Thursday, 11 October 2012

धम्मक्रांती काटेरी कुंपणात अडकली...?



धम्मक्रांती काटेरी कुंपणात अडकली...?
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१ 

अशोक विजयादशमी धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीच्या संदर्भात आढावा घेणे गरजेचे होते. त्यांच्या महापरीनिर्वानानंतर बुद्ध धम्मावर झालेल्या धार्मिक प्रतीक्रांतीवाद्यांच्या आक्रमणाचा आणि बुद्ध धम्माच्या वाटचालीचा आढावा घेतांना काही उणीवा ह्या बुद्ध आंबेडकरी अनुयायांकडून राहिलेल्या आहेत त्याचा उहापोह या लेखात करण्यात आलेला आहे. या लेखात केलेले विश्लेषण हे प्राथमिक स्तरावरील असून धम्मक्रांतीला मारक तत्वांचा उहापोह करून धम्मक्रांतीला अभिप्रेत विश्लेषण या लेखात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 


क्रांतीचा एक नारा आम्हीही दिला. क्रांतीचा सूर्य तळपतांना “याची देहा याची डोळा” आम्ही बघितला. क्रांतीची नवी पहाट १४ ऑक्टोंबर १९५६ ला जेव्हा उजाडली तेव्हा इथल्या प्रत्येक शोषित-पिडीत-वंचित समाजाचा नवा जन्म झाला. श्वेतक्रांतीच्या श्वेतपुत्रांनी नागपूरची दीक्षाभूमी प्रफुल्लीत झाली होती. चहूकडे एकाच निनाद गाजत होता. ‘आज मी हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या जन्मकैदेतून मुक्त झालो.’ स्वातंत्र्याचा मुक्त आस्वाद घेण्यास आसुसलेला प्रत्येक देह त्या महामानवांना नमन करत होता. माणूस म्हणून ओळख देणा-या तथागत बुद्धाला आणि जातीच्या गटारगंगेतून काढून माणूसपण बहाल करणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रत्येकजन शरण जात होता. प्रत्येकाच्या मुखात एकच प्रतिज्ञा होती, “बुद्धं शरणं गच्छामि ! धम्मं शरणं गच्छामि ! संघम शरणं गच्छामि !”. जगाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने कोरली गेलेली; २५०० वर्षानंतर प्रवर्तित झालेली धम्मदीक्षा क्रांती…धम्मचक्रप्रवर्तन क्रांती… 
शेवटचा बुद्ध राजा बृहदत्तापर्यंत असलेला बुद्ध भारत नंतरच्या काळात वैदिक आणि मुस्लिमांच्या आक्रमणाने लयाला गेला होता. अनेक प्रदूषणे धम्मात आली होती. भिक्षूंच्या कत्तलीपासून तर बौद्ध विहाराच्या उध्वस्त करण्याच्या इतिहासापर्यंत अनेक आक्रमणे बौद्ध धम्मावर झालेली होती. परंतु बुद्धाची तत्वे ही कायम होती. बुद्ध कायम होता. जरी तो वैदिकांनी विष्णूच्या अवताररुपात टिकवून ठेवला असला तरी तथागत बुद्धाचे अस्तित्व कायम टिकून होते. तत्व व धम्मातील प्रदूषणे बाहेर काढली गेली तर धम्मचक्र पुन्हा या धर्तीवर गतिमान करता येईल. आणि जगाला बुद्धाकडेच वळावे लागेल. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण विश्वास होता. विषमतावादी तत्व अंगी बाळगून असणा-या जगातील अन्य तत्त्वज्ञानापेक्षा समतावादी तत्व वास्तवात आणणारे तथागत बुद्धाचे तत्वज्ञान कधीही या जगाला अपरिहार्यच राहील. असा निश्चय करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि आपल्या सोबत लाखो अनुयायांना बुद्धाच्या समतावादाकडे वळविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने एका क्षणात हजारो वर्षांची हिंदूंची विषमतावादी जातीची उतरंड धराशाही झाली. जातीने लादलेली मानवी गुलामगिरी ठोकरली गेली. धार्मिक उन्मादाने माजविलेली विषमता नाकारली गेली. जातीची उच्च-नीच कर्मकांडे मोडीत निघाली. गुलामीच्या बेड्या तळातळा तुटू लागल्या. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मानवी शृंखला ‘आम्ही सर्व समान आहोत’ चा उद्घोष करू लागली होती. जातीच्या पायथ्याशी बांधलेला ब्राम्हणी श्रेष्ठत्वाचा इमला कोसळू लागला होता. जातीय श्रेष्ठतेची ओळख पुसली जाणार या भीतीपोटी बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला तात्कालिक विरोध केला गेला. आणि ही विरोधाची भूमिका आजतागायत सुरूच आहे. कुठल्याही परिस्थितीत ही धम्मक्रांती हाणून पाडायची असा निश्चय केलेली प्रतीक्रांतीवादी, जातीवादी व्यवस्था आणि माणसांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्मदीक्षेसमोर काटेरी कुंपण रोवणे सुरु केले. आणि ते आजतागायत सुरु आहे. धम्मदीक्षेला काटेरी कुंपणात कुणी कुणी अडविले आणि त्यातून बाहेर पडण्याची तयारी असतांना धम्मदीक्षेची वाट कुणी अडवून धरली याचा गोषवारा घेणे गरजेचे आहे असे वाटते.
…१…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मचक्रप्रवर्तनाने जातीची विषमता नष्ट होऊन हिंदुव्यवस्था मोडकळीस निघाली होती. त्यामुळे धम्मदीक्षेची वाट अडवून धरण्याचे काम सर्वप्रथम इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय हेतूने हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अशी टीका करू लागले. कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला नैतिक पाठबळ लाभू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने केले. त्यासाठी वेगवेगळ्या वेशातील माणसे बुद्ध धम्मात जाणीवपूर्वक पाठविले गेले. रजनीश ओशो, गोयंका, प्राणायमी रामदेव ही त्याचीच उदाहरणे आहेत. बुद्ध धम्मातील माणसे व शोषित-पिडीत-वंचित समाज यांच्या नादी लागला गेला. मोठ्या शिताफीने या बहुरुप्यांनी वेळोवेळी बुद्धाचे नामस्मरण केले. ज्यामुळे भोळी-भाबडी माणसे बुद्ध विचार, बुद्ध शिकवण, बुद्धांची पद्धती म्हणून अश्या हवशी अजगरांच्या गळाला लागली. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धम्मक्रांतीचा रथ थांबविला गेला.
पोटाची खडगी भरण्यासाठी अहोरात्र झटून काबाळकष्ट करणा-या माणसाला विचार व तत्वज्ञान प्राशन करायला फक्त भावनिक आधार घ्यावा लागतो. त्याची श्रद्धा ही त्याच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्या अधिकारासाठी लढणा-या महामानवांप्रती अतूट असते. त्यामुळे अश्या महामानवांचे नाव घेऊन सर्वसामान्य लोकांना फसविण्यात आले. धम्मक्रांतीचा खरा संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचू नये याची खबरदारी घेतल्या गेली. कुठल्याही परिस्थितीत बौद्ध धम्म वाढू नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले गेले. प्रतीक्रांतीची पाऊले ओळखून आंबेडकरी रणनीती आखली जायला पाहिजे होती ती आखली गेली नाही. त्यामुळे प्रतीक्रांतीवादी, ब्राम्हणवादी व्यवस्थेने बौद्ध धम्मातील तत्वांना, विचारांना आणि एकूणच तत्वज्ञानात विष पेरण्याचे काम केले.
“बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. बुद्ध तत्वज्ञानातील प्रमुख तत्वे वैदिक धर्मग्रंथातून घेतली गेली आहेत. बुद्ध हा वास्तुशांतीचा एक भाग ???” अशा प्रकारे बुद्धाला अवतारी बनवून बौद्ध धम्माचे हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. आंबेडकरी परिप्रेक्षातून बौद्ध धम्म समजून घेणा-यांनी अश्या अवतारी हिंदुत्वीकरणाचा विरोध केला. परंतु हा विरोध काहींपुरताच मर्यादित राहिला. आंबेडकरी परीप्रेक्षातील बुद्ध समाजाचा कणा व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही. त्यामुळे पाश्चात्य आणि अवतारी बुद्धाला समाजातल्या मोठ्या घटकाने स्वीकारणे सुरु केले. “बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आहे त्यामुळे आम्ही तो स्वीकारतो.” एवढीच त्या स्वीकारामागाची भूमिका राहिली. खरा बुद्ध आणि प्रदूषित बुद्ध यातील फरक जो बाबासाहेबांनी मांडला तो समाजापर्यंत पोहोचलाच नाही. जाणीवपूर्वक तो पोहचू दिला नाही. देवरूपी पाश्च्यात्य बुद्धिझम चा प्रचार आणि प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याला इथल्या अवतारी बुद्ध बनवू पाहणा-या ब्राम्हणी व्यवस्थेचे पाठबळ मिळाले. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा रथ थांबविला गेला.
…2…
आज धम्मक्रांतीवर आक्रमण करण्यासाठी वैदिक संस्कृतीची घुसळण बौद्ध धम्मात केली जात आहे. विपश्यना हे त्यातलेच बांडगुळ आज बुद्धिस्ट लोकांच्या मनावर बिंबविले जात आहे. आणि त्या माध्यमातून विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञानाला अध्यात्माची जोड दिली जात आहे. ज्या अध्यात्माच्या विरोधात बुद्धांनी संघर्ष केला तेच अध्यात्म बौद्धांच्या मानगुटीवर बसवून बौद्धांच्याच हाताने बुद्ध धम्मक्रांती संपविण्याचा कट विपश्यनेच्या माधमातून आखण्यात आलेला आहे. आणि बुद्ध आंबेडकरी समाज त्याला बळी मोठ्या प्रमाणात बळी पडू लागला आहे. सत्यनारायण गोयंका हा आर एस एस चा हस्तक आज बुद्ध आंबेडकरी समूहाच्या डोक्यावर विपश्यनेच्या माध्यमातून थैमान घालून नाचू लागला आहे. सत्य आणि असत्य याचा उलगडा होऊ न देणारी मोहिनी विपश्यनेच्या माध्यमातून गोयंका बुद्ध आंबेडकरी समाजावर लादीत आहे.
ध्यान, साधना, आत्मा, परमात्मा, समाधी, विपश्यना ह्या सर्व बाबी मानवी बुद्धीला खुजे बनवून मानवी सामाजिक विकासाला खंडित करणा-या आहेत. बुद्धाचा आणि विपश्यनेचा कुठलाही संबंध नसतांना तो संबंध दाखविला जाने म्हणजे धम्मक्रांतीला रोखणेच होय. शोषित-पिडीत-वंचित समाज आज त्याच्या हक्क व अधिकारासाठी बुद्ध तत्वाच्या आधारे आंबेडकरी विचारातून क्रांती करू पाहत आहे. या क्रांतीला थांबविण्यासाठी मानसिक रोग वाढविणारे विपश्यना केंद्र उभे केले जात आहे. बुद्ध विहारे आज विपश्यनेच्या जाळ्यात अडकविण्यात आले आहेत. ही मोठी प्रतिक्रांती आज धम्मक्रांतीवर मात करून समाजाला क्रांतिकारी विचारापासून दूर नेत आहे. भारत बौद्धमय करण्याच्या मार्गातला हा अडथळा दूर करणे आज गरजेचे आहे. अन्यथा बुद्ध तत्वज्ञानाला विपश्यना संपविण्याच्या मार्गापर्यंत पोहचली आहे. महापरित्रणपाठ, पुनर्जन्म, अध्यात्म, शांती अश्या प्रकारच्या भूलथापा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. विपश्यनेचे हे विषारी झाड मुळापासून संपविल्याशिवाय धम्मक्रांती गतिमान होणार नाही.
…3…
धम्मक्रांतीचे मारक म्हणून आज आणखी एका गोष्टीकडे बघितल्या जाऊ शकते ते म्हणजे आज अस्तित्वात असलेल भिख्खू संघ होय. रंगून च्या भाषणात बाबासाहेबांनी धम्म प्रचार आणि प्रसारासाठी भूख्खुंना प्रशिक्षित करण्याची गरज बोलून दाखविली होती. त्यासाठी एक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतू धम्मदीक्षेनंतर अल्पावधीत त्यांचे महापरिनिर्वान झाल्याने त्यांचा तो मानस पूर्ण होऊ शकला नाही. व आजतागायत तो पूर्ण झाला नाही. मध्यंतरीच्या काळात “भारतीय बौद्ध महासभा” या एकमेव बाबासाहेबांनी स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवलेल्या संस्थेने प्रयत्न केला परंतु धम्मातील इतर प्रदूषित धम्म संघटना, पाश्चात्य धम्म संघटना आणि त्यांच्या भिख्खू संघामुळे भारतीय बौद्ध महासभेचे प्रयत्न असफल ठरले. ज्यामुळे आज प्रशिक्षित भिख्खू नसल्याने खरा बुद्ध समाजातल्या घराघरात पोहचू शकला नाही. धम्मक्रांतीच्या अपयशाच्या संदर्भाने ही गोष्ट फार महत्वाची ठरली आहे.
आज बौद्ध भिख्खू धम्म प्रचारक कमी आणि धार्मिक उन्मादक जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भिक्षु या धम्मप्रचाराच्या नैतिक श्रद्धेचा आज व्यवसाय बनला आहे. आजचा भन्ते हा व्यावसायिक प्रचारक बनला आहे. भन्ते राहुल बोधी, भन्ते ज्ञानजोती सारखे उन्मादक भन्ते बुद्ध तत्वज्ञानाला नकळतपणे संपविण्याच्या मार्गावर चाललेले आहेत. एका दिवसात ४० ते ५० घरी चाललेला परित्रणपाठाचा व्यवसाय कुठल्या बुद्ध धम्माच्या तत्वात बसतो हे कळायला मार्ग उरलेला नाही. हिंदूंच्या सत्य साईबाबा प्रमाणे काही भन्ते बौद्धांच्या घरी दर्शन द्यायला जाऊ लागले आहेत. आज भन्ते स्वतःला देवरूपी बनवीत चाललेले आहेत. आणि हा सर्व प्रकार नागपूरच्या क्रांतीभूमीत सुरु आहे हे त्याहून अधिक खेदाची बाब म्हणावी लागेल.
बौद्ध धम्मात भिख्खुंना मानाचे/सन्मानाचे स्थान आहे. एक धम्मप्रसारक आणि प्रचारक म्हणून समाजासाठी ते वंदनीय आहेत. परंतु हेच भिख्खू जेव्हा आज मठाधीश (विहाराधीश) व्हायला लागले आहेत. तेव्हा धम्माला ग्लानी येणे सहज शक्य आहे. भिख्खुंच्या प्रशिक्षणाअभावी हे सर्व होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांना अभिप्रेत भिख्खुंची व्याख्या करतांना म्हणतात, ‘पूजापाठ आणि गाथा म्हणणे हे भिख्खुंचे काम नाही. एका ठिकाणी स्थिरावून (विहारात) विहाराला देवालयाचे रूप आणणारा भिख्खू नाही. तर भिख्खू तो जो समाजाच्या प्रश्नांवर विचार करतो, समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करतो. सामाजिक वातावरणाचा आढावा घेऊन त्याचा मानवी समाजावर होणा-या ब-यावाईट परिणामाची शहानिशा करतो. आजूबाजूच्या घटना-घडामोडींवर लक्ष ठेऊन असतो. आणि त्यासंबंधाने समाजाला सतत मार्गदर्शन करीत असतो. समाजाला दिशा देण्याचे काम भिख्खुंचे आहे.’
एकंदरीत सामाजिक समस्याचा मानवी जीवनावर होणा-या परिणामाला ओळखून सामाजिक जीवन सुखमय करण्यासाठी प्रयत्नरत असणारा अभ्यासू, चिंतन, मनन करून उपाय सुचविणारा अभ्यासक म्हणजे भिक्खू. ही व्याख्या आज अस्तित्वात असणा-या किती भिख्खूंनी त्याच्या जीवनचर्येत अंगिकारली आहे ? यावरच प्रश्नचिन्ह असल्याने धम्मक्रांती अपेक्षित ध्येयापर्यंत पोहचू शकलेली नाही. बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिप्रेत भिख्खू संघ निर्माण करण्याची गरज आहे. आज अस्तित्वात असणा-या भिख्खू संघांनी आणि भिख्खूंनी जर हे ध्यानात घेतले तर बौद्ध धम्मावर येणारी प्रतीक्रांतीची आक्रमणे सहज परतवून लावता येतील. आणि धम्मक्रांतीला गतिमान करता येईल.
…4…
धम्मक्रांतीला वेठीस धरण्यासाठी राजकारण हे सुद्धा जबाबदार ठरले आहे. १९५६ नंतर उदयास आलेल्या आंबेडकरोत्तर राजकारणाने धम्मक्रांतीला वेठीस धरले. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांती आणि राजकारण सम पातळीवर केले जाणे आवश्यक होते. परंतु काही अपरिहार्य कारणाने ते होऊ शकले नाही. धम्मक्रांती राजकारणाच्या वावटळीमुळे एकाकी पडली. ज्यामुळे आंबेडकरी राजकारणही यशस्वी होऊ शकले नाही आणि धम्मक्रांतीपण यशस्वी होऊ शकली नाही. रंगूनच्या प्रसिद्ध भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘मी बुद्ध धम्मातून घेतलेले समता तत्व हे राजकीय आहे. राज्यातील सर्व मानवमात्रांना समानतेने वागणूक देऊन सर्व नागरिक समान आहेत. हा न्यायप्रणीत बंधुभाव समाजात रुजविला जाणे गरजेचे आहे.’ हा संदेश आंबेडकरी राजकारणाला बुद्ध धम्माला सोबत घेऊन वाटचाल करणारा होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले ? की झाले ? यापेक्षा ते होऊ शकले नाही. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. ज्यामुळे अपेक्षित धम्मक्रांतीला चालना मिळू शकली नाही.
काहींनी तर राजकारणासाठी धम्माचा भावनिक वापर केला. बाबासाहेबांची अपेक्षित धम्मक्रांती “भारत बौद्धमय” करण्याची समाजात प्रचलित होती. या सामाजिक भावनाविवशतेला बामसेफ, बीएसपी ने राजकीय आयाम चढविला. समाजाला बुद्ध धम्माकडे आकृष्ट करण्याऐवजी राजकारणाकडे आकृष्ट केले गेले. “सत्ता आल्यावर धम्मक्रांती करू !” अश्या प्रकारच्या वल्गना करून सम्राट अशोकाच्या धम्मक्रांतीचा भावनिक आधार घेतला गेला. त्यामुळे सम्राट अशोकाचा खरा धम्मइतिहास मागे पडत गेला. आणि समाज या हवशी राजकारण्यांच्या पाठीशी बांधला गेला. आधी राजकारण, आधी सत्ता नंतर धम्मकारण, धम्मक्रांती, धम्मप्रवर्तन ही फसवी नीती समाजावर लादली गेली. आणि धम्मक्रांतीला ताटकळत ठेवण्यात आले. बाबासाहेबानंतर उल्लेखनीय धम्मक्रांती होऊच शकली नाही. तश्या अपेक्षा, तशी स्वप्ने मात्र समाजाला धाखाविली गेली. परंतु ते प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही. उलट तोच धम्मक्रांतीला मोडीत काढण्यासाठी आखण्यात आलेला षड्यंत्राचा भाग होता हे आता सिद्ध झाले आहे.
धम्मक्रांतीला मोडीत काढणा-या राजकारणाचा अनुभव मागील ५६ वर्षाच्या काळात आला असतांना सुद्धा आजही धम्माचेच राजकारण केले जाते यापेक्षा या चळवळीचे दुसरे दुर्भाग्य होऊ शकत नाही. धम्म स्वीकारणे म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्वज्ञानाची चतुर्सुत्री स्वीकारणे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या बुद्ध तत्वज्ञानातील चतुर्सुत्रीवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे राजकारणाचे उद्धिष्ट असतांना देखील ते न स्वीकारता राजकारण केले गेले आणि केले जात आहे. आणि सत्ता आल्यानंतरच धम्माचा स्वीकार अशी घोषणा म्हणजे शुद्ध बुद्धिभेद आहे. अध्यापही राजकारणासाठी धम्माचा उहापोह करणा-यांनी कधीही बुद्ध धम्माचा स्वीकार केला नाही. सत्ता आली. सत्ता उपभोगली. बुद्ध आणी बाबासाहेबांच्या नावावर समाजाचे आर्थिक शोषण केले. परंतु धम्माचा स्वीकार मात्र केला गेला नाही.  हे या चळवळीसाठी धोकादायक आहे. धम्मक्रांतीला ते मारक आहे.
   …5…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील ज्या भूमीवर (दीक्षाभूमीवर) बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसोबत घेतली त्याच भूमीवर आज काहींनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. दीक्षाभूमी ही जागतिक क्रांतिभूमी आहे. या क्रांतीभूमिला ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ नावाचे शापित विकायला निघाले आहेत. क्रांतिभूमी दीक्षाभूमी ही आज राजकारणाचा बळी ठरलेली आहे. ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ नावाने केले जाणारे राजकारण आज बुद्ध आणि आंबेडकरी अनुयायांसाठी अतिशय क्लेशदायक आहे. देश विदेशातील लाखो करोडो बुद्ध आंबेडकरी अनुयायी अशोक विजयादशमीला या भूमीला नमन करून जातात. त्या लाखो करोडो बुद्ध आंबेडकरी अनुयायांनी या दीक्षाभूमीवरून जो संदेश घेऊन जायला पाहिजे तो अध्यापही त्यांना मिळू शकला नाही. अशोक विजयादशमीला आज दिवसेंदिवस यात्रेचे आणि जत्रेचे स्वरूप यायला लागले आहे. दरवर्षी होणा-या ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ च्या राजकीय कार्यक्रमात येणारी प्रतीक्रांतीवादी पाहुणे, नेते आणि राजकारणी कुठला संदेश या लाखो करोडो अनुयायांना देतात ? याचा दीक्षाभूमी स्मारक समितीने (गवई-फुलझेले) महोदयांनी केलेला दिसत नाही. आज धम्मक्रांतीची हीच क्रांतिभूमी दीक्षाभूमी प्रतीक्रांतीवाद्यांच्या काटेरी कुंपणाने बंधिस्त केली गेली आहे.
दीक्षाभूमीवर होणा-या महत्वपूर्ण अश्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व बुद्धिस्ट देशातील राष्ट्राध्यक्षांना व गणमान्य लोकांना बोलाविले जाने अपेक्षित आहे. तसेच जगातील विद्वतापूर्ण बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांच्याकडून जागतिक बुद्ध धम्माची वाटचाल याविषयी लाखो करोड लोकांना संदेश दिला जाने अपेक्षित आहे. तेव्हाच ही धम्मक्रांती आपले निश्चित ध्येय गाठू शकेल. परंतु असे न होता अगदी याउलट सर्व घडामोडी घडून येत आहेत. आर एस एस आणि भाजप शी संबंधित नेत्यांना बोलावून हिंदू प्रतीक्रातीवाद्यांकडून बुद्ध आंबेडकरी अनुयायांना संदेश दिला जातो हे कितपत योग्य आहे याचा विचार आता निदान समाजाने करावा. दीक्षाभूमीवरील क्रांती आणि हिंदू प्रतीक्रांतीवादी यांचा काय संबंध ? विरोधकांच्या हातात आयती कोलीत देऊन दीक्षाभूमी स्मारक समिती कुठल्या क्रांतीचा सोहळा साजरा करीत आहे ? या प्रश्नाच्या उत्तरात धम्मदीक्षेचे काटेरी कुंपण लक्षात घेण्यासारखे आहे. 
दीक्षाभूमीचे पावित्र्य आज दिसून येत नाही. आजघडीला दीक्षाभूमीवर चालना-या महाविद्यालयाच्या तारुण्य उन्माद वातावरणाने क्रांतीभूमिला घेरलेले आहे. दीक्षाभूमीची शांतता भंग झाली आहे. ही दीक्षाभूमी आज जागतिक क्रांतिभूमी कमी आणि महाविद्यालयाचे सायकल स्टैंड अधिक बनली आहे. दिवसेंदिवस या भूमीवर होणारे अवैध बांधकाम आणि त्यात होणारा आर्थिक व्यवहार धम्मक्रांतीला संपवीत चालला आहे. बाबासाहेबांनी याच भूमीवरून दिलेला शुद्ध बुद्ध विसरून दीक्षाभूमी स्मारक समिती प्रतीक्रांतीवादी बुद्ध याठिकाणी प्रस्थापित करू पाहत आहे. आणि बुद्ध परिवेश घेऊन धम्मक्रांती संपवू पाहणा-या प्रतीक्रांतीवाद्यांचा शिरकाव आज दीक्षाभूमीवर राजरोसपणे होऊ लागला आहे. बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीला घातक अशी कृती आज ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ च्या माध्यमातून केली जात आहे. आणि आंबेडकरी जनता निमुटपणे असहाय होऊन उघड्या डोळ्याने पाहत आहे.
अश्या विविध मार्गाने काटेरी कुंपणात अडकलेली धम्मदीक्षा/धम्मक्रांती आम्हाला सर्व मानव्यासाठी मुक्त करावी लागणार आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध आणि त्यांचा धम्म समाजात, व्यवहारात रुजवावा लागणार आहे. अनेक बाजूंनी होणारे आक्रमण परतवून लावून जागतिक पटलावर सुवर्णाक्षराने लिहिल्या गेलेल्या क्रांतीला आपल्या इप्सित ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी प्राणपणाने लढावे लागणार आहे. आतापर्यंत बुद्ध धम्मावर आणि धम्मक्रांतीवर पडलेली प्रतीक्रांतीची विषारी पाऊले उपटून फेकावी लागणार आहेत. बाबासाहेबांना अभिप्रेत शुद्ध बुद्ध जोपर्यंत आम्ही समाजापर्यंत पोहचवीत नाही तोपर्यंत धम्मचक्र गतिमान करता येणार नाही.

*************

Thursday, 13 September 2012

इस देश का असली दुश्मन ? मिडिया !


इस देश का असली दुश्मन ? मिडिया !

आज हमारे देश का पहला दुश्मन याह का मिडिया ही बन चुका है ! लोकतंत्र का चौथा स्तंभ कहकर दिंडोरा पिटने वाला मिडिया आज इस लोकतंत्र को ख़त्म करने पर तुला है ! देशद्रोहियोंको देशभक्त और देशभक्तोंको देशद्रोही बनाने का काम आज मिडिया कर रहा है ! जिसका नमूना आज के पत्रपरिषद में मैंने अजमाया है ! एक पत्रकार कहता है की "ब्लू फिल्म और पैसे लेकर सवाल करने वाले विधायक चलते है फिर ये तो (असीम त्रिवेदी, केजरीवाल) देश को दिशा देने का काम कर रहे है !"

मेरा जवाब यह था की, "क्या संविधान ने बोला था उन विधायको को ब्लू फिल्म देखने के लिए या पैसा लेने के लिए ! क्या इसके लिए संविधान जबाबदार था या मिडिया जबाबदार था ! जिन्होंने उनको चुनाव के समय में पैसे के बल पर हीरो बनाया ! फिर क्यों बार बार सिर्फ संसद और संविधान को ही टार्गेट बनाया जाता है !" उन पत्रकारों को यह तक मालूम नहीं था की कलम १२४ और ३०२ Indian Penal Code के अंतर्गत आती है या Constitution के अंतर्गत आती है ! ऐसी मीडिया और ऐसे पत्रकारों से आप और क्या अपेक्षा कर सकते है ? अगर हिन्दू देवी देवता को अपमानित किया जाता है तो उन्हें जलन होती है ! ये आगबबुला हो जाते है ! जिस हिन्दू देवी देवताओं पर श्रद्धा रखने वाला समूह सिर्फ हिन्दू धर्म वाला ही है !लेकिन भारत के संविधान के तहत तो हर वो व्यक्ति आता है जो खुद को इस देश का नागरिक समझता है ! जो नागरिक है ! फिर देश के हर नागरिक की श्रद्धा देश के संविधान और संसद पर है ! और उसका अपमान ये हर नागरिक के श्रद्धा को ठेंच पहुचना है ! फिर ऐसे समय में हिन्दू देवी देवता श्रेष्ठ या देश का संविधान जो सभी नागरिको के लिए लागु होता है ! जो किसी एक धर्म का नहीं है ! इसका जवाब कौन देगा ?

देखिये इस मिडिया के पिल्लू और चेलो की क्या औकात बन बन गई है ! जो देश के खिलाफ बोलेगा, जो देश के कानून के खिलाफ आवाज उठाएगा, जो संसद और संविधान पर कीचड़ उछालेगा वो इनके लिए हीरो लगता है ! अपनी जिम्मेदारी नैतिकता का पाठ मिडिया के माध्यम से नागरिको को पढ़ना छोड़ कर ये मिडिया वाले देशद्रोहियोंको पैदा कर रहे है ! जिनके वजह से ये खुद का पेट भर रहे है ! पैसा लेकर येही मिडिया वाले चुनाव के समय उन्ही विधायको को हीरो बनाते है ! और जब वक्त आता है देशद्रोहियोंके देशविघातक कारनामो का तो यही मिडिया विधायको को झिरो और देशद्रोहियोंको हीरो बनाता है !

आज इस मिडिया के वजह से ही देशद्रोहियोंके हौसले बुलंद होते जा रहे है ! इस देश का, इस लोकतंत्र का सबसे बड़ा दुश्मन यह मिडिया ही है ! जिसके खिलाफ आज जनता मूकदर्शक बनी बैठी है ! जब तक हम मिडिया की बेखौफ और घिनोनी हरकते युही सहते रहेंगे ! तबतक यह देश बर्बादी की तरफ बढ़ता चला जायेगा !

सच्चे देशभक्तों और संविधानप्रेमियों को बड़ी गहनता से इस बात पर सोचना होगा ! और अपनी रणनीति तय करना होगा ! इस देश को, देश के लोकतंत्र को बचाना होगा ! वरना हिन्दू धर्म के बगलबच्चे इस देश की आझादी ख़त्म कर अन्य धर्म के लोगो को खतरे में ला सकते है ! आओ मेरे भारतवासियों एक हो जाओ ! इस देश को बचाओ ! समाज को बचाओ ! खुद की स्वतंत्रता को बचाओ !
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर. ९२२६७३४०९१

Wednesday, 12 September 2012

देश अराजकतेच्या ज्वालामुखीवर उभा आहे.



  
 -:  प्रेस नोट  :-   

देश अराजकतेच्या ज्वालामुखीवर उभा आहे.
                                                                                                            दि. १३-०९-२०१२
     
     


विषय :- भारतीय संविधान, भारतीय व्यवस्था यांचा अपमान करून अंतर्गत सामाजिक सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणा-या सामाजिक विकृतींचा निषेध....
निवेदनकर्ते  :-  डॉ. संदीप नंदेश्वर, सामाजिक कार्यकर्ता आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक, नागपूर.

सन्माननीय भारताचे सर्व नागरिक आज अंतर्गत सामाजिक व राजकीय परिस्थितीने त्रस्त झाले आहेत. समता, संविधान, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, संसद, राजकारण अश्या विषयावर उठसूट आंदोलने केली जात आहेत. आणि या मूल्यांच्या संबंधाने देशविघातक वक्तव्य केले जात आहे. भारतीय संविधान आणि व्यवस्थेच्या संबंधाने काही असामाजिक तत्वांकडून समाजात दुषित वातावरण निर्माण केले जात आहे. या असामाजिक तत्वांचा त्यामागचा हेतू (षड्यंत्र) काय आहे हे आता हळूहळू प्रत्यक्षात दिसून येत आहे. समाजात अंतर्गत यादवी निर्माण व्हावी यासाठी काही असामाजिक तत्वांकडून संघर्षाची ठिणगी टाकली जात आहे. ज्यामुळे देशातील नागरिकांची सुरक्षितता आणि देशातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. देश आज अराजकतेच्या ज्वालामुखीवर उभा आहे. अश्या परिस्थितीत देशातील सुज्ञ नागरिक आणि भारत सरकार यांनी या घडणा-या घडामोडींकडे प्रकर्षाने लक्ष देऊन सतर्क राहणे गरजेचे आहे.
अलीकडेच असीम त्रिवेदी या अण्णा टीमच्या सदस्य युवकाने भारतीय संविधान, भारतीय संसद आणि राष्ट्रीय बोधचिन्ह अशोकस्तंभ यावर अपमानजनक असे व्यंगचित्र काढून अण्णा हजारे, केजरीवाल आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन यांनी केलेल्या मुंबई मधील आंदोलनात वितरीत केले. त्या त्रिवेदी यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला आहे. तो खटला संविधानातील तरतुदींना आणि कलमांना धरूनच भरण्यात आला होता. परंतु त्रिवेदी नावाच्या विक्षिप्त डोक्याच्या या युवकाला वाचविण्यासाठी केजरीवाल आणि त्यांचे अन्य साथीदार ज्या पद्धतीने रणकंदन माजवीत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होत आहे की भारतातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत.
संविधानिक मुलभूत अधिकारात कलम १९ (क) नुसार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले असले तरी संविधानाच्या कलम ५१ (क) नुसार मुलभूत कर्तव्य पण सांगितलेली आहेत. संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करतांना कुठल्याही नागरिकाला मुलभूत कर्तव्य प्रामुख्याने पार पडावे लागतात. मुलभूत कर्तव्यात सुरवातीलाच सांगितले आहे की संसद, संविधान आणि राष्ट्रीय चिन्हे व प्रतीके, स्मारके यांचा मान, सन्मान आणि सुरक्षा करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. असीम त्रिवेदी या विक्षिप्त युवकाने आपल्या मुलभूत कर्तव्याचे हनन केले आहे. त्यामुळे त्याची ही कृती दखलपात्र ठरते. नव्हे ती देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणारी कृती आहे. देशाच्या स्वातंत्र्याला आव्हान देणारी कृती आहे. सामाजिक स्वास्थ्य, शांतता आणि सुव्यवस्था भंग करणारी कृती आहे. आणि ती देशद्रोही या कक्षेत मोडणारी आहे. संविधानिक कलमानुसार आणि Indian Penal Code यानुसार पण तो अतिशय गंभीर गुन्हाच ठरतो. अश्याप्रकारे संविधान आणि देशातील प्रतिक चिन्हाचा अपमान करणा-या असामाजिक कृतींचा आम्ही निषेध करीत आहोत.
भारतीय संविधान आणि प्रतिक चिन्हांचा अपमान होत असतांनाही केजरीवाल आणि तत्सम इंडिया अगेन्स्ट करप्शन च्या तंबूत वावरणा-यांनी असीम त्रिवेदी यांचा गुन्हा देशद्रोह ठरू नये म्हणून प्रयत्न चालविलेले आहे. आणि त्यांच्या या दबावतंत्राला बळी पडून सरकारही त्यांच्यासमोर लोटांगण घालतांना दिसून येते. त्यामुळे सरकार जर अश्या असामाजिक तत्वांना, देश विघातक कृती करणा-या लोकांना आणि देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणणा-या लोकांच्या दबावापुढे झुकत असेल तर अश्या परिस्थितीत सरकारच्या कृतीचापण आम्ही जाहीर धिक्कार करू.
मुळात आज अनेक स्तरातून देशाची शांतता, सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून अण्णा आणि केजरीवाल टीम ने मागील २ वर्षापासून या देशात चालविलेले आंदोलन आहे. भ्रष्टाचार हा देशातल्या कुठल्याही माणसाला नको आहे. परंतु भ्रष्टाचारासारख्या भावनिक मुद्द्यांचा वापर करून जर या देशातल्या संविधानाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते या देशातल्या सुज्ञ नागरिकांना कदापि मान्य नाही. भ्रष्टाचारासाठी (कर्तव्यातील कसूर आणि अधिकारातील उदासीनता यामुळे) या देशातल्या संविधानाचा बळी दिला जात असेल तर तो आम्हाला कदापि मान्य नाही.  व्यवस्था परिवर्तन किंवा राजकीय परिवर्तन व्हावे परंतु संविधानाचा बळी देऊन नाही. किंवा जातीवादी/धार्मिक (हिंदुत्ववादी किंवा मनुवादी) मानसिकतेतून नाही. पण मुळात अलीकडे चालविण्यात येणारी आंदोलने या संविधानाचा बळी घेणा-याच दिसून येत आहेत.
महाराष्ट्रात अलीकडे राज ठाकरे यांनी प्रांतिक वाद निर्माण केला होता. ज्यामुळे मराठी माणसे विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष उभा झाला. जे की मुळात भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारालाच नाकारले जात होते. ही कृती पण भारतीय संविधाच्या आणी देशातील अंतर्गत स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारी होती. गेल्या महिन्यात याच राज ठाकरे ने मुस्लीम विरुद्ध दलित अशी संघर्षाची ठिणगी जाहीर सभेतून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि आता तर दादर, मुंबई येथील इंदू मिल च्या जागेवर होणा-या प्रस्तावित आंबेडकर स्मारकावर उठसूट अकलेचे तारे तोडून दलित समाजाच्या/ आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. अश्या या राज ठाकरे नावाच्या राजकीय बाळबोध नेत्यावर सुद्धा देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा. राज ठाकरेच्या अश्या असामाजिक आणी असंवैधानिक कृतीचा सुद्धा आम्ही सुज्ञ भारतीय जनता निषेध करीत आहोत.
८ सप्टेंबर २०१२ ला नागपूर येथे "भारतीय संविधानातील समतेची संकल्पना" या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्या परिसंवादात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील सन्माननीय न्यायमूर्ती प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीक्रीष्णा यांनी "समता" वेद आणि उपनिशदातून घेण्यात आली आहे. असे वक्तव्य केले तर दुसरे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.एम. शाह हे म्हणाले की "समता" ही मनुस्मृतीमधून घेण्यात आली आहे. सन्माननीय न्यायाधीश असे जर वक्तव्य करीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे ? त्यामुळे या न्यायाधीशांच्या वक्तव्यांचा सुद्धा आम्ही निषेध करीत आहोत. संविधानातील समता हे तत्व आणि या न्यायाधीशांच्या वक्तव्यातून आलेली समता यात कुठेही तिळमात्र संबंध नसतांना असे वक्तव्य एका विशिष्ट उद्देशाने केले जात आहे ही शंका बळकट होते.
Hindu Law ने वेद, उपनिषदे आणि मनुस्मृतीला महत्व दिले असेल. Hindu Law हा व्यक्तिगत पातळीवर असेल पण त्यामुळे Constitutional Law तील तरतुदींची गफलत करणे चुकीचे आहे. हिंदू कायदा हा हिंदू समूहासाठी लागू होणारा असला तरी संविधानिक कायदा हा या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आहे. ज्यामुळे संविधानिक कायद्यातील "समता" या तत्वाला धार्मिक कायद्यात गुंफण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आणि देशाच्या संविधानिक तत्वांना काळिमा फासणारा आहे. संविधानातील "समता" तत्व हे वैश्विक पातळीवर मानवतावादी कायद्यातून घेण्यात आले आहे. त्याचा या हिंदू धर्मातील ग्रंथांशी काहीही संबंध नाही.
या सर्व घटना घडामोडींचा विचार केला तर असे दिसून येते की अतिशय शिस्तबद्ध रीतीने या देशातील "धर्मनिरपेक्ष" आणि "समता" तत्वाला अव्हेरून एकंदरीत संविधानाने दिलेले "भारतीयत्व" नाकारले जात आहे. कुठल्याही देशाचे स्वातंत्र्य हे त्या देशातील संसदेच्या सार्वभौमत्वावर निर्भर असते. आज देशाचे सार्वभौमत्व हे अश्या असामाजिक तत्वांच्या कृतींनी धोक्यात आले आहे. ज्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात येतांना दिसून येत आहे.
अश्या परिस्थितीत भारताची आणि भारतीय नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही पुढील काही मागण्या करीत आहोत....
१.                             संसदीय प्रतीके आणि राष्ट्रीय आयुधे यांच्याविरुद्ध गदारोळ करणा-यावर सक्त कार्यवाही करण्यात यावी.
२.                             संविधान, संसद आणि राष्ट्रीय चिन्ह व स्मारक या देशाच्या प्रतीकांचा अपमान करणा-यांना देशद्रोही घोषित करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी.
३.                             असामाजिक तत्वाच्या समोर सरकारने न झुकता त्यांचा खंबीरतेने प्रतिकार करावा. अश्या असामाजिक तत्वाचे जाळे पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
४.                             प्रांतिक वाद निर्माण करून नागरिकांच्या मुलभूत अधिकाराला खंडित करण्याचा प्रयत्न करणा-यांवर कार्यवाही करावी.
५.                             धार्मिक आणि जातीय अश्या प्रकारचे वक्तव्य करणा-या न्यायाधीशांवर नियंत्रण ठेवावे. व सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
६.                             समता, आरक्षण, धर्मनिरपेक्षता अश्या संवैधानिक मुलतत्वांविरुद्ध कृती करणा-यावर नियंत्रण मिळवावे. तसेच त्यांच्यावर कार्यवाही करावी.
७.                             काही असामाजिक तत्वांकडून देशाच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांच्यावर सरकारले त्वरित नियंत्रण मिळवावे.
८.                             असीम त्रिवेदी या विक्षिप्त डोक्याच्या व्यंगचित्रकारावर लावण्यात आलेला देशद्रोहाचा खटला मागे घेण्यात येऊ नये.
९.                             अरविंद केजरीवाल हे असीम त्रिवेदी सारख्या देशद्रोह्याला पाठीशी घालून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही देशविघातक कृत्य करणा-यांना पाठींबा देण्याच्या सबबीवर मौक्का कायद्याच्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी.
१०.                        असीम त्रिवेदी सारख्या देशविघातक कृत्य करणा-या विरोधात कायदेशीर लढाई लढणाऱ्या अमित कतारनवरे या तरुणाला पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे.
११.                        देशविघातक कृत्यात समाविष्ट असणा-या अन्य सर्वं व्यक्ती, संस्था, संघटनांवर कठोर कार्यवाही करावी. तसेच असे कृत्य करणा-यांना प्रोत्साहन देणा-यांवर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून अन्य कुणीही अश्या प्रकारची कृती करायचे धाडस करणार नाही.
१२.                        संसदीय आणि कायद्याची संस्कृती समाजात आणि नागरिकात रुजविण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न व्हावे व त्यासाठी त्वरित कृतीकार्याक्रमाची आखणी सरकारच्या माध्यमातून करण्यात यावी.
इ. मागण्यांसह हे प्रसिद्धीपत्रक समाज, नागरिक आणि सरकार यांच्या माहितीस्तव देण्यात येत आहे. यावर नागरीकातून, समाजातून आणि सरकारी स्तरातून चर्चा व्हावी आणि देशविघातक अश्या कृतीवर त्वरित आला घालता यावा असा आमचा शुद्ध हेतू आहे. देशाचे स्वातंत्र्य, नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य, सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी अशीच अपेक्षा आहे. यावर त्वरित विचार व्हावा. अन्यथा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. आणि संविधानप्रेमी जनता रस्त्यावर उतरून स्वतःच्या हक्क व अधिकार सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करतील. अश्या वेळेस असंवैधानिक कृत्य करणारे आणि संविधान प्रेमी याच्यात संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. व त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.
वरील सर्वं विवेचनावर आणि मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हावा. ही अपेक्षा.
धन्यवाद !
दि. १३-०९-२०१२
                      निवेदनकर्त्यांची नावे                                                                   स्वाक्षरी
1.   ……………………………………………….                                  ……………
2.   ……………………………………………….                                  ……………
3.   ……………………………………………….                                  ……………
4.   ……………………………………………….                                  ……………
5.   ……………………………………………….                                  ……………
6.   ……………………………………………….                                  ……………
7.   ……………………………………………….                                  ……………
8.   ……………………………………………….                                  ……………
9.   ……………………………………………….                                  ……………
10.            ……………………………………………….                                  ……………
11.            ……………………………………………….                                  ……………
12.            ……………………………………………….                                  ……………
13.            ……………………………………………….                                  ……………
14.            ……………………………………………….                                  ……………
15.            ……………………………………………….                                  ……………
16.            ……………………………………………….                                  ……………
17.            ……………………………………………….                                  ……………
18.            ……………………………………………….                                  ……………
19.            ……………………………………………….                                  ……………
20.            ……………………………………………….                                  ……………

Tuesday, 11 September 2012

ये देश कौन चला रहा ?


ये देश कौन चला रहा ?

आज भारत देश एक सामाजिक व्यवस्थात्मक ज्वालामुखी पर खड़ा है ! आज समाज मन में जहरीली नफरत इस व्यवस्था के प्रति भरी जा रही है ! व्यवस्था परिवर्तन के नाम से तो कोई राजनैतिक परिवर्तन के नाम से लोगो में जहर भर रहे है ! चारो तरफ बस इस समाज को एक जड़ से उखाड़ने की कोशिश हो रही है ! हर तरफ नफ़रत पैदा कर देश में सामाजिक अंतर्गत संघर्ष की नीव रखी जा रही है ! इसके कई उदाहरण प्रतिदिन सामने आ रहे है !

असीम त्रिवेदी नाम के विक्षिप्त मानसिकता के इस दुर्बल मानसिक रोगी ने संविधान, देश का राष्ट्रध्वज और राष्ट्रचिंन्ह का कार्टून बनाकर अपमान किया है ! जहा देश की धरोहर, देश का सन्मान, देश के प्रतिको का सन्मान करना देश के हर नागरिक का प्रथम कर्त्तव्य है ! वही इस मानसिक रोगी ने देश के सभी मानद चिन्हों को इस कदर बदनाम किया है मानो वह एक खिल्लोंना हो ! इसके खिलाफ जनहित याचिका दायर करने के बाद जब इसे देशद्रोही साबित किया जाता है तो अरविन्द केजरीवाल जैसा इस देश का महारोगी उठ कर उसके समर्थन में खड़ा होकर फिर एक बार इस देश की इमान को बेंच खाता है ! इस महारोगी अरविन्द केजरीवाल के कम्पू ने इस देश को बर्बाद करने की कसम खाई है तभी प्रतिदिन इन कम्पू में बने केजरीवाल और त्रिवेदी जैसे लोग इस देश को खौकला बनाने का प्रयास कर रहे है ! यह उन लोगो के लिए काफी शर्मनाक है जो इस देश के नागरिक होने के बावजूद केजरीवाल के कम्पू में जाकर देश के विर्रुद्ध की जाने वाली गतिविधियों में शामिल हो रहे है !

आये दिन देश का संविधान कितना गलत है ? इस देश की व्यवस्था कितनी गलत है ? और केजरीवाल जैसे महारोगी, मानसिक दुर्बल लोग देश के नायक है ? ये जताने का प्रयास किया जा रहा है ! जिस देश में आज तक सभी नागरिको में बंधुता बनायीं रखी ! जिस संविधान ने आज तक देश के हर नागरिक को उसका हक़ और अधिकार दिलाया जिसे इन जैसे लोगो ने कभी भी नहीं स्वीकार ! यही कारन है की आज यह लोग इस संविधान और इस क़ानूनी व्यवस्था को तोड़ने में लगे है !

असीम त्रिवेदी अगर हमारे देश के सन्मान चिन्ह को अपमानित करता है तो वह देशद्रोह ही है ! संविधान के कलम ५१ (क) के तहर मुलभुत कर्त्तव्य के खिलाफ की गई यह घ्रुनास्पद कृत्य है ! जो देशद्रोह की कक्षा में ही आता है ! अगर देश के नागरिक अभिव्यक्ति स्वतंत्रता के अंतर्गत मौलिक अधिकारों का निर्वहन कर रहे है तो मौलिक कर्त्तव्य का दमन नहीं होना चाहिए ! मौलिक कर्त्तव्य को सचेत रूप से स्वीकार कर के उसका भी निर्वहन होना चाहिए ! लेकिन लगता है की यह सभी केजरीवाल कम्पुवादी लोग इस देश के किसी भी कायदे या कलम को नहीं मानते ! वरना वो यह नहीं कहते की, देशद्रोह का कानून ब्रिटिश काल का था ! इतनी घटिया दलील केजरीवाल कम्पू से आना यह साबित करता है की यह पूरा कम्पू इस देश को बर्बाद करने के लिए बेताब है ! हमें सोचना होगा ?

उधर महाराष्ट्र धर्म की अपील करने वाला अ-राजकीय आतंकवादी राज ठाकरे असीम त्रिवेदी की सुरक्षा में खड़ा हुआ है ! और देशद्रोह का खटला असीम त्रिवेदी पर नहीं लगाया जाये ऐसी दलीले दे रहा है ! जो राज ठाकरे महाराष्ट्र के मराठी लोगो के लिए गले की हड्डिया तोड़ कर बिहारी और अन्य प्रदेश के नागरिकोंका महाराष्ट्र में जीना हराम कर रहा है वही राज ठाकरे आज एकदम असीम त्रिवेदी इस अ-महाराष्ट्रियन, अ-मराठी के लिए देशवाशी कैसे बन गया यह एक बड़ा सवाल आज पैदा हुआ है ? यह बड़ी ही सोची समझी रणनीति के तहत हो रहा है ! राज ठाकरे, महारोगी केजरीवाल और त्रिवेदी यह एक ही कड़ी है ?

आये दिन समता के तत्व पर, संविधानिक अधिकारों पर, आरक्षण पर सवाल खड़े किये जा रहे है ! तत्कालीन कायदे कानून ब्रिटिशकाल के है ऐसी बेतुकी दलीले देकर समाज को भड़काया जा रहा है ! समाज की सुरक्षा खतरे में है ! समाज में अंतर्गत युद्ध के परिस्थितिया पैदा की जा रही है ! समाज की शांतता और सुव्यवस्था को ख़त्म किया जा रहा है ! और जब भी इनपर क़ानूनी कार्यवाही हो तो दंगे फसाद कराकर देश के अन्य नागरिको के जान. माल और सुरक्षा को खतरे में डाला जा रहा है !

इन सब गतिविधियों को रोका जाना जरुरी है ! जिसके लिए ----\
१) केजरीवाल, राज ठाकरे और त्रिवेदी जैसे अन्य लोगो पर देशद्रोह के खटले लगाकर फांसी पे चढ़ाना चाहिए !
२) संविधान, कानून अन्य प्रतिको को बदनाम करने वाले किसी भी व्यक्ति के ऊपर सक्त से सक्त कार्यवाही की जानी चाहिए !
३) अगर सरकार ऐसे लोगो की गतिविधियों पर रोक नहीं लगा सकती तो यह स्पष्ट है की सरकार भी इन सब घटनाओमे शामिल है और जनता को धोका दे रही है !
४) सरकार ने ऐसे लोगो पर सक्त कदम उठाते वक्त थोड़ी भी कसर नहीं छोड़नी चाहिए !
५) इन जैसे देशद्रोहियों के कारन देश में सामाजिक संघर्ष की नीव रखी जा रही है ! जिसके काफी अमानवीय परिणाम समाज को भुगतना पड़ सकता है ! इसलिए इन्हें जल्द से जल्द रोका जाना चाहिए !

भाइयो हम इस देश के नागरिक है ! हमारा दायित्व भी कुछ बनता है की आज इन जैसे देशद्रोहियोंकी असली पहचान समाज के सामने लाये ! इन जैसे लोगो को रोके ! इन जैसे लोगो के हौसले हमारी चुप्पी के कारन बुलंद होते जा रहे है ! इन्हें रोकना हमें जरुरी है ! वरना यह लोग फिर एक बार हमारे स्वतंत्र देश पर जातिगत-धार्मिक गुलामी लादना चाहते है ! हमें इसे रोकना होगा ! अपने साथ साथ हम जिस समाज में रहते है उस समाज की भी सुरक्षा इन जैसे दरिन्दगो से करनी होगी ! देश की सुरक्षा करनी होगी ! अरविन्द केजरीवाल, राज ठाकरे और असीम त्रिवेदी जैसे लोगो के मुंह पर कालित पोतनी होगी ! उन्हें समाज से बेदखल कर देशद्रोह के आरोपों में और समाज की सुरक्षा व्यवस्था को विचलित करने के आरोप में फांसी देने की मांग भी करनी होगी ! अब हमें हमारी चुप्पी तोड़नी होगी ! अब हमें हमारी नींद से जागकर देश को बचाने के लिए ऐसे दरिंदो को कुचलना होगा !

---जय भारत---जय भारत----जय भारत-----
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

निखील वागले या देशद्रोह्यालाच आधी फासावर लटकवा !


निखील वागले या देशद्रोह्यालाच आधी फासावर लटकवा !

निखील वागले हा या देशातील मिडिया च्या नावाखाली नवा देशद्रोही बनत चालला आहे...आणि देशद्रोही बनण्यासाठी विक्षिप्त डोक्याच्या लोकांना प्रोत्साहित करीत आहे...यालाच आधी रस्त्यावरच्या खांबाला लटकावून मारा...या देशद्रोह्यालाच आधी फासावर लटकवा !

खरे तर आज इथल्या मिडिया ने RSS आणि VHP कडून संविधानाची सुपारी घेतली आहे. इथल्या लोकशाहीला आणि प्रातिनिधिक संसदीय व्यवस्थेला हद्दपार करण्याचा विडा मिडिया ने उचललेला आहे. खरेतर आज निश्चितच इथल्या मिडिया लाच उद्ध्वस्थ करण्याची वेळ आली आहे. अन्यथा हा मिडिया या देशाला गुलामीत टाकल्याशिवाय राहणार नाही. इथला मिडिया इथल्या काही कट्टरपंथीय संस्था संघटनांना हाताशी घेऊन हुकुमशाही व्यवस्था आपल्या हातात घेऊन पाहत आहे....लवकर डोळे उघडा....लोकशाही प्रेमींनो जागे व्हा !...मिडीयाचा कुठील डाव हाणून पाडा.... 

मिडिया आता पूर्णपणे मनुवाद्यांच्या हातातील बहुला बनला आहे. याला वेळीच आवर घातले नाही तर देश धोक्यात येईल. जनतेची सुरक्षितता धोक्यात येईल.

हा मिडिया कौन चालवत आहे ? या मिडिया चे पोट कौन भरत आहे ? आमच्याच पैशावर हा मिडिया पोसला जात आहे. कुठल्या मिडिया ला आम्ही सोडायचे ? आणि नवीन मिडिया काढायचा ? अरे ज्या मिडिया ला आम्ही पोसत आहोत तो मिडिया आमचे खातो आणि मनुवाद्यांचे काम करतो.  या मिडियाचे मुसके बांधल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आमचा स्वतःचा स्वतंत्र मिडिया काढू तेव्हा काढू पण आधी या मीडियाची मालकी घेऊन बसलेल्या देशद्रोही हरामखोरांची डोके ठेचल्याशिवाय राहणार नाही. 

Saturday, 1 September 2012

उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे.


उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे.

आंबेडकरी चळवळीला समजून घेतांना आमची काहीतरी गल्लत होत आहे. आणि आजपर्यंत ती झाली आहे. त्यामुळे या चळवळीला निश्चित असा मार्ग पकडता आला नाही. किंवा त्या मार्गावर संचलित होता आले नाही. राजकारण हेच अंतिम ध्येय गृहीत पकडून आम्ही मार्गक्रमण करू शकत नाही. आणि तसा उद्देश घेऊन आम्ही चळवळीला मार्गक्रमित केले तर समाज विनाकारण भरडला जातो. हे आतापर्यंतच्या वाटचालीवरून अनुभवायला आले आहे. आंबेडकरी चळवळीचे अंतिम ध्येय हे सत्ता होऊच शकत नाही. शिवाय ज्या तत्वज्ञानावर ही चळवळ उभी आहे त्या तत्वज्ञानाचा सत्तेशी तिळमात्र संबंध येत नाही. जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीला राजकारणाच्या ध्येय आणि उद्धीष्ठात गोवल्या गेले तेव्हा तेव्हा समाजात दुफळी माजली. फाटाफूट घडून आली. आपल्याच समाजबांधवांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले. अगदी पराकोटीच्या टोकाला जाण्याइतपत...

बहिष्कृत समाजाचा प्रश्न हा सामाजिक आहे तितकाच तो मानव्यिक आहे. आर्थिकता हे त्याच्या पायथ्याशी असले तेरी समाजातला उच्चनीच भाव या समाजाला छळतो आहे. त्यामुळे सामाजिक ध्येय घेऊन मानवी कल्याणासाठी लढा उभारणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. हे आंबेडकरी चळवळीचे सूत्र आम्ही अंगीकारणे कधीही लाभदायकच ठरेल. कायद्याने मिळेल तेवढे घेऊन समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ता असो अथवा नसो कल्याणकारी जगणे हेच आमचे मुलभूत अधिकार आहे. आणि तशी परिस्थिती निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आज भारतीय समाजात प्रत्येकच समाजाजवळ सत्ता आहे. असे कुणीही व्यवस्थावादी माणूस म्हणू शकणार नाही. सत्ता आणि व्यवस्थेचा अभ्यास करणारे अभ्यासकही आमच्या मताशी सहमती दर्शवतील. व्यवस्थेतील "सह्भागीत्व" आणि "सत्ता" या दोहोंत मोठी तफावत आहे. सहभागीत्वाची संकल्पना ही लोकशाहीला बळकटी प्रदान करते. तर "सत्ता" ही संकल्पना हुकुमशाहीला, अराजकतेला आमंत्रण देते. आंबेडकरी समूहाने आतातरी याचा नीट विचार करणे आत्यंतिक गरजेचे आहे.

आज ज्या समस्यांना आंबेडकरी समूहाला सामोरे जावे लागत आहे. त्या समस्या इतर समाजाला भेडसावतांना दिसत नाही. कारण इतर समाजाने व्यवस्थेतील सहभागीत्वाला महत्व दिले. आणि तत्कालीन आंबेडकरवादी (मुळात आंबेडकरी नसलेले) नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाची स्वप्ने बघितली. त्याला बळी पडून काही आंबेडकरी नेत्यांनीसुद्धा मंत्रिपद आणि तत्सम खुर्चीचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्या या कृतीने समाजाची व चळवळीची वाताहत होत आहे. हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. १९८० च्या दशकानंतर मानवी कल्याणासाठी लढणारी आंबेडकरी चळवळ "सत्ता" संकल्पनेभोवतीच मर्यादित झाली. आंबेडकरी चळवळीने आपला मोर्चा "सत्तेकडे" वळविल्याने समाज सर्वच पातळ्यांवर माघारू लागला. यावर सद्सदविवेक बुद्धीने चिंतन आणि मनन होणे आज गरजेचे आहे.

समाज एकसंघ राहील; नेते संघटीत राहीतील अश्या परिस्थितीत मानवी कल्याणाची निदान समाधानकारक पातळी गाठता आली तरी सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचता येईल. याचा विचारच कधी झाला नाही. सर्व गणिते व्यक्तिगत मान-सन्मान आणि सत्तेच्या लालसेनेच मांडल्या गेले. त्यामुळे सामाजिक समीकरणे कधी सोडवलीच गेली नाही. आज एक आशेचा किरण दिसतो आहे. निदान या "सत्तावादी" स्वप्नवलयातून काही उच्चशिक्षित तरुण बाहेर पडू लागली आहेत. आणि चळवळीच्या मुळाशी असणा-या तत्वज्ञानाच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या या आंबेडकरी नवतरुण पिढीने तरी आंबेडकरी चळवळीतील मानवी कल्याणाचे ध्येय उराशी बाळगून असले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या चळवळीच्या अंगांना बळकटी प्रदान करण्यासाठी काम केले पाहिजे. आणि तद्सोबतच अलीकडे आलेल्या धम्मातील प्रदूषणाला दूर करून बुद्ध तत्वज्ञानाला आंबेडकरी परिप्रेक्षातून पुर्नगठीत केले पाहिजे.

सत्ता ही तत्कालिक असते. ती कायम हातात राहील हे जगातल्या कुठल्याही समूहासाठी शक्य नाही. परंतु एकदा सत्ता हातून गेली की माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्तेच्या ऐश्वर्यासाठी नेते अश्लाघ्य, तत्वशून्य, स्वाभिमानशून्य तडजोडी करायला लागतात. आणि वेळप्रसंगी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात. पण मानवी कल्याण हे चिरंतन असते. समाजाच्या हिताचे असते. मानव्यिक विकासाला पूरक असते. या सर्व घटना घडामोडीचा अनुभव आंबेडकरी चळवळीने घेतला आहे. या सर्व अनुभव संपन्नतेच्या बळावरच आम्हाला सद्यकालीन आंबेडकरी चळवळीची आचारसंहिता बनवावी लागणार आहे. हे आम्ही करू शकलो तर उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे. आंबेडकरी चळवळीतील ध्येय आणि उद्धिष्टांची पूर्ती नव नेतृत्वाच्या बळावर होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही.

कल धरती और सूरज के बिच चाँद आया था !
पर काफिला कभी रुका नहीं !
आज न वो चाँद आएगा न अँधेरा तुम्हारे बिच में,
ये उस बाबासाहब जैसे विचारसूर्य का काफिला है !
जो अँधेरे को चीरकर रोशनी से कभी छुपा नहीं !

----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.