Thursday, 13 September 2012

इस देश का असली दुश्मन ? मिडिया !


इस देश का असली दुश्मन ? मिडिया !

आज हमारे देश का पहला दुश्मन याह का मिडिया ही बन चुका है ! लोकतंत्र का चौथा स्तंभ कहकर दिंडोरा पिटने वाला मिडिया आज इस लोकतंत्र को ख़त्म करने पर तुला है ! देशद्रोहियोंको देशभक्त और देशभक्तोंको देशद्रोही बनाने का काम आज मिडिया कर रहा है ! जिसका नमूना आज के पत्रपरिषद में मैंने अजमाया है ! एक पत्रकार कहता है की "ब्लू फिल्म और पैसे लेकर सवाल करने वाले विधायक चलते है फिर ये तो (असीम त्रिवेदी, केजरीवाल) देश को दिशा देने का काम कर रहे है !"

मेरा जवाब यह था की, "क्या संविधान ने बोला था उन विधायको को ब्लू फिल्म देखने के लिए या पैसा लेने के लिए ! क्या इसके लिए संविधान जबाबदार था या मिडिया जबाबदार था ! जिन्होंने उनको चुनाव के समय में पैसे के बल पर हीरो बनाया ! फिर क्यों बार बार सिर्फ संसद और संविधान को ही टार्गेट बनाया जाता है !" उन पत्रकारों को यह तक मालूम नहीं था की कलम १२४ और ३०२ Indian Penal Code के अंतर्गत आती है या Constitution के अंतर्गत आती है ! ऐसी मीडिया और ऐसे पत्रकारों से आप और क्या अपेक्षा कर सकते है ? अगर हिन्दू देवी देवता को अपमानित किया जाता है तो उन्हें जलन होती है ! ये आगबबुला हो जाते है ! जिस हिन्दू देवी देवताओं पर श्रद्धा रखने वाला समूह सिर्फ हिन्दू धर्म वाला ही है !लेकिन भारत के संविधान के तहत तो हर वो व्यक्ति आता है जो खुद को इस देश का नागरिक समझता है ! जो नागरिक है ! फिर देश के हर नागरिक की श्रद्धा देश के संविधान और संसद पर है ! और उसका अपमान ये हर नागरिक के श्रद्धा को ठेंच पहुचना है ! फिर ऐसे समय में हिन्दू देवी देवता श्रेष्ठ या देश का संविधान जो सभी नागरिको के लिए लागु होता है ! जो किसी एक धर्म का नहीं है ! इसका जवाब कौन देगा ?

देखिये इस मिडिया के पिल्लू और चेलो की क्या औकात बन बन गई है ! जो देश के खिलाफ बोलेगा, जो देश के कानून के खिलाफ आवाज उठाएगा, जो संसद और संविधान पर कीचड़ उछालेगा वो इनके लिए हीरो लगता है ! अपनी जिम्मेदारी नैतिकता का पाठ मिडिया के माध्यम से नागरिको को पढ़ना छोड़ कर ये मिडिया वाले देशद्रोहियोंको पैदा कर रहे है ! जिनके वजह से ये खुद का पेट भर रहे है ! पैसा लेकर येही मिडिया वाले चुनाव के समय उन्ही विधायको को हीरो बनाते है ! और जब वक्त आता है देशद्रोहियोंके देशविघातक कारनामो का तो यही मिडिया विधायको को झिरो और देशद्रोहियोंको हीरो बनाता है !

आज इस मिडिया के वजह से ही देशद्रोहियोंके हौसले बुलंद होते जा रहे है ! इस देश का, इस लोकतंत्र का सबसे बड़ा दुश्मन यह मिडिया ही है ! जिसके खिलाफ आज जनता मूकदर्शक बनी बैठी है ! जब तक हम मिडिया की बेखौफ और घिनोनी हरकते युही सहते रहेंगे ! तबतक यह देश बर्बादी की तरफ बढ़ता चला जायेगा !

सच्चे देशभक्तों और संविधानप्रेमियों को बड़ी गहनता से इस बात पर सोचना होगा ! और अपनी रणनीति तय करना होगा ! इस देश को, देश के लोकतंत्र को बचाना होगा ! वरना हिन्दू धर्म के बगलबच्चे इस देश की आझादी ख़त्म कर अन्य धर्म के लोगो को खतरे में ला सकते है ! आओ मेरे भारतवासियों एक हो जाओ ! इस देश को बचाओ ! समाज को बचाओ ! खुद की स्वतंत्रता को बचाओ !
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर. ९२२६७३४०९१

Wednesday, 12 September 2012

देश अराजकतेच्या ज्वालामुखीवर उभा आहे.



  
 -:  प्रेस नोट  :-   

देश अराजकतेच्या ज्वालामुखीवर उभा आहे.
                                                                                                            दि. १३-०९-२०१२
     
     


विषय :- भारतीय संविधान, भारतीय व्यवस्था यांचा अपमान करून अंतर्गत सामाजिक सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणा-या सामाजिक विकृतींचा निषेध....
निवेदनकर्ते  :-  डॉ. संदीप नंदेश्वर, सामाजिक कार्यकर्ता आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक, नागपूर.

सन्माननीय भारताचे सर्व नागरिक आज अंतर्गत सामाजिक व राजकीय परिस्थितीने त्रस्त झाले आहेत. समता, संविधान, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, संसद, राजकारण अश्या विषयावर उठसूट आंदोलने केली जात आहेत. आणि या मूल्यांच्या संबंधाने देशविघातक वक्तव्य केले जात आहे. भारतीय संविधान आणि व्यवस्थेच्या संबंधाने काही असामाजिक तत्वांकडून समाजात दुषित वातावरण निर्माण केले जात आहे. या असामाजिक तत्वांचा त्यामागचा हेतू (षड्यंत्र) काय आहे हे आता हळूहळू प्रत्यक्षात दिसून येत आहे. समाजात अंतर्गत यादवी निर्माण व्हावी यासाठी काही असामाजिक तत्वांकडून संघर्षाची ठिणगी टाकली जात आहे. ज्यामुळे देशातील नागरिकांची सुरक्षितता आणि देशातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. देश आज अराजकतेच्या ज्वालामुखीवर उभा आहे. अश्या परिस्थितीत देशातील सुज्ञ नागरिक आणि भारत सरकार यांनी या घडणा-या घडामोडींकडे प्रकर्षाने लक्ष देऊन सतर्क राहणे गरजेचे आहे.
अलीकडेच असीम त्रिवेदी या अण्णा टीमच्या सदस्य युवकाने भारतीय संविधान, भारतीय संसद आणि राष्ट्रीय बोधचिन्ह अशोकस्तंभ यावर अपमानजनक असे व्यंगचित्र काढून अण्णा हजारे, केजरीवाल आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन यांनी केलेल्या मुंबई मधील आंदोलनात वितरीत केले. त्या त्रिवेदी यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला आहे. तो खटला संविधानातील तरतुदींना आणि कलमांना धरूनच भरण्यात आला होता. परंतु त्रिवेदी नावाच्या विक्षिप्त डोक्याच्या या युवकाला वाचविण्यासाठी केजरीवाल आणि त्यांचे अन्य साथीदार ज्या पद्धतीने रणकंदन माजवीत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होत आहे की भारतातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत.
संविधानिक मुलभूत अधिकारात कलम १९ (क) नुसार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले असले तरी संविधानाच्या कलम ५१ (क) नुसार मुलभूत कर्तव्य पण सांगितलेली आहेत. संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करतांना कुठल्याही नागरिकाला मुलभूत कर्तव्य प्रामुख्याने पार पडावे लागतात. मुलभूत कर्तव्यात सुरवातीलाच सांगितले आहे की संसद, संविधान आणि राष्ट्रीय चिन्हे व प्रतीके, स्मारके यांचा मान, सन्मान आणि सुरक्षा करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. असीम त्रिवेदी या विक्षिप्त युवकाने आपल्या मुलभूत कर्तव्याचे हनन केले आहे. त्यामुळे त्याची ही कृती दखलपात्र ठरते. नव्हे ती देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणारी कृती आहे. देशाच्या स्वातंत्र्याला आव्हान देणारी कृती आहे. सामाजिक स्वास्थ्य, शांतता आणि सुव्यवस्था भंग करणारी कृती आहे. आणि ती देशद्रोही या कक्षेत मोडणारी आहे. संविधानिक कलमानुसार आणि Indian Penal Code यानुसार पण तो अतिशय गंभीर गुन्हाच ठरतो. अश्याप्रकारे संविधान आणि देशातील प्रतिक चिन्हाचा अपमान करणा-या असामाजिक कृतींचा आम्ही निषेध करीत आहोत.
भारतीय संविधान आणि प्रतिक चिन्हांचा अपमान होत असतांनाही केजरीवाल आणि तत्सम इंडिया अगेन्स्ट करप्शन च्या तंबूत वावरणा-यांनी असीम त्रिवेदी यांचा गुन्हा देशद्रोह ठरू नये म्हणून प्रयत्न चालविलेले आहे. आणि त्यांच्या या दबावतंत्राला बळी पडून सरकारही त्यांच्यासमोर लोटांगण घालतांना दिसून येते. त्यामुळे सरकार जर अश्या असामाजिक तत्वांना, देश विघातक कृती करणा-या लोकांना आणि देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणणा-या लोकांच्या दबावापुढे झुकत असेल तर अश्या परिस्थितीत सरकारच्या कृतीचापण आम्ही जाहीर धिक्कार करू.
मुळात आज अनेक स्तरातून देशाची शांतता, सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून अण्णा आणि केजरीवाल टीम ने मागील २ वर्षापासून या देशात चालविलेले आंदोलन आहे. भ्रष्टाचार हा देशातल्या कुठल्याही माणसाला नको आहे. परंतु भ्रष्टाचारासारख्या भावनिक मुद्द्यांचा वापर करून जर या देशातल्या संविधानाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते या देशातल्या सुज्ञ नागरिकांना कदापि मान्य नाही. भ्रष्टाचारासाठी (कर्तव्यातील कसूर आणि अधिकारातील उदासीनता यामुळे) या देशातल्या संविधानाचा बळी दिला जात असेल तर तो आम्हाला कदापि मान्य नाही.  व्यवस्था परिवर्तन किंवा राजकीय परिवर्तन व्हावे परंतु संविधानाचा बळी देऊन नाही. किंवा जातीवादी/धार्मिक (हिंदुत्ववादी किंवा मनुवादी) मानसिकतेतून नाही. पण मुळात अलीकडे चालविण्यात येणारी आंदोलने या संविधानाचा बळी घेणा-याच दिसून येत आहेत.
महाराष्ट्रात अलीकडे राज ठाकरे यांनी प्रांतिक वाद निर्माण केला होता. ज्यामुळे मराठी माणसे विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष उभा झाला. जे की मुळात भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारालाच नाकारले जात होते. ही कृती पण भारतीय संविधाच्या आणी देशातील अंतर्गत स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारी होती. गेल्या महिन्यात याच राज ठाकरे ने मुस्लीम विरुद्ध दलित अशी संघर्षाची ठिणगी जाहीर सभेतून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि आता तर दादर, मुंबई येथील इंदू मिल च्या जागेवर होणा-या प्रस्तावित आंबेडकर स्मारकावर उठसूट अकलेचे तारे तोडून दलित समाजाच्या/ आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. अश्या या राज ठाकरे नावाच्या राजकीय बाळबोध नेत्यावर सुद्धा देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा. राज ठाकरेच्या अश्या असामाजिक आणी असंवैधानिक कृतीचा सुद्धा आम्ही सुज्ञ भारतीय जनता निषेध करीत आहोत.
८ सप्टेंबर २०१२ ला नागपूर येथे "भारतीय संविधानातील समतेची संकल्पना" या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्या परिसंवादात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील सन्माननीय न्यायमूर्ती प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीक्रीष्णा यांनी "समता" वेद आणि उपनिशदातून घेण्यात आली आहे. असे वक्तव्य केले तर दुसरे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.एम. शाह हे म्हणाले की "समता" ही मनुस्मृतीमधून घेण्यात आली आहे. सन्माननीय न्यायाधीश असे जर वक्तव्य करीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे ? त्यामुळे या न्यायाधीशांच्या वक्तव्यांचा सुद्धा आम्ही निषेध करीत आहोत. संविधानातील समता हे तत्व आणि या न्यायाधीशांच्या वक्तव्यातून आलेली समता यात कुठेही तिळमात्र संबंध नसतांना असे वक्तव्य एका विशिष्ट उद्देशाने केले जात आहे ही शंका बळकट होते.
Hindu Law ने वेद, उपनिषदे आणि मनुस्मृतीला महत्व दिले असेल. Hindu Law हा व्यक्तिगत पातळीवर असेल पण त्यामुळे Constitutional Law तील तरतुदींची गफलत करणे चुकीचे आहे. हिंदू कायदा हा हिंदू समूहासाठी लागू होणारा असला तरी संविधानिक कायदा हा या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आहे. ज्यामुळे संविधानिक कायद्यातील "समता" या तत्वाला धार्मिक कायद्यात गुंफण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आणि देशाच्या संविधानिक तत्वांना काळिमा फासणारा आहे. संविधानातील "समता" तत्व हे वैश्विक पातळीवर मानवतावादी कायद्यातून घेण्यात आले आहे. त्याचा या हिंदू धर्मातील ग्रंथांशी काहीही संबंध नाही.
या सर्व घटना घडामोडींचा विचार केला तर असे दिसून येते की अतिशय शिस्तबद्ध रीतीने या देशातील "धर्मनिरपेक्ष" आणि "समता" तत्वाला अव्हेरून एकंदरीत संविधानाने दिलेले "भारतीयत्व" नाकारले जात आहे. कुठल्याही देशाचे स्वातंत्र्य हे त्या देशातील संसदेच्या सार्वभौमत्वावर निर्भर असते. आज देशाचे सार्वभौमत्व हे अश्या असामाजिक तत्वांच्या कृतींनी धोक्यात आले आहे. ज्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात येतांना दिसून येत आहे.
अश्या परिस्थितीत भारताची आणि भारतीय नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही पुढील काही मागण्या करीत आहोत....
१.                             संसदीय प्रतीके आणि राष्ट्रीय आयुधे यांच्याविरुद्ध गदारोळ करणा-यावर सक्त कार्यवाही करण्यात यावी.
२.                             संविधान, संसद आणि राष्ट्रीय चिन्ह व स्मारक या देशाच्या प्रतीकांचा अपमान करणा-यांना देशद्रोही घोषित करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी.
३.                             असामाजिक तत्वाच्या समोर सरकारने न झुकता त्यांचा खंबीरतेने प्रतिकार करावा. अश्या असामाजिक तत्वाचे जाळे पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
४.                             प्रांतिक वाद निर्माण करून नागरिकांच्या मुलभूत अधिकाराला खंडित करण्याचा प्रयत्न करणा-यांवर कार्यवाही करावी.
५.                             धार्मिक आणि जातीय अश्या प्रकारचे वक्तव्य करणा-या न्यायाधीशांवर नियंत्रण ठेवावे. व सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
६.                             समता, आरक्षण, धर्मनिरपेक्षता अश्या संवैधानिक मुलतत्वांविरुद्ध कृती करणा-यावर नियंत्रण मिळवावे. तसेच त्यांच्यावर कार्यवाही करावी.
७.                             काही असामाजिक तत्वांकडून देशाच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांच्यावर सरकारले त्वरित नियंत्रण मिळवावे.
८.                             असीम त्रिवेदी या विक्षिप्त डोक्याच्या व्यंगचित्रकारावर लावण्यात आलेला देशद्रोहाचा खटला मागे घेण्यात येऊ नये.
९.                             अरविंद केजरीवाल हे असीम त्रिवेदी सारख्या देशद्रोह्याला पाठीशी घालून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही देशविघातक कृत्य करणा-यांना पाठींबा देण्याच्या सबबीवर मौक्का कायद्याच्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी.
१०.                        असीम त्रिवेदी सारख्या देशविघातक कृत्य करणा-या विरोधात कायदेशीर लढाई लढणाऱ्या अमित कतारनवरे या तरुणाला पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे.
११.                        देशविघातक कृत्यात समाविष्ट असणा-या अन्य सर्वं व्यक्ती, संस्था, संघटनांवर कठोर कार्यवाही करावी. तसेच असे कृत्य करणा-यांना प्रोत्साहन देणा-यांवर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून अन्य कुणीही अश्या प्रकारची कृती करायचे धाडस करणार नाही.
१२.                        संसदीय आणि कायद्याची संस्कृती समाजात आणि नागरिकात रुजविण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न व्हावे व त्यासाठी त्वरित कृतीकार्याक्रमाची आखणी सरकारच्या माध्यमातून करण्यात यावी.
इ. मागण्यांसह हे प्रसिद्धीपत्रक समाज, नागरिक आणि सरकार यांच्या माहितीस्तव देण्यात येत आहे. यावर नागरीकातून, समाजातून आणि सरकारी स्तरातून चर्चा व्हावी आणि देशविघातक अश्या कृतीवर त्वरित आला घालता यावा असा आमचा शुद्ध हेतू आहे. देशाचे स्वातंत्र्य, नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य, सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी अशीच अपेक्षा आहे. यावर त्वरित विचार व्हावा. अन्यथा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. आणि संविधानप्रेमी जनता रस्त्यावर उतरून स्वतःच्या हक्क व अधिकार सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करतील. अश्या वेळेस असंवैधानिक कृत्य करणारे आणि संविधान प्रेमी याच्यात संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. व त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.
वरील सर्वं विवेचनावर आणि मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हावा. ही अपेक्षा.
धन्यवाद !
दि. १३-०९-२०१२
                      निवेदनकर्त्यांची नावे                                                                   स्वाक्षरी
1.   ……………………………………………….                                  ……………
2.   ……………………………………………….                                  ……………
3.   ……………………………………………….                                  ……………
4.   ……………………………………………….                                  ……………
5.   ……………………………………………….                                  ……………
6.   ……………………………………………….                                  ……………
7.   ……………………………………………….                                  ……………
8.   ……………………………………………….                                  ……………
9.   ……………………………………………….                                  ……………
10.            ……………………………………………….                                  ……………
11.            ……………………………………………….                                  ……………
12.            ……………………………………………….                                  ……………
13.            ……………………………………………….                                  ……………
14.            ……………………………………………….                                  ……………
15.            ……………………………………………….                                  ……………
16.            ……………………………………………….                                  ……………
17.            ……………………………………………….                                  ……………
18.            ……………………………………………….                                  ……………
19.            ……………………………………………….                                  ……………
20.            ……………………………………………….                                  ……………

Tuesday, 11 September 2012

ये देश कौन चला रहा ?


ये देश कौन चला रहा ?

आज भारत देश एक सामाजिक व्यवस्थात्मक ज्वालामुखी पर खड़ा है ! आज समाज मन में जहरीली नफरत इस व्यवस्था के प्रति भरी जा रही है ! व्यवस्था परिवर्तन के नाम से तो कोई राजनैतिक परिवर्तन के नाम से लोगो में जहर भर रहे है ! चारो तरफ बस इस समाज को एक जड़ से उखाड़ने की कोशिश हो रही है ! हर तरफ नफ़रत पैदा कर देश में सामाजिक अंतर्गत संघर्ष की नीव रखी जा रही है ! इसके कई उदाहरण प्रतिदिन सामने आ रहे है !

असीम त्रिवेदी नाम के विक्षिप्त मानसिकता के इस दुर्बल मानसिक रोगी ने संविधान, देश का राष्ट्रध्वज और राष्ट्रचिंन्ह का कार्टून बनाकर अपमान किया है ! जहा देश की धरोहर, देश का सन्मान, देश के प्रतिको का सन्मान करना देश के हर नागरिक का प्रथम कर्त्तव्य है ! वही इस मानसिक रोगी ने देश के सभी मानद चिन्हों को इस कदर बदनाम किया है मानो वह एक खिल्लोंना हो ! इसके खिलाफ जनहित याचिका दायर करने के बाद जब इसे देशद्रोही साबित किया जाता है तो अरविन्द केजरीवाल जैसा इस देश का महारोगी उठ कर उसके समर्थन में खड़ा होकर फिर एक बार इस देश की इमान को बेंच खाता है ! इस महारोगी अरविन्द केजरीवाल के कम्पू ने इस देश को बर्बाद करने की कसम खाई है तभी प्रतिदिन इन कम्पू में बने केजरीवाल और त्रिवेदी जैसे लोग इस देश को खौकला बनाने का प्रयास कर रहे है ! यह उन लोगो के लिए काफी शर्मनाक है जो इस देश के नागरिक होने के बावजूद केजरीवाल के कम्पू में जाकर देश के विर्रुद्ध की जाने वाली गतिविधियों में शामिल हो रहे है !

आये दिन देश का संविधान कितना गलत है ? इस देश की व्यवस्था कितनी गलत है ? और केजरीवाल जैसे महारोगी, मानसिक दुर्बल लोग देश के नायक है ? ये जताने का प्रयास किया जा रहा है ! जिस देश में आज तक सभी नागरिको में बंधुता बनायीं रखी ! जिस संविधान ने आज तक देश के हर नागरिक को उसका हक़ और अधिकार दिलाया जिसे इन जैसे लोगो ने कभी भी नहीं स्वीकार ! यही कारन है की आज यह लोग इस संविधान और इस क़ानूनी व्यवस्था को तोड़ने में लगे है !

असीम त्रिवेदी अगर हमारे देश के सन्मान चिन्ह को अपमानित करता है तो वह देशद्रोह ही है ! संविधान के कलम ५१ (क) के तहर मुलभुत कर्त्तव्य के खिलाफ की गई यह घ्रुनास्पद कृत्य है ! जो देशद्रोह की कक्षा में ही आता है ! अगर देश के नागरिक अभिव्यक्ति स्वतंत्रता के अंतर्गत मौलिक अधिकारों का निर्वहन कर रहे है तो मौलिक कर्त्तव्य का दमन नहीं होना चाहिए ! मौलिक कर्त्तव्य को सचेत रूप से स्वीकार कर के उसका भी निर्वहन होना चाहिए ! लेकिन लगता है की यह सभी केजरीवाल कम्पुवादी लोग इस देश के किसी भी कायदे या कलम को नहीं मानते ! वरना वो यह नहीं कहते की, देशद्रोह का कानून ब्रिटिश काल का था ! इतनी घटिया दलील केजरीवाल कम्पू से आना यह साबित करता है की यह पूरा कम्पू इस देश को बर्बाद करने के लिए बेताब है ! हमें सोचना होगा ?

उधर महाराष्ट्र धर्म की अपील करने वाला अ-राजकीय आतंकवादी राज ठाकरे असीम त्रिवेदी की सुरक्षा में खड़ा हुआ है ! और देशद्रोह का खटला असीम त्रिवेदी पर नहीं लगाया जाये ऐसी दलीले दे रहा है ! जो राज ठाकरे महाराष्ट्र के मराठी लोगो के लिए गले की हड्डिया तोड़ कर बिहारी और अन्य प्रदेश के नागरिकोंका महाराष्ट्र में जीना हराम कर रहा है वही राज ठाकरे आज एकदम असीम त्रिवेदी इस अ-महाराष्ट्रियन, अ-मराठी के लिए देशवाशी कैसे बन गया यह एक बड़ा सवाल आज पैदा हुआ है ? यह बड़ी ही सोची समझी रणनीति के तहत हो रहा है ! राज ठाकरे, महारोगी केजरीवाल और त्रिवेदी यह एक ही कड़ी है ?

आये दिन समता के तत्व पर, संविधानिक अधिकारों पर, आरक्षण पर सवाल खड़े किये जा रहे है ! तत्कालीन कायदे कानून ब्रिटिशकाल के है ऐसी बेतुकी दलीले देकर समाज को भड़काया जा रहा है ! समाज की सुरक्षा खतरे में है ! समाज में अंतर्गत युद्ध के परिस्थितिया पैदा की जा रही है ! समाज की शांतता और सुव्यवस्था को ख़त्म किया जा रहा है ! और जब भी इनपर क़ानूनी कार्यवाही हो तो दंगे फसाद कराकर देश के अन्य नागरिको के जान. माल और सुरक्षा को खतरे में डाला जा रहा है !

इन सब गतिविधियों को रोका जाना जरुरी है ! जिसके लिए ----\
१) केजरीवाल, राज ठाकरे और त्रिवेदी जैसे अन्य लोगो पर देशद्रोह के खटले लगाकर फांसी पे चढ़ाना चाहिए !
२) संविधान, कानून अन्य प्रतिको को बदनाम करने वाले किसी भी व्यक्ति के ऊपर सक्त से सक्त कार्यवाही की जानी चाहिए !
३) अगर सरकार ऐसे लोगो की गतिविधियों पर रोक नहीं लगा सकती तो यह स्पष्ट है की सरकार भी इन सब घटनाओमे शामिल है और जनता को धोका दे रही है !
४) सरकार ने ऐसे लोगो पर सक्त कदम उठाते वक्त थोड़ी भी कसर नहीं छोड़नी चाहिए !
५) इन जैसे देशद्रोहियों के कारन देश में सामाजिक संघर्ष की नीव रखी जा रही है ! जिसके काफी अमानवीय परिणाम समाज को भुगतना पड़ सकता है ! इसलिए इन्हें जल्द से जल्द रोका जाना चाहिए !

भाइयो हम इस देश के नागरिक है ! हमारा दायित्व भी कुछ बनता है की आज इन जैसे देशद्रोहियोंकी असली पहचान समाज के सामने लाये ! इन जैसे लोगो को रोके ! इन जैसे लोगो के हौसले हमारी चुप्पी के कारन बुलंद होते जा रहे है ! इन्हें रोकना हमें जरुरी है ! वरना यह लोग फिर एक बार हमारे स्वतंत्र देश पर जातिगत-धार्मिक गुलामी लादना चाहते है ! हमें इसे रोकना होगा ! अपने साथ साथ हम जिस समाज में रहते है उस समाज की भी सुरक्षा इन जैसे दरिन्दगो से करनी होगी ! देश की सुरक्षा करनी होगी ! अरविन्द केजरीवाल, राज ठाकरे और असीम त्रिवेदी जैसे लोगो के मुंह पर कालित पोतनी होगी ! उन्हें समाज से बेदखल कर देशद्रोह के आरोपों में और समाज की सुरक्षा व्यवस्था को विचलित करने के आरोप में फांसी देने की मांग भी करनी होगी ! अब हमें हमारी चुप्पी तोड़नी होगी ! अब हमें हमारी नींद से जागकर देश को बचाने के लिए ऐसे दरिंदो को कुचलना होगा !

---जय भारत---जय भारत----जय भारत-----
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

निखील वागले या देशद्रोह्यालाच आधी फासावर लटकवा !


निखील वागले या देशद्रोह्यालाच आधी फासावर लटकवा !

निखील वागले हा या देशातील मिडिया च्या नावाखाली नवा देशद्रोही बनत चालला आहे...आणि देशद्रोही बनण्यासाठी विक्षिप्त डोक्याच्या लोकांना प्रोत्साहित करीत आहे...यालाच आधी रस्त्यावरच्या खांबाला लटकावून मारा...या देशद्रोह्यालाच आधी फासावर लटकवा !

खरे तर आज इथल्या मिडिया ने RSS आणि VHP कडून संविधानाची सुपारी घेतली आहे. इथल्या लोकशाहीला आणि प्रातिनिधिक संसदीय व्यवस्थेला हद्दपार करण्याचा विडा मिडिया ने उचललेला आहे. खरेतर आज निश्चितच इथल्या मिडिया लाच उद्ध्वस्थ करण्याची वेळ आली आहे. अन्यथा हा मिडिया या देशाला गुलामीत टाकल्याशिवाय राहणार नाही. इथला मिडिया इथल्या काही कट्टरपंथीय संस्था संघटनांना हाताशी घेऊन हुकुमशाही व्यवस्था आपल्या हातात घेऊन पाहत आहे....लवकर डोळे उघडा....लोकशाही प्रेमींनो जागे व्हा !...मिडीयाचा कुठील डाव हाणून पाडा.... 

मिडिया आता पूर्णपणे मनुवाद्यांच्या हातातील बहुला बनला आहे. याला वेळीच आवर घातले नाही तर देश धोक्यात येईल. जनतेची सुरक्षितता धोक्यात येईल.

हा मिडिया कौन चालवत आहे ? या मिडिया चे पोट कौन भरत आहे ? आमच्याच पैशावर हा मिडिया पोसला जात आहे. कुठल्या मिडिया ला आम्ही सोडायचे ? आणि नवीन मिडिया काढायचा ? अरे ज्या मिडिया ला आम्ही पोसत आहोत तो मिडिया आमचे खातो आणि मनुवाद्यांचे काम करतो.  या मिडियाचे मुसके बांधल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आमचा स्वतःचा स्वतंत्र मिडिया काढू तेव्हा काढू पण आधी या मीडियाची मालकी घेऊन बसलेल्या देशद्रोही हरामखोरांची डोके ठेचल्याशिवाय राहणार नाही. 

Saturday, 1 September 2012

उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे.


उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे.

आंबेडकरी चळवळीला समजून घेतांना आमची काहीतरी गल्लत होत आहे. आणि आजपर्यंत ती झाली आहे. त्यामुळे या चळवळीला निश्चित असा मार्ग पकडता आला नाही. किंवा त्या मार्गावर संचलित होता आले नाही. राजकारण हेच अंतिम ध्येय गृहीत पकडून आम्ही मार्गक्रमण करू शकत नाही. आणि तसा उद्देश घेऊन आम्ही चळवळीला मार्गक्रमित केले तर समाज विनाकारण भरडला जातो. हे आतापर्यंतच्या वाटचालीवरून अनुभवायला आले आहे. आंबेडकरी चळवळीचे अंतिम ध्येय हे सत्ता होऊच शकत नाही. शिवाय ज्या तत्वज्ञानावर ही चळवळ उभी आहे त्या तत्वज्ञानाचा सत्तेशी तिळमात्र संबंध येत नाही. जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीला राजकारणाच्या ध्येय आणि उद्धीष्ठात गोवल्या गेले तेव्हा तेव्हा समाजात दुफळी माजली. फाटाफूट घडून आली. आपल्याच समाजबांधवांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले. अगदी पराकोटीच्या टोकाला जाण्याइतपत...

बहिष्कृत समाजाचा प्रश्न हा सामाजिक आहे तितकाच तो मानव्यिक आहे. आर्थिकता हे त्याच्या पायथ्याशी असले तेरी समाजातला उच्चनीच भाव या समाजाला छळतो आहे. त्यामुळे सामाजिक ध्येय घेऊन मानवी कल्याणासाठी लढा उभारणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. हे आंबेडकरी चळवळीचे सूत्र आम्ही अंगीकारणे कधीही लाभदायकच ठरेल. कायद्याने मिळेल तेवढे घेऊन समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ता असो अथवा नसो कल्याणकारी जगणे हेच आमचे मुलभूत अधिकार आहे. आणि तशी परिस्थिती निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आज भारतीय समाजात प्रत्येकच समाजाजवळ सत्ता आहे. असे कुणीही व्यवस्थावादी माणूस म्हणू शकणार नाही. सत्ता आणि व्यवस्थेचा अभ्यास करणारे अभ्यासकही आमच्या मताशी सहमती दर्शवतील. व्यवस्थेतील "सह्भागीत्व" आणि "सत्ता" या दोहोंत मोठी तफावत आहे. सहभागीत्वाची संकल्पना ही लोकशाहीला बळकटी प्रदान करते. तर "सत्ता" ही संकल्पना हुकुमशाहीला, अराजकतेला आमंत्रण देते. आंबेडकरी समूहाने आतातरी याचा नीट विचार करणे आत्यंतिक गरजेचे आहे.

आज ज्या समस्यांना आंबेडकरी समूहाला सामोरे जावे लागत आहे. त्या समस्या इतर समाजाला भेडसावतांना दिसत नाही. कारण इतर समाजाने व्यवस्थेतील सहभागीत्वाला महत्व दिले. आणि तत्कालीन आंबेडकरवादी (मुळात आंबेडकरी नसलेले) नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाची स्वप्ने बघितली. त्याला बळी पडून काही आंबेडकरी नेत्यांनीसुद्धा मंत्रिपद आणि तत्सम खुर्चीचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्या या कृतीने समाजाची व चळवळीची वाताहत होत आहे. हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. १९८० च्या दशकानंतर मानवी कल्याणासाठी लढणारी आंबेडकरी चळवळ "सत्ता" संकल्पनेभोवतीच मर्यादित झाली. आंबेडकरी चळवळीने आपला मोर्चा "सत्तेकडे" वळविल्याने समाज सर्वच पातळ्यांवर माघारू लागला. यावर सद्सदविवेक बुद्धीने चिंतन आणि मनन होणे आज गरजेचे आहे.

समाज एकसंघ राहील; नेते संघटीत राहीतील अश्या परिस्थितीत मानवी कल्याणाची निदान समाधानकारक पातळी गाठता आली तरी सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचता येईल. याचा विचारच कधी झाला नाही. सर्व गणिते व्यक्तिगत मान-सन्मान आणि सत्तेच्या लालसेनेच मांडल्या गेले. त्यामुळे सामाजिक समीकरणे कधी सोडवलीच गेली नाही. आज एक आशेचा किरण दिसतो आहे. निदान या "सत्तावादी" स्वप्नवलयातून काही उच्चशिक्षित तरुण बाहेर पडू लागली आहेत. आणि चळवळीच्या मुळाशी असणा-या तत्वज्ञानाच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या या आंबेडकरी नवतरुण पिढीने तरी आंबेडकरी चळवळीतील मानवी कल्याणाचे ध्येय उराशी बाळगून असले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या चळवळीच्या अंगांना बळकटी प्रदान करण्यासाठी काम केले पाहिजे. आणि तद्सोबतच अलीकडे आलेल्या धम्मातील प्रदूषणाला दूर करून बुद्ध तत्वज्ञानाला आंबेडकरी परिप्रेक्षातून पुर्नगठीत केले पाहिजे.

सत्ता ही तत्कालिक असते. ती कायम हातात राहील हे जगातल्या कुठल्याही समूहासाठी शक्य नाही. परंतु एकदा सत्ता हातून गेली की माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्तेच्या ऐश्वर्यासाठी नेते अश्लाघ्य, तत्वशून्य, स्वाभिमानशून्य तडजोडी करायला लागतात. आणि वेळप्रसंगी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात. पण मानवी कल्याण हे चिरंतन असते. समाजाच्या हिताचे असते. मानव्यिक विकासाला पूरक असते. या सर्व घटना घडामोडीचा अनुभव आंबेडकरी चळवळीने घेतला आहे. या सर्व अनुभव संपन्नतेच्या बळावरच आम्हाला सद्यकालीन आंबेडकरी चळवळीची आचारसंहिता बनवावी लागणार आहे. हे आम्ही करू शकलो तर उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे. आंबेडकरी चळवळीतील ध्येय आणि उद्धिष्टांची पूर्ती नव नेतृत्वाच्या बळावर होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही.

कल धरती और सूरज के बिच चाँद आया था !
पर काफिला कभी रुका नहीं !
आज न वो चाँद आएगा न अँधेरा तुम्हारे बिच में,
ये उस बाबासाहब जैसे विचारसूर्य का काफिला है !
जो अँधेरे को चीरकर रोशनी से कभी छुपा नहीं !

----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Friday, 31 August 2012

राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

आज सद्यकालीन स्थितीत आंबेडकरी समाजाचा प्रश्न राजकीय वाटत असला तरी तो पूर्णार्थाने खरा नाही. आम्ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर पिछाडलेले आहोत. हेच वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा आजचा प्रश्न हा सामाजिक आणि आर्थिक असाच आहे. अगदी तसाच जसा बाबासाहेबांच्या काळात होता. फरक इतकाच आहे की सामाजिक चटके तीव्र नसले तरी स्वरूप बदलून अर्थ-सामाजिक (Sociao - Economic) बनले आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या कायदेपुरक समतावादी व्यवस्थेने आम्हाला आमची ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत या समाजाला पाडून पुनश्च्य तीच पेशवाईच्या व्यवस्थेला प्राचारण केले जात आहे.

कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे इतिहासात मानवी गुलामीच्या अवस्थेला आर्थिकता कारणीभूत ठरली. अगदी हाच धागा अलीकडे मनुवादी विचारसरणीने पकडलेला आहे. समाजाचे आर्थिक खच्चीकरण करून सामाजिक गुलामगिरीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. आंबेडकरी समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे असे जर कुणी म्हणत असेल तर ते निव्वळ धाडसाचे होईल. अश्या लोकांना मला विचारावेसे वाटते की, फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिल्याप्रमाणे, "व्यक्तिगत उंची वाढली म्हणून समाजाची उंची वाढली हे म्हणणे धाडसाचे आहे तितकेच ते अप्रस्तुतही आहे. व्यक्तिगत उंची वाढली म्हणजे समाजाची उंची वाढत नाही. समाजाची उंची ही बहुसंख्यांकाच्या कल्याणाशी निगडीत असते. आणि एकदा का सामाजिक उंची गाठता आली की व्यक्तिगत उंची गाठायला वेळ लागत नाही." हे मांडायचे प्रयोजन इतकेच की, आजही समाज लाचार आहे. आजही समाज आर्थिक बाबतीत प्रस्थापितांवर निर्भर आहे. आणि ही निर्भरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि एकदा का निर्भरता वाढत गेली तर स्वाभिमान नावाचा मर्दानी बाणा कुठेतरी लुप्त होतांना दिसून येतो. भौतिक साधनांसाठी, नौकरीसाठी, परिवारासाठी इ. अनेक परिस्थितीत. आणि हे वास्तव आज समाजात अस्तित्वात असल्यामुळेच प्रतीक्रांतीवाद्यांनी आंबेडकरी समाजात शिरकाव करून दुफळी माजवलेली आहे. 

आज आम्ही राजकीय पातळीवर कितीही कमकुवत वाटत असलो तरी आम्ही समाजाची राजकीय उंची वाढविण्यात यशस्वी झालेलो आहोत. सत्ता असली काय आणि नसली काय परंतु सत्तेवरचे नियंत्रण आम्ही मिळविलेले आहे. भूमिहीनांचा सत्याग्रह असो, आणीबाणीच्या काळात घेतलेले निर्णय असो, स्वाभिमानाला धरून उभारलेले भावनिक आंदोलन असो, मंडळ कमिशन साठी पुकारलेला लढा असो की संविधानातील कल्याणकारी तत्वे टिकवून ठेवण्यासाठी विविध काळात निर्माण केलेला सामाजिक दबाव असो, आमच्या वाढलेल्या राजकीय उंचीचेच प्रतिक आहे. कुठलीही राजकीय समीकरणे आम्हाला वगळून मंडळी जात नाही यात आमचा राजकीय विजय आहे. असे आम्हाला वाटते. कुठलेही राजकीय निर्णय आम्हाला लक्षात घेतल्याशिवाय घेतले जात नाही. हे आमच्या राजकीय सजगतेचे प्रतिक आहे. 

प्रश्न हा आहे की, फक्त सत्ता आपल्याकडे नाही किंवा ती आपल्याकडे यावी म्हणून आम्ही आणखी किती दिवस समाजाचा स्वाभिमान गमावणार आहोत. कारण जगतांना सत्तेची वाट पाहता येत नाही. तर दैनंदिन जीवनातल्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांच्या शोधात बाहेर पडावेच लागते. आणि ज्या परिस्थितीत ही सर्व आर्थिक स्त्रोते प्रस्थापितांच्या हातात आहेत तोपर्यंत आम्ही दैनंदिन जीवनात स्वाभिमानाला धाब्यावर बसवूनच गरजापुर्तीचा प्रयत्न करणार आहोत. निदान याचा विचार तरी आधुनिक काळात आंबेडकरी समाजात / आंबेडकरी चळवळीत काम करणा-या लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. 

आज गरज आहे ती आर्थिक उत्पन्नाची स्तोते
समाजाच्या हातात देण्याची. निर्माण करण्याची. त्यासाठी प्रयत्न करण्याची. व्यक्तिगत आणि सामाजिक स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर या आर्थिक घटकांची नितांत गरज आहे. त्यामुळे आता आम्ही समाजाच्या आर्थिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाज स्वबळावर उभा राहू शकणार नाही. आणि जोपर्यंत समाज स्वबळावर उभा होत नाही तोपर्यंत व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक बलस्थान बळकट होणार नाहीत. हा समाज जगाच्या पातळीवरील अत्युच्च समाज आहे ज्या समाजाला बुद्ध धम्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे हे सर्व करायला आम्हाला फार काही वेळ द्यावा लागेल असे नाही. गरज आहे ती बुद्ध तत्वज्ञानातील मानव्यिक तत्वांना सामाजिक परिप्रेक्षात उतरविण्याची आणि अंगीकारण्याची. 

हे सर्व जर तात्त्विक आणि तार्कीतदृष्ट्या समजून घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण करायला लागलो तर निश्चितच आज आमची वाढलेली राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी चळवळीचे शिलेदार म्हणविना-यांनी सत्तेची अनेक प्रयोग करून बघितले आहेत. हाताळून बघितले आहेत. परंतु शेवटी व्यक्तिगत उंची गाठण्याच्या पलीकडे या सत्तावादी राजकारणाची मजल पोहचू शकली नाही. समाजाची उंची दिवसेंदिवस खुजी होत चालली आहे. नव्या आव्हानांना पेलण्यात आमची शक्ती इतकी खर्च होत आहे की आम्ही योग्य तो मार्गच पकडू शकलेलो नाही. त्यामुळे राजकारण की समाजकारण की अर्थकारण हे ठरविण्यातच गुरफटलो गेलो आहोत. ही कोंडी हा समाज जितक्या अल्पावधीत फोडून काढेल तितक्या लवकर या समाजाला आपले भविष्य सुकर करता येईल. आणि ही कोंडी आर्थिक संपन्नतेशिवाय फुटू शकणार नाही असे आमचे निर्भीड मत आहे. 
  
----डॉ. संदीप नंदेश्वर

Wednesday, 29 August 2012

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या

चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.

दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे. जो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. जो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. जो चळवळीपासून दूर जातो आहे. जो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या आहेत....

१)   विचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून  पाहणे.
२)   शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणे.
३)   आधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण घेणे व देणे. सोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे.
४)   भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणे. शासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे.
५)   वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणे.
६)   धम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे.

निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला प्राथमिक स्तरावर करता  आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.

-------टीप-----------------------ही सविस्तर मांडणी किंवा अंतिम मांडणी नाही हे लक्षात घ्यावे.------------------
---डॉ. संदीप नंदेश्वर.    

बाबासाहेब संविधान अमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते.

बाबासाहेब संविधान अमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते.

महावीर सांगलीकर हा बाळबोध भट आजकाल भारतीय संविधान आणि बाबासाहेबांच्या योगदानावर बरळतो आहे...त्याला उत्तर द्यावे इतकी त्याची लायकी नाही... पण आज संविधानाच्या संबंधाने काही प्रश्न उपस्थित होतात म्हणून संविधानाविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर व्हायला हवा....

भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यापासून सुरु झाली आहे.  आणि शेवट हा २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेच्या संविधान स्वीकारापर्यंत ती चालली आहे. या मध्यंतरीच्या काळात १९१९ चा montague - Chemsford  सुधारणा कायदा महत्वाचा आहे. ज्या कायद्याने भारतीयांना मर्यादित राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य बहाल केले. हा १९१९ चा कायदा बनण्याआधी साउथबुरो कमिशन १९१८ समोर डॉ. बाबासाहेबांनी निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या १९१९ च्या montague - Chemsford  सुधारणा कायदात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. बाबासाहेब वगळता तिथे या देशातील कुठल्याही अन्य व्यक्ती वा संघटनांचा समावेश का झाला नाही. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच या देशाच्या स्वातंत्र्याची आणि या देशातल्या जनतेच्या हिताची काळजी होती हेच दिसून येते.

त्यानंतर १९२७ ला सायमन कमिशन इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात आले. त्या कमिशन ला महात्मा गांधीच्या नेतृत्वातील कॉंग्रेस ने विरोध केला. आणि Go Back सायमन चा नारा लावला. कॉंग्रेस ने कुठलेही सहकार्य या कमिशन ला केले नाही. परंतु बाबासाहेबांनी या कमिशन ला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सदर केले. त्या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे यासोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधीमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले होते. तेव्हा कॉंग्रेस काय; गांधी काय; तर या देशातले इतर अन्य महा-(पुरुष), संस्था-संघटना निष्काम कर्मयोगाच्या समाधी अवस्थेत बसल्या होत्या.

१९२७ च्या सायमन कमिशन ने केलेल्या शिफारशीनुसारच इंग्रज संसदेने गोलमेज परिषद बोलावली. त्यात प्रामुख्याने बाबासाहेबांना पुनःच्या आमंत्रित करण्यात आले. या पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीप्रणीत कॉंग्रेस ने बहिष्कार घातला. परंतु बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत हजेरी देत इंग्रज सरकारला या देशाला कश्याप्रकारच्या कायद्याची गरज आहे. हे पटवून दिले. भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधीमंडळांची रचना कशी असावी हे सुद्धा पटवून दिले. हे गांधी आणि कॉंग्रेस ला माहित झाल्याने गांधी व कॉंग्रेस चे महत्व टिकून राहावे म्हणून गांधी दुस-या गोलमेज परिषदेला हजार झाले. तिथेही गांधी आणि बाबासाहेब यांच्यात भारतीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यक असणा-या तरतुदी संबंधाने मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली. शेवटी गोलमेज परिषदेने बाबासाहेबांच्या बाजूने ठराव घेतला. गांधींना त्यात सपशेल अपयश पचवावे लागले आणि बाबासाहेबांपुढे घुताने टेकावे लागले. (कृपया पुणे कराराच्या संबधाचा जो विषय आहे त्यावर मी बोलत नाही. तो विषय वगळता अन्य ठरावावर मी बोलत आहे) याच गोलमेज परिषदेने घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आणि त्याचेच रुपांतर पुढे १९३५ च्या कायद्यात झाले. म्हणजेच याही कायद्यात बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.

पुढे भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी त्यांनी विविध आयोगांना भारतात पाठविले. त्यातलेच पहिले १९४२ ला परत सायमन कमिशन भारतात आले. तेव्हाही गांधीप्रणीत कॉंग्रेस ने त्याला विरोध केला. परंतु बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. आपल्या मागण्यांचे निवेदन देत राहिले. त्यानंतर पुन्हा संविधान निर्मितीच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठी क्रिप्स मिशन (त्रीमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध) भारतात आले. तेव्हा थोडीशी कॉंग्रेस ची भूमिका मवाळ झाली होती. कारण प्रत्येक वेळेस बाबासाहेब आपल्या मागण्या इंग्रजांकडून मान्य करवून घेत होते. परत १९४६ ला माउंटबेटन च्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. जो संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. कॉंग्रेस किंवा गांधी किंवा अन्य कुणापेक्षा पेक्षा जास्त योगदान संविधान निर्मितीच्या पूर्वइतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राहिलेले आहे.

माउंटबेटन ने दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरु झाल्या. बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले. (तेव्हाही कॉंग्रेस ने बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. कारण पूर्वइतिहास त्यांना माहित असल्याने...कॉंग्रेस चे काहीही चालले नसते म्हणून) ९ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेची पहिली बैठक बोलाविण्यात आली. आणि भारतीय संविधानाचे प्रारूप कसे असावे यावर दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत प्रत्येकच सदस्याला मते मांडण्याची संधी देण्यात आली. बाबासाहेबांना आपली मते मांडण्यासाठी वाट पहावी लागत होती.

अखेर १७ डिसेंबर १९४६ ला बाबासाहेबांना संविधान सभेसमोर संविधानाच्या प्रारुपावर मत मांडण्यासाठी अचानक आमंत्रित करण्यात आले. (अचानक यासाठी कि अनेक सदस्य बाकी असल्याने बाबासाहेबांना याची कल्पनाच नव्हती कि त्यांना या दिवशी आपली मते मांडवी लागतील म्हणून...) बाबासाहेबांनी सुरवातीलाच याचा उल्लेख केला कि "माझा नंबर आज लागेल याची मला कल्पना नव्हती. तशी पूर्वसूचना मला मिळाली असती तर मी पूर्वतयारीनिशी माझे मत मांडले असते. पण तरीही मी माझे मत मांडणार आहे..." बाबासाहेबांचे ते संविधान सभेतील पहिले भाषण सुरु झाले. संपूर्ण सभागृह अवाक होऊन अतिशय एकाग्रचित्त झाले होते.

बाबासाहेब एकावर एक मुद्दे आपल्या बुद्धिचातुर्याने संविधान सभेसमोर मांडत होते. सभागृहातील एकही सदस्य त्या बाबासाहेबाच्या भाषणाच्या वेळी उठला नाही कि जागचा हलला सुद्धा नाही. बाबासाहेबांच्या मुखातून जणू काही भविष्याचे संविधानाच बाहेर पडत होते. ज्यात संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची एक आचारसंहिताच लिहिली जात होती. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृह टाळ्यांच्या गळगळाटांने निनादून उठले. संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मानच झुकविली. बाबासाहेबांचे विरोधकही त्या भाषणाने इतके प्रभावी झाले कि त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्दही फुटत नव्हते.

अश्यातच भारत आणि पाकिस्थानाची फाळणी होण्याचे संकेत होते. ती झाली. बाबासाहेबांचा मतदार संघ पाकिस्तानात गेला. त्यामुळे संविधान सभेतील त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते. अश्या परिस्थितीत बाबासाहेबांचे समर्थक आणि संविधान सभेतील अन्य सभासद ज्यांनी बाबासाहेबांचे १३ डिसेंबर १९४६ चे भाषण ऐकले होते त्यांचा कॉंग्रेस वर दबाव निर्माण झाला. कॉंगेस ला पण बाबासाहेबांना संविधान सभेतील कामकाजापासून अलिप्त ठेवता येत नव्हते. कारण इतकी प्रचंड विद्वत्ता आणि कल्याणाचा जाहीरनामा संपूर्ण कॉंग्रेस मध्ये कुणाकडेही नव्हते. भारताचे संविधान बाबासाहेबंशिवाय बनणे अशक्यप्राय होते हे कॉंग्रेस चांगल्याने जाणून होती. म्हणून शेवटी बी जी खेरांना पत्र लिहून जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व अन्य कारणाने रद्द करण्यात आले. आणि त्या टिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले. कॉंग्रेस, संविधान सभा, भारत देश या सर्वांचीच ती गरज होती. बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाने सर्वांच्याच हिताचे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते. 

संविधान निर्मितीचा हा पूर्ण इतिहास आपण लक्षात घेतला तर बाबासाहेब संविधान अमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते. परंतु काही बांडगुळे ठराविक अंतराने बाबासाहेब आणी भारतीय संविधानावर चिखलफेक करतात. ती मोडून काढण्यासाठी हा इतिहास आम्ही लक्षात घेतला पाहिजे. या देशात संविधान किती माणसांपर्यंत पोहचला आहे ? हे पाहायचे असेल तर अलीकडच्या काळात अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येत आहेत. इथली माणसे INDIAN PINAL CODE, HINDU LAW, COMPANY LAW, FAMILY LAW, CONTRACT LAW etc. अश्या अनेक कायद्यांची भेसळ भारतीय संविधानाशी करतात. उदा. "कसाबला लवकर फाशी होत नाही कारण संविधान जबाबदार आहे." "भ्रष्टाचार्यांना रोकता येत नाही. कारण संविधान जबाबदार आहे." सर्व प्रश्नांसाठी वेगळे कायदे असतांना ही बाळबोध माणसे सरसकट भारतीय संविधानाला आणि बाबासाहेबांना जबाबदार ठरवितात. हे किती हास्यास्पद आहे. आणि या देशातल्या अश्या बाळबोध माणसांमध्ये किती संविधानिक जागृती झाली आहे हे आपल्या लक्षात येईल.

बाबासाहेब आणि भारतीय संविधान यावर बोटे ठेवून उलटसुलट इतिहास मांडणा-या, वाचना-या, लिहिणा-या, सांगणा-या बाल्बोधांनी हा इतिहास वाचवा आणि नंतरच चर्चा करावी.
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१  

Thursday, 23 August 2012

विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती


विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५


अलीकडे जीवन हरवून बसलेल्या माणसांचा लोंढा अध्यात्माच्या पायथ्याशी शरण जाऊ लागला आहे. माणूसपण मिळविण्यासाठी धडपडणारी माणसे जीवनाच्या चक्रव्युहात माणूसपण हरवून बसतात. भौतिक सुखाच्या अमानवीय तृप्तीसाठी चाललेली स्पर्धा जीवनात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करते. जगण्याचा अर्थच समजून घेता न आल्याने सामाजिक जीवनातून अलिप्ततेची भावना बळावत जाते. मग मानवी प्रवास देव, आत्मा, परमात्मा यांच्या दिशेने मार्गक्रमित होऊन अध्यात्माच्या मानसिकतेला शरण जातो. आणि इथूनच मानवी जीवनाच्या अपरिमित -हासाला सुरवात होते.

मानवी उत्क्रांतीचा काळ हा संघर्षाचा होता. विकसनशील माणूस संघर्षातून घडला. अमानवियतेविरुद्धच्या क्रांत्या संघर्ष्यातूनच झाल्या. मानवतावादाची उत्क्रांतीही संघर्षातून झाली. आज मानवी जीवनाला माणूस नावाची ओळख प्राप्त होण्यात या संपूर्ण संघर्षकाळाचा मोठा वाटा राहिलेला आहे. संघर्षाने केलेली क्रांती ही संघर्षातून उलथवून लावता येत नाही. म्हणून आजपर्यंतच्या इतिहासात ज्या काही प्रतीक्रांत्या झाल्या त्या मानवाच्या मानसिकतेवर हल्ला करून, त्यांच्या भावनिक मानसिकतेची शिकार करून झालेल्या आहेत. क्रांती-प्रतीक्रांतीचा हा  संपूर्ण इतिहास संघर्ष विरुद्ध मानसिक हल्ला असाच राहिलेला आहे. 

इ.स.पूर्व ४ थ्या शतकात मानसिक स्वातंत्र्य गमावलेल्या माणसाला मानसिक गुलामीतून तथागत बुद्धांनी बाहेर काढले. अष्टांगिक मार्गाच्या रूपाने जगण्याचा मार्ग बहाल केला. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी पंचशील प्रदान केले. आणि सामाजिक अस्तित्व टिकविण्यासाठी त्रिशरण प्रचलित केले. जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी १० पारमिता घालून दिल्या. वैदिकांनी मानवी समाजावर घालून दिलेल्या चिरेबंद मानसिक गुलामीच्या कळ्या बुद्धांच्या या सिद्धांतांनी मोकळ्या होऊ लागल्या.  प्रत्युत्तसमुत्पाताच्या सिद्धांताने व्यवहारातील कार्यकारण भाव चिंतन आणि मननाच्या पातळीवर आणून मानवी समाजावरील बौद्धिक झापडबंद कवाडे मोकळी केली. मानवी विज्ञानाला प्रस्थापित केले. अदृश्य शक्तीची चिरेबंदी मानवी व्यवहारवादी तत्वज्ञानातून मोडकळीस आणली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची रुजवण समाजात केली. कर्मकांड, आत्मा, पुर्नजन्म मोडीत काढून ख-या मानवी विकासाचा पाया रचला. जो आजतागायत जगाला मार्गदर्शक आहे.

बुद्धाची ही क्रांती वैदिकांची व्यवस्था मोडीत काढणारी असल्याने तथागतांच्या महापरीनिर्वानानंतर बुद्ध तत्वज्ञानाला प्रदूषित करण्यासाठी वैदिकांनी आपली विषारी पाऊले पसरायला सुरवात केली. इ.स. ४ थ्या शतकात म्हणजे बुद्धाच्या महापरीनिर्वानानंतर जवळपास ८०० वर्षांनी बुद्ध तत्वज्ञानाची मांडणी लिखित स्वरुपात होऊ लागली. तोपर्यंत बरीच सरमिसळ बुद्ध तत्वज्ञानामध्ये झालेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथातून हे स्पष्ट होते. वैदिकांनी केलेल्या घुसखोरीला मोडीत काढून बुद्धाच्या सामाजिक संदेशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्ध स्वरुपात जगासमोर आणले. विखुरलेल्या आणि प्रदूषित झालेल्या बुद्धाच्या तत्वज्ञानाला शुद्ध स्वरुपात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविता यावे म्हणून २२ प्रतिज्ञा दिल्या. २२ प्रतिज्ञा या दुसरे तिसरे काहीही नसून बुद्ध तत्वज्ञानाचे अगदी सोपे व संक्षिप्त रूप आहे. ज्यामुळे हजारो वर्षे वैदिकांच्या वंशावळीने लादलेली गुलामी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेबांच्या धम्मचक्रप्रवर्तन क्रांतीने मोडीत काढली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केलेल्या धम्मचक्र क्रांतीला त्यांच्या महापरीनिर्वानानंतर पुन्हा मानसिक हल्ल्यातून प्रतीक्रांतीवाद्यांनी रोखून धरले. आज तर बुद्ध आणि आंबेडकरी तत्वज्ञानाला विपश्यना आणि समाधीच्या काटेरी कुंपणात गुंफून नष्ट करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञानाने प्रेरित झालेल्या माणसांना मानसिक गुलाम केले जात आहे. विपश्यना आणि समाधी बुद्धाच्या नावावर खपवून काही मानसिक रोगी समाजाला पंगु बनवू पाहत आहेत. वैदिकांनी बुद्ध धम्मात सोडलेले काही बहुरूपी बुद्ध-आंबेडकरी समाजाला चार भिंतीच्या आत बंधिस्त करीत आहेत. डोळे बंद करवून, समाधिस्त बसवून बुद्ध-आंबेडकरांच्या क्रांतीला थंड करीत आहेत. प्रतीक्रांतीची ही मानसिक विषारी पाऊले किती भयंकर सामाजिक गुलामगिरीला आमंत्रण देत आहेत. हे पाहणे आधुनिक समाजाला क्रमप्राप्त आहे.

आज बुद्ध तत्वज्ञान हे आंबेडकरी चष्म्यातूनच बघितले गेले पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘आधुनिक बुद्ध’ आहेत. इतकेच नाही तर ते ‘महाबुद्ध’ आहेत. परंतु समाजाने बुद्ध तत्वज्ञानाला बाबासाहेबांच्या चष्म्यातून बघू नये, म्हणून विपश्यना बुद्धांनी सांगितली आहे; समाधी बुद्ध तत्वज्ञानाचाच भाग आहे; अश्या प्रकारची पेरणी करून माणसांची मानसिकता दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण हयातीत कधीही समाधी वा विपश्यना केली नाही. उलट "बुद्ध आणी त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या पान. क्र. २२५ वर समाधी, विपश्यनेला नाकारून बुद्धाने सामाजिक संदेश दिला नाही का ? असा प्रश्न विचारून बुद्धाने सामाजिक संदेशालाच अधिक महत्व दिले आहे. असे उत्तरही दिले आहे. तसेच मिलिंद कॉलेज च्या भूमिपूजनाच्या वेळी, देहूरोड येथील बुद्ध मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी समाधिस्त बुद्धाला नाकारून उघड्या डोळ्यांचा आणि मार्गस्त बुद्ध प्रमाण मानला. रंगून येथील भाषणात तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे 'विपश्यना आणि समाधीमुळे भारतात बुद्ध तत्वज्ञान प्रदूषित झाले आहे' असे म्हटले.

मुळात बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, बुद्धांनी व्यक्तीसापेक्ष संदेशाला सामाजिक परीवेशामध्ये मांडलेले आहे. याचे कारणही तितकेच मानव्यिक आहे. कारण माणसाची खरी ओळख ही त्याला त्याच्या समाजातूनच प्राप्त होत असते. समाजाच्या बाहेर राहून माणसाचे अस्तित्व निर्माण होत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नांना व सामाजिक परिस्थितीला जुळवून घेतांना मानवी कार्यकारणभावाला बुद्धाने प्रमाण मानले. मानवी वर्तनापासून तर मानवी प्रगतीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते. जिच्या कार्यकारणभावातून व्यक्ती जीवन घडत जाते. विपश्यना आणी समाधीने याच कार्यकारणभावाला मोडीत काढून व्यक्तीला एकलकोंडे, स्वार्थी, सामाजिक प्रश्नांपासून दूर व सामाजिक परिस्थितीपासून अलिप्त बनविले जात आहे.

ज्या गोयंका गुरुजी ने विपश्यनेचे भूत भारतात पसरविले ते स्वतः २००७ च्या दीक्षाभूमी येथील भाषणात म्हणतात, "बुद्ध धर्मातील तत्वे अतिशय चांगली आहेत. ज्यामुळे बुद्ध धर्म जगात स्वीकारला गेला. परंतु ही सर्व तत्वे आमच्या वैदिक संस्कृतीतून घेतली गेली आहेत." आता या गोयकांच्या वक्तव्याला कश्याप्रकारे समजून घ्यायचे ? याचाच अर्थ असा होतो की विपश्यना / समाधी हे वैदिकांच्या संस्कृतीचे बांडगुळ आहे. आणि स्वतः गोयंका हे सुद्धा वैदिकच आहेत. एक वैदिक माणूस बुद्ध धम्म देशात कसा काय पसरवू शकणार आहे ? निदान याचा तरी विचार गोयंका गुरुजीच्या पायाशी लोळणा-यांनी करावा.

मुळात विपश्यना माणसाला आत्मिक समाधानासाठी एकाग्रचित्त व्हायला सांगते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर आत्मिक समाधान त्या माणसाला हवे असते. ज्या व्यक्तीला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती झाली आहे. पण भौतिक सुख मिळविण्याच्या नादात त्याला गमवावे लागलेले स्वत्व आणि करावे लागलेले अमानवीय कृत्य, ज्याची अनुभूती सर्व भौतिक सुख मिळाले असतांनाही समाधानाची अंतिम पातळी गाठू शकत नाही. भ्रष्टाचारी, श्रीमंत, नौकरदार(अवैध मार्गाने भौतिक सुखाच्या मार्गाला लागलेले) आणि समाजाचा विसर पडून स्वतः च्या विश्वात जगणा-या माणसांनाच विपश्यना किंवा समाधी मानसिक समाधान प्राप्त करून देऊ शकते. पण याने नैतिक समाजाची निर्मिती होणार आहे का ? याउलट जी माणसे समाजात वावरतात; जी समाजाच्या परिस्थितीशी समरस असतात; जी सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सदैव अग्रेसर असतात; अश्या माणसांना त्यांचे कर्तुत्व अंतिम आत्मिक समाधान मिळवून देत असते. अश्या माणसांना कधीच विपश्यना वा समाधी करण्याची गरज भासत नाही.  बुद्ध तत्वज्ञानातील नैतिक समाजाच्या निर्मितीची मांडणी यावरच केली गेली आहे.  

धम्म फक्त मानसिक समाधान देतो. आणि त्यामुळे धम्माकडे आकृष्ट झाले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे म्हणणे असेल तर मला वाटते की ती नाण्याची एकच बाजू होईल. ती पण अपूर्ण. धम्म जगणे शिकवितो. धम्म वागणे शिकवितो. धम्म माणसाला माणसाची ओळख देतो. धम्म भटकलेल्यांना मार्ग देतो. धम्म व्यक्तिमत्व बहाल करतो. धम्म विकासाला चालना देतो. मानवी जीवनातील यशापर्यंत धम्म घेऊन जातो. आणि जेव्हा धम्मामुळे हे सर्व मिळते तेव्हा भौतिक सुखाची अपेक्षा मानवी जीवनात राहत नाही. आवश्यक त्या सर्वच गरजांची पूर्तता मानवी यशाच्या परिभाषेत सामावलेली असते. त्यामुळे धम्माला फक्त मानसिक समाधानापुरते बंधिस्त करता येणार नाही. आणि तसा दृष्टीकोन पण धम्मासाठी घातक आहे. जगतांना भेडसावणा-या सर्व सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, जातीय, शैक्षणिक, राजकीय प्रश्नाची सोडवणूक धम्मात आहे. असे मला वाटते. आणि हे सर्व विपश्यना किंवा समाधीतून होऊ शकत नाही.

डोळे बंद करून एकाग्रचित्त होणे, आत्मिक विहार करणे, श्वासावर नियंत्रण ठेवणे, शारीरिक गरजांना (लोभ, माया) विसरणे हे कुठल्या माणसांची लक्षणे आहेत ? जी माणसे समाजासाठी झटतात; जी समाजासाठी जगतात ती या सर्वच पातळ्यांच्या फार उंच पातळीवर पोहोचलेली असतात. एकंदरीत बुद्धाचा संदेशही मानवाला सामाजिक बनविणे आहे. प्रज्ञा, मैत्री, दान इ. माध्यमातून समाजासाठी धावून जाण्याची प्रवृत्ती बुद्ध निर्माण करतात. ज्यामुळे बुद्धांनी विपश्यना वा समाधीसारख्या साधनांना नाकारून "चरक भिकव्वे चारीकम, बहुजन हिताय, बहुजन सुखाय" चा संदेश दिला. तो कुठल्याच विपश्यनेमध्ये किंवा समाधीच्या अवस्थेत बसत नाही.

मुळात बुद्ध स्वीकारत असतांना आम्ही कुठला बुद्ध स्वीकारतो हेसुद्धा जास्त महत्वाचे आहे. सुजाताने दिलेली खीर बुद्धांनी प्राशन केल्यानंतर मार्गस्त झालेले बुद्ध स्वीकारायचे ? की, गृहराज्य त्याग केल्यानंतर सप्तऋषींच्या आश्रमात अघोरी विद्याग्रहण करूनही सत्याची ओळख न पटलेले बुद्ध स्वीकारायचे ? सप्तऋषींच्या आश्रमात बुद्धांनी विपश्यना / समाधी केली. परंतु सत्याचा मार्ग सापडला नाही. अश्याच ध्यानस्त मुद्रेत शरीराला क्लेश देऊन समाधी करीत बुद्ध बसले असतांना सुजाता ने त्यांना खीर दिली. ती खीर प्राशन करून बुद्धांच्या शरीरात चैतन्य संचारले. तेव्हा त्यांना प्रचीती झाली की, मी आतापर्यंत शरीराला क्लेश देऊन केलेली साधना व्यर्थ होती. त्यातून मला कुठलेही ज्ञान प्राप्त होऊ शकले नाही. म्हणून ती खीर प्राशन केल्यानंतर ते सामाजिक समूहाच्या (गावाच्या) दिशेने मार्गस्त होतात. आणी त्यानंतर समाजाच्या सानिध्यात राहून चिंतन आणि मननाने सामाजिक दुःखाकडे बघतात. तेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती होते. खरे बुद्ध हे सुजाताने दिलेली खीर प्राशन केल्यानंतर सापडतात. निदान याचा तात्त्विक आणि सैद्धांतिक विचार तरी विपश्यना आणि समाधी करणा-यांनी किंवा त्याचा पुरस्कार करणा-यांनी करावा.

आज माणसांना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांनी वेढलेले आहे. क्षणाक्षणाला व्यवस्थेविरुद्ध मानवी स्वातंत्र्यासाठी लढावे लागते. इतकेच काय तर बौद्धिक स्वातंत्र्यासाठीही लढावे लागते. याचे उत्तर विपश्यना किंवा समाधीत नसून उघड्या डोळ्याने घडणा-या घटनांची चिकित्सक मांडणी करून बुद्धाच्या प्रत्युत्तसमुद्त्पाताच्या सिद्धांतात आहे. विपश्यना किंवा समाधी संघर्षाची उर्मी संपविते. आज व्यवस्था कुठल्याच परिस्थितीत वंचित समूहाच्या हिताची नाही. अश्यापरिस्थितीत व्यवस्थेशी दोन हात करूनच आपले हक्क व अधिकार मिळवावे लागत असतील, तर ते विपश्यनेच्या डोळे बंद अवस्थेतून मिळविता येतील का ? मानवी न्यायाची मुहूर्तमेढ व्यवस्थेच्या माध्यमातून करायची असेल, तर माणूस सतत बाह्य वातावरणाशी संघर्षरत राहणे गरजेचे आहे. परंतु तो संघर्षरत राहू नये यासाठीच विपश्यनेचे भूत समाजात पेरले जात आहे. ज्यामुळे आज ज्यांच्या हातात व्यवस्था आहे; ती त्यांच्याच हातात राहील. आणि क्रांती करणारा समाज पुन्हा मानसिक गुलामीत लोटला जाईल. क्रांतीला प्रेरणा देणारे बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञान प्रदूषित होईल. आणि त्यामुळे क्रांतीला जळामुळापासून उपटून फेकता येईल. असे हे या विपश्य्यी वैदिकांचे षड्यंत्र आहे.

मानसशास्त्र सांगते की, माणूस जेव्हा समाधिस्त असतो तेव्हा तो त्याच्या आजूबाजूला घडणा-या घटना / घडामोडींपासून अलिप्त असतो. अश्या परिस्थितीत तो मोठ्या प्रमाणात बाह्य वातावरणापासून असुरक्षित असतो. बाह्य वातावरणाचा धोका समाधिस्त माणूस हाणून पाडू शकत नाही. मानवी जीविताला सर्वात अधिक धोका हा समाधिस्त अवस्थेतच जास्त असतो. शिवाय शारीरिक क्लेश आहेच. मानसशास्त्र हे सर्व व्यक्तीसाठी सांगते. 

तसेच मानव्यशास्त्राचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, जेव्हा जेव्हा समाज समाधी अवस्थेमध्ये होता; बाहेरच्या वातावरणापासून किंवा घडणाऱ्या घटना / घडामोडींपासून अलिप्त राहिला; तेव्हा तेव्हा समाज आपले स्वातंत्र्य गमावून बसला. आणि गुलामीच्या अवस्थेत लोटला गेला. वैदिकांनी इथे हजारो वर्षे गुलामी लादली आणि राज्य केले ते समाजाला अश्याच प्रकारे भ्रमिष्ट करून केलेले आहे. तीच अवस्था समाजावर या विपश्यनेच्या विषारी समाधी अवस्थेने आधुनिक काळात लादायचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे विपश्यनेची ही विषारी पाऊले समाजाने ओळखणे गरजेचे आहे. बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी कधीही विपश्यना सांगितलेली नाही. बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा संदेश हा व्यक्तीच्या सामाजिक अस्तिवाला प्राप्त करण्यासाठी होता. बाह्य सामाजिक वातावरणाच्या प्रभावाने निर्माण होणा-या सामाजिक गुण दोषांना संतुलित करून मानवी स्वातंत्र्य बहाल करणारी क्रांती बुद्ध आणि बाबासाहेबांनी केली आहे. परंतु आज सामाजिक प्रश्नांपासून, सामाजिक अन्यायापासून विचलित करण्यासाठी माणसांना विपश्यनेच्या दावणीला बांधले जात आहे. विपश्यनेचे हे वैदिक गाजर गवत आताच नष्ट केले नाही. तर प्राचीन काळातील गुलामगिरीची अवस्था समाजावर पुनश्च्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या परिस्थितीत माणसे मानसिक स्वातंत्र्य गमावून बसलेले असल्यामुळे गुलामीच्या विरुद्ध बंद करून उठणार नाहीत. डोळे बंद करून गुलामगिरीला आमंत्रण देण्यापेक्षा डोळे सताळ उघडे ठेऊन प्रतीक्रांतीला हाणून पाडा ! त्यातच तुमचा विजय आहे. बुद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीला क्रांतीचीच आज खरी गरज आहे.
ôôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५