Saturday, 14 July 2012

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 6



आता नजर खिळली असेल
डोळ्यात साठवून ठेवलेल्या
अंतर्मनातल्या तुफान लाटा
धाऊन येतील अंगावर
ओढतील तुला...
पुन्हा त्या भावनेच्या विस्तीर्ण जलाशयात
आडेवेडे घेऊ नकोस
झोकून दे स्वतःला
त्या सागरी लाटांच्या मधोमध असलेल्या माझ्या बाहुपाश्यात…
तू जवळ जाऊ नकोस
लाटाच तुला जवळ लोटतील
लाटांशी चालणा-या तुझ्या संघर्षात
तुझा हात घट्ट खिळला होता माझ्याभोवती 
हे पाहून तुझी नजर लाटांवर पडत होती
समुद्राचे पाणी डोळ्याने पीत होती
अलगद लाटांवर तरंगणारे माझे प्रतिबिंब न्याहाळत होती
तिकडे चौपाटीवर मात्र हुसेन
त्याच प्रतिबिंबावर रंग भरत होता
ते प्रतिबिंब आजही तरंगतांना दिसेल तुला
भिंतीवर तरंगणा-या त्याच प्रतिबिंबाना न्याहाळतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 5


सखे !
जरा सांभाळ स्वतःला
आठवणींना घेऊन समोरच्या प्रवासाला निघ !
प्रेमरूपी वादळापासून दूर होऊ नकोस.
भावनेच्या जहाजाचे होकायंत्र काढू नकोस.
आयुष्याच्या महासागरात दिशाहीन भटकू नकोस.
स्थिर हो, अधीर होऊ नकोस.
शांत हो, अस्थिर होऊ नकोस.
आता जरा विचार कर.
तुझ्या बंद डोळ्यांना उघड.
एक नजर...
दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगलेल्या
हुसेनचीत्राकडे बघ !
आठवते का काही ?
तू, मी, पाणी, सागर, खळखळणा-या लाटा
आणि चौपाटीवर बसलेला हुसेन...?
तुझ्या माझ्या सागर मिलनाचे चित्र रेखटत होता.
तेच ते चित्र आज पडद्याआड होईल.
त्या चित्राकडे नजर वळतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 4


प्रस्तावित दीर्घकाव्य (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) यातून...

आज तू अस्वस्थ असशील.
काम नसतांना कामाचा बहाणा करशील.
वेळ असतांना व्यस्ततेचे कारण सांगशील.
कारण तू व्यस्त आहेस माझ्या आठवणीत
उघडू पाहतेस माझ्या आठवणीतला एक एक पान
सखे माझी आठवणच तुला स्वस्थ बसू देत नाही.
काही केल्या तुझ्यापासून दूर होऊ देत नाही.
कुणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही.
कळतेय मला तुझ्या मनातली घालमेल
अचानक जीवनात आलेली हीच ती कातरवेळ
अगदी आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलावेसे वाटते
तुझ्या शब्द लहरींना झेलावेसे वाटते.
आठवून तेच शब्द हसावेसे वाटते
म्हणूनच तू...
मी नसल्याचा बहाणा करू नकोस
अलगद कपाटाला हात लाव
कपाट उघड !
समोर दिसणारी माझी डायरी तुला पाहून हसत असेल ना !
त्याच डायरीला पाहून...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
---डॉ. संदीप नंदेश्वर,नागपूर.

बघ तुला माझा आभास होतो का ? ---3


लवकरच प्रकाशित होणा-या (बघ तुला माझा आभास होतो का ?) या माझ्या दिर्घकाव्यातून...

थांब ! जरा जपून

रस्ता ओलांडतांना तू नेहमीच अडखळत होतीस.
दबक्या पावलांनी रस्ता अडवीत होतीस.
महाराणीच्या शृंगाराने पालवी फुलवीत होतीस.
आणि ओसाड रस्त्यावर बेमौसम बहराला उधान येते होते.
रस्त्याच्या मधोमध उभी राहून मला खुणावत होतीस.
तेव्हा ड्रायविंग सीटवरचा बेल्ट तुटून पडला होता.
आणि स्टेरिंग वरचा हात अलगद गियर वर चढला होता.
ब्रेंक च्या ऐवजी एक्सलेटर दाबला होता.
क्लच मात्र कधीचाच तुटून पडला होता.
इतक्या अपघातप्रवण रस्त्यावर... 
तुझ्या प्रीतीचा बहर मात्र उफानला होता.
तुझे माझे प्रेम जगाने अनुभवावे म्हणून
किती तरी अपघात घडवून आणले होते.
आजही तोच रस्ता तू ओलांडतांना...
सखे बघ ! तुला माझा आभास होतो का ?-
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. 

Friday, 13 July 2012

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 2

माझ्या प्रस्तावित (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) या महाकाव्यातून...साभार प्रक्षेपित...

रात्री तू बिछान्यावर...

आठवणींचा अल्बम घेऊन पडली होतीस.
सहवासाचा एक एक पान पलटत होतीस.
प्रेमाच्या आक्रंदनाने क्षण भारावले होते.
तू मात्र निपचित पडून
उघड्या डोळ्यांनी...
जीवनातील सहवासाचे चांदणे मोजीत होतीस.
तुझी काया शेजारचा स्पर्श शोधीत होती.
तेव्हा...
तुझ्या वेणीतील गजरा मात्र...
खुल्या केसांना सोडू पाहत नव्हता.
बिछान्यावर प्रेमाचा वर्षाव करू पाहत होता.
वारंवार खुणावत होता.
वारंवार डोकावत होता.
प्रेमरूपी सुगंधाची उधळण करू पाहत होता.
मधेच कुणाच्यातरी स्पर्शाने गदगदीत होऊ पाहत होता.
कुणाच्यातरी आठवणींचा सहारा शोधू पाहत होता.
अशातच...
तुझा हात शेजारच्या उशीचा सहारा घेतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
...डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

बघ ! तुला माझा आभास होतो का ? - 1

 
माझ्या प्रस्तावित (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) या महाकाव्यातील...अंश


तू ज्या रस्त्याने धावत आहेस

तो रस्ता तुला परिचयाचा असेल
रस्त्यावरच्या खाणा-खुणा अजूनही ताज्या असतील
सोबतीची वर्दड कायम असेल.
त्यामुळे ते क्षण पुन्हा जिवंत होतील.
तू चालशील, तू धावशील,
तू दमशील, तू थकशील
वाटेच्या बाजूला हात पकडशील
लगेच उत्साह अंगात भरेल
वा-याला मिठी मारण्यासाठी,
वेगळा कवेत घेण्यासाठी,
रस्त्याच्या कडेला विसावण्यासाठी...
नजर समोरच पडेल त्या हिरव्यागार गवतावर
बाजूच्या शिवारातील त्या हिरव्यागार गवतावर पडावेसे वाटेल.
बोलावेसे वाटेल, हसावेसे वाटेल,
खांद्यावर डोके ठेऊन जगावेसे वाटेल.
रस्त्यावरची गाडी बघून,
घट्ट मिठी मारून,
लॉंग ड्राईव्ह करावीशी वाटेल.
तू लगेच उठशील, पळत येशील त्या गाडीपाशी
त्या गाडीला बघून धावतांना...
सखे बघ ! तुला माझा आभास होतो का ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

बघ ! तुला माझा आभास होतो का ?

 
माझ्या प्रस्तावित (बघ ! तुला माझा आभास होतो का ?) या महाकाव्यातील...अंश
 

आठवते का तुला तुझे ते शब्द
गाडीवरच्या लॉंग ड्राईव्ह ची गोष्ट
घट्ट मिठी मारून तू म्हणाली...
.....
"चल आता वा-याशी स्पर्धा खेडुया
किना-यावरील सर्वांना प्रवाहात बांधूया
गाडीवरच्या एक्सलेटरला घट्ट आवरूया
तुझ्या माझ्या मस्तीने चंद्र लाजवूया
थंड श्वासाने वातावरणाचे उन्ह तापवूया
समुद्राच्या किनारी आपण दोघे झिम्मा खेडुया"
.....
चालला होता असाच तुझा माझा
वेगाच्या बेभान गोंगाटात तो लांबचा प्रवास
चहुबाजूने उभी होती नजरांची लांबच लांब रांग
बिनधास्त, बेहोश, मदमस्त आकाश
कुश्ती खेळत होता जमलेल्या परावर्तीत ढगांशी
वाट बघत होता तुझ्या आणि माझ्यावर वर्षावाची
पण अचानक...
लाजेने शरमला होता तोही...
तुझ्या त्या बिनधास्त वागण्याने घाबरला होता तोही...
ढग आजही मस्तीत गुंगले आहेत.
आकाशाच्या कुस्तीत रंगले आहेत.
वाट बघतात तुझ्या बहरण्याची, फुलण्याची
तू मात्र निराश तशीच उभी आहेस.
वाटेकडे डोळे लावून वाट बघत आहेस.
थेंबांच्या वर्षावाने ओली होत आहेस.
ओल्याचिंब आकाशात...
मृगजळाच्या ओलाव्याचा सुगंध दरवळतांना...
सखे बघ ! तुला माझा आभास होतो का ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

Monday, 9 July 2012

क्या सिर्फ शो में उत्पीडन के किस्से सुनाके जातिगत उत्पीडन कम होगा ?

 
क्या सिर्फ शो में उत्पीडन के किस्से सुनाके जातिगत उत्पीडन कम होगा ?

आम्बेडकरवादी समूह प्रतिक्रियावादी है ! यह आज सारी दुनिया जानती है ! क्यों न हो दुनिया में जो भी जुल्म और सामाजिक विडंबन का इतिहास है उसमे सबसे ज्यादा सामना इस समूह ने किया है ! कई वर्षो से चले आये इस जुल्म और सामाजिक विडंबन को बाबासाहब ने पैरोतले कुचलकर इस समूह को जीने की रह सिखाई है ! एक नए इतिहास के तरफ हमें ले गए है ! इसलिए यह समूह आज भी आँखों में अंगारे लेके हर पल पहरा देते रहता है ! वो अपनी अस्मिता की सुरक्षा खुद करना जानता है ! बाबासाहब की प्रेरणा उन्हें कभी स्वस्थ होने का मौका नहीं देती ! इतनी तकलीफों के साथ आज हमें कुछ मिल पाया है ! उसकी सुरक्षा करना हमारी नैतिक जिम्मेवारी है ! जिस जातीउत्पीडन के हम शिकार थे ! बाबासाहब ने उसे ख़त्म कर हमें मानवीयता की उंचाइयो तक पहुचाया है ! इसलिए उस ऊंचाईपर आप को देखकर जातिवादी ब्राम्हण परेशान होना लाजमी है ! जिसके चलते फिर एक बार "सत्यमेव जयते" इस रिअलिटी शो का सहारा लेकर वही जातिगत उत्पीडन को सामने लाया गया ! जिसका मुख्य उद्देश यह था की, उस ब्राम्हण पंडित को वहा बुलाकर उसके द्वारा इस देश को यह बताना की हम संविधान को नहीं बल्कि मनुस्मृति को मानते है ! इसलिए आज हम उस शो के ऊपर प्रतिक्रिया दे रहे है ! कहिपर इस शो में बाबासाहब का नाम नहीं लिया गया इसलिए ! तो कही पर भी बाबासाहब ने दिए हुए जतिनिर्मुलन के उपाय दोहराए नहीं जाने के कारन ! और यह प्रतिक्रियाये आना लाजमी भी है ! क्योंकि इस देश में एक ही महामानव हो के गया है जिसने इन सारी समस्यओंका सामना करते हुए इस जातिव्यवस्था को खत्म करके दलित उत्पीडन को खत्म करने के सुझाव दिए है !

पुरे शो के दरम्यान इस जातिगत उत्पीडन को दूर करने के लिए कोई सुझाव नहीं दिए गए ! किसी भी समस्या को जब हम उठाते है तो उसके साथ साथ उस समस्या को सुलझाने का प्रयास भी करते है ! वह दूर करने के लिए कुछ सुझाव भी देते है ! तबतक उस समस्या का हल नहीं निकल सकता ! पर कल के सत्यमेव जयते में सिर्फ समस्या का पाढा पढ़ा गया ! न की कोई उसपर उपाय बताया गया ! यही कल के "सत्यमेव जयते" का खास पहलू है !  और वह ऐसा नहीं करना चाहते ! क्योंकि अगर इस जातीउत्पीडन की समस्या को सुलझाने का कोई सुझाव या उपाय वो देते तो बाबासाहब के अलावा उनके सामने कोई दूसरा नाम नहीं आता था ! और फिर एक बार बाबासाहब लोगो के दिलो दिमाग में बस जाते थे ! शो के प्रोडूसर और उनके सभी साथी भी यही चाहते थे की गाँधी आया तो चलेगा पर कभी बाबासाहब गलती से भी उस शो में नहीं आने चाहिए !

कल शाम को इसी विषय को लेकर हमारी डॉ. यशवंत मनोहर, मा. एन. जी. काम्बले, प्रमोद वालके जी से काफी लम्बी और गहन चर्चा चली ! उस चर्चा में भी मैंने यही विषय रखा की इस शो का मतलब यह नहीं था की उन्हें जतिउन्मुलन करना है ! उनका मकसद यह था की, हिन्दू पंडितो के माध्यम से यहाँ के हिन्दू इस देश का संविधान नहीं बल्कि मनुस्मृति को मानते है यह हिन्दू लोगो के जहन में उतरना ! और वो इस मिशन में सफल भी हो गए ! क्योंकि इसी कड़ी को लेकर मै आप का ध्यान और एक तरफ खींचना चाहता हु की आज कल हिन्दू संघटनो के कुछ प्रमुख लोगो के माध्यम से हिन्दू पंतप्रधान होना चाहिए ऐसी चर्चा सुर्खियों में चल रही है ! कल का दि- ०८-०७-२०१२ का "सत्यमेव जयते" यह शो उसी कड़ी का हिस्सा है ! आज दि. ०९-०७-२०१२ के वर्तमान पत्रों में आया है की, विश्व हिन्दू संघटन के प्रवीन तोगड़िया ने भी कहा है की, "इस देश का पंतप्रधान हिन्दू ही होना चाहिए !" यही है सच्चाई !
हालाकि देश की जनता यह जानती है की जतिनिर्मुलन के लिए किसी ने काम किया है तो वह डॉ. बाबासाहब आम्बेडकर जी ही है ! पर इन्होने इसके लिए गांधीजी को सामने लाया ! लोगो के दिमाग में यह डालने के लिए की, "देखो हिन्दू धर्म में रहकर ही हिन्दू धर्म से जातिवाद को मिटने के लिए गाँधी ने क्या काम किया है !" इस विषय पर गाँधी को लाना साफ जाहिर करता है की जैसे गाँधी ने हिन्दू धर्म में ही रहकर जातीउत्पीडन को बड़े गोल मोल तरीकेसे घुमाया है ! उसी तरह उस शो में जिन लोगो पर जातीउत्पीडन हुआ है उन लोगो को बाबासाहब के साथ नहीं बल्कि गाँधी के साथ वे जोड़ना चाहते थे ! और यह शो कही भी एकतरफा न हो इसलिए कुछ शिख, मुस्लिम और ख्रिश्चन भाइयोंको को भी इन्होने उसमे शामिल कर दिया ! अब समाज में चर्चा तो चल रही है ! पर वह चर्चा हिन्दू, मनुस्मृति, और गाँधी के इर्दगिर्द घूम रही है ! हो गए वो अपने काम में सफल ! उनका तो यही मकसद था की इस समस्या को उठाकर इस विषय पर लोगो का ध्यान बटाना ! और इधर भाजपा, आर एस एस, विश्व हिन्दू परिषद् अपना हिन्दू प्रधानमंत्री का मुद्दा उठा ही रहे है !

भाइयो बड़ी गंभीरता से सोचना होगा ! विषय भलेही जातिवाद का हो, लेकिन उनका सही मकसद पहचानना होगा ! यहाँ का आम्बेडकरवादी समूह प्रतिक्रियाये जरुर देगा यह उन्हें मालूम था ! इसीलिए उन्होंने एक भी आम्बेडकरवादी समूह के इन्सान को वहा शो में नहीं बुलाया ! बल्कि जो लोग आम्बेडकरवादी नहीं है ! जो लोग आज भी हिन्दू दलित कह कर ही अपना गुजर बसर कर रहे है वही लोग वहा पर आये ! यह कहने के लिए की, "देखो भाई हम आपके ही लोग है ! हम हिन्दू ही है ! और हिन्दू ही रहना चाहते है ! सिर्फ हमें सताना बंद कर दो !" अरे भाई जब आपको मालूम है की आप के धर्म में ही आप को इस तरह के उत्पीडन का सामना करना पड़ रहा है ! फिर भी आपके लिए वही धर्म आज इतना प्रिय कैसे हुआ ? क्यों आज भी आप सिर्फ हिन्दू धर्म के पंतप्रधान की वकालत कर रहे हो ? बाबासाहब ने इसी उत्पीडन को ख़त्म करने के लिए मनुस्मृति का दहन किया था ! आप उसी मनुस्मृति को आज भी मानने की सलाह समाज को दे रहे हो ? यह कैसी निति है ?

क्या सिर्फ शो में उत्पीडन के किस्से सुनाके जातिगत उत्पीडन कम होगा ? क्या सिर्फ यह कहने से की आज की विज्ञान के युग में भी जातिगत उत्पीडन हो रहे है ! क्या लोगो को न्याय मिलेगा ? जबतक हम उस उत्पीडन को ख़त्म करने का साँझा सुझाव नहीं देते ! उसके लिए उपाय नहीं देते ! तबतक यह उत्पीडन की कहानिया ख़त्म नहीं हो सकती ! और जातिगत उत्पीडन को ख़त्म करने का एकमात्र उपाय सिर्फ और सिर्फ बाबासाहब को अपनाना है ! भारतीय संविधान को अपनाना है ! जाती और धर्म की पहचान मिटाकर "मै भारतीय हु" की पहचान बनाना है ! तबतक इस समस्या का कोई हल नहीं निकल सकता !

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.  

Friday, 6 July 2012

इथे भविष्यकाळात बुद्ध इतिहास घडेल का ?



इथे भविष्यकाळात बुद्ध इतिहास घडेल का ?

डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५
मानवी सभ्यतेच्या हजारो कपोलकल्पित घटना आमच्यावर बिंबविण्यात आल्या आहेत. विज्ञानवादी इतिहासाला झाकून पारलौकिक इतिहास मानवी मनावर लादण्यात आला आहे. त्यासाठी हेतुपुरस्सर कपोलकल्पित संस्कृतीच्या भिंती आमच्या अवती भवती उभारल्या गेल्या आहेत. हजारो वर्षाची मानवी मनावरची ही मरगळ काढून टाकणे इतके सहज शक्य नाही. कारण संस्कृती नावाची भिंत आजही आमच्यासमोर उभी आहे. ती लांघून पुढे पाऊल टाकणे म्हणजे स्वतःवर अरिष्ठ ओढवून घेणेच होईल. तरीही पारलौकिक संस्कृतीच्या या भिंतींना भेगा पाडून आम्हाला भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागणार आहे. आम्हाला आमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे असेल तर प्रस्थापित प्रवाहात मिसळून न जाता स्वतंत्र वाटचाल आमच्यासाठी कधीही लाभदायक ठरणारी आहे. तेव्हाच आम्ही नव्या इतिहासाची उभारणी करू शकू.
आज सभ्य व्यवस्थावादी संस्कृतीच्या गप्पा मारल्या जातात त्या पारलौकीकातून किंवा पाश्चिमात्यांकडून आलेल्या नसून बुद्ध काळातल्या सभ्य संस्कृतीतून आलेल्या आहेत. हा खरा इतिहास आज विज्ञानाच्या युगातही दडवून ठेवल्या जात आहे. कारण खोटा इतिहास प्रस्थापित करण्याची साधने आज त्यांच्या हातात आहेत. त्यामुळे हजारो वर्षांचा इतिहास यांनी काही दिवसातच निर्माण केला आहे. मग तो वाल्मिकी-व्यास मुनींनी लिहिलेल्या रामायण महाभारताचा असो की अलीकडच्या रामसेतू-बाबरी मस्जीतीचा इतिहास असो. विज्ञानाने विश्व निर्मितीच्या शोधात अणू रेणूंच्या एक पाऊल पुढे टाकले. मात्र यांच्या ब्रम्हांडाची निर्मिती स्वर्ग-नरकाच्या बाहुपाश्यातच अडकलेली आहे. कारण यांच्या ब्रम्हांड निर्मितीच्या भाकड कथा रोज सकाळी ग्रह नक्षत्राच्या रुपात घरोघरी पोहचत आहेत. यांच्या या ग्रह-नक्षत्रांनी विज्ञानवादी मानवी मेंदूला पूर्णतः जकळून टाकले आहे. पाप-पुण्याचे हे अघोरी चक्र जोपर्यंत मानवी समाजात फिरत आहेत. तोपर्यंत परिवर्तनाच्या प्रवाही नद्या हिमनद्यांसारख्या सतत गोठविल्या जाणार आहेत. 
क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या प्रवाही इतिहासात रूढीवाद्यांनी क्रांतीच्या इतिहासाला पुसून टाकण्याचा सतत प्रयत्न केला आहे. मानवी जीवनाचे विज्ञान मांडणा-या शास्त्रातही चुकीचे लिखाण करून यांनी स्वतःच्या कल्पित पात्रांना उभे केले आहे. समाजशास्त्र, राज्यशात्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र या सर्वच शास्त्रांमधून एका विशिष्ट जातीच्या पात्रांना उभे केले गेले आहे. मग तो कल्पित मनु आणि ब्राम्हण कौटिल्य पासून तर अलीकडच्या गोलवलकर-हेगडेवार ते अरुण शौरीपर्यंत. शाश्वत आणि अशाश्वत तत्वज्ञानाचे हे महायुद्ध सत्य आणि असत्याच्या प्रस्थापनेसाठी आजतागायत लढले जात आहे.
बुद्ध काळ मानवनिर्मितीनंतरच्या विकासातील अतिशय विकसित आणि आधुनिक काळाशी सुसंगती साधणारा काळ होता. आधुनिक विकसित शास्त्रातील जवळपास सर्वच शास्त्रांचा हा निर्मितीकाळच म्हणावा लागेल. परंतु कुठल्याही शास्त्राच्या निर्मिती इतिहासात बुद्धकाळाला स्थान का मिळाले नाही ? या शास्त्रांच्या भारतीय योगदानातही बुद्धकाल उपेक्षित का राहिला ? ज्या शाक्यवंशात कुळांच्या माध्यमातून निवडणुकीद्वारे शाक्य कुळांचा अध्यक्ष ठरविले जायचे. त्या बुद्धकालीन शाक्यकुळांना आधुनिक लोकशाही आणि राज्यशास्त्राचे जनक म्हणून का संबोधले जात नाही ? सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वडील शुद्धोधन राजा हे ८० शाक्य कुळांनी निवडून दिलेले श्याक्य कुळाचे प्रमुख होते. तरी त्यांना लोकशाही राज्याचा पहिला राज्यप्रमुख असण्याचा दर्जा का प्राप्त होत नाही ? रोहिणी नदीने शाक्य आणि कोलिय या दोन कुळ राज्यांची निर्मिती केली होती. बहुतांश आधुनिक राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा निर्धारित करीत असतांना तेच तत्व अंगिकारले गेले असतांना बुद्ध काळ लोकशाहीचा काळ म्हणून का गणला गेला नाही ?
शाक्य कुळाची पंचायत होती. सर्व राज्याचे निर्णय त्या पंचायतीच्या माध्यमातून घेण्यात येत होते. त्या शाक्य पंचायतीची रचना आधुनिक कायदेमंडळासारखी असतांना सुद्धा त्याचा कुठेच उल्लेख का केला जात नाही ?  ज्या सम्राट अशोकाने आपल्या राज्याला ख-या अर्थाने प्रजासत्ताक बनविले त्या सम्राट अशोकाला प्रजासत्ताक राज्यनिर्मितीचा जनक म्हणून का संबोधले जात नाही ? राज्याला आणी राज्यातील जनतेला धनसंपन्न ठेवणारा आणि राज्याच्या कल्याणाकडे जातीने लक्ष घालणारा चक्रवर्ती सम्राट अशोक अर्थशास्त्राचा जनक का होऊ शकत नाही ? बुद्धांचे मानवतावादी विचार मानवी कल्याणासाठी जगभर पेरण्याचा निर्धार केलेला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा सम्राट अशोक मानववंशशास्त्रात का अभ्यासाला जात नाही ? या प्रश्नांचे उत्तर आधुनिक इतिहासात कुठेच का सापडत नाही ? ते आता आम्हाला शोधून काढावे लागणार आहे. इतकेच नाही तर ते आधुनिक इतिहासाच्या पानापानांमधून समाजापर्यंत रुजवावे लागणार आहे.
तथागत बुद्धांच्या महापरीनिर्वानानंतर त्यांच्या विचारांवर तत्कालीन वैदिकांनी आक्रमणे सुरु केली. परंतु अल्पावधीतच वैदिकांच्या आक्रमणांना थोपवून बुद्धांचे विचार जनमानसात पोहचविणारे आणि राहुल आणि यशोधरा सारखी मुले बुद्धांच्या प्रचार आणि प्रसारासाठी जगभरात पाठविणारे सम्राट अशोक आज आमच्या समाजात किती रुजविले गेले आहेत ? बुद्धांचा धम्मचक्र गतिमान करणारे सम्राट अशोक हे ख-या अर्थाने मानवतावादासाठी झटणारे शिल्पकारच होते. सम्राट अशोकापासून तर बृहदत्ताचा खून होईपर्यंतचा बुद्धकाळ अतिशय समृद्ध आणि विज्ञानवादी होता. या काळात वैदिकांच्या प्रतीक्रांतीला न जुमानता क्रांत्या केल्या गेल्या. एक समृद्ध बुद्ध संस्कृती रुजविल्या गेली. या संकृतीची प्रतीके आणि प्रतिमाने स्थापित केली गेली. जगात होणा-या आणि त्यातही प्रामुख्याने आशिया खंडात होणा-या उत्खननात सापडणारी बुद्धकालीन प्रतीके आणि प्रतिमाने ही त्या काळातल्या समृद्ध बुद्ध संकृतीची साक्ष देणारीच आहेत. पण ते जगासमोर आणणारी साधने ही वैदिकांच्या पिलावळीच्या हातात असल्याने समाजापर्यंत तो इतिहास आणि ती समृद्ध संकृती पोहचवली जात नाही.
वैदिकांचे थोतांड, त्यांचे अपौरुषेय तत्वज्ञान मोडीत काढण्याची आणि प्रगल्भ सामाजिक विज्ञान समाजात रुजविण्याची ताकत बुद्धाच्या विचारात होती आणि आजही आहे. त्यामुळे बृहदत्ताचा खून केल्यानंतर अनेक वर्षे वैदिकांची हल्ले फक्त आणि फक्त बुद्ध संस्कृतीवर झाली. आणि त्यात राज्य बळकावण्याच्या नादात मुस्लीम आक्रमणांनी भर घातली. त्यामुळे बुद्ध संस्कृतीच्या विनाशाची आयतीच संधी वैदिकांना मिळाली. बृहदत्ताच्या खुनापासून ते १९५६ पर्यंत बुद्ध संस्कृतीला नष्ट करण्याची संधी वैदिकांनी सोडली नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ती समृद्ध बुद्ध संस्कृती पुनर्जीवित झाली आहे. २५ हजार वर्षानंतर धम्मचक्र गतिमान झाले आहे. ते सतत गतिमान ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी बुद्ध संस्कृती आम्हाला पुनश्च्य या समाजात रुजवायची आहे.
मध्यंतरीच्या काळात बुद्ध विचारात आणि संस्कृतीत वैदिक संस्कृतीची सरमिसळ करण्यात आली. त्यामुळे नित्य आणि अनित्य, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, आत्मा आणि अनात्मा असा स्पष्ट भेद बुद्ध आणि वैदिक संस्कृतीमध्ये असतांनासुद्धा या भेदरेषा नष्ट करण्याचे काम करण्यात आले. जातक कथा आणि त्रिपिटकातून आलेली वैदिकांची गटारगंगा "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोडून काढली. आणि या जगाला शुद्ध “बुद्ध आणि त्यांचा धम्म” बहाल केला. "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,'पारंपारिक बुद्ध धम्म आणि आधुनिक बुद्ध धम्म यात मोठी तफावत आहे. पारंपारिक बुद्ध धम्मावर वैदिकांनी आक्रमणे केल्यामुळे बुद्ध धम्माची मोठ्या प्रमाणात हानी झाली. तर आधुनिक बुद्ध धम्म कालौघात परिस्थितीनुरूप बदलत गेला. परंतु दोन्ही ठिकाणी खरा बुद्ध धम्म हा पडद्याआड राहिलेला आहे. वैदिकांच्या आक्रमणाने बुद्ध धम्मात अनेक छिद्रे पडली. त्या छिद्रातून वैदिकांची घाण बुद्ध धम्मात आली. ज्यामुळे बुद्ध धम्म प्रदूषित झाला होता. परंतु मी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथातून बुद्ध धम्माला पडलेली छिद्रे बुजविण्याचे काम करीत आहे. बुद्ध धम्मात साचलेली वैदिकांची घाण साफ करीत आहे. आणि शुद्ध स्वरूपातला खरा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून तुमच्यासमोर मांडत आहे.' बाबासाहेबांनी प्रस्थावनेत सुचविलेले हे सूचक अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देऊन जाते. त्यामुळे ख-या बुद्ध आणि त्यांच्या धम्माची ओळख आम्हाला 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातूनच होऊ शकते. बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच आम्ही प्रमाण ग्रंथ मानला पाहिजे. 
बुद्ध या मातीतून जन्माला आला आहे. बुद्ध धम्म आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारही सर्वप्रथम भारतातूनच झाला आहे. सम्राट अशोकापासून तर बृहदत्त पर्यंतचा इतिहास बुद्ध संस्कृतीच्या लौकिकाचा इतिहास मांडतो आहे. या इतिहासाची पुनर्बांधणी १४ ऑक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीने झाली. हजारो वर्षाच्या गुलामीची बंधने झुगारून बहुसंख्य शोषित-पिडीत-मागास समाज बुद्धाच्या संस्कृतीकडे आकृष्ट झाला. युगानयुगे चाललेली जातीची वर्णव्यवस्था फेकून देऊन मानवतावादी माणूस बुद्धाच्या संस्कृतीकडे स्वगृही परतू लागला. या धम्मक्रांतीने जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद केली. कुठल्याही रक्तपाताशिवाय एक मोठा सामाजिक समूह परिवर्तनाकडे वळला गेला. जे युद्धाने जिंकता आले नाही. ते बुद्धाच्या धम्माने जिंकता आले. त्यामुळे ही धम्मक्रांती मानवी परिवर्तनाच्या विजयाची शिलेदार ठरली. जगात अनेक क्रांत्या घडून आल्या. या क्रांत्यांनी परिवर्तन घडविले. परंतु रक्तपात करून. स्वकीयांना गमावून. मानवी स्वातंत्र्याचा बळी देऊन. अश्या परिस्थितीत बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती एकमेव मानवतावादी क्रांती ठरली.
जगाच्या इतिहासात रक्तपाताने झालेल्या क्रांत्या शिकविल्या जातात. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात, समाजशास्त्रात आणि मानववंशशास्त्रात बाबासाहेबांची धम्मक्रांती शिकविली जात नाही. का ? का आजही बाबासाहेबांची धम्मक्रांती अभ्यासक्रमातून, वाहिन्यांमधून, सामाजिक संदेशांमधून जाणीवपूर्वक वगळली जात आहे. आज जगाला युद्ध नको आहे. बुद्ध हवा आहे. मग युद्धाच्या ऐवजी बुद्ध पाहिजे असेल तर समाजमनावर आणि आधुनिक पिढीवर मानवतावादाची रुजवण होणे आवश्यक आहे. जगाला युद्धाने नाही तर बुद्धांच्या विचाराने जिंकता येते. हे जोपर्यंत आधुनिक पिढीच्या मनावर ठासून बिंबविले जात नाही. तोपर्यंत आधुनिक पिढी मोह-माया-श्रद्धा-भक्ती च्या मोहजालातून दूर जाणार नाही. आणि ही शिकवण रुजवणारी साधने शिक्षण, दूरसंचार, इंटरनेट, सिनेमा, टी.व्ही इ. साधनांच्या माध्यमातून होऊ शकते. हा समाज या क्षेत्रांना आणि साधनांना आपल्या हातात केव्हा घेणार आहे ? त्यावरच पुढल्या इतिहासाची दिशा ठरू शकेल. 
आज धम्मक्रांतीवर अनेक प्रतीआक्रमणे सुरु आहेत. आणि ते अव्याहत सुरु राहतील. कारण धर्मसंघर्षाचा इतिहास मोठा आहे. अश्या परिस्थितीत बुद्ध धम्म टिकवून ठेवायचा असेल. आणि बुद्ध धम्माची अपरिहार्यता मानवासमोर उभी करायची असेल. तर आधुनिक प्रचार आणि प्रसाराची साधने आम्ही आमच्या हातात घेणे गरजेचे आहे. आज आमच्या विचारांच्या निष्ठा विभागल्या आहेत. आमची श्रद्धास्थाने दुभंगली आहेत. समान ध्येय आणि उद्धिस्ट राहिलेले नाही. त्यामुळे शत्रूंनी त्याचा लाभ घेऊन आमच्यामध्ये दुही माजविली आहे. सामाजिक कल्याणाच्या इतिहासाची निर्मिती आम्हाला करायची असेल तर आमच्या विभागलेल्या श्रद्धा आणि निष्ठांना पायदळी तुडवून समान निष्ठांवर आम्हाला आग्रही व्हावे लागणार आहे. प्रतिक्रांतीचे शिरच्छेद करायचे असेल. तर आम्हाला आमच्या विचारांच्या तलवारी सदैव धारदार आणि मजबूत ठेवाव्याच लागणार आहेत. समाजापर्यंत बुद्धाची मानवतावादी क्रांती पेरायची असेल तर घराघरात बाबासाहेबांना अपेक्षित बुद्ध आणि त्यांचा धम्म पोहचला पाहिजे. ती पोहचविणारी साधने आम्ही निर्माण केली पाहिजे. खुल्या डोळ्याने दिसणारे विज्ञान विरुद्ध वैदिकांची समाधी या सीमारेषेवरच आम्ही खरा बुद्ध इतिहास समजून घेऊ शकतो. ती सीमारेषा प्रत्येकाने आपल्या जीवनात भिनविण्याचा प्रयत्न केला. तर निश्चितच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुद्ध संस्कृतीच्या इतिहासाला अभिप्रेत भविष्याचा बुद्ध इतिहास इथे घडवू शकू.  
ôôôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५

Wednesday, 27 June 2012

आंबेडकरी संतुष्टीकरण चळवळीला घातक



आंबेडकरी संतुष्टीकरण चळवळीला घातक
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५
भारत सदैव सामाजिक संघर्षात पेटत राहिलेला देश आहे. धर्म, संस्कृती आणि स्वातंत्र्यासाठी इथे सदैव संघर्षच झालेला दिसून येतो. समाज संघर्षरत राहणे आणि वर्चस्वासाठी कार्यरत राहणे यात मुलभूत फरक आहे. समाज स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि विकासासाठी संघर्षरत राहिला तर त्यातून एका नव परिवर्तनवादी समाजाची निर्मिती होते. परंतु जर समाज वर्चस्वासाठी कार्यरत राहिला तर समाजाचा व देशाचा विकास रसातळाला जातो. क्रांती आणि प्रतीक्रांतीची ही भेदरेषा ज्या समाजाने लवकर ओळखली आणि त्या दिशेने मार्गक्रमण केले तो समाज प्रगतीच्या शिखरावर लवकर पोहोचतो. क्रांती मानवी स्वातंत्र्याच्या बळावर सामाजिक परिवर्तनाला प्राधान्य देते. जिथे समाज सतत संघर्षरत राहतो. पण प्रतीक्रांतीच्या काळात समाज हा फक्त क्रांतीने हिरावलेल्या कृत्रिम आणि अमानवी वर्चस्वाला पुन्हा बळकावू पाहतो. असा समाज फक्त आणि फक्त वर्चस्वासाठी लढत असतो. हाच समाज पारंपारिक गुलामीला कारणीभूत असतो. समाजावर अधिकार गाजविण्याचे मालकी हक्क शाबूत ठेवण्यासाठी येनकेन प्रकारे हा समाज क्रांतीला दडपू पाहतो. ही परिस्थिती गेल्या अनेक शतकानुशतके भारतीय समाजात दिसून येत आहे. क्रांतीच्या मुलावर घाव घालण्यासाठी प्रतिक्रांती आपली पंखे पसरून बसलेली सदैव दिसून येते. कुठलीही संधी न दवडता क्रांतीने आलेल्या सामाजिक परिवर्तनाला मोडीत काढण्यासाठी प्रतीक्रांतीवादी वादळे समाजात सदैव घोंगावत असतात. अश्या परिस्थितीत परिवर्तनवादी समाज क्रांतीने निर्माण केलेल्या मानवी वातावरणाच्या मोहजाळात संतुष्टीकरणाला चिकटून बसला तर क्रांती प्रतीक्रांतीची शिकार बनते.
आंबेडकरी चळवळीने लढविलेले क्रांतीचे लढे भारतीय समाजात इतिहासाच्या पानावर अजरामर झाले. भारतीय सामाजिक क्रांतीचा इतिहास जेव्हा केव्हा भविष्यकाळात लिहिला जाईल तेव्हा आंबेडकरी चळवळीने केलेल्या क्रांत्या ह्या त्या इतिहासाच्या अग्रक्रमावर असतील. या क्रांत्यांचा माणूस हाच केंद्रबिंदू असल्याने मानवी न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आंबेडकरी आंदोलन नेहमी अग्रक्रमावर राहिलेले आहे. परंतु यावरच आम्ही समाधान मानून घेणार आहोत का ? आम्ही इतिहास घडविला त्यामुळे इतिहासाच्या पानांवर आमचे नाव सुवर्णाक्षराने रोवल्या गेले. म्हणून आम्ही शांत बसायचे का ? क्रांतीने मिळालेल्या यशालाच आम्ही अंतिम यश समजायचे का ? की क्रांतीच्या पावलाने आलेल्या परिस्थितीला टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र प्रतीक्रांतीची पाऊले ओळखून जागली करायची ? या प्रश्नाच्या सोडवणुकीत आम्ही आता स्वतःला गुंतविले पाहिजे. कारण आंबेडकरी आंदोलनाला आलेले यश व त्यातून आंदोलनाच्या शिलेदारांमध्ये निर्माण झालेले संतुष्टीकरण हेच ख-या अर्थाने आधुनिक आंबेडकरी आंदोलनासमोरील समस्यांचे माहेरघर बनलेले आहे. असे प्रकर्षाने दिसून येत आहे. आंदोलनाच्या यशाला हुरळून जाऊन आंदोलनाकडे आंदोलनकर्त्यांनी फिरविलेली पाठ आज नव्या आव्हानांना उभी करत चालली आहे. आंबेडकरी आंदोलनात आलेल्या संतुष्टीकरणाने चळवळीची जी हानी झाली त्याचा उहापोह करणे आज गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "मी कुठलेही आंदोलन फार काळ लावून धरत नाही. समाजाची व चळवळीची फार शक्ती वाया न घालविता तत्कालीन आंदोलनाला थोडे यश आले की मी ते आंदोलन सोडून माझा मोर्चा दुस-या आंदोलनाकडे वळवितो." ज्यामुळे बाबासाहेबांच्या काळात कधीही चळवळीमध्ये स्थैर्य आले नाही. समाज सतत प्रवाहित राहिला. अधिकार व हक्कासाठी लढत राहिला. ज्याचे समर्थ नेतृत्व बाबासाहेबांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वानानंतर जे उत्तर आंबेडकरी आंदोलन उदयास आले त्यात रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भाषिक प्रांतरचना आणि त्यानंतर उदयास आलेली भाषिक राज्ये यामध्ये रिपब्लिकन नेत्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. मध्य प्रांताच्या फाळणीत आणि स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीत मा. दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्या सहका-यांनी बजावलेली भूमिका इतिहासातून पुसली जाऊ शकत नाही. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीचा लढा संपत नाही तोच मा. दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांचा सत्याग्रह पुकारला. देशातली तुरुंग कमी पडली इतका समाजाचा पाठींबा त्या आंदोलनाला मिळाला होता. ज्यामुळे सरकारला सुद्धा नमते घ्यावे लागले होते. आंबेडकरी आंदोलन या देशाच्या कानाकोप-यात पोहचले होते. रिपब्लिकन अस्मिता उभी झाली होती. रिपब्लिकन पक्ष देशातील न.२ चा पक्ष बनला होता. हे यश आंबेडकरी चळवळीला इतके जिव्हारी आले की काय ? आंबेडकरी आंदोलनाला आलेल्या या यशाने आंबेडकरी समाज आणि नेते इतके संतुष्ट झाले की त्यानंतर आंदोलनाला १९७८ पर्यंत वाट पहावी लागली. इथूनच सुरु झालेले आंबेडकरी संतुष्टीकरण राजकारणाच्या खेळत इतके रंगले की त्यानंतर सामाजिक लढे उभे होण्यास तब्बल १९६४ ते १९७८ पर्यंत अनेक वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागला. हेच आजच्या आंबेडकरी चळवळीच्या वास्तवाला कारणीभूत झाले आहे.
आंबेडकरी आंदोलनाला दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात आलेले यश आणि त्यातून वाढलेले संतुष्टीकरण पाहून ही चळवळ राजकारणाच्या गळाला लावणे सुरु झाले. नंतरच्या काळात भूमिहीनांचे आंदोलन पडद्यामागे गेले. तब्बल १९९० च्या दशकापर्यंत. प्रकाश आंबेडकरांनी दादासाहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवत राजकारणाच्या पटलावर प्रवेश केला. पण तोपर्यंत आंदोलनाची धार बोथड झाली होती. महाराष्ट्र विधानमंडळाने मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ सरकारने केले त्यामुळे त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १९७८ ला मा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु झाले. हे आंदोलन इतके ताणल्या गेले की त्यामुळे समाजाची मोठी हानी झाली. पण या आंदोलनाला अखेर १९९२ च्या काळात यश आले. या आंदोलनाने जे नेतृत्व उभे केले ते पुन्हा आंदोलाच्या यशाच्या संतुष्टीकरनातून राजकारणाचे भागीदार बनले. आणि पुन्हा एकदा आंबेडकरी आंदोलन विष्कळीत झाले. १९७२ च्या दशकात उभे झालेले दलित पँथर चे आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शोषित-पिडीत-दीन-दुबल्यांवर होणा-या अन्यायावर तुटून पडले. एक प्रकारचा प्रस्थापित वर्गावर वचक निर्माण झाला. ज्यामुळे या पँथरचे राजकीय पटलावरील महत्व वाढू लागले. समाज आशाळभूत नजरेने पँथर नेतृत्वाकडे बघू लागला होता. खेड्यापाड्यातील जनतेवर होणारा अन्याय पँथरनी ज्यापद्धतीने हाताळला ती पद्धत तरुणांना पँथरकडे ओढू लागली. त्या काळात समाजावर होणा-या अन्यायाविरोधात आंबेडकरी चळवळीला पँथरच्या रुपात मोठे यश मिळू लागले. परंतु काही आप्तस्वकीय आणि राजकारण यांच्या हल्ल्याने पँथर पुन्हा फुटला. आंदोलनाच्या यशाने दिलेले संतुष्टीकरण पुन्हा आडवे आले. रोपट्याचे झाड होण्याआधी पँथरचे रोपटे कोमेजले. आणि राजकारण या सर्वांचे घात करायला कारणीभूत ठरला.
आंबेडकरी चळवळीने केलेल्या आंदोलनाने निश्चितच या व्यवस्थेला बळकटी प्राप्त झाली. समाजाला न्याय मिळाला. वंचितांना हक्क मिळाले. याकडे डोळेझाक करता येणार नाही. मात्र चळवळीचे बळकटीकरण यातून व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. आंदोलनाने नेतृत्व उभे केले. समाजाने ते स्वीकारले. आंदोलनाच्या यशाचे वारे डोक्यात गेले. आंबेडकरी चळवळीचे एकमेव आम्हीच शिलेदार म्हणून समाजाची फरफट होऊ लागली. याचाच लाभ घेऊन काही घरभेद्यांनी चळवळी फोडली. इतकी की भाऊच भावाचा शत्रू बनल्यासारखे कार्यकर्ते आमोरासमोर शत्रू बनले. चळवळीत एकमेकांविषयी विष कालविल्या गेले. शिव्या घालून षंडांचे राजकारण केल्या गेले. आंदोलन मागे पडले. राजकीय सत्ता आणि त्यातूनच सामाजिक उन्नयनाचा मार्ग अशी बतावणी करून राजकारणाच्या संतुष्टीकरणाचा मार्ग पत्करला गेला. सामाजिक लढा इथेच विरघडू लागला. मंडळ कमिशन ने शिफारस केलेल्या ओ बी सी आरक्षणाचा रिपब्लिकन पक्षांच्या विविध नेतृत्वाने १९९० ला एकमुखाने लढलेला लढा सोडला तर नंतरच्या काळात सामाजिक लढे अतिशय तुरळक झाले होते. राजकीय सत्ता म्हणना-यांनी तर सामाजिक प्रश्नांकडे आणी लढ्यांकडे पंतप्रधानाची स्वप्ने पाहण्यातच डोळेझाक केली. आणी समाज दोन भागात दुभंगला. एकीकडे मर्यादित राजकीय सत्ता आणि सामाजिक लढ्याचे पुरस्कार करणारे रिपब्लिकन पक्षाचे विभक्त तुकडे तर दुसरीकडे संपूर्ण सत्ता आधी म्हणून सामाजिक लढ्याला वेठीस धरणारे राजकारणाचे दलाल. दोन्ही कडे वेगवेगळे संतुष्टीकरण मात्र चळवळ एकाकी पडली. मानवी जीवनाच्या उत्कर्षाच्या सर्व अंगांना व्यापणारे बाबासाहेबांचे विचार त्यांच्याच शिलेदारांनी राजकारणाच्या मर्यादेत गोवले.
१९९६ च्या दरम्यान आलेले रिडल्स आणि रमाबाई हत्याकांड हे दोन्ही लढे पुन्हा आंबेडकरी अस्मितेला उभारी देणारे ठरले. रिडल्स चे प्रकरण हे तर बाबासाहेबांच्या विचारांवर घाला घालणारे होते. भारतीय समाजाच्या घृणित मानसिकतेचे प्रदर्शन घडविणारे होते. त्याविरोधात आंबेडकरी समाज आणि संघटना एकजूट होऊन लढल्या आणि तो लढा जिंकला. त्याचाच बदला म्हणून की काय तर प्रस्थापितांनी रमाबाई हत्त्याकांड घडवून आणले. महाराष्ट्रात तेव्हा युतीचे सरकार होते. तर दुसरीकडे आंबेडकरी चळवळीचे वारस समजणा-या एका गटाकडे याच युतीच्या सहयोगी पक्षाच्या सहकार्याने एका राज्याची सत्ता होती. म्हणून त्यांनी या दोन्ही लढ्याची कुस्सित भावनेतून घृणा केली. परंतु महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीने त्यांची तमा न बाळगता सरकारला पळता भुई कमी पाडली. आंदोलन यशस्वी झाले. न्याय मिळाला. पण थोड्याच वर्षात भारतीय संविधानाची समीक्षा नावाचा नवा फार्स इथल्या प्रस्थापितांनी भारतीय बहुसंख्यांकांच्या मुळावर मारला. २००० साली आलेले भारतीय संविधान समीक्षेचे वादळ उलथवून पाडण्याची जबाबदारी सर्व परिवर्तनवादी समाजाची होती. भारतातील मानवी अधिकाराला मानणा-या आणि परिवर्तनवादी चळवळीवर विश्वास ठेवणा-या सर्व संस्था संघटनांनी रालोआ सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात जंग जंग पछाडले. आणि संविधान समीक्षेचे वादळ शांत झाले. या यशाने पुन्हा नव्या संतुष्टीकरणाला मार्ग मोकळा करून दिला. पण मध्यंतरीच्या काळात याच विषयावर संसदेमध्ये चर्चा घडून येत असतांना कांशीरामचे वक्तव्य तापदायक ठरले. ते संसदेमध्ये बोलतांना म्हणाले. "जोपर्यंत माझ्या पक्षाचे ५० खासदार मी संसदेमध्ये निवडून आणीत नाही तोपर्यंत मी संसदेमध्ये कुठल्याही विषयावर बोलणार नाही." याला राजकीय सत्ता प्राप्तीचे संतुष्टीकरण म्हणायचे की आंबेडकरी चळवळीला संपुष्टात आणण्यासाठी आखलेले षड्यंत्र म्हणायचे याचा विचार सुज्ञ डोक्यांनी केलेला बरा ! खैरलांजी हत्त्याकांड हे सुद्धा चळवळीच्या संतुष्टीकरनातून सामाजिक न्यायाकडे आंबेडकरी आंदोलनाने केलेल्या दुर्लक्षाचे परिपाक म्हणून पाहता येईल. कारण आंदोलन आणि त्याच्या यशानंतर आंबेडकरी चळवळ स्वकीय भांडणात इतकी व्यस्त होत होती की त्यामुळे प्रस्थापित जातीवाद्यांनी या समाजावर अन्याय करायची कधीही भीडमुर्वत बाळगली नव्हती. हे सर्व काही आमच्याच स्वकीयांना हाताशी घेऊन जाणीवपूर्वक केल्या जात होते. हे आता सिद्ध होऊ लागले आहे. 
आधुनिक आंबेडकरी आंदोलनाने सुद्धा आपल्या पारंपारिक प्राक्तनांचे गोडवे गात आपली वाटचाल सुरु केली आहे. एखादे आंदोलन करायचे आणि अनियमित काळासाठी शांत होऊन आंदोलनाच्या यशाचे बोधामृत पिण्याची सवय आम्हाला जडलेली आहे. ती सवय आता आम्हाला मोडावी लागणार आहे. मानवीय विरुद्ध अमानवीय अश्या व्यवस्थावादी मानसिकतेत 'एका आंदोलनाचे यश म्हणजे संपूर्ण मानवियतेचा विजय' या भ्रमातून बाहेर पडून मानवी विकासाच्या अंतापर्यंतचे लढे आम्हाला लढावे लागणार आहे. तेव्हाच इतिहासातल्या चुका आम्हाला दुरुस्त करता येतील. आणि नव्या आव्हानांना पेलून घरून नवी आंदोलने उभी करता येईल. ज्या समाजाला कुठल्याही अधिकारासाठी लढाच द्यावा लागत असेल. त्या समाजासाठी आंदोलन म्हणजे संजीवनीच असते. ही आंदोलनाची संजीवनी आम्ही दुर्लक्षित केली तर असा समाज आपले अस्तित्व फार काळ टिकवून ठेवू शकणार नाही.
आंबेडकरी आंदोलनाच्या लढ्याचे आणि यशाचे स्मरण कुणाचीही भीडमुर्वत न करता करणे आज गरजेचे आहे. नव्हे ती आधुनिक आंबेडकरी आंदोलनाच्या लढ्याचे दिशादर्शन करण्यासाठी महत्वाचे आहे. कुठलीही चळवळ किंवा आंदोलन तोपर्यंत अंतिम उद्देशाला पोहचत नाही जोपर्यंत ती चळवळ जागल्याची भूमिका घेऊन आंदोलनाने मिळालेल्या यशाचे संरक्षण करीत नाही. आंदोलन करून मिळालेल्या सामाजिक हक्क-अधिकारांचे संरक्षण केले गेले नाही. तर ते फार काळ टिकून राहण्याची अपेक्षा करता येत नाही. मग ते हक्क अधिकार कायद्याच्या रूपाने संविधानातून मिळालेले असो, किंवा आंदोलन करून हिसकावून घेतलेले असो. आंदोलनाच्या यशाच्या संतुष्टीकरणाला चिकटून परिवर्तनवादी चळवळी फार काळ तग धरू शकणार नाही. आंदोलनाला खंड पडणे म्हणजे चळवळीच्या उद्देशाला आणि ध्येयाला खंड पडणे होय. समाजाच्या विकासाला आणि मानवी विकासाच्या प्रवाहाला खंड पडणे होय. म्हणून कुठलीही परिवर्तनवादी चळवळ संतुष्टीकरणात जगू शकत नाही. आंबेडकरी चळवळ जी परिवर्तनवादी चळवळीची मुख्य आधारशीला आहे ती तर या संतुष्टीकरनापासून जितकी जास्त लांब राहील. तितके जास्त यश या चळवळीला संपादन करता येईल. आंबेडकरी संतुष्टीकरण चळवळीला घातक ठरले आहे. त्यामुळे समाज दुभंगला आहे. समाजाची एकमुठ बांधायची असेल तर संतुष्टीकरणाला तिलांजली देऊन प्रवाहित आंदोलनांना सुरवात होणे गरजेचे आहे. आज समाजासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला आता रोजच्या जीवनमरणाची आंदोलने उभी करणे आणि त्यासाठी सतत झटणे, लढणे गरजेचे आहे.  तेव्हाच आम्ही आंबेडकरी चळवळीला तिच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचवू शकणार आहोत. हे लक्षात घ्यावे.
ôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५

Tuesday, 26 June 2012

अविष्कार सोनावणे जी को भावपूर्ण श्रद्धांजली !

बडे दुःख और दर्द के साथ आज यह खबर आप तक पहुचाने की कोशिश कर रहा हु !
हमारे मित्र और युवा आंबेडकरी कार्यकर्ता उल्ल्हासनगर, मुंबई के अविष्कार सोनवणे इनका रेल अपघात में दु:खद निधन हुआ !
उनके स्मृति को सभी मित्र परिवार और तमाम आंबेडकरी कार्यकर्ताओंकी तरफ से विनम्र श्रद्धांजली !

अविष्कार सोनवणे यह मुंबई के आंबेडकरी कार्यकर्ता बहोत ही हसमुख, धैर्यशील और संवेदनशील कार्यकर्ता थे ! आंबेडकरी आंदोलन के प्रती उनकी लगन सराहनीय थी ! और भविष्य मे आंबेडकरी आंदोलन को दिशा प्रदान करणे के लिये वो काफी चिंतीत थे ! फोन पर जब भी बात करते, फेसबुक पर जब भी बात करते तो सिर्फ और सिर्फ आंदोलन की ! ऐसा एक नौजवान साथी अब हमारे बीच नही रहा ! अब वो हमारे बीच नही है पर उनकी यादे हमारे साथ हर वक्त रहेगी ! वो हर वक्त कहते थे, " सर बाबासाहाब के इस कारवा को हमे आगे बढाना है ! आप हमे मार्गदर्शन करते रहे ! हम जरूर इस कारवा को बाबासाहाब की उंचाई तक पोहचायेंगे !" इतना सजग और कृतीशील, भविष्य के आंबेडकरी आंदोलन का सरताज आज हमने खो दिया है ! उनके साथ बिताये हुये पल, नागपूर मे उनके साथ मेरे घर मे हुई वार्तालाप, मेरे घर पर उनका गुजारा हुआ पुरा एक दिन और रात, हर एक पल मेरे परिवार के सभी सदस्य को याद आ रहा है ! ऐसे मेरे युवा साथी और मित्र को बडी विनम्रता और दुःख के साथ आज हम उसे अलविदा कहने जा रहे है ! अविष्कार सोनावणे के दुःखद निधन के रूप मे आंबेडकरी आंदोलन को जो ठेच पहुची है वो कभी पुरी नही हो सकती ! मेरे और मेरे परिवार की तरफ से और सभी मित्र परिवार की तरफ से अविष्कार सोनावणे जी को भावपूर्ण श्रद्धांजली !

छत्रपती माझा


रयतेचे राजा महर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या क्रांतीकार्याला विनम्र अभिवादन ! कोटी कोटी प्रणाम !

छत्रपती माझा 

रयतेचा राजा छत्रपती माझा
दिली त्याने देशाला जनकल्याणाची पावती
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! १ !!

लोककल्याणासाठी राजे तुम्ही पेटविली ज्योत
चहूकडे जनता माझी गाते आज तुमचेच गीत
तुमच्या छायेने भिमक्रांती गाजली...
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! २ !!

भिमक्रांती प्रकाशमान तुम्हामुळे झाली
हजारो जीवांचे मुक्तिदाता बाबासाहेब घडविलेत तुम्ही
झुगारून जातीच्या बंधनांना दिली आम्हा सावली
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! ३ !!

आरक्षणाचे जनक बनून पेटविल्यात चुली
मनुवादी व्यवस्थेने फेकलेल्या माणसांना गोंजारून तुम्ही
दीन-दुबळ्यांसाठी केली शिक्षणाची दारे मोकळी
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! ४ !!

घडविण्यास जीवन आमुचे वस्तीगृह बांधले
स्त्री स्वातंत्र्याचा कायदा करून इतिहास रचला तुम्ही
मोफत शिक्षणाला राजाश्रय देऊन दिली सर्वांना विकासाची संधी
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! ५ !!

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१ 

Wednesday, 20 June 2012

चला तर आता नोटेवर असणा-यांना हाकलुया !


रिझर्व बँकेने नोटांवर महापुरुषांचे फोटो छापण्याचा निर्णय घेतला आहे असे वाचण्यात आले. म्हणजे आता गांधी शिवाय या देशाच्या चलनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज असे काही महापुरुष येणार आहेत. त्यातल्या फक्त डॉ. बाबासाहेबांचे फोटो नोटेवर येणार म्हणून काहींची तीद्पापड सुरु झाली आहे. अन्यथा झाली नसती. त्यामुळे आता हा विषय चर्चिल्या जाऊ लागला आहे. पण या विषयाची कळकळ जर थोडी आधी वाटली असती तर वजन वाढविता आले असते. सुरवात कुणी केली ? का केली ? तेव्हा हा बुद्धिवादी विचार कुठे दडला होता ? अनुत्तरीत अश्या प्रश्नांना वाचा आताच का फुटली ? देशाच्या अस्मिता आणि प्रतिक चिन्हे नोटेवर असतांना अचानक देशविघातक पुळका आला कसा ? विषय हा असूच शकत नाही कि कौन नोटेवर येईल. विषय हो होऊ शकतो कि जे आहेत ते केव्हा नोटेवरून जातील आणि पुन्हा या सुजलाम सुफलाम देशाला त्यांच्या परिवर्तनवादी प्रतिक चिन्हाने पुल्लंकित करतील, चला तर आता नोटेवर असणा-यांना हाकलुया !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

Wednesday, 6 June 2012

"१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने घेण्यात येणारी जनमत निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात येण्याबाबत....

निवेदन
प्रती,
        मा. पंतप्रधान,
       भारत सरकार,
       नई दिल्ली.
      

विषय      :- CNN-IBN आणि HISTORY-18 या वाहिन्यांच्या माध्यमातून "१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने घेण्यात येणारी जनमत निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात येण्याबाबत....
निवेदनकर्ते         :- डॉ. संदीप नंदेश्वर, इतर सामाजिक कार्यकर्ते व इतर संस्था-संघटना.
पत्ता                  :- ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर- ४४००३४
           मो. क्र. 9226734091
CNN-IBN आणि HISTORY-18 या वाहिन्यांच्या माध्यमातून "१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचे सर्वोच्च भारतीय" या विषयाच्या अनुषंगाने जनमत निवड चाचणी घेण्यात येत आहे. ही निवड चाचणी विषयानुसारच दोषपूर्ण अशी आहे. जगाच्या पाठीवर अश्या प्रकारची कुठलीही चाचणी अजूनपर्यंत झालेली नाही. कुठल्या तरी एका राष्ट्रीय व्यक्तिमत्वाला आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इर राष्ट्रीय व्यक्तिमत्वांची निवड करणे हे जगामध्ये सर्वप्रथम भारतात घडून येत आहे. ज्यामुळे इतर महापुरुश्यांच्या अनुयायांची मने दुखावली जात आहेत. सामाजिक शांतता व सुव्यवस्था डोक्यात येत आहे. आणि समाजात पुनःश्च्य वैचारिक संघर्षाला खतपाणी घातल्या जात आहे. त्यामुळे ही निवड चाचणी शक्य तितक्या लवकर रद्दबातल ठरवून किंवा विषयात बदल करून केली जावी अशी मागणी समाजातून जोर धरू लागली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून केंद्रसरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारला पाठविण्यात येत आहे. कृपया या निवेदनाची त्वरित दाखल घेण्यात यावी.
मुळात या निवड यादीत ज्या राष्ट्रीय नेतृत्वाची सद्यकालीन नेतृत्वांशी सांगड घालण्यात आली आहे. तीच पूर्णतः दोषपूर्ण आहे. या निवड यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण इ. राष्ट्रीय नेतृत्वाची आणि महापुरुषांची तुलना अटल बिहारी बाजपेयी आणि अब्दुल कलम यांच्याशी होऊ शकत नाही. निवड यादीत एकत्र सुद्धा या नेतृत्वांना बसविता येणार नाही. शिवाय वरील सर्व राष्ट्रीय नेते हे महात्मा गांधी यांच्या समकक्ष आणि एकाच कालखंडातील असल्यामुळे गांधीजींच्या नंतर किंव्हा गांधीजींना मोठे करून इतर महापुरुषांना छोटे करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाचे देशाच्या नवनिर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. याची कृपया सरकारने दक्षता घ्यावी.
ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने केलेल्या जागतिक संशोधनात "जगाचे निर्माते" या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ४ थे स्थान देण्यात आले आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग संपूर्ण जगात आहे. या निवड यादीत त्यांचे नाव महात्मा गांधी नंतर...घेतल्या गेल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय समाजातल्या शोषित-पिडीत वर्गासाठी आणि भारतीय संविधानाच्या रुपात देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान जगाने मान्य केले आहे. तरीही त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न या निवड चाचणीत करण्यात आला आहे.
या निवड चाचणीने गांधी-आंबेडकर या पारंपारिक वैचारिक संघार्षालासुद्धा खतपाणी घातले आहे. गांधी-आंबेडकर वैचारिक वाद आधुनिक समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अश्या परिस्थितीत गांधीजींच्या नंतर सर्वोच्च भारतीय च्या यादीत बाबासाहेबांना ठेवणे म्हणजे सामाजिक संघर्षाला चीतावनी देणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे करोडो शोषित-पिडीत-मागास समूहाचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे त्यांना अश्या निवड चाचणीत घेणे म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा अपमान करणे होय. अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. याची दाखल शासनाने घ्यावी.   
सर्वोच्च भारतीय ठरवायचेच आहे तर गांधीजींचे नाव सुद्धा या निवड चाचणीच्या यादीत घेऊन भारतातील इतरही महापुरुषांना या यादीत स्थान देण्यात यायला पाहिजे होते. तेव्हाच ती निवड चाचणी पारदर्शक होईल. अन्यथा समाजाच्या विभिन्न घटकांना, त्यांच्या श्रद्धास्थानांना, त्यांच्या प्रतीकांना दुखावले जाईल. ज्यामुळे समाजात वैचारिक तेढ, व्यायक्तिक संघर्षाला चालना दिली जाऊ शकते. सूचना प्रसारण आणि दूरसंचार मंत्रालयाने अश्या निवड चाचणीला परवानगी देऊ नये. व ती त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावे. जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांचा सन्मान केला जाईल.  अनेक संत, महात्मे भारतात जन्मले आहेत. ज्यात संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत साई बाबा, महर्षी कर्वे, गायकवाड, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर इ. महान समाजसेवकांचे योगदानही महत्वपूर्ण असेच आहे.  त्यांचा सन्मान म्हणून त्यांच्याही नावांना या यादीत समाविष्ठ करायला पाहिजे होते. परंतु तसे जाणीवपूर्वक न करता षडयत्रपुर्वक ही निवड चाचणी घेण्यात येत आहे. ज्यात फक्त आणि फक्त गांधीजींना मोठे करून इतर महापुरुषांना कमी लेखण्याचा यांचा उद्देश आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.  
वरील निवेदनात करण्यात आलेल्या विवेचनाला लक्षात घेऊन सरकारने आमच्या पुढील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या –
१.        ही निवड चाचणी त्वरित रद्द करण्यात यावी.
२.        अश्या प्रकारची निवड चाचणी करतांना सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याची दाखल घेऊन दोषींवर कार्यवाही करावी.
३.        भारतात ज्या महापुरुषांच्या योगदानाने आज समता, स्वातंत्राची पहाट उगवली आहे अश्या महापुरुषांचा अपमान होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी.
४.        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या निवड यादीतून वगळण्यात यावे. त्याच बरोबर वर उल्लेखित केलेल्या व्यक्तिमत्वाच्या कार्याला न्याय देण्यासाठी त्यांचेही नाव या यादीतून वगळण्यात यावे.
५.        निवड चाचणी घ्यायचीच असेल तर कुणाचेही नाव विषयात न घेता सर्व नावांना निवड यादीत घ्यावे.
६.        महात्मा गांधीचे नाव सुद्धा निवड यादीत समाविष्ठ करावे. जेणेकरून ही निवड यादी पारदर्शक होईल.
वरील मागण्यांसह आम्ही हे निवेदन सरकारला सदर करीत आहोत. यावर सरकारने आणि संबंधित विभागाने त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा समाजातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अश्याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था भंग होत असेल तर त्याला पूर्णतः सरकार जबाबदार असेल.
सविनय विनंतीपूर्वक वरील मागण्यांचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सादर.
धन्यवाद !
आपले जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
प्रतिलिपी,
1)   राष्ट्रपती, भारत सरकार, नई दिल्ली.
2)   सूचना प्रसारण व दूरसंचार मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली.
3)   मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, मुंबई.
4)   मार्फत, जिल्हाधिकारी, नागपूर, महाराष्ट्र सरकार.
निवेदनकर्ते
                             नाव                                                                                                   सही
1.    -------------------------------------------------------                           --------------------------
2.    -------------------------------------------------------                           --------------------------
3.    -------------------------------------------------------                           --------------------------
4.    -------------------------------------------------------                           --------------------------
5.    -------------------------------------------------------                           --------------------------
6.    -------------------------------------------------------                           --------------------------
7.    -------------------------------------------------------                           --------------------------
8.    -------------------------------------------------------                           --------------------------
9.    -------------------------------------------------------                           --------------------------
10.  -------------------------------------------------------                           --------------------------