्णता लाने के लिए हमारे देश के अर्थव्यवस्था की सबसे बडी कडी कृषीक्षेत्र और उससे जूडे संबंधीत व्यवसाय को बडावा देना जरूरी है ! लेकीन बजट मे इसका कोई समाधानकारक प्रावधान नही !
👉एक तरफ देश का कृषीक्षेत्र घटता जा रहा है ! इसकी कोई चिंता बजेट मे नही जताई गई ! अगर हम हमारे संसाधनो को घटाकर नए उद्योग खडे करेंगे तो देश एक लंबे खतरे के तरफ बढता जा रहा है !
👎Service Tax बढाकर आम आदमी को कंगाल बनाने का और Corporate Tax आनेवाले दिनोंमे घटाकर अब्जोपतीयों और कारखानदारों ने चूनाव मे जो खर्चा कीया है वो कई गूना बढाकर वापस करने का प्रावधान कर लिया गया ! आप बस Service Tax भरते जाओ !
👉Service Tax बढने से हर चिज की किंमते बढेगी और वह आम आदमी के जेब से जाएगा !
👎योगा यह नया Charitable Commodity मे आ गया ! जिसका सिधा फायदा योगा की सबसे बडी दूकान चलाने वाले रामदेव बाबा को होगा ! जिसको कोई Tax भरना नही होगा ! और ऐसे कई रामदेवबाबा योगा की दूकान खोलने के लिए तय्यार होंगे !
👎स्वास्थ, शिक्षा, सामाजिक दायित्व, कृषीक्षेत्र और स्वयंपूर्णता पर ईस बजेट-२०१५ ने पूरी तरह से निराश किया !
📡कारखानदार, पूंजीपती, उद्योगपती और साधू-बूवाओंकी बल्ले बल्ले.....

🐰बेरोजगार, कृषक और आम आदमी की ठल्ले ठल्ले.....
...Adv. डॉ. संदीप नंदेश्वर...
🔕🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐

Wednesday, 11 February 2015

अविवेक जिंकला, विवेक हरला...

👹👹👹दिल्लीत भाजप, हिंदूत्व, आरएसएस व नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला नसून विवेकाचा पराभव व अविवेकाचा विजय झाला आहे.👹👹👹

दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या विजयाने फसव्या विकासाचे राजकारण पून्हा चर्चेत आले आणि सारेच विकासाच्या "कोमात" गेले.

मात्र हेच खरे वास्तव आहे का ? काँग्रेस शून्यावर आली. इतकेच नाही तर २०१३ च्या तूलनेत १५ % मत कमी पडली. अपक्ष व इतरांच्याही मतांचा टक्का कमी झाला आणि ते सर्व मते "आप" च्या पारड्यात कशी गेली ?

दूसरीकडे भाजपा ला २०१३ ला मिळालेल्या मतात (३३ %) फक्त १ % टक्का मते कमी पडली. या निवडणूकीत भाजप ला ३२ % टक्के मते पडली आहेत. मात्र ३२ जागावरून ३ जागावर भाजप आली.

इतका फरक का पडला ? याचे सरळ उत्तर हे आहे की काँग्रेस व अन्य पक्षांना पडत असलेले deciding votes यावेळी "आप" च्या खात्यात गेली. ही मते "आप" कडे कशी गेली ? की, ही मते तिकडे वळविण्यात आली ? या प्रश्नाच्या उत्तरात दिल्लीच्या निकालाचे गूढ दडलेले आहे.

दिल्लीच्या तख्तावरून १३० वर्षाची काँग्रेस हद्दपार होऊन त्याचे पडसाद देशभर परिणाम करणारे आहे. तसेच विचारसरणीवर आधारीत प्रादेशिक व काही राष्ट्रीय पक्ष पूर्णतः नाकारले जाणे. ही अतिशय गांभिर्याची बाब आहे. पण त्यातच हिंदूत्व विचारसरणीच्या भाजपा चा मतदान टक्का कायम राहणे; सोबतच कूठलीही विचारधारा पाठीशी नसणारा "आप" पक्ष भरारी घेणे देशाच्या भविष्याला प्रश्नांकीत करणारे आहे.

यावरून हेच दिसून येते की, हिंदूत्ववादी मतदार कायम ठेवून हिंदूत्वाच्या विरोधी असणारा मतदार अविवेकी, अविचारी "आप" सारख्या प्रवाहासोबत जोडला गेला. सत्ताधारी पक्षाच्या मूळाशी विचारधारा नसेल तर राज्य विवेकाने नाही तर अविवेकाने चालविले जाणार हे नक्की. आणि ही कृती भविष्यात व्यवस्था मोडकळीस आणण्यास पोषक वातावरण निर्माण करेल. याचा विचार राजकीय भाष्यकारांकडून केला  न जाणे भारतील लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहे.

"आप" च्या झंजावाताने विकासाचे व स्थानिक मूद्यांचे भांडवल राजकीय बाजारात सर्वांना आकर्षित करू गेले. आता या भांडवलाचा वापर सर्वच राज्यीय व राष्ट्रीय पातळीवर केला जाईल. यातून राजकीय वैचारीक व्यवस्था व पक्षप्रणाली मोडकळीस येईल.

काँग्रेस व अन्य पक्षांना संपवून, हिंदूत्वाला टिकवून अविवेक व अविचारी विदूषकांच्या हातात सत्ता सोपविण्यात अविवेकवादी यशस्वी झाले.

शेवटी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्या उक्ती व कृतीत कूठलाही फरक नाही. दोघांचेही वैचारीक नेतृत्व करनारे एकच आहेत हे विसरू नका.

पूढील योजना 🌹"चाय पे चर्चा"🌹 या प्रस्तावीत कार्यक्रमात आखली जाईल.
🐄🐄🐄तूम्ही विकासाची चर्चा करीत रहा ! राजकीय घमंड आणि गर्वाचे गर्वहरण झाल्याचा शंखनाद करीत रहा !🐰🐰🐰

शेवटी विचार व विवेक पराभूत होईल. त्याला आम्हीच जबाबदार राहू.
...डॉ. संदीप नंदेश्वर...

Friday, 5 September 2014

शिक्षा के बाजारीकरण में प्रधानमंत्री का बचपना...

शिक्षा के बाजारीकरण में प्रधानमंत्री का बचपना...

प्रातिनिधिक शिक्षण दिन के शुभ अवसर पर देश के प्रधानमंत्री ने पुरे देश को स्कुली बच्चो और शिक्षको को संबोधित किया ! सब ने खुद को बडा हि गौरवांकित महसूस किया ! क्योकी ये देश में पहली बार हो रहा था ! जबाबदेही और आम जनता से संवाद करने वाली सरकार की इस पहल का मै स्वागत करता हु !
लेकिन स्कूली बच्चो और शिक्षकों के साथ प्रधानमंत्री महोदय का उनके बचपन के दिनों का हुआ वार्तालाप क्या देश के बिघडते शिक्षा स्तर को सुधार पाएगा ! शिक्षक दिन के अवसर पर अपने बचपने में खोये हुए हमारे मा. प्रधानमंत्री जी का यह वार्तालाप उतनाही बचपना भरा हुआ ! हमें अपेक्षाए थी, इस देश के ७५ % गरीब बच्चो को अपेक्षाए थी, शिक्षा के बढ़ते हुए बाजारीकरण से निजात पाने के लिए स्कुल और पढाई छोडने की कगार पर खड़े बच्चो को अपेक्षाए थी की प्रधानमंत्री जी शिक्षा के ऊपर होनेवाले सरकारी खर्चे में बढ़ोतरी करेंगे ! अपेक्षा ये थी की प्रायवेट स्कूलों की बढती हुई फी के कारन समाज का बहोत बड़ा तबका शिक्षा से वंचित हो रहा है ! उससे निजात पाकर सबके लिए शिक्षा के धोरण में कुछ बदलाव आकर प्रायवेट स्कुल मालिको में लगाम लगाई जाएगी ! शिक्षा के बाजारीकरण से परेशांन शिक्षको को उनके Management के मानसिक और गुलामिक व्यवस्था से दूर कर कुछ नई उम्मीद देश का प्रधानमंत्री देगा ! पर यह सबकुछ हशियाने पे रखकर सिर्फ खुद की प्रवृत्ती उभरते हुए भारत पर लादने का प्रयास किया गया ! जो की निसंदेह सराहनीय नहीं कहा जा सकता ! देश के प्रधानमंत्री देश में चल रही शिक्षा व्यवस्था और समाज में शिक्षा से दूर हो रहे बढ़ते प्रमाण के बारे में कोई अंदाजा नहीं है ! बस अपनी प्रवृत्ती और प्रकृती को किसी भी हालात में देश के जनमन पर लादना अपनी हुकुमियत और हुकूमत के माध्यम से तानाशाही के तरफ बढ़ते कदम का एक प्रतिक ही माना जायेगा !
देश की सरकार के ऐसे जनता से संवाद भरे आयोजनों का भविष्य में भी स्वागत रहेगा ! पर तानाशाही के पैर फ़ैलाने की लिए नहीं बल्कि असलियत को समझकर देश को सही राह दिखाने के लिए वह आयोजन होना चाहिए !
भारत सरकार के लिए मै समझता हु की मेरी प्रतिक्रिया उन तमाम देशवासियों की है जो शिक्षा के बाजारीकरण से तंग आकर इस प्रायवेट शिक्षा प्रणाली को ख़त्म कर शिक्षा के माध्यम से विकास की एक नई ऊंचाई को नापना चाहते है !
धन्यवाद् !
---डॉ. संदीप नंदेश्वर, भारीप. नागपुर.

Saturday, 9 August 2014

निजीकरण के परिप्रेक्ष में आरक्षण पर चर्चा

फ़िलहाल भारत देश और समाज बड़ी ही पेचीदा दौर से गुजर रहा है ! एकतरफ सरकार वैश्विकरण को अपनाकर निजीकरण की तरफ बड़ी तेजी से बढ़ रही है ! निजीकरण से देश को खौकला बनाने की कोशिश पूंजी के बढ़ोतरी के आड़े चल रही है ! तो दूसरी तरफ समाज का कई सालो से दबा हुआ निचला तबका आरक्षण जैसे मौलिक अधिकार के तरफ बढ़ता हुआ दिखाई दे रहा है ! आये दिन समाज का कोई न कोई तबका आरक्षण की मांग को लेकर रस्ते पर उतर रहा है या फिर राजनीती के लिए उन्हें रस्ते पर उतारा जा रहा है ! भविष्य की दिशाए और नीतिया न तो पूंजीपति भारत सरकार के पास है और न तो आरक्षण की मांग करने वाले समाज के अविकसित वर्ग के पास ! इसी पेचीदा हालात से आज देश गुजर रहा है !
मौलिक सवाल यह है की सरकार अगर एकतरफ निजीकरण को बढ़ावा दे रही है और दूसरी तरफ आरक्षण की भी पैरवी कर रही है तो यह स्पष्ट है की देश की सरकार देश और समाज को दोखा दे रही है ! आरक्षण और निजीकरण एक साथ साथ आगे नहीं बढ़ सकते ! आरक्षण तभी कारगर होगा जब सरकार, संपत्ति, उद्योग और सेवा क्षेत्र लोकतांत्रिक सरकार के हाथो में हो ! बिमा, रेल्वे, बैंकिंग, शिक्षा, सुरक्षा, जैसे क्षेत्र जो बड़ी तेजी से पूंजीपतियों के हाथो में देने की मानो होड़ सी लगी है ! ऐसे समय में आरक्षण चाहे किसीको भी और कितना भी दे दो ! कोई लाभ नहीं होने वाला !
भारतीय समाज का दबा हुआ निचला तबका जो खुद को आरक्षण में सुरक्षित करना चाहता है वो पहले देश में सरकार के माध्यम से चल रहे निजीकरण के खिलाफ पहल करे ! निजीकरण को रोके तो ही आरक्षण बच सकता है ! वरना यह जातिवादी पूंजीवादी लोगो की कटपुतली सरकारे और उनके शिकंजे में फंसे राजनेता आप को आरक्षण देकर निजीकरण के जरिए खुद ब खुद ख़त्म कर देंगे ! ""न रहेगा बांस और न बजेगी बासुरी !""
इसलिए सभी आरक्षणवादी लोगो से नम्र निवेदन है की आरक्षण मांगने की बजाये आरक्षण को ख़त्म करने वाले निजीकरण को ख़त्म करने की मांग करो ! उसी में आरक्षण की सही अहमीयत छुपी हुई है !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Friday, 25 July 2014

धनगर समाजाचे आरक्षण : वास्तव कि राजकारण

धनगर समाजाचे आरक्षण : वास्तव कि राजकारण 

We are Touchable, not Untouchable---by Mahadeo Jankar धनगर समाजाचे बारामतीचे नेते 

धनगर समाज महाराष्ट्रात आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनाचा पवित्र घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळी कलाटणी दिली आहे. धनगर समाजाच्या या आंदोलनाच्या भावनिक बाजूशी आम्ही आहोत. पण वैचारिक आणि व्यावहारिक बाजू तपासून पाहाव्याच लागतील.
धनगर आणि धनगड या दोन नाव साधर्म्यामुळे हा गोंधळ मागच्या अनेक वर्षापासून उफाळलेला आहे. धनगड असा उल्लेख संविधान सूची मध्ये आलेला आहे. आणि धनगर ही जात म्हणून महाराष्ट्रात उल्लेख आलेला आहे. दोन्ही वेगळ्या जाती आहेत असेच आजपर्यंत मानण्यात आले.
भारतीय संविधान, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे अनुसूचित जमाती आणि जाती यामध्ये मुलभूत अंतर आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्कृती या निकषाच्या आधारावर एखाद्या जाती किंवा जमातीला अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्यसरकार घेऊन तो केंद्राकडे सुपूर्द करावा लागतो. केंद्र त्यावर निर्णय घेऊन त्या जाती किंवा जमातीचा समावेश अनुसूचित करीत असतो.
आज धनगर समाज अनुसूचित जाती किंवा जमातीच्या निकषात बसतो का ? जर बसत नसेल तर मुळ आदिवासींवर अन्याय होईल. त्यावर तोडगा म्हणून मराठा समाजासारखे वेगळे आरक्षण त्यांना देता येऊ शकते. पण त्यावर धनगर समाजाचे नेतृत्व करणारे काय दिशा समाजाला देतात त्यावर निर्भर करेल.
धनगर समाजाचे नेते महादेव जाणकर काल IBN LOKMAT वर बोलतांना म्हणाले कि, "आम्ही Untouchable नाहीत आम्ही Touchable आहोत. (We are Touchable, not Untouchable)" आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी बनलो नाहीत. काय मानसिकता आहे ही ? जानकर यांचे म्हणणे सत्य असेल तर धनगर समाजाला आज राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जवाब विचारण्याची गरज नाही. किंवा आरक्षण मागण्याचीही गरज नाही. त्यांच्या समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती खराब असेल तर याचा जवाब त्यांनी धर्मसंस्थेला किंवा धर्मव्यवस्थेला किंवा ते ज्या Touchable धर्मांचे पाईक आहेत त्यांच्या धर्मप्रमुखांना विचारावा कि नाही ?
जिथे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही touchable आणि Untouchable अशी जातीय मानसिकता आरक्षण मागणार्यांच्या व एकूणच समाजाच्या मानसिकतेतून गेलेली नसेल तिथे अश्या वर्गांना कितीही आरक्षण दिले तरी समाजाच्या एकूण परिस्थितीत काहीच बदल घडणार नाही हेच सिद्ध होते. एकूणच हा राजकीय डाव भारतीय समाजाला जातीय मानसिकतेने (वर्णव्यवस्थेने) येणाऱ्या काळात सोलून काढेल एवढे मात्र निश्चित. तूर्तास तुम्ही सर्व तयार राहा एवढेच !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
 

Friday, 11 July 2014

भुलभुलय्या अर्थसंकल्प 2014 (Budget 2014)

भुलभुलय्या अर्थसंकल्प 2014 (Budget 2014)
---डॉ. संदीप नंदेश्वर.


भारत सरकार का २०१४ अर्थसंकल्पीय बजेट ऊपर से संतुलित दिख रहा है लेकिन अन्दर से पूंजीपति और बुजुर्वा वर्ग के हित को ध्यान में रखकर बनाया गया है ! कुछ प्रतिशत पूंजीपति और बुजुर्वा वर्ग के विकास पर करोडो अबजो की आबादीवाले सामान्य जनता को निर्भर करना मेरे ख्याल से लोकतंत्र की सबसे बड़ी निंदा किये समान है ! अर्थव्यवस्था का इतना गलत प्राक्कथन सत्ता में बैठे अर्थतज्ञ कर रहे है जिससे देश फिर एक बार पूंजीपती विरुद्ध सर्वहारा वर्ग के संघर्ष के तट पर खड़ा हो रहा है !

पूंजीपतियों का विकास और उनके लिए मुक्त अर्थव्यवस्था लाने के लिए की गई वकालत पर आधारित अर्थसंकल्प में रखा गया विकास का प्राक्कथन पूरी तरह से झूठा, बेबुनियाद और गलत है ! कुछ प्रतिशत पूंजीपतियों की आमदनी में बढ़ोतरी होने से सामान्य जनता के जनजीवन और तरक्की पर असर होगा ऐसा मानना लोकतंत्र के साथ और सामान्य जनता के साथ गद्दारी के समान है !

वर्तमान अर्थनेताओ की यह सामान्य धारणा बन चुकी है की, २० से ३० करोड़ जो सामान्य करदाता है उनको ५०००० रू. मात्र की थोड़ी सी आयकर छुट दे दी गई तो अर्थसंकल्प सर्वसमावेशक कहलायेगा ! और उसी भूल भुलय्या के आड़ में देश की संपत्ति और साधनों का विनिवेश PPP और FDI के जरिए पूंजीपतियों के हाथो में दिया जा सकता है ! इस धारणा के चलते २०१४ का अर्थसंकल्प बना है ऐसा मेरा मानना है !

सामान्य जनता के हित और विकास को ध्यान में रखकर दी जानेवाली सबसीडी ख़त्म कर नए पूंजीपतियों को उभरने के लिए दी जानेवाली सुविधाए और नीतियों पर कई करोब अब्जो रुपयों की सबसिडी बहाल कर देना भारत के अर्थव्यवस्था के साथ किया गया घिनोंना मजाक है ! यह जनता के साथ किया जाने वाला धोका है ! नई अर्थनीति के आड़ में सर्वहारा वर्ग को ख़त्म करना कतई समर्थनीय नहीं है !

उद्योग, व्यापर और नए पूंजीपतियों के विकास से देश के Fiscal Deficit में सुधार जरुर होगा पर जनता के आर्थिक जीवन में सुधार नहीं होगा ! PPP और FDI लाने से विकास दर में सुधार तो होगा पर सामान्य जनता की PCI (दरडोई) में कोई बदलाव नहीं आएगा ! महंगाई दर कम करने के लिए अमीरों की संपत्ति बढाने की वकालत नहीं की जा सकती ! सामान्य जनता की बचत ज्यादा हो इसके लिए कारगर कदम उठाए जाना ज्यादा जरुरी है ! अमीरी और गरीबी की बढती हुई दुरिया कम करने के बजाये उसको और गहरी करना देश हित में नहीं !

भारत की पेचीदा समाजरचना को देखते हुए सामाजिक अर्थसंकल्प ही देश के लिए तरक्की के नए रास्ते खोल सकता है ! लेकिन भारत सरकार के सत्ताधारियो ने देश के सामने रखे हुए अर्थसंकल्प ने घोर निराशा की है ! यह अर्थसंकल्प सामाजिक नहीं बल्कि पूंजीपति अर्थसंकल्प है !
***जबतक देश के अमीरों के हाथो में बढती हुई संपत्ति को उनके हाथो से सरकारी खजिनो लाने की कोशिश नहीं होती तबतक देश का विकास दर आगे नहीं बढ़ सकता !
***महंगाई की मार से त्रस्त मध्यम वर्ग को बचत की और बढ़ावा देना होगा क्योंकि यही वर्ग सबसे ज्यादा उपभोक्ता वर्ग है ! जिसकी आय आज सिर्फ खर्चे में ही जा रही है ! ऐसे में आर्थिक विकास का दर कैसे बढेगा ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर और अमर्त्य सेन जैसे अर्थशास्त्री के विचारो को जबतक सत्ताधारी वर्ग और भारत सरकार अपने अर्थनीति में नहीं लाता तबतक भारतीय अर्थव्यवस्था की पूंजीपतियों के हाथो से बिघडती हुई बागडोर हम संभाल नहीं पाएंगे !

इस अर्थसंकल्प ने खेतिहर मजदूर, कामगार, बेरोजगार और किसानो को कुछ नहीं दिया ! जो कुछ भी दिया वो प्रस्थापित पूंजीपतियों, देश में आने वाले परदेशी बुजुर्वा वर्ग और देश के अन्दर पनपते हुए नए पूंजीपति को ही दिया है ! यह अर्थसंकल्प देश का नहीं बल्कि पूंजीपति का है ! जो कल सत्ता में आने के लिए फिर पूंजी देने वाले है ! इसलिए यह अर्थसंकल्प भुलभुलय्या है !
***सोचो***और अपनी राय रखो***

   ---डॉ. संदीप नंदेश्वर.

Sunday, 26 January 2014

सिर्फ सत्ता बदलने से परिवर्तन नहीं होता !

लीबिया में गद्दाफी के हुकुमतंत्र को बदलकर लोकतंत्र लाने के लिए आन्दोलन खड़ा किया गया ! और गद्दाफी को फांसी पर लटकाकर लोकतंत्र की नीव रखी गई !

आज भारत में अरविंद केजरीवाल का हुकुमतंत्र देश के लोकतंत्र के खिलाफ आग उगल रहा है ! सड़क छाप आन्दोलन हो या खुद को Anarchist कहने की बात हो यही जाहिर होता है की लोकतंत्र के खिलाफ आने वाले दिनों में जो आन्दोलन खड़ा होगा उसकी नीव अरविन्द केजरीवाल के माध्यम से रखी जा रही है ! देश की जनता को मुर्ख बनाकर कुछ पार्टिया लोकतंत्र का आधार लिए केजरीवाल पर टिपण्णी जरूर कर रहे है ! लेकिन अन्दर से केजरीवाल को मदत भी कर रही है ! क्योंकि इस देश से लोकतंत्र को ख़त्म करना जिनका उद्देश है उनके लिए केजरीवाल एक नए परिवेश में जमीन तैयार करने का काम कर रहे है !
सोच में फर्क हो सकता है लेकिन वास्तविकता में नहीं !


जब दिल और दिमाग काम करना बंद कर दे तो इन्सान दूसरो की बुरोइयो में लुप्त होकर बुनियादी तत्व को अक्सर भूल जाते है !और अविचारी निति सामने आने लगती है ! जो आजकल केजरीवाल के साथ हो रही है ! और उनके समर्थक भी उसी दिशा में अग्रेसर हो रहे है ! केजरीवाल बुनियादी बातो को दोहरा तो रहे है लेकिन उन बुनियादी बदलाव को आम जनता से दूर ही रख रहे है ! 2+2=4 बोलो या 1+3=4 बोलो ! बात तो एक ही है ! और हल भी एक ! बदलाव उसे कहते है जिसमे 4+4=8 किया जाये !

सत्ता परिवर्तन होता है ! लोग सिर्फ सत्ता परिवर्तन ही चाहते है ! केजरीवाल आने से सत्ता परिवर्तन हुआ ! व्यवस्था परिवर्तन नहीं ! और लोगो के जीवनकाल में कोई परिवर्तन नहीं ! यही सोच आज देश के सामने गंभीर समस्या बन कर उभर रही है ! सिर्फ सत्ता परिवर्तन होने से बदलाव नहीं होता ! संवैधानिक संस्कृति की नीव में पलने वाली विचारधारा के संचलन में जबतक उस संकृति और विचारधारा से ताल्लुक रखनेवाले नहीं होंगे ! तबतक देश किसी भी बदलाव या परिवर्तन की दिशा में अग्रसर नहीं होगा !

सिर्फ सत्ता बदलने से परिवर्तन नहीं होता ! असल में परिवर्तन के लिए सत्ता में बैठे लोगो की विचारधारा बदलनी चाहिए ! वरना हम जहा थे वही पर रुक जायेंगे ! गुलाम को तो खैर गुलामी की आदत पड़ चुकी होती है ! इसलिए उनके लिए कोई नयी मुसीबत नहीं होगी ! हाँ ! लेकिन जिन लोगो को लग रहा है की वो सुरक्षित रहेंगे उनको आने वाली गुलामी से डरने की ज्यादा जरुरत है !

"लंगूर के हाथ में अंगूर" कुछ ऐसी ही परिस्थितिया आज कल दिल्ली में चल रही है ! दिल्ली वाले आज खुद को कोस रहे होंगे की हमने किस बला को दिल्ली में राज करने का मौका दिया है ! जिनकी खुद की संस्कृति विनाशकारी होती है वो राजनितिक संस्कृतिको भी विनाशकारी बना देते है !@ जिसका खूब नमूना "आप" के माध्यम से केजरीवाल दिल्ली और देश के सामने ला रहे है ! लोकतंत्र की राजनितिक संस्कृति जिन्हें मान्य नहीं, जिन्होंने आज तक लोकतंत्र को ही माना नहीं वो "आप" और "कजरी" भक्त इस बात को नहीं समझ सकते. लेकिन देश देख भी रहा है और समझ भी रहा है ! "आप" का "बाप" जनता इतनी बुद्धू है यह समझने की गलती न करे !


---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Constitutional Morality

(((आता आपल्याला आंबेडकरी समूहाबाहेर येऊन इतर बहुजन समाजाला सोबत घेऊन त्याचं नायकत्व आपल्याला स्वीकाराव लागेल त्यातच यश मिळू शकेल...By Pravin Jadhav))) 101 % खरे आहे. जे फार पूर्वी व्हायला पाहिजे होते. पण नाईलाजाने आता ते या पिढीला म्हणावे लागते किंवा ते करायला प्रवृत्त व्हावे लागते. आमच्या डोक्यातील विचार, आचार व कृती आराखडा कुणीही मिटवू शकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे आम्ही हिंदू म्हणविणाऱ्या बहुजनांमध्ये गेलो तरी त्यांच्यात परिवर्तन करू पण आपल्यात त्यांच्यामुळे परिवर्तन होणार नाही. हे खंबीरपणे जोपर्यंत हा आंबेडकरी समूह समजून घेत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचे नायकत्व आंबेडकरी माणसाकडे येणार नाही. हिंदुप्रणीत बहुजनांच्या आदर्श (देव / मंदिर) व संस्कृतीत दर्शक किंवा पाहुणे म्हणून आपण एक भाग बनलो म्हणजे आपल्यातला आंबेडकरवाद किंवा buddhism संपला असा अर्थ निघत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर Constitutional Morality च्या संबंधाने बोलतांना म्हणतात कि "Recognition of Pluralism is the part of Cultivation of Constitutional Morality in India" वैविध्यतेला मान्यता दिल्यानेच या देशात संवैधानिक नैतिकतेची रुजवण करता येईल. असे म्हणणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनीच आता ठरवावे कि आम्हाला एकाला चलो रे स्वीकारायचे कि वैविध्यतेला स्वीकारून संवैधानिक नैतिकतेची रुजवण करतांना बहुजनांचे नेतृत्व स्वीकारायचे. निर्णय समाजाला घ्यायचा आहे. निर्णय नवशिक्षित पिढीला घ्यायचा आहे. निर्णय वर्तमानातील उच्चशिक्षित पिढीला घ्यायचा आहे.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. 24 January 2014.

नेतृत्वाचा स्वीकार करा


((("आता सर्व गटांनी युती करावी अशी कल्पना येत आहे . बर एकवेळ युती मान्य करूया पण मृत गटांना परत सुळसुळाट करण्यासाठी त्यांना ICU मधून काढून परत त्यांच्यात जीव टाकण्याचे प्रकार आहेत."...By Pravin Jadhao)))...प्रवीण हे अगदी बरोबर आहे. युती किंवा ऐक्य म्हणणाऱ्या लोकांची राजकीय प्रगल्भता बाल्यावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ऐक्य आता अश्यक्यप्राय आहे त्यामुळे त्यावर मत प्रदर्शित करण्यात वेळ घालविणार नाही. परंतु युती ही नवी संकल्पना काही तरुणांनी मांडली त्यामुळे त्यांचे स्वागतही करू. परंतु जर राजकीय परिस्थितीचे चिंतन केले तर असे दिसून येते कि युती किंवा आघाडी ही स्वतंत्र वोट बँक असणाऱ्या पक्षांमध्ये केली जाते. आज आंबेडकरी म्हणविणाऱ्या पक्षांजवळ स्वतःची अशी स्वतंत्र वोट बँक नाही. अश्या परिस्थितीत कार्यकर्ते आणि नेते यांच्यात कितीही युती वा आघाड्या झाल्या तरी निवडणुकीवर त्याचा परिणाम पाडू शकतील असे दिसत नाही. बसपा निवडणुकीच्या सौदेबाजीत इतकी गुंतली आहे कि त्यांनी युती व आघाडी केली तर त्यांची दुकानदारी बंद व्हायची. व दाना-पाणी बंद व्हायचा अशी परिस्थिती आहे. जोपर्यंत स्वतःची स्वतंत्र अशी मजबूत वोट बँक तयार होत नाही तोपर्यंत आपापसात कितीही युती व आघाडी झाली तरी निर्णय मात्र शून्य राहील. म्हणून एकच पर्याय या समाजासमोर व कार्यकर्त्यांसमोर राहतो तो असा कि, प्रत्येकांनी वर्तमान राजकारणाचा व राजकीय परिस्थितीचा विचार करून समाजासमोर "एकनेतृत्वाची संकल्पना" ठेवावी. समाजाला कुठलेही एक नेतृत्व स्वीकारावयास सांगावे. जो नेता आंबेडकरी विचार व कृतीवर सक्षम बसत असेल त्या नेतृत्वाचा स्वीकार करा. तेव्हाच एक भक्कम वोट बँक या समाजाची तयार होईल. त्यातच या समाजाचा अभ्युदय आहे. राजकीय उभारणी त्यातूनच करता येईल.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. 25 जानेवारी 2014


सत्ता ही तात्कालिक आणि अल्पकालीन असते. पण सामाजिक परिवर्तन हे दीर्घकाळ टिकणारे. समाजाचे भवितव्य अल्पकाळासाठी कि दीर्घकाळासाठी ? याचा विचार प्रत्येकाने करावा. कारण सामाजिक परीवर्तानासोबत जर सत्तेपर्यंत पोहचायचे असेल तर तत्कालीन सत्तेला व राजकीय स्वार्थाला तिलांजली द्यावीच लागते. आणि सामाजिक राजकारणाच्या प्रक्रियेत हितसंबंधी लोकांसोबतच इतर हितसंबंधी लोकांशी सौहार्दाचे संबंध निर्माण करून सत्तेकडे जायचे असते. राजकीय सामाजीकरणाची ही प्रक्रिया समजून घेतल्या शिवाय तुम्हाला तुमची भक्कम राजकीय ताकत निर्माण करता येणार नाही. कम्पुवादी राजकारण हे प्रत्येकच समाजासाठी घातक आहे याचे भान असू द्या. आणि कम्पुवादी राजकारणातून बाहेर पडून सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजकारण करा. तशी मानसिकता तयार करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. २१ जानेवारी २०१४


समाज चुकीच्या दिशेने जात नसतो. समाजाचे मानसिकीकरण करणारी यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा नेतृत्वाने भूमिका घेऊन समाजाला योग्य दिशा दाखविली पाहिजे. आणि समाजाचे मानसिकीकरण करणारी यंत्रणा भक्कम केली पाहिजे....

मतस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्यामुळे जोपर्यंत मानसिक परिवर्तन केले जात नाही तोपर्यंत कुणावरही आळा घालता येणार नाही. त्यासाठी संवैधानिक मानसिकीकरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून एकसंघ भारतच नव्हे तर एकसंघ समाज निर्माण करायचा होता जो संवैधानिक प्रक्रियेतून या लोकशाहीला बळकटी देऊ शकेल. निदान याचे तरी भान प्रत्येकाने ठेवायला हवे. एवढेच...

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. २१ जानेवारी २०१४

Tuesday, 14 January 2014

जागो भारत के लोगो...जागो !

देश की राजनीती ने नया रुख अपना लिया है ! बदलाव की लहर चारो और गूंजती दिखाई दे रही है ! लोकतंत्र के लिए यह शुभ संकेत है ! ऐसा अगर कोई कहता है तो बिलकुल सही है ! लोकतंत्र में किसी एक पक्ष के हाथ में सत्ता जादा दिन तक रहे तो वो लोकतंत्र के लिए सबसे बड़ा खतरा है ! जिसका नजारा भारत ने देख लिया है ! लेकिन क्या आज का बदलाव सही में लोकतंत्र को मजबूती प्रदान करेगा ? क्या सही में लोकतंत्र की दिशा में यह बदलाव हो रहे है ? इसकी तय तक पहुचे बिना इस राजनितिक बदलाव को लोकतंत्र के लिए सही नहीं कहा जा सकता !
लोकतंत्र में किसी भी आम चुनाव के पहले देश की विभिन्न पार्टियों के चुनावी घोषणापत्र और नीतियों को देखा जाता है ! एवम उस घोषणापत्र और नीतियों का जनता तक प्रचार और प्रसार किया जाता है ! लेकिन आज इस बदलाव के दौर में घोषणापत्र और नीतियों की चर्चा नहीं हो रही बल्कि प्रधानमंत्री पद के व्यक्ति की चर्चाए हो रही है ! प्रधानमंत्री पद के व्यक्ति के नामसे जिस व्यवस्था में चुनावी प्रचार और प्रसार होते है वह व्यवस्था लोकतंत्र नहीं बल्कि अध्यक्षतंत्र होता है ! राहुल गाँधी / नरेन्द्र मोदी / केजरीवाल जैसे व्यक्ति के नाम से देश की सत्ता का प्रचार और प्रसार किया जा रहा है यह किस लोकतंत्र की नीतियों में आता है ! इसका सोच विचार करना आज देश के नागरिको की पहली प्राथमिकता है ! पिछले कई सालो से व्यक्तिविशेष के नाम से चुनाव लड़ाए जा रहे है ! और २०१४ तो पूरी तरह से व्यक्तिबाधित बन गई है ! क्या इससे देश का लोकतंत्र बना रहेगा ? या बहोत ही जल्द देश में अध्यक्षतंत्र लागु होगा ? इस विषय पर गंभीरता से सोचना सभी देशवासियों का प्रथम कर्त्तव्य है ! जागो भारत के लोगो...जागो !
---डॉ. संदीप नंदेश्वर.

Tuesday, 7 January 2014

प्रसारमाध्यमे संचालित लोकशाही

latest photo.jpg

प्रसारमाध्यमे संचालित लोकशाही
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
मोबाईल नं. 8793397275, 9226734091

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. जनमत तयार करण्यापासून तर जनतेचा आवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केले जाते. ज्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होते. प्रसारमाध्यमांचे लोकशाही व्यवस्थेमध्ये त्रिकालाबाधित महत्व कुणीही नाकारू शकत नाही. नागरिकांचे सार्वभौमत्व अबाधित ठेऊन लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्याचे महत्कार्य प्रसारमाध्यमांना करावे लागते. यादृष्टीने विचार केला तर आजची भारतीय राजकीय व्यवस्था, सामाजिक परिस्थिती आणि भारतीय प्रसारमाध्यमांची भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे.

भारतीय प्रसारमाध्यमांनी स्वातंत्रपूर्व काळापासून इथल्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेच्या बांधणीत महत्वाची भूमिका पेलून धरली होती. टिळक, आगरकर पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत प्रत्येकच महापुरुषाने प्रसारमाध्यमांचे महत्व ओळखून जनमतासोबतच व्यवस्था परिवर्तनाचे साधन म्हणून प्रसारमाध्यमांचा वापर केला. The Times of India (1850), The Hindu (1889), The Hitwada (1911), अश्या इंग्रजी वर्तमानपत्रांपासून केसरी, विजय मराठा, जनता, प्रबुद्ध भारत, दैनिक भास्कर इ. वर्तमानपत्रे आणि १९२७ ला सुरु झालेली दूरभाषकेंद्राची सेवा यांनी जनमताचे साधन म्हणून भारतीय समाजव्यवस्थेत महत्वाचे स्थान निर्माण केले होते. स्वातंत्र लढ्यात या प्रसारमाध्यमांचे योगदान फार मोठे होते. स्वातंत्र्यानंतरही स्वतंत्र भारताची मुहूर्तमेढ रोवण्यात आणि संविधानाने निर्माण केलेल्या नव्या राजकीय व्यवस्थेची घडी बसविण्यात वर्तमानपत्रांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे.

समाजाचे राजकीय सामाजीकरण करण्यापासून ते थेट सत्ताधाऱ्यांची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या प्रसारमाध्यमांकडून होत असते. इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यमांनी १९९० च्या दशकापासून लोकशाहीमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. आज तर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे हेच मतदारांचे मतपरिवर्तन करण्यापासून ते थेट कुठल्या पक्षाला व कुठल्या माणसाला सत्तेवर बसवायचे याचे नियोजन करायला लागले आहेत.

२०११ पासून देशात उभे झालेले भ्रष्टाचाराचे आंदोलन हे पूर्णतः इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी संचालित केलेले आंदोलन ठरले. समाजात सत्ताधारी व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी तीव्र असंतोष निर्माण करण्यात प्रसारमाध्यमे यशस्वी ठरली. भ्रष्टाचाराचे दिल्लीतून उभ्या झालेल्या आंदोलनाला प्रसारमाध्यमांनी जनआंदोलनात स्वरूप प्राप्त करून दिले. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लोकपाल कायदा व्हावा यासाठी दबावतंत्र निर्माण करण्यात प्रसारमाध्यमांना यश आले. भ्रष्टाचाराविषयी जनआंदोलनाच्या नेतृत्वधारी शिलेदारांमध्ये राजकारण आणि आंदोलन यावरून पडलेली फुट प्रसारमाध्यमांनी अतिशय योग्यरितीने संचारित केली. त्यामुळे आंदोलनात उघड फुट पडून देखील हे आंदोलन ध्येयसिद्धीपर्यंत पोहचविण्यात मिडिया यशस्वी ठरला.

प्रिंट मिडिया असो कि इलेक्ट्रॉनिक मिडिया असो काही अपवाद वगळता सर्वच प्रसारमाध्यमे सदैव कॉंग्रेस पक्षाचा हात धरून चालत आले आहे. त्यामुळे निष्पक्ष पत्रकारिता आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची मुलभूत तत्वे नेहमीच अव्हेरली गेली. मागच्या ६० वर्षात कॉंग्रेस ने जी काही सत्ता या देशावर गाजविली त्याचे श्रेय प्रसारमाध्यमांना पण द्यावेच लागेल. एकंदरीतच सत्ताधाऱ्यांच्या कुशीत बसून मिडीयाचा झालेला प्रवास लोकशाहीला मजबुती प्रदान करू शकला नाही. हे परखड सत्य देखील मान्य करावेच लागेल. त्यामुळेच २०११ पासून सर्वच मिडियाने कॉंग्रेसचा हात सोडून केलेला प्रवास आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका संशयास्पद वाटते. अचानक देशासमोर उफाळून आलेली मिडियाची सक्रियता आणि पत्रकारिता अचंभित करणारी आहे. कॉंग्रेस पक्षाला आलेली सत्तेची गुर्मी हेही त्याचे एक कारण असू शकते.

दिल्लीतला राजकीय गोंधळ इलेक्ट्रॉनिक मिडीयाने इतका उचलून धरला की त्यामुळे गल्लीतला गोंधळ प्रकाशझोतात येउच शकला नाही. केजरीवाल नावाचे राजकीय वलय दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाण्यात मिडिया यशस्वी ठरला. अचानक नरेंद्र मोदी नावाची उपरती मिडीयाला झाली आणि पंतप्रधान पद मिडियाने निवडणुकीच्या आधीच बहाल केल्यागत प्रचार आणि प्रसार सुरु केला होता. तेव्हापर्यंत मिडीयाने उभा केलेला अरविंद केजरीवाल नावाचा माणूस मिडीयाच्या अपेक्षेपेक्षाही मोठी मजल मारुन गेला. त्यामुळे लगेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा अभिषेक होत नाही तोच अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत मिडिया ने उतरविले आहे. इतक्या झपाट्याने होणाऱ्या मिडीयाच्या हालचाली देशातील जनतेला विचारप्रवृत्त नक्कीच करीत आहेत. पण त्यासोबतच मिडीयाने चालविलेल्या या सत्तेच्या सारीपाटातील खेळात कुणाला जिंकवायचे ? आणि कुणाला हरवायचे ? हे सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे.

आजपर्यंत या देशात अनेक सार्वत्रिक निवडणुका झाल्या. अनेक मुख्यमंत्री व पंतप्रधान झाले. अनेकांच्या सत्ता आल्या आणि गेल्या. पण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सारखे मीडियातील सातत्य आजपर्यंत पाहायला मिळालेले नाही. पंतप्रधान पद व्यक्तीदर्शक बनवून रंगविले गेलेले राजकीय चित्र आजपर्यंत या देशात कधीच पाहायला मिळाले नाही. अमेरिकेत चालणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत होणारी राजकीय चर्चा जशी व्यक्तीदर्शक असते तशी व्यक्तीदर्शक चर्चा पंतप्रधान पदासाठी चाललेली पाहून देशात लोकशाही आहे कि अध्यक्षीय प्रणाली ? हेच कळत नाही. मुळात या दोन्ही प्रणाली भिन्न आहेत. लोकशाहीची प्रक्रिया वेगळी आहे. ती लोकशाहीची पक्षीय राजकीय प्रक्रिया मोडीत काढून व्यक्तीदर्शक व्यक्तिकेंद्रित प्रक्रिया आणण्याचा प्रयत्न अतिशय गांभीर्याने मिडीयाच्या माध्यमातून सुरु आहे. हिदुत्ववादी विचारसरणीशी जुळलेल्या भाजपप्रणीत वर्गाला या देशात अध्यक्षीय प्रणाली आणायची आहे. हे केव्हाचेच स्पष्ट झाले आहे. आणि मिडिया त्या प्रणालीला देशांतर्गत जनतेच्या मनावर बिंबवत आहे. कारण तिथे हिंदुत्वाचे आणि हिंदुत्व प्रणालीशी जुळलेल्या संस्था संघटनेचे हितसंबंध जुळलेले आहे.

आज मिडिया नावाचे क्षेत्र उद्योगपती आणि भांडवलदार वर्गाने बळकावलेले आहे हे देशातल्या नागरिकांपासून लपून राहिलेले नाही. नागरिकांच्या राजकीय प्रबोधनासोबतच राजकीय सत्तेची सूत्रे व चाबी कुणाच्या हातात ठेवायची जेणेकरून या वर्गाचे हितसंबंध सुरक्षित ठेवता येतील. यासाठी हा सर्व खेळ सुरु आहे. निष्पक्ष पत्रकारिता लयाला जाऊन वर्चस्ववादी भांडवलधार्जिणी पत्रकारिता उदयाला आली आहे. जी लोकशाहीसाठी घातक आहे.

लोकशाही व्यवस्थेत सत्ता बदल झाला पाहिजे. सत्तेतील पक्षीय हुकुमशाही मोडीत निघाली पाहिजे. सत्ताबदल हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. आणि ती बदलण्यासाठी मिडिया भूमिका घेत असेल तर त्याचे स्वागत केलेच पाहिजे. २०१४ मध्ये कॉंग्रेस ची सत्ता येणार नाही. याची पुरेपूर खबरदारी मिडियाने घेतलेली आहे. देशाच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीने ते चांगले आहे. पण सोबतच ही सत्ता कुणाच्या हातात सोपवायची याचीही पूर्ण तयारी मिडियाने करून ठेवलेली आहे. भाजप प्रणीत नरेंद्र मोदी आणि मिडीयाने जन्माला घातलेले अरविंद केजरीवाल इतकीच लढाई मिडिया देशासमोर मांडत असेल तर ती या देशाची कुचंबनाच ठरेल. नरेंद्र मोदी किंवा अरविंद केजरीवाल यांच्या सभोवताल पंतप्रधानाची माळ फिरविण्यात मिडिया धन्यता मानीत आहे. कारण हे दोघेही मिडियाप्रणीत वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. एकंदरीतच नव्या आर्थिक समाजरचनेकडे हा देश वळविला जात आहे.

भारतावर मागच्या ६४ वर्षात कॉंग्रेसने एकछत्री सत्ता गाजविली आहे. त्यातून या पक्षाने निर्माण केलेला राजकीय-आर्थिक श्रेष्ठीजणांचा वर्ग आता कॉंग्रेस चा हाथ सोडून बाहेर पडू पाहत आहे. हा वर्ग कॉंग्रेस पक्षातील पारिवारिक वंशवादी वर्चस्व मोडीत काढून आपल्या हातात सत्ता स्थिरावू पाहत आहे. “आम आदमी” हे या वर्गाने धारण केलेले गोंडस नाव समाजाला संमोहित करणारे निमित्त मात्र आहे. अंतर्गत हालचाली राजकीय-आर्थिक श्रेष्ठीजणांचे, मिडियाप्रणीत भांडवलदार वर्गाचे परंपरागत वर्चस्व या समाजावर लादण्यासाठी सुरु आहेत. त्यासाठी “आम आदमी” नावाचे संम्मोहन फार कामी येणार आहे. तेव्हाच या देशात आजपर्यंत राज्याच्या निवडणुकांतील मतदारांचे मतपरिवर्तन करण्यापासून ते थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यापर्यंत सातत्याने मिडीया पाठपुरावा करीत आहे.

कॉंग्रेस ची या देशावरील सत्तेची हुकुमशाही जावी हा या देशातील जनतेच्या मनातील उद्रेक आहे. पण त्यासोबतच मिडिया करीत असलेले संम्मोहन शास्त्र वगळले तर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावे किंवा भाजप च्या हाती या देशाची सत्ता द्यावी असेही देशातील जनतेला वाटत नाही. अरविंद केजरीवाल “आम आदमी” चे प्रतिनिधित्व करतात ? कि इथल्या परंपरागत वर्णवर्चस्ववादी लोकांचे प्रतिनिधित्व करतात ? हे अरविंद केजरीवाल यांनी Aims मधील OBC च्या आरक्षणाच्या विरोधात केलेल्या आंदोलनातून दिसून आलेले आहे. अश्या परीस्थितीत मिडिया या देशाची सत्ता त्यांच्या हातात सोपवायला उतावळी झालेली आहे.

इथे मिडीयाच्या माध्यमातून चर्चिला जाणारा वर्ग, सत्तेसाठी गृहीत धरलेला वर्ग आणि विचारधारा कायम या देशावर सत्तेत होती. त्यामुळे आलटून पालटून मिडीयाने कुणाच्याही हातात सत्ता सोपविली तरी सत्तेत कायम तोच वर्ग आणि तीच विचारधारा राहणार आहे. त्यामुळे देशांतर्गत परिस्थितीत कुठलाही बदल अथवा परिवर्तन अपेक्षित नाही. कायम उपेक्षित वर्गाचे उत्थान यातून अभिप्रेत नाही. या वास्तववादी गृहितकावर विचार केला तर येणारा काळ हा उपेक्षित, बहुजन (आम आदमी) वर्गासाठी आहे त्यापेक्षाही बिकट अवस्था निर्माण करणाराच आहे.

या सर्व परिस्थितीत परिवर्तनवादी विचारांची बैठक असणारा स्थानिक व प्रादेशिक पातळीवर वर्चस्व असणारा आणि मर्यादित सत्तेची फळे चाखणारा उपेक्षित, बहुजन (आम आदमी) समाजाचा राजकीय वर्ग या देशात आहे. जो कायम या देशाच्या केंद्रीय सत्तेपासून दूर राहिला आहे. (काही अल्पकालिक उदाहरणे वगळता) ज्या वर्गाने कायम कॉंग्रेस च्या धर्मनिरपेक्षवादी मवाळ भूमिकेसोबत राहण्यात धन्यता मानली. स्वतः अनेकदा तिसऱ्या आघाडीच्या पर्यायी शोधात राहिला. पण मिडीयाने त्यांची तिसरी आघाडी उदयास येऊ न देता आघाडीची बिघाडीच करण्यात धन्यता मानली. ज्या वर्गाचे प्रभावक्षेत्र मिडीयाने कधी उचलून धरले नाही. किंवा ते पेलून धरले नाही. या देशातल्या लोकांना परिवर्तन हवे आहे. आणि ते परिवर्तन परिवर्तनवादी विचारांची नाळ असणाऱ्या पक्ष नेत्यांशिवाय या देशात अपेक्षित नाही. अश्या वर्गाच्या हातात २०१४ ची सत्ता यावी अशी भूमिका मिडियाची असायला हवी होती. पण तिथेही मिडिया मागेच पडत आहे. किंवा मिडिया संचालित वर्गाला ते नकोच आहे.

या सर्व राजकीय गदारोडात आणि मिडीयाच्या फसव्या राजकीय प्रचार प्रसारात २०१४ कडे या देशाने परिवर्तनाच्या दिशेने पाहू नये. सत्ताबदल होईल. परिवर्तन होणार नाही. सत्तेच्या व सत्ताधारी पक्षाच्या मुळाशी असणाऱ्या विचारप्रणाली व विचारप्रवाहात बदल होत नाही तोपर्यंत जनतेला अभिप्रेत परिवर्तन शक्य नाही. परिवर्तनवादी पक्ष व नेत्यांच्या हातात सत्तेची सूत्रे दिल्याशिवाय या देशाला लोकशाही टिकविता येणार नाही. मिडिया संचालित लोकशाहीकडे होणारी वाटचाल संसदीय लोकशाही व समान मत मूल्य असणारी जनतेची सार्वभौम लोकशाही प्रणाली टिकवून ठेवण्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे मिडीयाने स्वतःच्या भूमिकेचा विचार नक्कीच करावा. आणि जनतेने आपली मते (राजकीय जाणीव) मिडीयाच्या संम्मोहनात न अडकता डोळसपणे निश्चित करावी. अन्यथा देशांतर्गत लोकशाहीचा अनर्थ व विनाश अटळ आहे.
óóóóó
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

मोबाईल नं. 8793397275, 9226734091